BREAKING NEWS
latest

देश-विदेश

featured/block-3

महाराष्ट्र

featured/block-3

ठाणे

featured/block-1

नवी मुंबई

featured/block-3

वसई विरार

featured/block-6

पालघर

featured/block-3

कल्याण-डोंबिवली

featured/block-2

उल्हासनगर-अम्बरनाथ-बदलापुर

featured/block-3

अन्य जिले

featured/block-4

Latest Articles

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये अवघे गर्जले पंढरपूर, विठू नामाच्या घोषाचे दुमदुमले सूर..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

डोंबिवली : 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे अहोभाग्यच म्हणावे लागेल की आज देवशयनी एकादशी, शुक्ल आषाढ यादिवशी विद्यार्थ्यांच्या रूपात साक्षात पांडुरंग रुक्मिणीच जणू काही 'जे एम एफ' मंडपम मध्ये अवतरले होते. मोठ्या संख्येने वारकरी होऊन आलेले जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळेचे आणि विद्यामंदिराचे विद्यार्थी संत मंडळीची मांदियाळीच जणू अवतरली होती.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे व इतर मान्यवरांनी विठल रखुमाई आणि पालखी मधील संत ज्ञानेश्वरांची विधीवत पूजा करून पालखी प्रस्थान सोहळा सुरू झाला. सर्वच मुलांनी विठूचा गजर करत, टाळ मृदूंगाचा घोष करत पालखी प्रस्थान सोहळ्यांमध्ये सामील झाले.  
इयत्ता तिसरी व पाचवी मधील विद्यार्थ्यांनी संगीत शिक्षिका सौ. श्रेया कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी.. हा अभंग सादर केला. त्याच बरोबर शिशुविहार व पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य शिक्षिका दीपाली सोलकर व सर्व शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली रिंगण सोहळा संपन्न केला तर नाट्य विभागाचे शिक्षक श्री. प्रमोद पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली संत गोरा कुंभार नाटक छोट्या बाळ गोपाळ यांनी सादर केले. 
विठ्ठलाचे बाह्यरुपी वर्णन करताना संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सांगितले की, विठ्ठल हा रंगाने सावळा आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे, कानामध्ये मकर कुंडले आहेत असे  विठ्ठलाचे सात्विक रूप बघताना आपला अहंपणा अलगद निसटून जातो तर अंतर्रूप पाहताना निस्सिम त्यागाची भावना जाणवते, आणि आज असे हे सावळे, सुंदर, मनोहर  वाटणारे तुमचे रूप बघून साक्षात बालरूपातले विठ्ठल 'जे एम एफ' मंडप्पम मध्ये अवतरले आहेत असेच वाटत आहे. असे उद्गार काढून सर्वांना देवशयनी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.
देवशयनी एकादशी म्हणजेच आजपासून पांडुरंग चार महिने निद्रावस्थेत जातात, त्यावेळी पुढचे आठ महिने इतर देवगण संसाराचा कारभार चालवतात, हेच एक उत्तम उदाहरण तुमच्या सर्वांसाठी आहे की आपण आपल्या शाळेचा, आपल्या वर्गाचा एक भाग आहोत, वर्गप्रतिनिधी उपस्थित नसला तरी ती तुम्हा सर्वाची जबाबदारी आहे की वर्गाला शिस्तबद्ध ठेवणे आणि सहकार्य करणे. आज ही संतांची मांदियाळी बघून खऱ्या अर्थाने पांडुरंग आपल्या भेटीसाठी आला आहे असे जाणवत आहे, असे उद्गार संस्थेच्या सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी काढले व सर्वांना शुभेच्छा दिल्या. श्री.नरेश पिसाट, श्री.अवधूत देसाई, श्री.विठ्ठल कोल्हे यांनी हुबेहूब विट्ठल रुक्मिणी मंदिराची प्रतिकृती उभी केली, व समोरच तुळशी वृंदावन देखील तयार केले. 

"याची देही, याची डोळा पाहिला माऊलींचा रिंगण सोहळा.."


विठ्ठलाच्या नामघोषात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात, फुगड्या खेळत माऊलींचा पालखी सोहळा संपन्न झाला. प्रसाद सेवन करून पुन्हा एकदा सर्व पालक, शिक्षक, विद्यार्थ्यांनी विठ्ठलाचा नामघोष करून सोहळ्याची सांगता झाली.

पुढील ५ वर्षांत कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी अतिरिक्त ₹२५,००० कोटींची गुंतवणूक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

पंढरपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पंढरपूर येथे महाराष्ट्र शासन व कृषी उत्पन्न बाजार समिती, पंढरपूर यांच्यावतीने आयोजित ‘कृषी पंढरी’ या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उदघाटन संपन्न झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, दरवर्षी आषाढी वारीच्या निमित्ताने राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांचा आणि शेतकरी बांधवांच्या मुक्कामाचे एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती, पंढरपूर. येथे शेतकरी बांधवांना एकाच ठिकाणी कृषी क्षेत्रात विकसित होत असलेले अद्ययावत तंत्रज्ञान, संशोधन, नव्या शेती पद्धती तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित राज्य शासनाच्या सर्व योजनांची माहिती मिळावी, या उद्देशाने या कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जात आहे. शेतीतील विविध यशस्वी प्रयोग, फलोत्पादन पद्धती, उत्पादन वाढविण्यासाठीचे संशोधन, माती परीक्षणापासून ते कापणीपर्यंतच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती या कृषी प्रदर्शनातून मिळते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. गावांमध्ये संपूर्ण कृषी व्यवस्थापन करून अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा देण्याचा प्रयत्न नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून होत आहे. दरवर्षी ₹५००० कोटीप्रमाणे, पुढील 5 वर्षांत ₹२५,००० कोटींची अतिरिक्त गुंतवणूक कृषी क्षेत्रात करण्यात येणार आहे. तसेच, शेतकरी बांधवांना दिवसा १२ तास वीज देण्यासाठी सौर ऊर्जेवर आधारित वीजनिर्मितीचे काम सुरू झाले असून, या योजनेत सोलापूर जिल्हा अग्रेसर आहे. गावांतील बहुद्देशीय सोसायट्यांना १८ प्रकारचे व्यवसाय करण्यास परवानगी देण्याची व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. 

या प्रसंगी प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधितांचे अभिनंदन केले. यावेळी मंत्री ऍड. माणिकराव कोकाटे, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री जयकुमार रावल, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

वारकरी सेवेचे नवे ‘बेंचमार्क’ राज्य शासनाकडून प्रस्थापित..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पंढरपूर येथे ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाद्वारे आयोजित ‘निर्मल दिंडी’ उपक्रमाचा समारोप करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आपल्या सर्व संतांनी निसर्गप्रेम आणि स्वच्छतेचा संदेश दिला आहे. तसेच नद्यांवर प्रेम करायला शिकवले आहे. ‘निर्मल वारी’ उपक्रमाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊलींचा हा संदेश प्रत्यक्षात उतरवण्याचे कार्य आपण करत आहोत. दरवर्षी मोठ्या संख्येने राज्यभरातून वारकरी, देहभान हरपून भगवान विठ्ठलाच्या चरणी लीन होण्यासाठी पंढरपूरात येतात. वर्षानुवर्षे आवश्यक अश्या स्वच्छतेच्या सेवा उपलब्ध नसल्यामुळे वारी मार्गावर आणि पंढरपूर शहरात वारीनंतर कचऱ्याची मोठी समस्या निर्माण होत असे. २०१८ साली या समस्येच्या अनुषंगाने ‘निर्मल वारी’ उपक्रम सुरु करण्यात आला.

या उपक्रमाच्या माध्यमातून पालखींच्या मुक्कामाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने शौचालयांची व्यवस्था राज्य शासनाने केली. त्यामुळे यावर्षी आपली वारी अधिक स्वच्छ, म्हणजेच ‘निर्मल’ झालेली आहे. स्वच्छतेत वाढ झाल्याने महिला वारकऱ्यांची संख्या देखील वाढलेली दिसून येत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. ‘निर्मल वारी’ उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ग्रामविकास आणि आरोग्य विभागाच्या सर्व संबंधितांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले. याप्रसंगी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या ‘चरणसेवा’ उपक्रमाचे तसेच राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून महिला सेवेच्या उपक्रमाचेही मुख्यमंत्री यांनी कौतुक केले. यावेळी मंत्री ऍड. माणिकराव कोकाटे, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते

यंदाचा आषाढी एकादशीला डिजिटल वारीचा ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते नवीन उपक्रमाचा शुभारंभ..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : दि ६ रोजी विवियाना मॉल, ठाणे येथे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या डिजिटल वारी या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे, डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त, ठाणे यांच्या हस्ते करण्यात आला.
सदर डिजीटल वारी मध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या सोशल मिडीयावरील व्हॉट्सऍप, फेसबुक, इंन्स्टाग्राम, X (ट्वीटर) व वेबसाईट या सोशल मिडीया चॅनल चे क्युआर कोड नागरिकांसाठी सुरू करण्यात आले. या कार्यक्रमास मराठी सिनेअभिनेता हार्दिक जोशी, मंगेश देसाई, गौरख मोरे आणि सिनेअभिनेत्री अक्षया देवधर हे देखील उपस्थित होते.

'जन गण मन' कॉन्व्हेन्ट शाळा, दावसा येथे दहावी, बारावी नंतर विद्यार्थांना करियर मार्गदर्शन व कौतुक सोहळ्याचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

नागपूर - इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये कोणते क्षेत्र निवडावे यासाठी गोंधळून न जाता योग्य मार्गदर्शन लाभण्यासाठी 'जे एम एफ' शिक्षण  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांचे मार्गदर्शन शिबिर जन गण मन कॉन्व्हेन्ट, दावसा, ता. नरखेड शाळेमध्ये आयोजित केले होते.
'जान्हवीज मल्टी फाऊंडेशन' शिक्षण संस्थेचे हे वर्ष म्हणजे मुंबई आणि नागपूर (दावसा) येथे कार्यरत असलेल्या संस्थेचे 'रौप्य महोत्सव' म्हणून साजरे होत आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, शाळेचे व्यवस्थापक श्री. महेश कळंबे, मुख्याध्यापक श्री. भजन सर, तसेच उपस्थित पाहुणे डॉ. कैलाश कडू, प्राचार्य दिलीप फीसके, डॉ. मारोतराव कोल्हे, श्रीमती सुभद्रा रेंगे, श्री. युवराज कोल्हे, सौ. छाया घाटोळे, सौ. कल्पना कळंबे, श्री. राकेश भांगे त्याच बरोबर २०० पेक्षा जास्त दहावी बारावी चे उत्तीर्ण विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन  व स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रत्येक मुलगा अथवा मुलगी जन्मजातचं वेगवेगळे गुण आत्मसात करून जन्माला आलेला असतो, जसजसे मोठे होऊ लागतो तसतसे  अंगभूत असलेले हे गुण प्रगल्भ होऊ लागतात व आवड निवड ठरवू लागतात, सांगण्याचा उद्देश हाच की , तुमच्या मध्ये असलेले गुण हे आता विखुरले गेले आहेत त्यामुळे दहावी बारावी मध्ये उत्कृष्ट गुण मिळवून देखील कोणत्या गुणवत्ते आधारे पुढे काय करायचे हा प्रश्न कायमच मनात सलत राहतो, त्यासाठी जसे हिऱ्याला पैलू पाडणारा उत्तम कारागीर मिळाला की त्याची चकाकी जगभर झळकते, तसेच उत्तम मार्गदर्शक लाभला की विद्यार्थ्यांचे भवितव्य चकाकते असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. सगळेच डॉक्टर, इंजिनिअर, वकील,वैज्ञानिक नाहीत बनू शकत, पण म्हणून खजील न होता त्या पदव्यांसारखे इतर अभ्यासक्रम देखील तुमच्यासाठी उपलब्ध आहेत व ते तुम्ही करू शकता. प्रयत्न करत असताना आपल्या बुद्धिमत्तेला झेपेल असेच क्षेत्र निवडा असेही डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात नमूद केले.
     
एखादी गोष्ट अचूकपणे करायची आहे आणि ती मी करूनच दाखवणार हा ध्यास विद्यार्थी दशेत कायमच असला पाहिजे, परंतु मनावर आणि बुद्धीवर ताण न येऊ देता शांतपणे मार्ग काढत आपल्या योग्य विचारांच्या दिशेने जा, असे सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व पालकांना सांगून दिलासा दिला तसेच डॉ. कडू यांनी विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन केले. अनेक विद्यार्थ्यांनी करियर विषयी मनात रेंगाळत असलेले प्रश्न डॉ. राजकुमार कोल्हे यांना विचारले, व त्यांनी देखील विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊन योग्य ती समाधानकारक उत्तरे दिली. मागील १२ वर्षा पासुन अशा प्रकारचा कौतुक सोहळा मुंबई पासून दावसा पर्यंत आयोजन करून 'जाह्नवीज मल्टी फाउंडेशन' शिक्षण संस्था 'रौप्य महोत्सव' साजरा करत आहे. 
त्याच बरोबर इतर शाळेतून देखील सर्वोत्कृष्ट आदर्श शिक्षक व उत्कृष्ट मुख्याध्यापक निवडून त्यांनाही शाल, श्रीफळ व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांचे आभार मानून, वंदे मातरम् म्हणून मार्गदर्शन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

तुफान गर्दीत मराठीचा एल्गार करत अखेर ठाकरे बंधू आले एकत्र..

प्रतिनिधी: अवधूत सावंत
   
मुंबई : राज्यातील हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला विरोध करत सरकारने तो निर्णय मागे घेतल्यानंतर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र विजय मेळावा घेतला. या मेळाव्याचे निमित्ताने तब्बल १९ वर्षांनंतर दोघे एकत्र आले. मुंबईतील वरळीतील डोम सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या विजयी मेळाव्याला प्रचंड गर्दी उसळली होती. दोघांनीही विजय मेळाव्यातून सरकारवर घणाघात केला. त्यांनी भविष्यातही एकत्र राहण्याचे संकेत दिल्याने मनसैनिक आणि उबाठा सैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. आज सकाळी या मेळाव्यासाठी वरळी डोम सभागृह पूर्ण क्षमतेने भरून गेले होते. जागा नसल्याने अनेक कार्यकर्त्यांना बाहेर थांबावे लागले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर देश-विदेशातून आलेल्या मराठीप्रेमींनी तसेच चित्रपट सृष्टीतील कलाकारांनी सभागृहात हजेरी लावली होती. या मेळाव्याला विविध पक्ष आणि क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अजित नवले, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, तसेच कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांची उपस्थिती होती. मात्र, या मेळाव्यात काँग्रेसचा एकही आमदार, खासदार किंवा प्रमुख नेते हजर नव्हते.
या मेळाव्याची सुरुवात गणेश वंदनेने करण्यात आली. वरळीतील ब्रास बँड पथकाच्या सादरीकरणातून वातावरण भारावून गेले होते. सन्माननीय उद्धव ठाकरे असा उल्लेख करत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. ते म्हणाले की, हा मेळावा शिवतीर्थावर व्हायला हवा होता. तिथले संपूर्ण मैदान ओसंडून वाहिले असते. पण पावसामुळे जागेची अडचण निर्माण झाली. त्यामुळे हा कार्यक्रम इथे घ्यावा लागला. मी एका मुलाखतीतही स्पष्टपणे सांगितले होते की कोणत्याही भांडणापेक्षा, मतभेदांपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज जवळपास २० वर्षांनी मी आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर एकत्र आलो आहोत. जे अनेकांना जमले नाही, जे बाळासाहेबांनाही साधता आले नाही, ते देवेंद्र फडणवीसांना  जमले. त्यांच्यामुळे आम्ही एकत्र आले. आजचा हा मेळावा कुठलाही झेंडा न घेता फक्त ‘मराठी’ या अजेंड्यासमोर ठेवून पार पडत आहे. महाराष्ट्राकडे कोणीही वेड्या-वाकड्या नजरेने पाहू नये. हिंदीचा मुद्दा नव्हता. पण तो कुठून तरी अचानक आला. लहान मुलांनी हिंदी शिकावी, यासाठी सरकारकडून सक्ती केली जात आहे. कुणालाही विचारले जात नाही, शिक्षणतज्ज्ञांचंचे मत घेतले जात नाही. केवळ बहुमताच्या जोरावर सरकार निर्णय लादते. पण लक्षात ठेवा सत्ता तुमच्याकडे विधान भवनात आहे, रस्त्यावर मात्र आमच्याकडे सत्ता आहे.

उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या विजयी मेळाव्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, आमच्यातला (राज आणि उद्धव) आंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला. आम्ही एकत्र आलो आहोत आणि आता एकत्र राहणार आहोत. हे पाहून अनेक बुवा-महाराज व्यस्त झाले आहेत. कुणी लिंबू कापत आहे, कुणी टाचण्या मारत आहे, तर कुणी अंगारे-धुपारे करत गावाकडे गेला आहे. रेडेही कापत असतील. पण त्यांना सांगतो या भोंदूपणाविरोधात आमच्या आजोबांनी लढा दिला आणि आज आम्ही त्यांच्या वारसदार म्हणून तुमच्या पुढे उभे आहोत. हिंदी सक्ती तुमच्या सात पिढ्या आल्या तरी आम्ही होऊ देणार नाही .आज भाषणापेक्षा आमचे एकत्र दिसणे महत्त्वाचे आहे. मराठी भाषेसाठी आज सर्वांनी वज्रमुठ दाखवली आहे. मुख्यमंत्री म्हणतात मराठीसाठी आंदोलन करणे म्हणजे गुंडगिरी आहे. आम्ही गुंड आहोत. न्याय मागणे म्हणजे गुंडगिरी असेल, तर तुमच्या दरबारात न्याय मिळवण्यासाठी ही गुंडगिरीच करू. कारण, आजपर्यंत तुम्ही आम्हाला वापरून फेकले, पण आता आम्ही तुम्हाला फेकून देणार आहोत.

गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे ध्येय वाढवण्यासाठी महापालिकेच्या शिक्षकांसाठी प्रथमच झाली शिक्षण परिषद..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

कल्याण : महापालिका शाळांतील शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासह विद्यार्थ्यांचा स्तर वाढवण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागाने कंबर कसली असून त्याचाच एक भाग म्हणून महापालिका शाळांमधील शिक्षकांसाठी प्रथमच शिक्षण परिषदेचे आयोजन कल्याण मधील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात करण्यात आले होते. या शिक्षण परिषदेला आयुक्त अभिनव गोयल यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करून त्यांच्याशी संवादही साधला.

“महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी केले महापालिका शाळांतील शिक्षकांना मार्गदर्शन!”

केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सध्या निपुण भारत कार्यक्रम राबवला जात आहे, ज्यामध्ये महापालिका शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचा पायाभूत बौध्दीक स्तर वाढवण्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत. त्याअंतर्गत काही दिवसांपूर्वी महापालिका शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची विनोबा भावे ऍपच्या माध्यमातून मराठी - इंग्रजी आणि गणित विषयाची चाचणी घेण्यात आली आहे. त्याद्वारे महापालिका शाळांतील विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहेत ते निश्चित करण्यात आले आहे. त्यानंतर पुढील ३ महिन्यांमध्ये महापालिका शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याला निपुण करून अंतिम टप्प्यापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या प्रारंभिक चाचणीमध्ये समोर आलेल्या विद्यार्थ्यांचा बौद्धिक स्तर शिक्षकांना माहिती करून देणे, आवश्यक ते नियोजन करणे आणि ३ महिन्यात महापालिका शाळांतील हे सर्व विद्यार्थी अंतिम टप्प्यापर्यंत कसे पोहोचतील याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ही पहिली शिक्षण परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली. ज्यामध्ये महापालिका शाळांचे सर्व शिक्षक, सनियंत्रण अधिकारी, मार्गदर्शन करण्यासाठी काही शिक्षण अभ्यासकही सहभागी झाले होते.

महापालिकेकडून आता विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा आणि महापालिका शिक्षकांची शिक्षण परिषद ही दर महिना घेण्यात येणार आहे. जेणेकरून शिक्षण विभागाकडून केल्या जाणाऱ्या या प्रयत्नांवर देखरेख ठेवण्यासह त्याची परिणामकारकताही समोर येईल आणि महापालिका शाळांमधील सर्व विद्यार्थी हे पायाभूत चाचणीच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचू शकतील. याची दखल न घेणाऱ्या शिक्षकांवर कारवाई प्रस्तावित केली जाईल अशी माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी दिली.

कल्याण-डोंबिवली महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच या सर्व उपक्रमांमागील अंतिम ध्येय असल्याचा निर्वाळा केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी उपस्थित शिक्षकांशी संवाद साधताना दिला. तसेच ही काही अवघड गोष्ट नसून आपल्या महापालिका शाळांमधील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊ शकतात असा विश्वासही आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला. या शिक्षण परिषदेला महापालिकेच्या शिक्षण विभागाचे उप-आयुक्त संजय जाधव, शिक्षण अधिकारी विजय सरकटे तसेच विनोबा भावे ऍपचे भैरव गायकवाड उपस्थित होते.