संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, न्याय रणभूमी वर्तमानपत्र)
नुकतेच भांडुप (प.) येथील यशवंत चांदजी सावंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, उत्कर्ष नगर येथे एक आगळं-वेगळं दृश्य पाहायला मिळालं. परंपरेचा वारसा आणि नव्या पिढीला दिली जाणारी ऊर्जा यांचा अनोखा संगम विद्यार्थ्यांनी अनुभवला – कारण जय जवान गोविंदा पथकाला शाळेकडून थरांचे प्रात्यक्षिक व कार्यशाळा सादर करण्यासाठी विशेष निमंत्रण देण्यात आलं होतं.
या वेळी विद्यार्थ्यांनी गोविंदांच्या सादरीकरणाकडे केवळ पाहिलं नाही, तर त्या प्रत्येक थरात त्यांनी प्रेरणाही शोधली. प्रशिक्षक संदीप ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शिस्तबद्ध आणि जीव ओतून सादर केलेलं प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांच्या मनावर खोलवर ठसलं. त्यांच्या डोळ्यांतील चमक, विचारलेले प्रश्न, आणि प्रत्येक क्षणाचं कौतुक – हे दृश्य वर्णन करण्याइतपत शब्द अपुरे पडतात.
दहीहंडी केवळ सण नाही तर तो आता संघभावना, शिस्त आणि आत्मविश्वास शिकवणारा एक प्रकारचा साहसी खेळ बनला आहे, हे या उपक्रमाने अधोरेखित केलं. या विशेष कार्यशाळेसाठी मुख्याध्यापक राजू तु. गडहिरे आणि त्यांच्या संपूर्ण शिक्षकवर्गाचे मनःपूर्वक आभार मानले गेले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा