BREAKING NEWS
latest
featured लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
featured लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

दुपारी आरे ब्रिजवर मृत्यूचा थरार! मनसेच्या चिटणीसाचा डंपरखाली येऊन दुर्दैवी अंत...

आज दुपारी मुंबईच्या आरे ब्रिजवर एक धक्कादायक अपघात घडला. महाराष्ट्र नवनिर्माण सुरक्षा सेनेचे चिटणीस अशोक डांगे यांचा डंपरखाली येऊन जागीच मृत्यू झाला. या अनपेक्षित घटनेने मनसेत शोककळा पसरली आहे.


घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक भालचंद्र अंबुरे आणि मनसे विभाग अध्यक्ष संदीप ढवळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघातस्थळाची पाहणी करून आरे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

दरम्यान, आरे पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. अपघात कसा आणि कशामुळे घडला, याचा शोध घेतला जात आहे.

"अशोक डांगे यांच्या अचानक जाण्याने मनसेला मोठा धक्का – हा फक्त अपघात की कोणाची निष्काळजीपणा?" असा प्रश्न सध्या दक्ष नागरिकांना पडला आहे.

दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सुरक्षा सेनेचे सरचिटणीस देवेंद्र पाटील यांनी देखील शोककळा व्यक्त केली आहे.

डोंबिवलीतील शिवप्रतिमा मित्र मंडळातर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.२७ : डोंबिवली एमआयडीसीमधील शिव प्रतिमा मित्र मंडळ व डोंबिवलीचे सुप्रसिद्ध 'अनिल आय हॉस्पिटल' यांच्या सांघिक माध्यमातून आज मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम एम.आय.डी.सी निवासी विभागातील 'शिव प्रतिमा मित्र मंडळ' सभागृहात रविवारी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आयोजित करण्यात आले होते. यावेळी एकूण ९० लोकांनी या शिबिराला हजेरी लावली त्यात पुरुष, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला.  
यामध्ये मोतीबिंदू, काचबिंदू, मधुमेहामुळे डोळयांवर होणारे दुष्परिणाम त्यावर उपाय योजना तसेच डोळ्यांचे इतर आजार आणि त्यांची काळजी कशी घ्यावी यावर काउन्सलर यांचा सल्ला आणि मार्गदर्शन नेत्रतज्ज्ञांच्या उपस्थित राहून तपासणी करण्यात आल्याचे शिबिराचे आयोजक राजू नलावडे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. याप्रसंगी शिवप्रतिमा मित्र मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र म्हात्रे, उपाध्यक्ष रामदास मेंगडे, सरचिटणीस जयसिंग आयरे, सहचिटनिस सागर पाटील आणि खजिनदार विजय कुलकर्णी उपस्थित होते.

महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या दालनात मान्सूनपूर्व तयारी संदर्भातील आढावा बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील विविध प्रभागांमध्ये येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजनांबाबत सखोल चर्चा झाली. या बैठकीत आयुक्तांनी लवकरात लवकर नाले सफाई पूर्ण करून त्यामध्ये वाढलेला गाळ प्राथमिक टप्प्यातच उचलण्याचे निर्देश दिले. तसेच मोठ्या, मध्यम नाल्यांबरोबरच लहान गटारांच्या जवळील GVP ठिकाणी दैनंदिन स्वच्छता करण्याचे आदेश देण्यात आले.

पावसाच्या पाणी ज्या भागांमध्ये साचते असे भाग लक्षात घेऊन, त्या ठिकाणी अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी स्वतंत्र प्रभाग पातळीवर विशेष टीम तयार करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. यामुळे पावसाळ्यात महापालिका क्षेत्रात पाणी साचण्याच्या समस्या कमी होतील, असे आयुक्तांनी सूचित केले. महापालिकेच्या सर्व संबंधित विभागांनी या सूचनांची अंमलबजावणी तत्काळ सुरू करावी, असे आदेश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

एल्फिन्स्टन पूल रविवारी मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : परळ आणि प्रभादेवी परिसरास जोडणारा ऐतिहासिक ब्रिटीशकालीन एल्फिस्टन पूल पाडण्यात येणार आहे. त्यासाठी हा पूल रविवार (२७ एप्रिल) रोजी रात्री ९ वाजल्यापासून वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे- वरळी सागरी सेतूला थेट अटल सेतूशी शिवडी येथे जोडण्यात येणार असून, त्यासाठी हा पूल पाडून 'एमएमआरडीए'च्या वतीने नवीन पूल बांधण्यात येणार आहे. यासाठी या पुलावरील वाहतूक रवीवारी रात्री ९ वाजल्यापासून बंद करण्यात येणार आहे. दोन वर्षांसाठी हा पूल बंद करण्यात येणार आहे.

दरम्यान, एल्फिस्टन सारखा महत्त्वाचा पूल बंद राहणार असल्याने वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. ती टाळण्यासाठी वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे.

असे असणार पर्यायी मार्ग..

दादर पूर्वेकडून पश्चिमकडे आणि दादर मार्केटकडे जाणाऱ्या वाहनांना टिळक ब्रीजचा वापर करता येईल. तर, परळ पूर्वेकडून प्रभादेवी आणि लोअर परळकडे जाणारी वाहने करी रोड ब्रीजचा वापर करतील.

परळ, भायखळा पूर्वेकडून प्रभादेवी, वरळी, कोस्टल रोड व सी-लिंकच्या दिशेने जाणारी वाहने ही चिंचपोकळी ब्रीजचा वापर करतील.

प्रभादेवी व लोअर परेल पश्चिमेकडून परळला, टाटा रुग्णालय व के.ई.एम रुग्णालयकडे जाणाऱ्या वाहनांना दुपारी ३ ते रात्री ११ या काळात करी रोड ब्रीजचा वापर करता येईल.

करी रोड रेल्वे ब्रिजवरून..

कॉम्रेड कृष्णा देसाई चौककडून (भारत माता जंक्शन) शिंगटे मास्तर चौककडे वाहतूक ही सकाळी ७ ते दुपारी ३ या काळात एकेरी असणार आहे. तर शिंगटे मास्तर चौकाकडून कॉम्रेड कृष्णा देसाई चौकाकडे (भारत माता जंक्शन) वाहतूक दुपारी ३ ते रात्री ११ या वेळेत एक मार्गी असणार आहे.

इथे नो पार्किंग..

सेनापती बापट मार्ग : संत रोहिदास चौक (एलफिन्स्टन जंक्शन) ते ऑडियो जंक्शन

ना. म. जोशी मार्ग : कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य चौक (आर्थर रोड नाका) ते धनमिल नाका

भवानी शंकर मार्ग : हनुमान मंदिर, कबुतरखाना ते गोपीनाथ चौक

महादेव पालव मार्ग : कॉम्रेड कृष्णा देसाई चौक (भारत माता जंक्शन) ते शिंगटे मास्तर चौक

साने गुरुजी मार्ग : संत जगनाडे चौक ते कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य चौक (आर्थर रोड नाका)

रावबहादूर एस. के. बोले मार्ग : हनुमान मंदिर ते पोर्तुगीज चर्च डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग

विक्रोळीतील आक्रोश! पाकिस्तानचा झेंडा जाळून झालं ऐतिहासिक आंदोलन!

विक्रोळीतील व्यापारी वेल्फेअर असोसिएशनचा पाकिस्तान विरोधी निषेध: राष्ट्रप्रेमाचा स्फोट

आकाश पगारे (प्रतिनिधी पवई)

विक्रोळीच्या आंबेडकर चौकात आज एक ऐतिहासिक आणि राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेली घटना घडली, जिथे विक्रोळी व्यापारी वेल्फेअर असोसिएशनच्या सभासदांनी पाकिस्तानच्या निषेधार्थ मोठ्या प्रमाणात आंदोलन केले. या आंदोलनात, पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यांच्या शिकार झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मेणबत्त्या लावण्यात आल्या. पाकिस्तानच्या शरमेच्या कृत्याचा विरोध दर्शवण्यासाठी या समाजसेवी संघटनेने भावपूर्ण श्रद्धांजली देत पाकिस्तान विरोधी घोषणांसह जोरदार आवाज उठवला.

विक्रोळीतील या आंदोलनात सर्व वयोगटातील नागरिक सामील झाले होते. एका मोठ्या जमावाने "पाकिस्तान मुर्दाबाद!" या घोषणा देत एकसाथ शक्तीची भावना व्यक्त केली. या दरम्यान, एक क्षणिक पण प्रभावी दृश्य साकारले गेलं, जेव्हा पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध करण्यात आला. या कारवाईने फडप्रमुखांनी दहशतवादाचा विरोध करणारे एक दृढ संदेश दिला.

यावेळी विक्रोळीतील नागरिकांनी देशप्रेमाची भावना व्यक्त करत पाकिस्तानच्या शत्रुत्वाच्या कृत्यांना नाकारले. एकीकडे मेणबत्त्या लावत, दुसरीकडे पाकिस्तानच्या विरोधात आवाज उठवत त्यांनी त्यांच्या एकात्मतेचं प्रकटवण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनामुळे विक्रोळीतील नागरिकांच्या एकतेचं आणि राष्ट्रप्रेमाचं प्रतीक निर्माण झालं.

या घटनेला अनेक स्थानिक नेत्यांनी आणि समाजसेवकांनी त्यांचे समर्थन दिले आणि देशातील एकतेचं आणि अखंडतेचं महत्त्व अधोरेखित केले. विक्रोळीतील या प्रकारच्या निषेधाने राष्ट्रीय एकतेच्या संदेशाला अधिक सशक्त केले आहे, जो लोकांमध्ये एक सशक्त भावना निर्माण करतो.

मुंबई लोकलसाठी ऐतिहासिक बदल, प्रवाशांसाठी आनंदाची बातमी!


दिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, न्याय रणभूमी)

मुंबईकरांसाठी ऐतिहासिक बैठक: पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक अशोककुमार मिश्रा यांनी मांडले महत्त्वाचे मुद्दे!

मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक अशोककुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली जी. एम बिल्डिंग, चर्चगेट येथे एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत खालील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

मुख्य मुद्दे:

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पुतळा बसविणे: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्याची मागणी केली गेली. या संदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांना निवेदन देण्यात आले आहे.

मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेठ यांचे स्मारक: मुंबई सेंट्रल टर्मिनसला मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेठ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली.

खेळाडूंना रेल्वेमध्ये नोकरीची संधी: मुंबई व महाराष्ट्रातील खेळाडूंना भारतीय रेल्वेमध्ये स्पोर्ट्स कोट्यातून नोकरी मिळावी, अशी मागणी केली.

मराठी भाषेचा वापर: पश्चिम उपनगरातील सर्व रेल्वे प्लॅटफॉर्मवर मराठीतून उद्घोषणा करण्यात यावी, तसेच रेल्वे व्यवहारांमध्ये मराठी भाषेला अनिवार्य करण्यात यावी.

एस्केलेटरची दुरुस्ती: पश्चिम उपनगरातील रेल्वे स्टेशनवर असलेल्या एस्केलेटरची तातडीने दुरुस्ती केली जावी, कारण अनेक एस्केलेटर कायम बंद असतात.

रुग्णवाहिका सेवा: रेल्वे स्टेशनजवळील रुग्णालयांसोबत संपर्क करून रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करावी.

गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना: मुंबईच्या उपनगरी रेल्वेतील गर्दी कमी करण्यासाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात.

प्लॅटफॉर्म लांबी वाढविणे: १५ डब्यांच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचे काम तत्काळ पूर्ण करावे, विशेषतः अंधेरी, जोगेश्वरी आणि गोरेगाव येथे.

जोगेश्वरी जंक्शनला मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटी: जोगेश्वरी स्टेशन जंक्शन घोषित झाल्यामुळे, त्याला हाँगकाँगच्या धर्तीवर मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटीने जोडावे. येथे पार्किंग, हॉटेल, मॉल यांसारख्या सुविधांचा समावेश करावा.

जोगेश्वरी जंक्शनला मेट्रो आणि विमानतळाशी जोडणे: जोगेश्वरी जंक्शनला मेट्रो आणि मुंबई विमानतळाशी थेट जोडले जावे.

स्वयंचलित शिड्यांची आवश्यकता: सर्व उपनगरी रेल्वे स्थानकांवर स्वयंचलित शिड्यांची आवश्यकता असताना अंधेरी, जोगेश्वरी आणि गोरेगाव येथे १००% शिड्यांची मागणी केली.

सुरक्षितता आणि हेल्पलाईन: मुंबईकरांच्या सुरक्षित आणि सुकर प्रवासासाठी स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक सुरू करावा. सध्या १३९ हा देशव्यापी क्रमांक आहे, पण वेळेवर मदत मिळत नाही.

रेल्वे लोकलसाठी स्वतंत्र विभाग: मुंबई लोकलसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करावा आणि त्यासाठी विशेष विभागीय व्यवस्थापकाची नियुक्ती करावी.

शौचालयांची नियमित साफसफाई: रेल्वे स्थानकांवरील शौचालयांची साफसफाई विमानतळाप्रमाणे नियमित केली जावी.

स्तनपान कक्षांची उपलब्धता: स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी रेल्वे स्थानकांवर स्वतंत्र स्तनपान कक्ष उपलब्ध करावेत.

एसी लोकल फेऱ्या वाढविणे: एसी लोकलची मागणी लक्षात घेता त्यांची फेरे वाढवावी.

ज्येष्ठ नागरिकांसाठी उपाययोजना: ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव डब्यांमध्ये होणाऱ्या गैरसोयींसाठी स्वतंत्र उपाययोजना कराव्यात.

पादचारी पुलावर स्वयंचलित शिड्यांची सुविधा: जोगेश्वरी पूर्व येथील अंबोली फाटकाजवळ पादचारी पुलावर स्वयंचलित शिड्यांची सुविधा असावी, तसेच गोरेगाव पूर्व व पश्चिम जोडणाऱ्या जवाहर नगर रेल्वे पादचारी पुलावर स्वयंचलित शिड्या बसवाव्यात.

अनधिकृत फेरीवाल्यांवर नियंत्रण: रेल्वे स्थानकांवर आणि आजुबाजूला वाढलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष रेल्वे गस्त पथक तयार करावे.

प्राथमिक उपचार केंद्रांची स्थापना: प्रत्येक प्लॅटफॉर्मवर अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज प्राथमिक उपचार केंद्राची स्थापना करावी.

सातत्याने पाठपुरावा: या सर्व मुद्द्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी महाप्रबंधक अशोककुमार मिश्रा यांनी सातत्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

बैठकीत खासदार रवींद्र वायकर, कमिटी अध्यक्ष आमदार चित्रा वाघ, खासदार शोभा बच्छाव, खासदार नरेश म्हस्के, विक्रम सिंह, खासदार अनिल देसाई, खासदार वर्षा गायकवाड, आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुंबईकरांच्या प्रवासाचा अनुभव सुधारण्यासाठी ही बैठक एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली.

वायकरांचे विधान: पहलगाम हल्ल्यावर बांगलादेशी आणि घुसखोरांची सर्चिंग संसदेत मांडणार!

संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, न्याय रणभूमी)

"हिंदू धर्म विचारून गोळीबार? आमचं हिंदू राष्ट्र डगमगावं, हे कधीच सहन होणार नाही!" — खासदार रविंद्र वायकर यांचा संतप्त आवाज पहलगाम प्रकरणावरून दणका

पहलगाममधील गोळीबारानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या अमानवी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) चे खासदार रविंद्र वायकर यांनी अत्यंत तीव्र शब्दांत या घटनेचा निषेध करत हिंदू राष्ट्रावर झालेला घाला म्हणून या हल्ल्याचे वर्णन केले आहे.

"अतिरेकी लोकांनी धर्म विचारून गोळीबार केला, ही अत्यंत निंदनीय व भीषण गोष्ट आहे. आमच्या हिंदू राष्ट्रावर घाला घातला गेला आहे. अशा प्रकारांची मुळापासून चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे," अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.

वायकर यांनी भारतातील सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण मागणी देखील पुढे केली आहे. त्यांनी म्हटलं, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ या घटनेची दखल घेतली आहे. पण आता वेळ आहे कठोर निर्णय घेण्याची. देशातील ३६ राज्यांमध्ये राहणारे बांगलादेशी घुसखोर आणि संशयास्पद लोकांची सखोल तपासणी झाली पाहिजे. त्यांच्या विरोधात तात्काळ कारवाई झाली पाहिजे."

याच पार्श्वभूमीवर त्यांनी संसदेमध्ये या मुद्द्यावर उघडपणे आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे. "मी काही दिवसांतच संसदेत ही मागणी मांडणार आहे. राष्ट्राच्या सुरक्षेसोबत कुठलाही तडजोड स्वीकारणार नाही," असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

पहलगाममध्ये धार्मिक द्वेषातून हल्ला — देशाच्या अस्मितेला आव्हान?

या घटनेमुळे सामाजिक सलोखा धोक्यात आला असून, 'धर्म विचारून हत्या' ही संकल्पना देशाच्या संविधानिक मूल्यांवरच आघात करत आहे.

- या मुद्द्यावरून आता देशभरात चळवळ होणार का?

- बांगलादेशी घुसखोरांविरोधात आता देशव्यापी मोहिम राबवली जाणार का?

- वायकर यांचा आवाज संसदेत किती बुलंद होतो ते पाहणे महत्त्वाचे ठरेल.

पहलगाम हल्ल्याबाबत पार पडली सर्वपक्षीय बैठक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
नवी दिल्ली, दि. २४ : मंगळवारी (दि. २२) रोजी काश्मिरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर काल दिवसभर वेगवान घडामोडी घडल्या. काल सकाळी गृहमंत्री अमित शाह यांनी घटनास्थळी भेट दिली त्यांनतर संध्याकाळी पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा विषयक कॅबिनेट कमिटीची बैठक पार पडली. त्यानंतर आज संध्याकाळी हल्ल्याबाबत सर्वपक्षीय बैठक पार पडली. यावेळी गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. दोन तास चाललेल्या या बैठकीत पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकही खासदार उपस्थित नसल्याची माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्र्यांकडून पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या डोंबिवलीतील तिघांना श्रद्धांजली..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीन जणांना बुधवारी रात्री डोंबिवलीत हजारो शोकाकुल नागरिकांनी भगशाला मैदानात एकत्रित येत अश्रूंच्या साक्षीने अखेरचा निरोप दिला. अतिरेक्यांच्या या पूर्वनियोजित आणि घृणास्पद हत्याकांडामुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे. मात्र जनतेत दहशतवादाविरुद्ध तीव्र असंतोष आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली शहरातील मृत पावलेल्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंत्यदर्शन घेतले व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, माजी खासदार जगन्नाथ पाटील, आमदार सुलभा गायकवाड, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलीस सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  या सर्वांनी घटनास्थळी भेट देऊन पीडितांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. नागरिकांनी एकापाठोपाठ एक येत आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्याने वातावरणात कमालीची शांतता आणि दुःख पसरले होते.
 मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान संतप्त नागरिकांनी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि सर्व पाकिस्तानी उत्पादनांवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली. अनेकजण भावुक होऊन फडणवीस यांना म्हणाले, "फक्त तुम्हीच आम्हाला न्याय देऊ शकता." रात्री ९:०० च्या सुमारास फुलांनी सजलेल्या वाहनांमधून या तिघांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. यापूर्वी हजारो शोकाकुल नागरिकांच्या उपस्थितीत मोठी अंत्ययात्रा काढण्यात आली. "भावपूर्ण श्रद्धांजली" असे मोठे बॅनर वाहनावर लावण्यात आले होते, ज्यावर मृतांची नावे आणि छायाचित्रे होती. ही अंत्ययात्रा डोंबिवलीतील  डॉमिनोज पिझ्झा, एम. जी. रोड, डोंबिवली स्टेशन (पश्चिम), कोपर रोड, कोपर ब्रिज, टंडन रोड, आर.पी. रोड या प्रमुख मार्गांवरून गेली आणि शेवटी शिव मंदिर रोडवरील स्मशानभूमीत या तिघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिक यावेळी आपल्या भावनांना आवरू शकले नाहीत.
अंत्यसंस्कारापूर्वी भगशाला मैदानात स्मशान शांतता पसरली होती, कारण शोकाकुल नागरिक शांतपणे शवपेट्यांजवळून जात होते. अनेकजण स्तब्ध उभे होते, तर काहींच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. या घटनेमुळे समुदायाला बसलेला मोठा मानसिक आघात वातावरणात स्पष्टपणे जाणवत होता. यापूर्वी, जेव्हा पार्थिव विमानतळावर पोहोचले, तेव्हा अनेक वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांनी राज्याच्या वतीने पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. 
दरम्यान, ठाणे जिल्हा प्रशासनाने रात्री उशिरा जारी केलेल्या निवेदनात सांगितले की, जिल्ह्यातील १५६ पर्यटक अजूनही जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकले आहेत. विशेष विमाने आणि गाड्यांच्या माध्यमातून त्यांची घरवापसीची व्यवस्था केली जात आहे आणि ती उद्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीकरांनी समस्त देशवासियांना न्याय देण्याची तसेच दहशतवादावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.