डोंबिवली : आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अनुभवी मार्गदर्शकाची गरज असते, प्रथम मार्गदर्शक आपले आई वडील, त्यानंतर शिक्षक व नंतर स्वतः आपण असतो. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालाने दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मनात आता पुढे काय ? या प्रश्नाने काहूर माजलेले असते, अशातच विश्वसनीय आणि अनुभवी मार्गदर्शक लाभला तर मनावरचा ताण हलका होतो व मार्ग मिळतो.
Responsive Adsense
avdhoot13
-
मे ३०, २०२५
Edit this post
avdhoot13
-
मे ३०, २०२५
Edit this post
तेहरान : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर कारवाई केल्यावर आणि जगभरात नाचक्की झाल्यावर पाकने आता काहीशी नरमाईची भूमिका घेतली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी काश्मीर, पाणी वाटप , व्यापार, आणि दहशतवाद यांसारख्या दीर्घकाळ प्रलंबित विषयांवर भारतासोबत संवाद साधण्याची तयारी दर्शवली आहे. ते सध्या इराणच्या दौऱ्यावर असून तेहरानमध्ये आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली.
इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियानयांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना शरीफ म्हणाले, “आम्हाला आमच्या शेजारी देशासोबत शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातून पाणी वाटपासारख्या समस्यांवर तोडगा शोधायचा आहे.” ते पुढे म्हणाले, “व्यापार वाढवणे आणि दहशतवादाचा सामना करणे हेसुद्धा आमच्या चर्चेचे विषय असतील.”
शरिफ म्हणाले की, “जर भारताने आमची शांततेची ऑफर स्वीकारली, तर आम्ही हे दाखवून देऊ की आम्ही प्रामाणिकपणे शांतता साध्य करू इच्छितो.” तुर्कस्तान दौऱ्यानंतर शहबाज शरीफ सोमवारी इराणमध्ये पोहोचले असून, पुढील आठवड्यात ते ताजिकिस्तान आणि अझरबैजानला भेट देणार आहेत.
दरम्यान, इराणच्या अधिकृत ‘IRNA’ वृत्तसंस्थेनुसार, अध्यक्ष पेझेश्कियान यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये चिरस्थायी युद्धविरामासाठी इराणच्या पाठिंब्याचा पुनरुच्चार केला आहे. त्यांनी प्रादेशिक शांततेसाठी संवादाला प्रोत्साहन देण्याचे आवाहनही केले.
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचा एक मुख्य मुद्दा म्हणजे सिंधू पाणी करार, जो भारत सरकारने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर स्थगित केला होता. या हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलली, ज्यामध्ये पाणी वाटप करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.
भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, १९६० मध्ये झालेला सिंधू पाणी करार सध्या पाकिस्तानच्या सीमापार दहशतवादामुळे अंमलात नाही. हा करार सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांमधील पाण्याचे नियमन करतो.
त्याचप्रमाणे, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले होते की, हवामान बदल, लोकसंख्येतील वाढ आणि तांत्रिक बदलांमुळे जमिनीवर नवीन वास्तव निर्माण झाले आहे. पाकिस्तानने सीमापार दहशतवादाला पूर्णपणे आणि विश्वासार्हपणे थांबवल्याशिवाय भारत करार पुन्हा सुरु करणार नाही.
भारत सरकारने वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अधिसूचनेद्वारे पाकिस्तानमधून कोणत्याही वस्तूंच्या आयात किंवा वाहतुकीवर तात्काळ बंदी लागू केली होती, ज्यामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार पूर्णपणे ठप्प झाला आहे.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट
(
Atom
)
Stay Connected
Most Reading
-
प्रतिनिधी: अवधुत सावंत दिल्ली : भारताचे १४ वे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे एक विचारवंत व अभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांचा क...
-
प्रतिनिधी: अवधुत सावंत बीड : सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी हिचं नाव घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आज अप्रत्यक्ष निशाणा साधला...
-
प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण : मुंबई आणि उपनगरात मेट्रोचे जाळे पसरत आहेत. शहरांत मेट्रोचे काम वेगाने होत आहेत. मेट्रोमुळं प्रवा...
-
प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : सर्व मुलांचा आवडता आणि आनंद देणारा सण म्हणजे नाताळ. शाळेला दहा दिवसांची सुट्टी आणि त्यातच कल्प...
-
संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, न्याय रणभूमी) जोगेश्वरी पूर्व : शिक्षण क्षेत्रात एक नवीन सोनेरी अध्याय! रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति ...
Categories
*"न्याय रणभूमी"*www.nyayranbhumi.com*संपादक: संदीप कसालकर**प्रतिनिधी: अवधुत सावंत*
अजित पवार
इंटरनेट दिन
कोल्हापूर
ताज्या बातम्या
दिनविशेष
दिवाळी
नाळ २ सिनेमा
न्याय रणभूमी
न्युज
न्यूज
पुणे बातमी
पुण्यतिथि
प्रदूषण
बातम्या
मराठा आरक्षण
मराठी
मराठी बातम्या
मराठी लेख
मराठी समाचार
महाराष्ट्र
मुंबई
रायगड
लेख
व्ही. शांताराम
शिक्षण
समाचार
सविस्तर बातमीसाठी👇खालिल लिंकवर क्लिक आणि सबस्क्राईब करा !
Breaking News
childrens day
entertainment news
epaper
featured
Featured
featuree
Hasan mushrif
Horoscope
karwa chauth
kokan sanstha
lateat updates
Lates
latest
Latest
latest news
latest updates
latest updates.
latets updates
maharashtra
manoj jarange
marathi news
mega block
Mukesh Ambani news
mumabi
mumbai
mumbai local
naal part 2 movie
news
news article
nrb
nyay ranbhumi
PRIVACYPOLICY
ravindra waikar
shivsena