BREAKING NEWS
latest

बत्तीस शिराळ्यात २३ वर्षांनंतर होणार जिवंत नागाची पूजा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
सांगली : राज्यभर नागपंचमीचा सण साजरा होt आहे. यामध्ये नागपूजेला विशेष महत्त्व असते. सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा हे गाव नागपंचमीच्या उत्सवासाठी संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. या गावात जिवंत नागाची पकडून पूजा करण्याची प्रथा होती. ही अनोखी प्रथा पाहण्यासाठी अनेक जण या गावात नागपंचमीच्या दिवशी येत असतं. पण, या प्रथेला काही संघटनांनी आक्षेप घेतल्यानं त्यावर बंदी घाळण्याता निर्णय न्यायालयानं यापूर्वी घेतला होता. पण, आता २३ वर्षांनंतर ही प्रथा सुरु होणार आहे. केंद्र सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. शिक्षण आणि जनजागृतीच्या उद्देशाने २१ नागराज सापांना पकडण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला परवानगी दिली आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ च्या कलम १२ च्या (ए) उपकलमांतर्गत ही मंजुरी दिली आहे.

राज्याच्या मुख्य वन्यजीव संरक्षकांनी मंत्रालयाकडे सांगली जिल्ह्यातील शिराळा वन परिक्षेत्रातून २१ नर नागराज साप पकडण्याची परवानगी मागितली होती. या परवानगीनुसार, २७ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीतच सापांना पकडता येणार आहे. पकडलेले साप शिक्षण कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या नैसर्गिक अधिवासात किंवा पकडलेल्या ठिकाणी सोडले जातील. केंद्राने ही परवानगी अनेक अटी व शर्तींसह दिली आहे, जेणेकरून सापांची सुरक्षितता आणि कल्याणाची खात्री केली जाईल.सापांची निवड आणि ओळख मुख्य वन्यजीव संरक्षक किंवा त्यांच्या अधिकृत अधिकाऱ्यांनी केली पाहिजे. साप पकडणे, सोडणे आणि शिक्षण हे सर्व स्थानिक वन/वन्यजीव अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, मुख्य वन्यजीव संरक्षकांनी ठरवल्याप्रमाणे केले पाहिजे.

या संपूर्ण प्रक्रियेची महाराष्ट्र राज्याच्या मुख्य वन्यजीव संरक्षकांनी योग्यरीत्या नोंद ठेवली पाहिजे. साप पकडण्याचा एकमेव उद्देश स्थानिक तरुण आणि समुदायामध्ये सापांच्या संवर्धनाविषयी पारंपरिक ज्ञान प्रसारित करणे, तसेच परिसंस्थेतील सापांचे महत्त्व आणि त्यांचे उपयोगाबद्दलची स्थानिक पारंपरिक ज्ञानाची पुढच्या पिढीमध्ये हस्तांतरण करणे हा आहे. कोणत्याही प्रकारचा व्यावसायिक वापर किंवा मनोरंजन करण्यास परवानगी नाही. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान सापांना कोणतीही इजा किंवा हानी होणार नाही याची खात्री मुख्य वन्यजीव संरक्षकांनी करावी. सापांचा मृत्यू होणार नाही याची विशेष काळजी घेतली जावी आणि त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात विहित वेळेत सोडावे.

हा संपूर्ण उपक्रम राज्य वन विभागाच्या (स्टेट फॉरस्ट डिपार्टमेंट) कठोर देखरेखीखाली होईल. यामध्ये प्रशिक्षित सर्पमित्र, पशुवैद्यकीय व्यावसायिक आणि पुरेशी वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्याची खात्री मुख्य वन्यजीव संरक्षकांनी करावी, जेणेकरून साप आणि सामान्य नागरिक दोघांचेही कल्याण जपले जाईल. साप पकडण्याच्या आणि सोडण्याच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य पशुवैद्यकीय काळजी घेतली पाहिजे आणि अत्यंत सावधगिरीने ही प्रक्रिया पूर्ण करावी. सापांना पकडल्यानंतर उद्भवणाऱ्या गुंतागुंत टाळण्यासाठी योग्य काळजी घ्यावी.सापांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणारी कोणतीही घटना घडल्यास, मंत्रालय दिलेल्या परवानगीचा आढावा घेण्याचा आणि गरज पडल्यास ती रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवते. मुख्य वन्यजीव संरक्षकांनी लागू असलेल्या सर्व कायदे, नियम आणि नियमांनुसार पालन सुनिश्चित करावे.

ऍप आधारित रिक्षा-टॅक्सी आणि ई-बाईक सेवा आता राज्य सरकारकडून उपलब्ध..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : राज्य सरकारने मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ऍप आधारित प्रवासी वाहनसेवा सुरू करण्याच्या विचारात असून प्रवासी वाहतुकीसाठी ऍप आधारित रिक्षा,टॅक्सी व ई-बाईक सेवा आता खासगी कंपन्यांपुरती मर्यादित न राहता, परिवहन विभागाच्या सहकार्याने सुरू करण्यात येणाऱ्या या ऍप ला जय महाराष्ट्र, महा -राईड, महा-यात्री, महा-गो यापैकी एखादे नाव देणे प्रस्तावित आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या अंतिम मान्यतेने सदर शासकीय ऍप लवकरच कार्यान्वित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, या उपक्रमाअंतर्गत ऍप विकसित करण्यासाठी ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्ट टेक्नॉलॉजी’ आणि ‘मित्र’ या संस्थेसह खासगी कंपन्यांशी चर्चा सुरू करण्यात आली आहे. यंत्रणेत पारदर्शकता ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा समावेश यात असून लवकरच ऍप तयार होणार आहे.

या माध्यमातून मराठी तरुण-तरुणींना विशेष आर्थिक पाठबळ देण्यात येणार आहे. बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार देण्यासाठी मुंबई बँकेच्या माध्यमातून वाहन खरेदीसाठी १० टक्के व्याजदराने कर्ज दिले जाणार आहे. अशी ग्वाही मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली. ते म्हणाले की, मुंबै बँकेच्या मदतीने बेरोजगार तरुण-तरुणींना अर्थसहाय उपलब्धता होईल. तसेच अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटके विमुक्त महामंडळ, ओबीसी महामंडळ आणि एमएसडीसी या संस्थांतर्फे ११ टक्के व्याज परतावा अनुदानाच्या स्वरूपात दिला जाणार आहे. त्यामुळे हे कर्ज बिनव्याजी असल्यासारखे आहे.

मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की, केंद्र सरकारच्या अ‍ॅग्रीगेटर मार्गदर्शक तत्वानुसार या ऍप ची नियमावली अंतिम टप्यात आहे. सध्या खाजगी संस्था अनाधिकृत ऍप च्या माध्यमातून प्रचंड नफा कमावतात. त्यासाठी त्या कंपन्या चालक व प्रवासी यांची लूट करीत आहेत. सरकारकडे यंत्रणा, तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ मुबलक प्रमाणात असल्यामुळे शासनाने असे ॲप विकसित केल्यास त्याचा फायदा प्रवाशांच्या बरोबर चालकांना देखील होईल. या संदर्भात ५ ऑगस्ट रोजी मंत्रालयात संबंधितांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला आमदार प्रवीण दरेकर या ऍप निर्मितीचे तंत्रज्ञ व शासकीय अधिकारी उपस्थित असतील, त्यामुळे या बैठकीत या शासकीय ऍप ला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

राज्यात तिसरी ते दहावीसाठी नवीन अभ्यासक्रम जाहीर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित अभ्यासक्रम जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, या मसुद्यातून हिंदी भाषा सध्या वगळण्यात आली आहे. अभ्यासक्रमात मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, कलाशिक्षण, व्यावसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण आणि पायाभूत मूल्य शिक्षणाचा समावेश आहे.

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात हिंदी भाषेच्या सक्तीवरून पेटलेला वाद असताना हा सुधारित अभ्यासक्रम जाहीर करण्यात आळा आहे. राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी सक्तीचा अध्यादेश काढल्यानंतर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला होता. यानंतर सरकारने त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय तात्पुरता मागे घेतला. आता राज्य शासनाने नवीन अभ्यासक्रमाचा मसुदा जाहीर केला असून, यात सध्या तरी मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषांना स्थान देण्यात आले आहे.

एससीईआरटीचे संचालक डॉ. राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले की, सध्या पहिली व दुसरी भाषा म्हणून मराठी आणि इंग्रजीचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. तिसऱ्या भाषेचा समावेश हा त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या शिफारशींवर आणि शासनाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून असेल. नवीन अभ्यासक्रमाचा मसुदा राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या दिशानिर्देशांनुसार तयार करण्यात आला आहे. यात अनेक महत्त्वाचे बदल प्रस्तावित आहेत. यात व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन, भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश, वाहतूक सुरक्षा, नागरी संरक्षण आणि समाजसेवा यांसारख्या समकालीन विषयांनाही नव्या अभ्यासक्रमात स्थान मिळाले आहे.चौथीसाठीचे ‘शिवछत्रपती’ हे पाठ्यपुस्तक कायम राहणार आहे.

या प्रस्तावित मसुद्यावर राज्यभरातील शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, अभ्यासक, पालक, अधिकारी आणि नागरिकांनी अभिप्राय द्यावा, असे आवाहन एससीईआरटीने केले आहे. हा मसुदा <www.maa.ac.in> या संकेतस्थळावर २८ जुलैपासून उपलब्ध असून, २७ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाइन अभिप्राय नोंदवता येणार आहे.

पहलगाम आतंकवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मुसासह तीन दहशतवादी ठार..

प्रतिनिधी अवधुत सावंत
   
श्रीनगर : भारतीय लष्कराच्या 'ऑपरेशन महादेव" अंतर्गत भारतीय सैन्याने आज श्रीनगरच्या लिडवास भागात लपलेल्या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार मारले. चिनार कॉर्प्सने एक्स वर हे वृत्त दिले. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये पहलगाम हल्ल्यातील मुख्य आरोपी हाशिम मुसा देखील होता. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, लष्कराच्या अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की मारला गेलेला दहशतवादी हाशिम मुसा होता. इतर दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. उर्वरित दोन दहशतवाद्यांपैकी एकाचा २०२४ मध्ये सोनमर्ग बोगदा प्रकल्पावरील हल्ल्यात सहभाग असल्याचे सांगितले जात आहे.

दहशतवाद्यांकडून अमेरिकन एम४ कार्बाइन, एके-४७, १७ रायफल आणि ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. काही इतर संशयास्पद वस्तू देखील जप्त करण्यात आल्या आहेत. मंगळवारी लष्कराकडून ऑपरेशन महादेवची माहिती दिली जाऊ शकते.

लष्कराच्या म्हणण्यानुसार, सकाळी ११ वाजता गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर लिडवासमध्ये शोध मोहीम सुरू करण्यात आली. यादरम्यान, दुरून दोनदा गोळीबाराचा आवाज ऐकू आला. या भागात सुरक्षा दलांची तैनाती वाढवण्यात आली आहे. २२ एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता आणि १६ जण गंभीर जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांच्या धार्मिक ओळखीच्या आधारे निवडकपणे लक्ष्य केले होते. ही घटना पहलगाम शहरापासून ६ किमी अंतरावर असलेल्या बैसरन खोऱ्यात घडली.

हल्ल्यानंतर केलेल्या तपासात तीन दहशतवाद्यांची नावे उघड झाली. २४ एप्रिल रोजी अनंतनाग पोलिसांनी ३ रेखाचित्रे प्रसिद्ध केली. तिन्ही दहशतवाद्यांची नावे अनंतनागचा आदिल हुसेन ठोकर, हाशिम मुसा उर्फ सुलेमान आणि अली उर्फ तल्हा भाई अशी आहेत. मुसा आणि अली हे पाकिस्तानी आहेत. मुसा हा पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपमध्ये कमांडो होता. त्यांच्यावर प्रत्येकी २० लाख रुपयांचे बक्षीसही ठेवण्यात आले आहे. एनआयएने अटक केलेल्या दोन आरोपींनी या तीन दहशतवाद्यांची नावे उघड केली आहेत की इतर काही दहशतवाद्यांची नावे हे सध्या स्पष्ट झालेले नाही.

महाराष्ट्राची दिव्या देशमुख नवी महिला बुद्धिबळ जागतिक विजेती..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
युरोप : जॉर्जियामधील बटुमी येथे पार पडलेल्या FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक २०२५ स्पर्धेत भारताच्या दिव्या देशमुखने अभूतपूर्व कामगिरी करत अंतिम फेरीत अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला पराभूत करून भारताची पहिली महिला विश्वविजेती ठरली आहे. दिव्या देशमुखने वयाच्या केवळ १९व्या वर्षी हे यश संपादन करून भारताच्या बुद्धिबळ क्षेत्रात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या विजयामुळे दिव्या देशमुख भारताची चौथी महिला ग्रँडमास्टर बनण्याच्या दिशेने मोठं पाऊल टाकत आहे. दिव्याने भारताची ८८ वी ग्रँडमास्टर होण्याचा मानही मिळवला.

या स्पर्धेच्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींपैकी एक म्हणजे अंतिम फेरीत दोन भारतीय महिला खेळाडू एकमेकांविरुद्ध खेळत होत्या. कोनेरू हम्पीच्या अनुभवासमोर दिव्याच्या धाडसी निर्णयक्षमता आणि सखोल तयारीचा विजय झाला. यामधून भारताच्या बुद्धिबळ क्षमतेचं आंतरराष्ट्रीय स्तरावर ठोस प्रदर्शन झालं आणि चीनसारख्या बलाढ्य बुद्धिबळ राष्ट्रांवर मात करण्यात भारत यशस्वी झाला.

FIDE महिला विश्वचषक २०२५ च्या अंतिम फेरीतील विजेत्या दिव्या देशमुखला सुमारे ४२ लाख रुपये आणि उपविजेत्या कोनेरू हम्पीला सुमारे ३० लाख रुपये बक्षिसे मिळतील. याशिवाय, या खेळाडूंनी अत्यंत प्रतिष्ठित ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेसाठी देखील पात्रता मिळवली आहे.

बुद्धिबळ तज्ञांनी दिव्याच्या विजयाचे विशेष कौतुक केले असून विश्वनाथन आनंद यांच्यासारख्या दिग्गजांनी तिच्या खेळातील परिपक्वता आणि आत्मविश्वासाची प्रशंसा केली आहे. या यशामुळे देशभरात नवोदित बुद्धिबळपटूंना प्रेरणा मिळेल आणि महिलांच्या सहभागास नवे दालन खुले होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये ३० शाळेच्या ४००० विद्यार्थ्यांसोबत ४ दिवसीय 'जे एम एफ' गुरू पौर्णिमा आंतरशालेय स्पर्धांचे व कारगिल दिवसाचे भव्य आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे २०२५ हे वर्ष "रजत महोत्सव" म्हणून साजरे होत आहे. संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन संस्थेमध्ये करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या अंगभूत कला गुणांना वाव मिळण्यासाठी दरवर्षी प्रमाणेच या वर्षी देखील 'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये गुरू पौर्णिमा निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन दिनांक २३ ते २६ जुलै या चार दिवसांमध्ये करण्यात आले. दिनांक २३ व २४ जुलै रोजी अनुक्रमे बुद्धिबळ आणि चित्रकला व प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन केले गेले तर दिनांक २५ व २६ जुलै रोजी अनुक्रमे एकांकिका नाटक, पथनाट्य, व समूह गायन तसेच समूह नृत्य आणि शिशुविहरचे वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, व इतर पदाधिकारी यांच्या हस्ते सरस्वती पूजन व महर्षी वेद व्यास पूजन करण्यात आले. पथनाट्य व एकांकिका स्पर्धेचे परीक्षक श्री. रमेश जाधव व निहारिका राजदत्त यांनी परीक्षण केले तर समूह गायनाचे परीक्षक श्री. श्रीधर अय्यर यांनी केले. समूह नृत्याचे परिक्षक श्री. भावेश बोमेरा व रेशम कदम यांनी परीक्षण केले तर शिशु विहार च्या वेशभूषा स्पर्धेचे परीक्षण मिस डोंबिवलीकर आणि मिस कल्याण मुकुट विजेत्या निशिता शिंदे व श्वेता जगताप यांनी केले.
"सा कला या विमुक्तये" म्हणजेच कला ही सर्व बंधनातून मुक्त करते असे सांगत  संस्थेचे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी पुढे आपल्या भाषणात नमूद केले की, प्रत्येक क्षणाला मनुष्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत असतात, बोलताना देखील न कळतपणे अभिनय होत असतो. जन्मतःच घेऊन आलेली ही अभिनय कला म्हणजे दैवी देणगी आहे. आज मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेले सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून तुम्हाला अभिनय स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी विद्यार्थांना सांगितले तर अभिनयाबरोबरच संगीत ऐकणे, गाणे म्हणणे म्हणजे स्वतः बरोबरच इतरांना देखील आनंद देणे होय. बाळ जन्माला येते ते रडतच येते, त्यातही सूर गवसतो, बोबडे बोल बोलताना देखील आलाप, ताना ऐकायला मिळतात अशी ही अभिजात संगीताची दैवी देणगी सर्वानाच असते. फक्त त्याला पैलू पडण्याचे काम संगीताचे गुरू करत असतात, असे संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी समूह गान स्पर्धेच्या वेळी मुलांना सांगून त्यांना शुभेच्छा दिल्या.
वेशभूषा स्पर्धांची छोटी मुले बघून जणू काही 'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये, "हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमलीचे.." असेच भासत होते. वेशभूषेची "निसर्ग थीम" असल्या कारणाने सर्व सहभागी विद्यार्थी झाडे, वेली, फुले आणि अन्य प्रकारे सजून आली होती. समूह नृत्यांमध्ये देखील असंख्य मुलांनी सहभाग दर्शवला होता. जिंकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार व दिग्दर्शिका जाह्नवी कोल्हे व मान्यवरांच्या हस्ते पदके, चषक, प्रशस्तीपत्रक देण्यात आले तसेच सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना देखील सहभाग प्रशस्तीपत्रक देण्यात आले. जास्तीत जास्त संख्येने सहभागी झालेल्या 'डॉन बॉस्को' शाळेला सर्वोत्कृष्ट सहभागी शाळा ६५० विद्यार्थी म्हणून मोठे चषक देण्यात आले.
'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे २०२५ हे वर्ष रौप्य महोत्सव म्हणून साजरे होत आहे, त्या निमित सहभागी झालेल्या प्रत्येक शाळेला 'जे एम एफ' शिक्षण संस्थेकडून "स्मृतिचिन्ह" देण्यात आले. चार दिवस सुरु असलेल्या या स्पर्धामध्ये सुमारे चार हजारांच्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. संगीत शिक्षिका सौ. श्रेया कुलकर्णी, नृत्य शिक्षक श्री. अभिषेक देसाई आणि दीपाली सोलकर, नाट्य विभागाचे शिक्षक श्री. प्रमोद पगारे,  मुख्याध्यापिका सौ. ज्योती व्यंकटरामण व तेजावती  कोटीयन , महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक श्री. अलपेश खोब्रागडे, श्री. विठ्ठल कोल्हे, शिशुविहरच्या उपमुख्याध्यापिका सौ. मयुरी खोब्रागडे तसेच इतर सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी 'जे एम एफ' गुरुपौर्णिमा आंतरशालेय स्पर्धा उत्तमरित्या नियोजन करून यशस्वीरित्या पार पाडल्या.
२६ जुलै हा "कारगिल विजय दिवस" म्हणून ओळखला जातो. येत्या ९ ऑगस्ट ला राखी पौर्णिमाचे औचित्य साधून जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर मधील सर्व विद्यार्थिनींनी स्वतःच्या हाताने राखी तयार करून सीमेवर कार्यरत असलेल्या आपल्या बंधू जवानांना राखी पोहचती केली, यावेळी आपल्या भारत देशाचा झेंडा फडकवत शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहिली व वंदे मातरम् म्हणून कार्यक्रमांची सांगता झाली.

भारत विकसीत करतोय जगातील पहिला ड्युअल स्टेल्थ 'रामा' (RAMA) ड्रोन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
हैदराबाद : भारतात जगातील पहिला ड्युअल स्टेल्थ ड्रोन विकसीत केला जात आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा ड्रोन केवळ शत्रूच्या हाय-रेझोल्यूशन रडार आणि इन्फ्रारेड सिग्नलपासून बचाव करणार नाही, तर काही सेकंदात हल्ला करण्यास देखील सक्षम असेल. या ड्रोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ‘रडार ऍब्सॉर्प्शन ऍण्ड मल्टीस्पेक्ट्रल ऍडॉप्टिव्ह’ तंत्रज्ञान रामा (RAMA) या तंत्रज्ञानावर आधारित ड्रोनला रामा (RAMA) असे नावही देण्यात आले आहे. या ड्रोनचे वजन १०० किलो आहे आणि ते ५० किलोपर्यंत वजन वाहून नेऊ शकते. रामासह हे ड्रोन २०२५ च्या अखेरीस भारतीय नौदलाकडे सोपवले जाऊ शकते.

हे एक विशेष स्वदेशी कोटिंग मटेरियल आहे, जे रडार आणि इन्फ्रारेड डिटेक्शन ९७% कमी करते. यामुळे ड्रोन शत्रूच्या रडार आणि इन्फ्रारेड सिग्नलपासून पूर्णपणे लपू शकतो. सध्या, फक्त अमेरिका, चीन आणि रशियाकडेच रडारपासून लपणारे स्टेल्थ ड्रोन आहेत.

संरक्षण मंत्रालयाच्या मदतीने हैदराबादस्थित स्टार्टअप कंपनी 'वीरा डायनॅमिक्स आणि बिनफोर्ड रिसर्च लॅब' हे ड्रोन विकसित करत आहे. ड्रोन तयार करण्यासाठी वीरा डायनॅमिक्सने त्यांचे रामा (RAMA) वापरले आहे आणि बिनफोर्ड लॅब्सने त्यांचे स्वायत्त ड्रोन तंत्रज्ञान त्यात समाविष्ट केले आहे.