BREAKING NEWS
latest

वयाच्या ८४ व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते असरानी काळाच्या पडद्याआड..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई दि.२० : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते असरानी यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांनी आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. दीर्घकाळापासून फुफ्फुसांच्या आजाराने त्रस्त असलेल्या असरानींवर गेल्या पाच दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. असरानींच्या निधनाची बातमी समोर येताच संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. दीपावलीच्या आनंदाच्या दिवशी ही दुःखद बातमी समोर आली आहे. याबाबत माहिती देताना त्यांचे मॅनेजर बाबुभाई यांनी सांगितलं की, "दीर्घकाळापासून फुफ्फुसांच्या आजाराने ते त्रस्त होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. यातच आज त्यांचं निधन झालं."

असरानी यांनी त्यांच्या कारकिर्दीत शेकडो चित्रपटांमध्ये काम केलं. १ जानेवारी १९४१ रोजी जयपूर येथे जन्मलेल्या असरानी यांनी जयपूरमधील सेंट झेवियर्स स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आणि नंतर राजस्थान कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. १९६७ मध्ये 'हरे कांच की चुडियां' या चित्रपटातून असरानी यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. असरानींच्या सर्वात संस्मरणीय भूमिकांपैकी, 'शोले' चित्रपटातील जेलरची भूमिका अत्यंत महत्त्वाची स्मरणात राहणारी आहे. या चित्रपटातील त्यांचा संवाद, "हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं.”, खूप गाजलं वं प्रसिद्ध झालं आणि अनेक दशकांनंतरही लोक अजूनही त्या संवादाने असरानींना ओळखतात. 'कोशिश' (१९७३), 'बावर्ची' (१९७२), 'चुपके चुपके' (१९७५), 'छोटी सी बात' (१९७५), आणि 'शोले' (१९७५) हे त्यांचे अविस्मरणीय असे चित्रपट आहेत.

गुटक्याची बेकायदेशीर वाहतुक करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखा, घटक-३, कल्याणच्या पोलीसांना यश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: गुजरात राज्यातुन आयशर टेम्पोमधुन महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीरित्या वाहतुक करून विक्री केली जात असल्याबाबत गुन्हे शाखा, घटक-३, कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशिर बातमीच्या आधारे गुन्हे शाखा, घटक-३, कल्याणचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांच्या पथकाने दिनांक १७/१०/२०२५ रोजी ०५:३० वाजता गांधारी ब्रिज चौक, कल्याण पश्चिम, जि. ठाणे या ठिकाणी सापळा रचला असता आरोपी नामे धनराज रामगोपाल स्वामी, राहणार: वार्ड नंबर १३ मु.पो. लालासी ता. लक्ष्मणगढ, जि. शिकर, राज्य: राजस्थान हा त्याच्या ताब्यातील आयशर टेम्पोमधुन प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाची बेकायदेशीर वाहतुक करताना मिळुन आला व त्याच्याकडुन एकुन ८७,३७,४७२/- रू. किंमतीचा अवैध गुटखा, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ व टेम्पो हस्तगत करण्यात गुन्हे शाखा घटक-३च्या पोलीस पथकास यश आले आहे.
सदर बाबत आरोपी नामे धनराज रामगोपाल स्वामी याचे व चौकशीत निष्पन्न पाहिजे आरोपी यांच्या विरोधात खडकपाडा पो.स्टे. गु.र.नं. ७३८/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ मधील कलम २६ (२)) (1), कलम २७(१) सह वाचन ३(१) (ZZ) (IV), शिक्षा कलम ५९(३) तसेच २६ (२) (IV), २७ (३) (d),२७ (३) (e) सह वाचन कलम ३०(२), (a), व मा. अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांची अधिसुचना क्रमांक अ.सु.मा.अ./अधिसुचना-४११/२०२५/०७, दि. १६/०७/२०२५ ची अवज्ञा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा तपास मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विनोद पाटील, पोलीस उप निरीक्षक नेम गुन्हे शाखा, युनिट-३, कल्याण हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. श्री. आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, मा. श्री. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर, मा. श्री. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर व मा. श्री. शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध-१) गुन्हे शाखा, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजित शिंदे, सहा.पो निरी. सर्जेराव पाटील, पोउपनिरी विनोद पाटील, किरण भिसे, सपोउपनिरी दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, पोहवा बोरकर, सुधीर कदम, विजय जिरे, प्रशांत वानखेडे, सचिन भालेराव, गोरक्षनाथ पोटे, विलास कडु, आदिक जाधव, पांडुरंग भांगरे, उल्हास खंदारे, सचिन कदम, पोना प्रविण किनरे, दिपक महाजन, पोशि मिथुन राठोड, सतिश सोनवणे, गुरूनाथ जरग, विनोद चन्ने, गणेश हरणे, गोरक्ष शेकडे, सर्व नेम गुन्हे शाखा, घटक-३, कल्याण यांनी केलेली आहे.

समृद्धी महामार्ग भिवंडीतून थेट ठाण्यात जोडत विनाअडथळा मुंबईत प्रवेश करता येणार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरून ठाण्यात आणि पुढे मुंबईत थेट प्रवेश  करता येणार आहे. या मार्गामुळे वाहतूक कोंडीतून प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. या मार्गामुळे दक्षिण मुंबईत पोहोचणं सोपं होणार आहे.

मुंबई आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावरुन ठाण्यात येण्यासाठी मोठी वाहतूक कोंडी असते. मात्र आता या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे. मुंबई आणि ठाण्यातून प्रवास करणाऱ्या रहिवाशांना आता लवकरच हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई - नागपूर या समृद्धी महामार्गाशी थेट जोडता येणार आहे.

(भिवंडी) आमने ते (ठाणे) साकेत दरम्यान उन्नत मार्ग आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीए  ने (भिवंडी) आमने ते (ठाणे) साकेत दरम्यान २९.३ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग, एलिवेटेड ब्रिज उभारण्याची योजना आखली आहे. या उन्नत मार्गासाठी ६ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. भिवंडी येथील आमने ते ठाणे येथील साकेत या दरम्यान उभारण्यात येणाऱ्या पुलामुळे समृद्धी महामार्गावरुन प्रवाशांना विनाअडथळा थेट मुंबईत प्रवेश करता येणार आहे. नव्या आमने ते साकेत या मार्गामुळे वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होईल.

ठाणे ते मुंबई प्रवास होणार सुखकर

सध्या भिवंडीतून आमने ते ठाणे या प्रवासाला वाहतूक कोंडीमुळे जवळपास दीड ते दोन तास लागतात. तसंच ठाण्यातून मुंबईच्या दिशेने जातानाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर एमएमआरडीए 'इस्टर्न फ्री वे' चा विस्तार करणार आहे. घाटकोपर येथील छेडानगर ते आनंदनगर दरम्यान हा फ्री वेचा विस्तार केला जाणार आहे. या मार्गाचं कामही सुरू करण्यात आलं आहे. छेडानगर ते आनंदनगर हा मार्ग १२.९५५ किलोमीटर लांबीचा असेल. तसंच या मार्गावर सहा लेन असतील. या कामासाठी २६८३ कोटी खर्च अपेक्षित आहे. तसंच आनंदनगर ते साकेत (ठाणे) या मार्गावरही उन्नत मार्गाचं काम सुरू आहे. हा मार्ग ८.२४ किलोमीटर लांबीचा असून यासाठी १८७४ कोटी खर्च येईल. एखादा महामार्ग जेव्हा बनतो तेव्हा विकासाची दालनं खुली करतो त्यामुळे दक्षिण मुंबईत पोहोचणं सोपं होणार आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर समृद्धी महामार्गावरुन विनाअडथळा मुंबईत जाता येईल. भिवंडी-आमने ते ठाणे-साकेत, साकेत ते आनंदनगर आणि आनंदनगर - छेडानगर-घाटकोपर आणि पुढे सध्याच्या 'इस्टर्न फ्री वे' ने दक्षिण मुंबईत पोहोचणं अतिशय सुलभ होईल.

मुंबई - सोलापूर विमान प्रवासाला हिरवा कंदील..

प्रतिनिधी : अवधुत सावंत

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर येथे 'मुंबई-सोलापूर विमान सेवे'चा शुभारंभ संपन्न झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस सोलापूरकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, गेल्या अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आणि अडथळ्यांवर मात करत आज विमानसेवेचा शुभारंभ झाला आहे. शहराचा विकास आणि रोजगारासाठी तसेच नवीन उद्योगांसाठी, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हवाई सेवा. आज मोठ्या प्रमाणावर निर्यात सुरू आहे आणि आपण जागतिक बाजारपेठेशी जोडले जात आहोत, अशा परिस्थितीत विकास साधायचा तर कार्यक्षम (functional) विमानतळ आणि चांगली हवाई जोडणी असणे अत्यावश्यक आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितले.
सोलापूर हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा, या जिल्ह्याच्या जवळपासच्या परिसरात अनेक तीर्थक्षेत्रे आहेत, पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, सोलापूरला सिद्धरामेश्वर, तुळजापूरला आई तुळजाभवानी, अशा पवित्र स्थळांना जोडणाऱ्या भागात हवाई सेवा अत्यावश्यक म्हणून हे विमानतळ सुरू करण्याचा निर्धार आम्ही केला, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात हवाई सेवांचे महत्त्व ओळखून 'उडान योज़ना (RCS)' सुरू केली. सोलापूरसाठी आम्ही 'वायबिलिटी गॅप फंड' तयार केला. मुंबईशी हवाई जोडणी ही सर्वात महत्त्वाची होती, कारण मुंबईला जोडले की संपूर्ण जगाशी जोडले जातो. आज सोलापूरहून प्रत्यक्ष विमानसेवा सुरू झाली आहे. काही वेळातच मुंबईहून विमान सिद्धरामेश्वराच्या नगरीत उतरणार आहे. या पहिल्या उड्डाणाचा साक्षीदार होण्याचा मला अतिशय आनंद आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

याआधी सोलापूरला आयटी पार्क उभारण्याची घोषणा केली होती, मात्र त्यासाठी 'फंक्शनल विमानसेवा' अत्यावश्यक आहे, आता विमानसेवा सुरू झाल्याने आयटी पार्क सोलापूरमध्ये उभारणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री प्रताप सरनाईक, 'स्टार एअर'चे संजय घोडावत व इतर मान्यवर उपस्थित होते.

डोंबिवली सेवाकेंद्र के 'स्वर्ण जयंती उत्सव' निमित्त, VIP प्रोग्राम (दुआओं का सफर, दिल से दिल तक) संपन्न..


प्रतिनिधी: अवधुत सावंत 

डोंबिवली :   ओम शांति 🙏ब्रह्माकुमारीज डोंबिवली शाखा, (घाटकोपर सब-झोन) की ओर से डोम्बिवली सेवाकेंद्र के ५० वर्ष पुरे होने के "स्वर्ण जयंती उत्सव" के उपलक्ष्य में, आदरणीय शकु दीदीजी (निर्देशिका – घाटकोपर उपक्षेत्र, प्रभारी – डोंबिवली सेवाकेंद्र) के मार्गदर्शन एवं प्रेरणा से, "दुआओं का सफर, दिल से दिल तक” (A Blessed journey from Heart to Heart) इस विषय पर विशेष VIP कार्यक्रम का आयोजन किया गया। 

यह कार्यक्रम डोम्बिवली पूर्व के पाटीदार भवन सभागृह में रविवार, १२ अक्टूबर २०२५ को १०.३० बजे संपन्न हुआ।
आए हुए मेहमानों का गोल्डन बैच एवं फोल्डर देकर स्वागत किया गया। कार्यक्रम की शुरुवात परमात्मा की याद से हुई। तत्पश्चात, पवित्र भट ग्रुप डांस अकादमी द्वारा सुन्दर नृत्य प्रस्तृत किया गया ।

आदरणीय ब्रह्माकुमारी राजयोगिनी शकू दीदी जी ने प्रेरणादाई विचार व्यक्त करते हुए कैसे इस डोम्बिवली सेवाकेंद्र की स्थापना १९७५ में २५ दिसंबर को आदरणीय परम श्रद्धेय डॉक्टर नलिनी दीदी के द्वारा हुई, और उसी समय एक आध्यात्मिक प्रदर्शनी का आयोजन किया गया था । उस प्रदर्शनी में आया हुए नगराध्यक्ष भ्राता पटवारीजी ने कहा था मुझे इस डोम्बिवली नगरी को देव नगरी बनाना है, उसी तरह परमात्मा सिर्फ डोम्बिवली नहीं परतु पुरे विश्व को देव नगरी बनाने आये है । साथ ही उन्होंने कहा की हमे अपने अंदर के रावण को पूरी तरह से ख़त्म करना होगा उसीसे हमारे जीवन में परिवर्तन आएगा और सुख शांति की प्राप्ति होगी ।
साथ ही सभी को माउंट आबू, घाटकोपर योग भवन तथा डोम्बिवली सेवाकेंद्र पर आने का हार्दिक निमंत्रण दिया।

तत्पश्चात, आदरणीय निकुंज भाई जी (स्तंभकार एवं मीडिया विंग के राष्ट्रीय समन्वयक) ने अपने बोल रखे, उन्होंने अपने वक्तव्य में VIP का एक अलग ही अर्थ बताया उन्होंने कहा  VIP मतलब वेरी इनोसेंट पर्सन ।
तत्पश्चात, आदरणीय रविंद्र जी ने (अध्यक्ष-भाजपा, प्रदेशाध्यक्ष-महाराष्ट्र प्रदेश) डोम्बिवली सेवाकेंद्र के ५० वर्ष होने के निमित्त शुभ कामनाये दी, और कैसे वे इस ब्रह्माकुमारीज़ संस्था से पिछले कई वर्ष से जुड़े हुए है वो अनुभव साँझा किया ।
कार्यक्रम में आगे आदरणीय शकू दीदीजी, आदरणीय निकुंज भाई जी का और मुख्य अतिथियोंको मोमेंटो देकर सन्मान किया गया ल

निम्नलिखित अतिथि उपस्थित रहे:

1. Bro. Ravindra Chavanji (President of BJP and Pradeshadhyaksh, Maharashtra)
2. Bro. Rajesh More (MLA from Kalyan Rural Assembly constituency in Thane district)
3. Sis. Alka Mutalik Ji (President of Shree Ganesh Mandir Sansthan, Dombivli east) 
4. Bro. Dr. Rajkumar Kolhe Ji (Founder President of Jahnvis Multi Foundation's Vande Mataram Degree College, Dombivli west)
5. Bro Ashok Chandravarkar Ji & Mangala Chandravarkar Ji (Director FDC Ltd)
6. Karnataka Sangha'S Manjunatha College Of Commerce (On Behalf Of Chairaman Bro. Dr.Divakar Shetty, Trustee Devidas Kulal Sir, Urmani Sir,Taranath Sir, Principal Sushila Madam, Mrs Veena Subhash Palan)
7. Bro. Amit Mhatre (Secretary Youth Congress,Dombivli)
8. Sis. Dr. Tara Naik (Md and Gynaecologist, owner of Ashwini Maternity, Nursing Home)
9. Bro. Mr. Bhola Patil (Secretery Obc Dept)
10. Bro Niranjan Kadam (Trustee- Mumbreshwar Temple)
11. Bro. Yogesh Patil (Priest- Mumbra devi Temple) 
12. Bro. Mohan Bhagat (Trustee-Mumbreshwer Temple)
13. Bro.Mr. Shantilal Jain (Prop. M/S Darshan Marbal)
14. Bro. Manoj Kantak Ji (President, Toshvin Analytical Pvt Ltd)
15. Bro. Mahendra Patil (Vice President – Kalyan Jilha OBC Morcha – BJP Mr. Nitin patil (corporator)
16. Bro. Ravi Patil, and Mrs. Jyoti Marathe (corporator)
17. Bro. Dr Milind shirodkar (Director and Chief general surgeon at Aims hospital, Dombivli east)

कार्यक्रम को आगे बढ़ाते हुए RJ दिलीप भाई ने आदरणीय शकू दीदीजी तथा आदरणीय निकुंज भाई जी से कुछ सामान्य सवाल जवाब किये । आदरणीय विष्णु बहन जी ने सभी को मेडिटेशन कराया, सभी ने शांति और शक्ति की अनुभूति की ।
कार्यक्रम के अंत में सभीने आ. नलिनी दीदीजी को पुष्पांजलि अर्पित करते हुए सौगात और टोली स्वीकार की और ब्रह्मभोजन के लिए प्रस्थान हुए ।
इस तरह VIP कार्यक्रम उमंग उत्साह के साथ संपन्न हुआ ।
 
Photo and link:
<https://photos.app.goo.gl/nGHZH8AWQLTAREfv6>

<https://drive.google.com/drive/folders/1NYWecg-2TQCBjfX981CVDSS1TzYArAWo?usp=sharing>  

ओम शांति
राजयोगिनी ब्रह्माकुमारी शकु दीदीजी
निर्देशिका – घाटकोपर उपक्षेत्र, प्रभारी – डोंबिवली सेवाकेंद्र

६० दिवसांचे पैसे भरुन करा ९० दिवस प्रवास..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता राज्यातील ई-बस प्रवाशांना मासिक व त्रैमासिक पास सवलत योजना उपलब्ध होणार आहे. उच्च सेवा वर्गाचा पास असलेले प्रवासी निमआराम किंवा साध्या बसमधून प्रवास करु शकतील. मात्र निमआराम किंवा साध्या बसचा पासधारक ई-बसने प्रवास करत असल्यास दोन्ही सेवांतील भाड्याचा फरक १०० टक्के दराने भरावा लागणार आहे.

काय आहे योजना ?
या योजनेंतर्गंत प्रवाशांना ६० दिवसांचे भाडे भरून ९० दिवस प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे.

कोणत्या बससाठी पास उपलब्धः ९ मीटर ई-बस, १२ मीटर ई बस आणि ई शिवाई सेवा (ई-शिवनेरीवगळून)

मासिक पास (३० दिवस): २० दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारुन ३० दिवस वैध

त्रैमासिक पास (९० दिवस): ६० दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारुन ९० दिवस वैध

एसटी महामंडळाने घेतलेल्या पास योजनांचा मुख्य उद्देश नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने दररोज एकाच मार्गावर प्रवास करणाऱ्या नियमित प्रवाशांना ई-बस सेवेकडे आकर्षित करणे हा आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सध्या महामंडळाच्या ताफ्यात ई-बस प्रकल्पातील ४४८ बसेस आणि शिवाई प्रकल्पातील ५० ई-बसेस कार्यरत आहेत. या बसेसची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्याचा मानस असल्याचे सरनाईक म्हणाले.

१७ ड्रग्स माफियांवर ११५ किलो गांजा जप्त करत कल्याण खडकपाडा पोलीसांची धडक कारवाई..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : अंमली पदार्थांच्या तस्करी जाळ्याचा धसका भरवणारी भव्य कारवाई करत खडकपाडा पोलीसांनी तब्बल १७ ड्रग तस्करांविरोधात मोक्का अंतर्गत कार्यवाही केली आहे. विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यात मोक्का अंतर्गत ड्रग माफियांविरोधात झालेली ही पहिलीच मोठी कारवाई ठरली आहे. कल्याण झोन-३ चे उपयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या ऑपरेशनमध्ये पोलीसांनी तब्बल ११५ किलो गांजा, पिस्तूल, वॉकी-टॉकी संच, वाहने आणि तब्बल ७० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीने विशाखापट्टणम ते कल्याण असा अंमली पदार्थाचा पुरवठ्याचे जाले उभारले होते.

कल्याण जवळ बाल्ल्यानी परिसरात राहणारा गुफरान हजरान शेख हा या तस्कर टोळीचा म्होरक्या असून, त्यांच्यासह १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर ४ आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातील पोलीसांना 'ऑपरेशन ड्रग बर्स्ट' ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच सहायक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे व पोलीस अधिकारी अनिल गायकवाड यांच्या पथकाने केली. या तपासात पोलीसांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून आरोपींच्या ताब्यातून ६२ किलो गांजा, १ पिस्तूल, २ जिवंत काडतुसे आणि २ वॉकी-टॉकी संच चार्जरसह जप्त केले.
अटक केलेल्या आरोपींची नावे गुफरान शेख, बाबार शेख, सुनिल राठोड, आझाद शेख, रेशमा शेख, शुभम उर्फ सोन्या भंडारी, असिफ शेख, सोनू सय्यद, प्रथमेश ननावडे, रितेश गायकवाड, अंबादास खामकर, आकाश भिंगारदे, गणेश जोशी अशी असून आणि इतर ५ आरोपींचा समावेश आहे.

'ड्रग माफियांचा सळसळाट रोखण्यासाठी मोक्का हाच प्रभावी उपाय' - डीसीपी अतुल झेंडे


या प्रकरणात आरोपींनी आर्थिक लाभासाठी संघटित गुन्हेगारी केल्याचे स्पष्ट झाल्याने, महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली. उपयुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले की, 'राज्यातील ड्रग तस्करांच्या मुळावर घाव घालण्यासाठी खडकपाडा पोलीसांची ही कारवाई आदर्श ठरेल'. या संपूर्ण तपासाचा पुढील भाग सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या देखरेखीखाली सुरू असल्याचे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.