BREAKING NEWS
latest

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये केडीएमसी च्या शिक्षण विभागातर्फे सकारात्मक शिस्त आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता विषयावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत शिक्षकांचे सकारात्मक विचार आणि शिस्त हा महत्वाचा घटक आहे, या संदर्भात जिल्ह्यामध्ये मनपा, तालुका व केंद्रस्तरावर सकारात्मक शिस्त या विषयावर विशेष शिक्षण परिषदेचे आयोजन 'जे एम एफ' मधुबन वातानुकूलित दालनात करण्यात आले होते, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व या चर्चासत्राचे वक्ते डॉ.राजकुमार कोल्हे यांनी सकारात्मक शिस्ती बाबतचे व्याख्यान दिले. आयोजित केलेल्या व्याखनाला 'सी आर सी' प्रमुख क्रमांक २१ च्या सौ.राजश्री जतकर, कल्याण डोंबिवली महानगर पालिका, कल्याण येथील प्रशासन अधिकारी श्री.भारत बोरनारे तसेच जिल्ह्यातील सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांची उपस्थिती प्रार्थनीय होती.
संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे आणि संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व स्वागत करून व्याख्यानमाला सुरू करण्यात आली. वक्ते डॉ. राजकुमार कोल्हे यांनी  विद्यार्थ्यांच्या बाबतीत शिक्षक कसा असावा तर शिक्षक हा संयमी, सकारात्मक विचारांचा, वेळ प्रसंगी कठोर पण मृदु देखील असावा असे सांगितले. मस्ती करणे हा विद्यार्थ्यांचा स्वाभाविक गुण आहे, अनेक विद्यार्थ्यांना अध्यापन हा कंटाळवाणा विषय वाटत असतो, शिक्षक शिकवत असताना एकमेकांच्या खोड्या काढणे, आपापसात कुजबूज करणे, अशा प्रकारच्या मस्ती करत रहाणे या गोष्टी विद्यार्थी दशेत घडणे हे स्वाभाविक आहे,  त्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षा ही दिली जाते परंतु दिलेल्या शिक्षाचा वाईट परिणाम मुलांवर होऊन मुले वैचारिक रित्या कठोर होऊ लागतात, म्हणून शिक्षकांनी मुलांना शिक्षा न करता सकारात्मक विचाराने आणि संयमाने सद्य परिस्थिती हाताळणे आणि  विद्यार्थ्यांना सकारात्मक शिस्त लावणे हे योग्य ठरेल असे डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले. जेव्हा मूल वाचन, संभाषण, आणि अभ्यास अशी बौद्धिक कामे करत असतो, अशा वेळेला त्याला रागावले तर त्याला भीती वाटते. मग बुद्धीचे काम थांबवून भावनांचे काम सुरू होते, आणि अशा वेळी जर अजून मोठी शिक्षा झाली तर विद्यार्थी स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसतो यासाठी संवाद, सहकार्य व समुपदेशन करण्याचे कार्य आणि कर्तव्य हे शिक्षकाचे आहे म्हणूनच विद्यार्थ्यांना शिक्षा न करता त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी विद्यार्थी दशेत अनेक वेळा अपयशी ठरलेले परंतु भविष्यात यशस्वी ठरलेल्या व्यक्तींची उदाहरणे विद्यार्थांना द्यावीत, फेसबुक , व्हॉट्सऍप, अशा अनेक 
संगणकीय उपयोजन विकसित केलेले तद्न्य हे विद्यार्थी दशेत असताना यशस्वी नव्हते ते देखील आजच्या विद्यार्थ्यांसारखेच होते परंतु शिक्षकांच्या सकारात्मक शिस्तीने त्यांच्या मधे बदल घडवून आला आणि ते यशस्वी झाले, म्हणून ध्येय गाठायचा आधी तिथं पर्यंत पोहचण्याचा प्रवासाची तयारी आधी करा असा मोलाचा सल्ला डॉ.राजकुमार कोल्हे यांनी उपस्थित सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांना दिला.
अनेक यशस्वी अयशस्वी मोठ्या व्यक्तींची चित्रफित दाखवून यशाची आणि सकारात्मक शिस्ती ची व्याख्या डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सांगितली. या चर्चासत्रात अनेकांनी आपल्या मनातले प्रश्न डॉ. राजकुमार कोल्हे यांना विचारले व समाधान कारक उत्तरे मिळवली. सुमारे २५० ते ३०० शिक्षक या परिसंवादामध्ये सहभागी झाले होते.

ठाणे खंडणी विरोधी पथकाच्या कारवाईत एम.डी.(मेफेड्रोन) विक्री करणाऱ्या इसमाकडुन १०.८८ लाख रूपये किंमतीचा १०८.८ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ, एक अग्नीशस्त्र व एक जिवंत काडतुस जप्त..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : गोपनिय बातमीदारांकडुन प्राप्त माहितीच्या आधारे दिनांक ८/१२/२०२५ रोजी २२.५० वा. कल्याण पूर्वेतील आडवली, ढोकळी, हाजीमंलग रोड, येथील काका ढाबा, येथे असलेल्या श्री. गजानन रेसिडेन्सी, दिनकर विहार को.ऑप हौ.सोसायटी लिमि. रुम नं. ००२, डी-विंग याठिकाणी इसम नामे आकिब इकबाल बागवान (वय: ३३ वर्षे) हा एकुण १०८ ग्रॅम ८ मिलीग्रॅम वजनाचा १०,८८,०००/- रुपये किंमतीचा एम.डी.(मफेड्रोन) हा अंमली पदार्थ विक्री करण्याकरिता जवळ बाळगला असताना व ५०,०००/- रुपये किंमतीची विनापरवाना गावठी बनावटीचे पिस्टल अग्नीशस्त्र बेकायदेशीररित्या जवळ बाळगुन ठेवले असल्याने मिळुन आला म्हणुन आरोपी नामे १) आकिब इकबाल बागवान याच्या विरुध्द मानपाडा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १५०२/२०२५ एनडीपीएस ऍक्ट १९८५ कलम ८ (क), २१ (क), सह भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ सह म.पो. कायदा कलम ३७ (१)१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचा आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन बाजारपेठ पोलीस स्टेशन, कल्याण गुन्हा रजि नं. ५०५/२०२५ एन.डी.पी.एस कलम ८ (क) २२ (ब) व ५६०/२०२५ एन.डी.पी.एस कलम ८ (क) २२ (क) या दोन गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्ह्यातीलं अटक आरोपी याच्याकडे चौकशी केली असता सदरचे अग्नीशस्त्र त्याने भरत शत्रुध्न यादव याच्याकडुन घेतल्याचे सांगितले.

त्यामुळे गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे २) भरत शत्रुध्न यादव याचा तांत्रिक विश्लेषन व गुप्त बातमीदाराच्या आधारे शोध घेवुन त्यास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या अंगझडती मध्ये एक जिवंत काडतुस मिळुन आले.

सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये एकुण २ आरोपीना अटक करण्यात आलेली असुन त्यांच्याकडुन १०८.८ ग्रॅम वजनाचा एम.डी.(मेफेड्रोन) हा अंमली पदार्थ व एक अग्नीशस्त्र व एक जिवंत काडतुस असा एकुण ११,४१,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि. सुनिल तारमळे, नेम - खंडणी विरोधी पथक, ठाणे हे करीत आहे.

सदरची कारवाई श्री.अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, श्री. विनय घोरपडे, सहायक पोलीस आयुक्त, शोध - २, गुन्हे शाखा, ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शैलेश साळवी, सपोनि. सुनिल तारमळे, सपोउपनिरी. भोसले, कानडे, पोहवा. ठाकुर, राठोड, शिंदे, पाटील, गायकवाड, जाधव, गडगे, मपोहवा. पावस्कर, चापोहवा. हिवरे, पोशि. वायकर, पाटील, शेजवळ, मपोशि. भोसले यांनी केली आहे.

शालेय विद्यार्थ्यांसाठी डोंबिवलीच्या 'रोटरी डाऊनटाउन क्लब' तर्फे धावण्याची स्पर्धा आयोजित..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: दि. ०७ डिसेंबर २०२५ रोजी, 'रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डाऊनटाउन'ने शालेय विद्यार्थ्यांसाठी धावण्याची स्पर्धा आयोजित केली होती. डोंबिवली शहरातील सुमारे १४० शाळांमधील एकूण २,१०० विद्यार्थ्यांनी या धावण्याच्या स्पर्धेत सक्रिय सहभाग घेतला.
या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नामदार श्री. रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती होती. इतर मान्यवरांमध्ये आमदार श्री. राजेश मोरे, श्रीमती. सुलभा गायकवाड, रोटेरियन श्री. हर्ष मोकल तसेच होली एंजल शाळेचे मुख्याध्यापक श्री. बिजॉय ओमेन यांचा समावेश होता.
वंचित मुलांसाठी बालरोग हृदय शस्त्रक्रियांसाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाला अनेक संस्थांकडून मोठा पाठिंबा मिळाला. रुस्तमजी ग्रुप, फेडरल बँक, डेकॅथलॉन आणि डोंबिवली शहरातील १५ हून अधिक संस्थांनी आपले मौल्यवान योगदान दिले.
गेल्या वर्षी, 'रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डाऊनटाउन'ने केलेल्या अशाच निधी संकलनाच्या प्रयत्नांमुळे मुरबाडमध्ये चेक डॅम बांधणे शक्य झाले होते. त्याच भावनेला अनुसरून, या वर्षीच्या स्कूल रनमधून उभारलेला निधी लहान मुलांसाठी जीवनरक्षक हृदय शस्त्रक्रियांसाठी समर्पित केला जाईल असे आयोजक रोटरी क्लब ऑफ डोंबिवली च्या रोटेरियन ऍनी बिजॉय यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

डोंबिवलीत भाजपा-शिवसेनेत तणाव; प्रदेशाध्यक्ष चव्हाणांसमोर शिवसेनेची जोरदार घोषणाबाजी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : डोंबिवलीमधील एका कार्यक्रमाच्या ठिकाणी शिवसेना आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. डोंबिवली पश्चिम भागातील कुंभारखाणपाडा परिसरात गणेश घाट आणि रागाई मंदिर प्रवेशद्वाराच्या उद्घाटनावेळी भाजपा आणि शिवसेनेच्या शक्तीप्रदर्शनामुळे वातावरण तापले होतं. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी आणि घोषणाबाजीने दणानून सोडत परिसरात राजकीय शक्ती दाखवण्याचा प्रयत्न केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. विशेष म्हणजे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या समोरच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसरात राजकीय तणाव वाढल्याचं पाहायला मिळाले. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दोन्ही बाजूंनी कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

शिवसेना कार्यकर्त्यांनी आरोप केला की शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांच्या स्वागताचे बॅनर जाणूनबुजून झाकण्यात आले. त्यामुळे उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपामध्ये वाद झाला. उद्घाटनासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित असताना शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. त्याचवेळी भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनेसमोर घोषणाबाजी करत प्रत्युत्तर दिलं. त्यामुळं परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. 

उद्घाटनासारख्या कार्यक्रमात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून झालेली बॅनरबाजी, घोषणाबाजी आणि शक्ती प्रदर्शनामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीत राजकीय वातावरण तापलं आहे. विशेष म्हणजे उद्घाटन सोहळ्यापूर्वीच भाजपा आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यामुळं तणावनाची परिस्थिती निर्माण झाली होती. अलीकडेच शिवसेनेत प्रवेश केलेले विकास म्हात्रे आणि त्यांची पत्नी कविता म्हात्रे यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून शक्तीप्रदर्शन केलं. यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. भाजपा कार्यकर्ते शिवसेनेविरोधत कुरघोडी करणार असल्याच बोललं जात आहे. या संदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु बैठकीत व्यस्त असल्याचं कारण देत प्रतिक्रिया दिली गेली नाही.

अवैध्य बेकायदेशीररित्या चालणारी गावठी दारूभट्टी खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे यांचेकडुन उध्वस्त..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे: दिनांक २८/११/२०२५ रोजी पोहवा. आशिष ठाकूर, नेम. खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा करवी माहीती मिळाली की "एक इसम नामे जयेश ठोंबरे राहणार: खोणी गाव हा खोणी गाव, नाल्याचे बाजूला झाडीमध्ये डोंबिवली, जि. ठाणे याठिकाणी बेकायदीर अवैध्यरित्या गावठी हातभट्टीची दारू बनविण्याचे काम करीत आहे." त्यानुसार सपोनि. सुनिल तारमळे, पोहवा. ठाकुर, जाधव, चापोहवा. हिवरे, पोशि.  वायकर सर्व नेमणुक खंडणी विरोधी पथक, ठाणे शहर यांनी दोन पंच समक्ष छापा कारवाई करून १) १,५०,०००/- रू किंमतीचा गूळमिश्रीत व नवसागरमिश्रीत वॉश ८ डूम मध्ये १६०० लिटर, २) २००/- रू किंमतीचा नवसागर, ३) २०,०००/- रू किंमतीचे सतेले, ४) १०,०००/- रू किंमतीचे प्लॅस्टीकचे ड्रम, ५) ६०,०००/- रू किंमतीची गावठी हातभट्टीची दारू ३०० लिटर असा एकुण २,४०,२००/- रू किंमतीचा मुद्देमाल नष्ट केला. सदर छापा कारवाई बाबत मानपाडा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १४३७/२०२५ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. अमरसिंह जाधव साो, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, श्री. विनय घोरपडे साो, सहायक पोलीस आयुक्त, शोध-२, गुन्हे शाखा, ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी, सपोनि. सुनिल तारमळे, श्रीकृष्णा गोरे, कापडणिस, पोउपनिरी. तावडे, सहापोउपनिरी. भोसले, कानडे, पोहवा. ठाकुर, राठोड, शिंदे, पाटील, गायकवाड, जाधव, गडगे, मपोहवा. पावसकर, चापोहवा. हिवरे, पोना. हासे, मधाळे, पोशि. वायकर, शेजवळ, ढाकणे, पाटील, मपोशि. भोसले, यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे यांच्याकडुन एम.डी. (मेफेड्रोन) ह्या अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे: खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे यांच्याकडुन एम.डी (मेफेड्रोन) ह्या अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करून १,००,९२,०००/- रू किंमतीचा ९९९.२ ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रोन) हा अंमली पदार्थ व इतर वस्तु जप्त करण्यात आला.

खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांनी कापुरबावडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ७५६/२०२५ एनडीपीएस ऍक्ट १९८५ कलम ८ (क), २१ (ब), २१ (क), २९ या गुन्ह्याच्या तपासादरम्यान यातील आरोपीत नामे १) सचिन सुभाष चव्हाण यांस ताब्यात घेवुन त्याच्याकडुन २९.०६ ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रोन) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. सदर गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषन व गुप्त बातमीदाराच्या आधारे आरोपी नामे २) रवि शामवीर डागुर यांस ताब्यात घेवुन त्याच्या अंगझडती मध्ये ३४ ग्रॅम वजनाचा व घरझडतीमध्ये ९२२ ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रोन ) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये एकुण ६ आरोपीना अटक करण्यात आलेली असुन त्याच्याकडुन ९९९.२ ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रोन) हा अंमली पदार्थ व मोबाईल असा एकुण १,००,९२,०००/- रू किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि. सुनिल तारमळे, नेम खंडणी विरोधी पथक, ठाणे करीत आहे.

सदरची कारवाई श्री. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, श्री. विनय घोरपडे, सहायक पोलीस आयुक्त, शोध-२, गुन्हे शाखा, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शैलेश साळवी, सपोनि. सुनिल तारमळे, श्रीकृष्ण गोरे, कापडणिस, पोउपनिरी. तावडे, सपोउपनिरी. भोसले, कानडे, पोहवा. ठाकुर, राठोड, शिंदे, पाटील, गायकवाड, जाधव, गडगे, मपोहवा. पावसकर, चापोहवा. हिवरे, पोना. हासे, मधाळे, पोशि. वायकर, शेजवळ, ढाकणे, पाटील, मपोशि. भोसले, यांनी केली आहे.

आरोपीस २४ तासाचे आत अटक करत देसाई गावच्या खाडी पुलाचे खालील ट्रॉली बॅगेतील अनोळखी महिलेच्या मृतदेहाचे गुढ उकलले..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : दिनांक २४/११/२०२५ रोजी दुपारी १२.५५ वा. नियंत्रण कक्ष, ठाणे येथुन प्राप्त झालेल्या संदेशानुसार देसाई गावकडुन कल्याणकडे जाणारे रोडवर देसाई गावचे पुढील खाडी ब्रिजच्या खाली एका बॅगेमध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह असल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती. त्याप्रमाणे बिट मार्शल २ वरील अंमलदार यांनी खात्री करुन पोलीस ठाण्यात माहिती कळविली. त्याप्रमाणे लागलीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांच्यासह पोलीस पथकाने सदर ठिकाणी भेट देवुन पाहणी केली असता तेथे खाडीचे पाण्यातील मातीचे भरावावर एक ट्रॉली बॅग पडलेली दिसुन आली. त्यामध्ये एका २० ते २५ वर्षे वयाच्या महिलेचा मृतदेह पाय गुडघ्यात दुमडुन ट्रॉली बॅगमध्ये भरलेला व अर्धवट बाहेर आल्याचे दिसत होते. मयत महिलेचे अंगात गुलाबी रंगाचा टॉप, त्यावर नक्षीदार फुलांची डिझाईन, त्याखाली लाल रंगाची लेगिन्ग्स घातलेली होती. तिचे डावे हाताचे मनगटाजवळ पी.व्ही.एस. असे इंग्रजीमध्ये गोंदलेले होते. तसेच प्रेत फुगलेले व अर्धवट कुजलेले होते. सदर मयत महिलेचे नातेवाईक किंवा परिचीत संपडलेले नाहीत. त्यावरुन दिनांक २४/११/२०२५ रोजी दुपारी १३.१५ वा. पुर्वी कोणीतरी अज्ञात इसमाने अनोळखी महिलेस अज्ञात कारणावरुन कश्याने तरी जिवे ठार मारून प्रेत ट्रॉली बॅगमध्ये भरुन सदर ठिकाणी प्रेत ट्रॉलीबॅगसह पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने देसाई खाडी ब्रिजखाली फेकुन दिलेले असल्याबाबत शिळ डायघर पोलीस ठाण्यात गु. रजि.नं. ९५५/२०२५ भा.न्या.सं. कलम १०३ (१), २३८ प्रमाणे अज्ञात आरोपीताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मा. वरिष्ठांच्या मागदर्शनाखाली शिळ-डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी मयताची ओळख पटवून आरोपीचा शोध तपासकामी अधिकारी / अंमलदार यांचे चार तपास पथके तयार करून गुन्ह्याचा तपास चालू असताना सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने सोशल मिडीयावर प्रसारीत केलेल्या बातमीद्वारे एका साक्षीदाराकडून मा. अपर पोलीस आयुक्त श्री. विनायक देशमुख, पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे यांना प्राप्त उपयुक्त माहितीच्या आधारे अज्ञात आरोपीताबाबत सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या माध्यमातुन कसोशीने शोध घेवुन सदर गुन्ह्यात आरोपी नामे विनोद श्रीनिवास विश्वकर्मा (वय: ५० वर्षे) राहण्याचे .ठिकाण. देसाईगाव, ता. जि: ठाणे, मुळगाव-गोरखपुर, उत्तरप्रदेश यां lस देसाई येथून ताब्यात घेवुन त्याच्याकडे तपास केला असता सदरचा गुन्हा त्यानेच केला असल्याची कबुली दिली आहे. सदर गुन्ह्यातील मयत महिला नामे प्रियांका विश्वकर्मा (वय: २२ वर्षे) ही आरोपीसोबत मागील ०५ वर्षापासुन राहावयास होती. त्याच्यात दिनांक २१/११/२०२५ रोजी रात्रौ आपसात भांडण झाले होते. आरोपी याने मयत महिलेचा गळा दाबुन खुन करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिला ट्रॉली बॅगमध्ये भरुन एक दिवस रुममध्येच ठेवले होते. मयत महिलेच्या प्रेताची दुर्गंधी सुटल्यानंतर दिनांक २२/११/२०२५ रोजी रात्रौ ११.३० ते १२.०० वा. चे दरम्यान प्रेत असलेली ट्रॉलीबॅग रोडने पायी चालत खाडी पुलाकडे घेवुन जावुन सदरची ट्रॉलीबॅग पुलावरुन खाली फेकुन दिली होती. मयत व आरोपीताबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसताना सोशल मिडीयामध्ये प्रसारीत झालेल्या बातमीच्या आधारे साक्षीदार मिळवून, हद्दीतील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शिळ डायघर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा कसोशीने तपास करुन सदर गुन्ह्यातील मयताची ओळख पटवून आरोपीस सदर गुन्ह्यात २४ तासात अटक करुन खुनाचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणून स्तुत्य अशी कामगिरी केलेली आहे.

सदरची कामगिरी श्री. सुभाषचंद्र बुरसे पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ ठाणे, श्री. प्रशांत कदम पोलीस उप आयुक्त परिमंडळ-५ वागळे इस्टेट, श्रीमती प्रिया डमाळे सहा. पोलीस आयुक्त कळवा विभाग, श्री. श्रीराम पौळ वपोनि. शिळ-डायघर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजेंद्र राऊत, सपोनि. संतोष चव्हाण, अनिल राजपुत, योगश लामखडे, शहाजी शेळके, अमोल पोवार, पोउपनिरी. माने, बेळगे, तिडके, पोह. श्यामकुमार राठोड, हनुमंत मोरे, भरत जाधव, तेजस परब, विश्वास मोटे, महेंद्र लिंगाळे, सचिन कोळी, अजय साबळे, रमेश पाटील, विक्रांत कांबळे, पोना. मंदार यादव, महेंद्र पाटील, पोशि. संदीप बोरकर, सुशिल पवार, ललीत महाजन, जयेश येळवे, रत्नदिप चौधरी, अक्षय पाडळे, स्वप्निल सोनवलकर, वाहीद तडवी, विजय खाडे यांनी यशस्वीपणे केलेली आहे.