BREAKING NEWS
latest

देश-विदेश

featured/block-3

महाराष्ट्र

featured/block-3

ठाणे

featured/block-1

नवी मुंबई

featured/block-3

वसई विरार

featured/block-6

पालघर

featured/block-3

कल्याण-डोंबिवली

featured/block-2

उल्हासनगर-अम्बरनाथ-बदलापुर

featured/block-3

अन्य जिले

featured/block-4

Latest Articles

अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवून नवजात अर्भकास कचऱ्यात टाकणाऱ्या आरोपीला अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : कल्याण पश्चिम येथील खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बारावे भागात एक स्त्री जातीचे अर्भक बेवारस टाकले गेले होते. अत्यंत हृदयद्रावक व माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक अशी घटना उघडकीस आली आहे. गुन्ह्यातील एका १९ वर्षीय युवकाला खडकपाडा पोलीसांनी अटक केली असून १७ ऑगस्ट २०२५ रोजी गुन्हा नोंदवण्यात आला असून गु.र.नं. ६७०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ६४(२),(एम),९३,३(५), बाल न्याय (मुलाची काळजी व संरक्षण) कायदा २०१५ चे कलम ७५ आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (POCSO) २०१२ अंतर्गत कलम ४,८,१२ अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याच्या तपासानुसार आरोपी रोहित प्रदीप पांडे (वय: १९ वर्षे) राहणार: बारावे, त्याने अल्पवयीन असल्याचे माहित असूनही पीडित मुलीसोबत मागील दोन वर्षापासून शारीरिक संबंध ठेवले, त्यात ती गर्भवती राहिली. सदर मुलीने नवजात मुलीला जन्म दिला. अर्भकाचा जन्मानंतर कोणताही पुरावा मागे न ठेवता, ते अर्भक रात्रभरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकून दिले, ज्यामुळे बाळाचा जीव धोक्यात आला. कल्याण, आंबिवली व शहाड परिसरात तांत्रिक विश्लेषण आणि प्रत्यक्ष तपासणीद्वारे पीडित व आरोपीचा शोध घेण्यात आला. त्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

पुढील तपासा दरम्यान आरोपी रोहित पांडे यांस १९ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याणजी घेटे, तसेच खडकपाडा पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे, निरीक्षक (गुन्हे) मारुती आंधळे, पोलीस निरीक्षक विजय गायकवाड, सतीश पाटील, उपनिरीक्षक भूषण देवरे, व तपास पथकाच्या इतर अंमलदारांनी केला. ही घटना केवळ कायद्याचा भंग करणारी नसून सामाजिक दृष्टिकोनातूनही अत्यंत चिंताजनक आहे. संबंधित आरोपीवर कायद्यानुसार कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

संसदेचा स्फोटक निर्णय! Dream11, MPL, PokerBaazi ऑनलाईन गेम रातोरात होणार बंद ?

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नवी दिल्ली : ऑनलाईन गेमिंगवर सरकारचा मोठा निर्णय! The Promotion and Regulation of Online Gaming Bill, 2025 गुरुवारी राज्यसभेत पारित झाला असून आता तो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वाक्षरीसाठी गेला आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर पैशांवर आधारित सर्व गेम्स म्हणजेच Real Money Games (RMGs) देशात पूर्णपणे बंद होणार आहेत.
- ७२ तासांत दोन्ही सभागृहांतून मंजुरी – विधेयकाला मंत्रिमंडळ, लोकसभा आणि राज्यसभेची झपाट्याने मंजुरी मिळाली.
- मोठ्या कंपन्यांना धक्का – Dream11, MPL, PokerBaazi सारख्या कंपन्यांचा प्रमुख महसूल रातोरात कोसळणार.
- सरकारचा ठाम पवित्रा – “ऑनलाइन पैशांच्या गेममुळे अनेक कुटुंबांचं नुकसान झालं आहे. समाजातल्या गैरप्रकारांवर लगाम घालणं हीच संसद व सरकारची जबाबदारी आहे,” असं आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत स्पष्ट केलं.
- विरोधकांचा गोंधळ – काही विरोधी खासदारांनी विधेयक बदलण्याचे प्रस्ताव मांडले, मात्र मुख्य भर हा “मत चोरीच्या आरोपांवर”च होता.- 

त्वरित अंमलबजावणी 
मंत्री वैष्णव यांनी सांगितलं की, हा कायदा त्वरित लागू केला जाणार असून त्यासाठी स्वतंत्र नियमावली किंवा दीर्घकालीन सल्लामसलत होणार नाही.
- उद्योगात खळबळ – उद्योग क्षेत्राने गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून सवलतीची मागणी केली आहे. मात्र सरकारने ई-स्पोर्ट्सला प्रोत्साहन देण्याची घोषणा केली आहे.

गेम खेळा, पण पैशांचा मोह केला तर थेट तुरुंगाची हवा खावी लागेल !

या निर्णयामुळे शेअर बाजारावरही परिणाम दिसून आला. PokerBaazi मध्ये गुंतवणूक केलेल्या Nazara Technologies च्या शेअर्समध्ये २% घसरण झाली असून Delta Corp Ltd. च्या शेअर्समध्ये ३.१४% घट नोंदली गेली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केले ‘लाडकी सून’ अभियान..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
ठाणे, दि. १८ : ‘लाडकी बहीण’ योजनेच्या यशानंतर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यांनी ठाणे शहरातून ‘लाडकी सून’ या राज्यव्यापी अभियानाची त्यांनी सुरुवात केली आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश घरगुती अत्याचार आणि अन्यायाला बळी पडणाऱ्या महिलांना तात्काळ मदत करणे हा आहे. या अभियानांतर्गत पीडित सुनांना मदत करण्यासाठी एक हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे. ८८२८८६२२८८ या नंबरवर पीडित महिला थेट संपर्क साधून मदत मागू शकतात. त्यांनी दिलेली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबवले जाणार असून, प्रत्येक शिवसेना (शिंदे गट) शाखेतून पीडित महिलांना मदत आणि मार्गदर्शन केले जाईल. एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “सासर काही वाईट नसते, पण काही ठिकाणी अप्रिय घटना घडत असतात. आपली मुलगी जशी लाडकी असते, त्याचप्रमाणे सूनही लाडकी असावी, यासाठी आम्ही हे अभियान सुरू केले आहे.”

हे अभियान विशेषतः सून आणि सासू यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी आणि प्रत्येक सुनेला घरात सन्मान मिळावा यासाठी सुरू करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या पुढाकाराने या अभियानाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. शिंदे यांनी एक्सवर (ट्विटर) माहिती दिली की, आपल्या घरात जशी आपली लेक लाडकी असते तशीच सूनही लाडकी असायला हवी. तिला योग्य वागणूक देऊन सन्मानाने वागवायला हवे, आणि जे असे करणार नाहीत त्यांना आता शिवसेना महिला आघाडी योग्य पद्धतीने धडा शिकवणार आहे. त्यासाठी ‘लाडक्या सुनेचे रक्षण हेच शिवसेनेचे वचन’ हे अभियान हाती घेणार आहे. महिला कुटुंबासाठी सर्व काही करतात, पण स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आपली नियमित तपासणी करून घेण्यासाठी ठाणे मनपा आणि रोटरी क्लबच्या पुढाकाराने ‘उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान’ सुरू करण्यात आले असून जास्तीत जास्त महिलांनी त्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील शिंदे यांनी केले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्कतेचे निर्देश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई, दि. १८ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपूर्ण राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, माहिती तंत्रज्ञान मंत्री ऍड. आशिष शेलार, मुख्य सचिव राजेशकुमार, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, आपत्ती व्यवस्थापन अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.

बैठकीत विभागीय आयुक्तांनी आपल्या विभागातील पावसाबाबतची माहिती सादर केली. रत्नागिरी, रायगड आणि हिंगोली जिल्ह्यांत अधिक पाऊस झाला असून, हवामान खात्याने १७ ते २१ ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. मागील दोन दिवसांत राज्यात विविध घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. कोकणातील काही नद्यांनी धोकापातळी ओलांडली असून जळगावमध्ये मोठे नुकसान झाले आहे. अलमट्टीबाबत कर्नाटक सरकारशी सातत्याने संपर्क ठेवला जात असून, सद्या धोका नसला तरी यंत्रणा सतर्क ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले. मुखेडमधील परिस्थिती नियंत्रणात आली असून, विष्णुपुरीकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजीनगर विभागातील ८०० गावे बाधित झाली आहेत. दक्षिण गडचिरोलीत प्रशासन सतर्क आहे. अकोला, चांदूर रेल्वे, मेहकर, वाशिम येथे परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. विदर्भात प्राथमिक अंदाजानुसार २ लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे. मुंबईत आज सकाळपासून अवघ्या आठ तासांत १७० मिमी पाऊस झाला आहे. शहरात पाणी तुंबल्यामुळे दोन ठिकाणी वाहतूक प्रभावित झाली. रेल्वे, मेट्रो व इतर वाहतूक सुरळीत सुरू आहे. पुढील १० ते १२ तास मुंबईसाठी अत्यंत महत्वाचे असून, प्रशासनाने काळजी घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. उद्याच्या हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शाळांना सुटी जाहीर करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासन व महापालिकांना देण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना दिलेल्या सूचनांमध्ये, एसएमएस अलर्ट पाठवताना वेळेचा अचूक उल्लेख करावा, येणारे अलर्ट गांभीर्याने घ्यावेत, स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. तातडीच्या मदतीसाठी मंत्रालय गाठण्याची गरज नाही, स्थानिक पातळीवरच निधी व अधिकार देण्यात आले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. घरांच्या पडझडीसाठीची मदत, पंचनामे योग्य पद्धतीने करण्याचे निर्देशही देण्यात आले. धोक्याची पातळी वाढण्यापूर्वी अन्य राज्यांशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले. पर्यटकांच्या ठिकाणी पोलिसांनी सतर्क रहावे, दरडी कोसळणाऱ्या भागात आधीच यंत्रणा कार्यरत करावी, तसेच निवारा केंद्रात भोजन, शुद्ध पाणी व पांघरूण यांची पुरेशी सोय करावी, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई दि. १८ :  मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यानंतर रेड अलर्ट देण्यात आलेल्या मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड , नाशिक जिल्ह्यातील घाटमाथा, बुलडाणा जिल्ह्यातील दोन तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालये यांना आज, दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

भारतीय हवामान खात्याकडून मंगळवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई सह या सगळ्या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरसह या सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालये यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने सुट्टी जारी करण्यात आली आहे. या शिवाय स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहून संबंधित जिल्हाधिकारी, शाळा मुख्याध्यापक यांना शाळांना सुट्टी देण्याचे अधिकार देण्यात आल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर स्पष्ट केले आहे.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन आणि कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली:  भारत देश १९४७ साली स्वतंत्र झाला आणि भारतीय नागरिकांना त्यांचे मूलभूत हक्क आणि अधिकार मिळाले त्याच मातृभूमीसाठी आणि आपल्या शूरवीर शाहिद जवानांना कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे १५ ऑगस्ट. योगायोग हाच की गोकुळ अष्टमी देखील याच दिवशी असल्याकारणाने मोठ्या जल्लोषात उत्सवचं साजरा करण्यात आला.
'जे एम एफ' संस्थे अंतर्गत जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर तसेच कनिष्ठ महाविद्यालय व वंदे मातरम् पदवी महाविद्यालयाच्या प्रांगणात झेंडा वंदन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे, प्रमुख पाहुणे डॉ. गुजराथी तसेच इतर पदाधिकारी व सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहण करून तिरंग्याला मानवंदना दिली त्यावेळी संगीत शिक्षिका सौ. श्रेया कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगान व झेंडावंदन गीत गाऊन सलामी दिली. इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेची व श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले व सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्याच बरोबर नृत्य शिक्षक अभिषेक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली देशभक्तीपर नृत्य तर शिक्षिका कविता गुप्ता व नितेश मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली देशभक्तीपर नाटक सादर केले. तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी देखील भाषण व नृत्य सादर केले.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि भारतीय एकात्मता हीच भारताचा अमूल्य ठेवा म्हणून भारत देशाची ओळख निर्माण झाली, "भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत." ही वचनबद्ध प्रतिज्ञा प्रत्येक भारतीयांच्या मनात, हृदयात कृतज्ञता पूर्वक एकात्मतेचे प्रतीक बनून राहिली आहे, असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले. तर देशाच्या सीमेवर जाऊन लढले म्हणजेच देशसेवा केली असे नाही तर कुठेही कचरा न टाकता स्वच्छ भारत, सुंदर भारत करणे ही सुद्धा देशाचीच सेवा आहे असे संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सांगितले. यावेळी १९४७ सालापासून ते २०२५ पर्यंतच्या काळात देशात कोणकोणत्या अलौकिक घटना घडल्या त्या घटना क्रमांकाची चित्रफित दाखवण्यात आली. पुस्तकी इतिहासाच्या अभ्यासाबरोबरच त्या काळी घडत असलेल्या घटना विद्यार्थ्यांना बघून समजावा असा इतिहास दाखवण्यात आला, संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी प्रत्येक घटनेचे सविस्तर वर्णन करून विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. प्रसार माध्यमाचे मुख्य संपादक रोहित राजगुरु, अखिल नायडू व त्यांच्या चमू ने चित्रफित तयार केली.
स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम झाल्यावर लगेचच बाळगोपाल्यांच्या आवडीचा कृष्ण जन्माष्टमी सोहळा व दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. इयत्ता पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांनी कृष्णाचे सुंदर गीत गाऊन भक्तीमय वातावरण तयार केले तर नाट्य शिक्षक श्री. प्रमोद पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी राधा कृष्ण नाटक सादर केले व इतर विद्यार्थ्यांनी रासलीला नृत्य सादर केले. "लाख असतील कृष्ण कालिंदीच्या तटाला, राधेस जो मिळाला तो एकटाच उरला.." सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सुंदर अशा पंक्ती म्हणून आपल्या कृष्ण कथेला सुरुवात केली. स्वातंत्र्य दिन आणि कृष्ण जन्म हा एकाच दिवशी आला हा योगायोग आहेच खरे, पण या दोन्ही गोष्टीत एकच साम्य आहे ते म्हणजे, दोन्हीकडे असणारे 'तुरुंग ' बराच काही इतिहास सांगून जातो, ज्यादिवशी स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशासाठी तुरुंगात असलेले वीर बाहेर पडले व स्वतंत्र झाले तर श्रीकृष्णाचा जन्म तुरुंगात झाला आणि तोही कंसाच्या तावडीतून वाचण्यासाठी तुरुंगातून बाहेर पडला.. असा इतिहास म्हणजे कर्मासाठी आणि धर्मासाठी असलेला दैवी दुवा आहे असेही डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी नमूद केले. कृष्ण कोण होता आणि त्याच्या लीला कशा होत्या याची माहिती त्यांनी आपल्या चित्रफिती मध्ये दाखवली.
मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये मोठी दहीहंडी बांधून बाळकृष्ण बनून आलेल्या छोट्या मुलांचे थरावर थर तयार करून जल्लोषात दहीहंडी फोडण्यात आली. प्रसाद वाटप होऊन सर्वांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्राध्यापक श्री. योगेश शिरसाट व विद्यामंदिर शाळेची विद्यार्थिनी मीरा यांनी केले.

नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
पुणे, दि.०१– आज पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२५ चे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी रोहित टिळक, सुशील कुमार शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

१९८३ साली लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात झाली. सर्व प्रथम एस.एम.जोशी यांना टिळक पुरस्कार पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराचे हे ४३ वे वर्ष आहे. दोन वर्षांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता मागील वर्षी हा पुरस्कार सुधा मूर्ती यांना देण्यात आला.

लोकमान्य टिळक हे आमच्यासाठी प्रेरणा स्थान आहे. त्यांच्या नावाने असणारा पुरस्कार मला मिळाला मी भाग्यवान आहे, टिळक हे राष्ट्रीय निर्माते होते. सत्ता कारणाचे रूपांतर हे समाज कार्यात झाले पाहिजे. स्वातंत्र्य हे राष्ट्रपुरुषांच्या बलिदानाने मिळाले आहे. अविचारी माणसे धाडसी निर्णय घेतात असे नितीन गडकरी आपल्या सत्काराच्या उत्तरात म्हणाले.

५० हजार कोटींची पुणे शहरात काम होणार आहेत. मुंबई-बंगलोरचे काम लवकरच होणार आहे. स्वराज्य आणि समाज सुधारणा देखील पाहिजे. महाराष्ट्र सर्वात जास्त रेव्हेन्यू देत आहे. भारत आता ३ नंबर ची अर्थव्यवस्था आहे. आत्मनिर्भर भारत चे स्वप्न आपले पूर्ण होणार आहे. आटोमोबाईल मध्ये भारत येणाऱ्या काळात सर्वात मोठा देश होणार आहे. लोकमान्यांचे स्वराज्याचे सुराज्य बनवण्याचे काम आपण केले पाहिजे, असे ही गडकरी म्हणाले. टिळकांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम आपण केले पाहिजे असे नितीन गडकरी म्हणाले.