BREAKING NEWS
latest

पाकची नरमाई - काश्मीरसह सर्व मुद्द्यांवर भारताशी चर्चा करण्यास तयार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
तेहरान : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर कारवाई केल्यावर आणि जगभरात नाचक्की झाल्यावर पाकने आता काहीशी नरमाईची भूमिका घेतली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी काश्मीर, पाणी वाटप , व्यापार, आणि दहशतवाद यांसारख्या दीर्घकाळ प्रलंबित विषयांवर भारतासोबत संवाद साधण्याची तयारी दर्शवली आहे. ते सध्या इराणच्या दौऱ्यावर असून तेहरानमध्ये आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली.

इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियानयांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना शरीफ म्हणाले, “आम्हाला आमच्या शेजारी देशासोबत शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातून पाणी वाटपासारख्या समस्यांवर तोडगा शोधायचा आहे.” ते पुढे म्हणाले, “व्यापार वाढवणे आणि दहशतवादाचा सामना करणे हेसुद्धा आमच्या चर्चेचे विषय असतील.”

शरिफ म्हणाले की, “जर भारताने आमची शांततेची ऑफर स्वीकारली, तर आम्ही हे दाखवून देऊ की आम्ही प्रामाणिकपणे शांतता साध्य करू इच्छितो.” तुर्कस्तान दौऱ्यानंतर शहबाज शरीफ सोमवारी इराणमध्ये पोहोचले असून, पुढील आठवड्यात ते ताजिकिस्तान आणि अझरबैजानला भेट देणार आहेत.

दरम्यान, इराणच्या अधिकृत ‘IRNA’ वृत्तसंस्थेनुसार, अध्यक्ष पेझेश्कियान यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये चिरस्थायी युद्धविरामासाठी इराणच्या पाठिंब्याचा पुनरुच्चार केला आहे. त्यांनी प्रादेशिक शांततेसाठी संवादाला प्रोत्साहन देण्याचे आवाहनही केले.

भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचा एक मुख्य मुद्दा म्हणजे सिंधू पाणी करार, जो भारत सरकारने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर स्थगित केला होता. या हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलली, ज्यामध्ये पाणी वाटप करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.

भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, १९६० मध्ये झालेला सिंधू पाणी करार सध्या पाकिस्तानच्या सीमापार दहशतवादामुळे अंमलात नाही. हा करार सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांमधील पाण्याचे नियमन करतो.

त्याचप्रमाणे, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले होते की, हवामान बदल, लोकसंख्येतील वाढ आणि तांत्रिक बदलांमुळे जमिनीवर नवीन वास्तव निर्माण झाले आहे. पाकिस्तानने सीमापार दहशतवादाला पूर्णपणे आणि विश्वासार्हपणे थांबवल्याशिवाय भारत करार पुन्हा सुरु करणार नाही.

भारत सरकारने वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अधिसूचनेद्वारे पाकिस्तानमधून कोणत्याही वस्तूंच्या आयात किंवा वाहतुकीवर तात्काळ बंदी लागू केली होती, ज्यामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार पूर्णपणे ठप्प झाला आहे.

मुंबईत अवतरलं ‘लाइव्ह कोकण’! जोगेश्वरीत सुरु झाला धमाकेदार कोकण महोत्सव

 

संदिप कसालकर (संपादक, भारत २४ तास)

मुंबई | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पुरस्कृत युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने २० मे ते १० जून २०२५ दरम्यान ‘कोकण महोत्सव आणि जोगेश्वरी-अंधेरी कार्निवल’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या महोत्सवात कोकणची चव, कलापरंपरा, लोकसंगीत, आणि सांस्कृतिक ठेवा मुंबईच्या हृदयात सादर होणार आहे.

हा उत्सव अंधेरी पूर्व येथील रॉयल मैदानावर सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत पार पडणार असून, सर्व मुंबईकरांसाठी खुला आणि आकर्षणाने परिपूर्ण आहे. महोत्सवात कोकणातील खास खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू, लोककलेचे कार्यक्रम, लहान मुलांसाठी कार्निवल स्टॉल्स आणि मनोरंजनाचे विविध पर्याय पाहायला मिळणार आहेत.

कार्यक्रमात दररोज नवीन सांस्कृतिक सादरीकरण, शालेय विद्यार्थ्यांचे नृत्य व गीत स्पर्धा, महिला मंडळांचे सादरीकरण, तसेच स्थानिक कलाकारांना व्यासपीठ देण्यात येणार आहे. २१ दिवस चालणाऱ्या या कार्निवलमध्ये प्रेक्षकांना कोकणची खरी अनुभूती देणारे प्रत्येक क्षण खास असणार आहेत.

या महोत्सवाचे प्रमुख आयोजक आहेत अमोल भिंगार्डे तसेच सुयश साटम (युवा नेता, जोगेश्वरी विधानसभा चिटणीस ) यांनी देखील मोलाचा सहभाग नोंदविला आहे. या कार्यक्रमात शिवसेनेचे विविध नेते, पदाधिकारी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर देखील सहभागी होणार आहेत. विशेषतः अनिल परब, आमदार बाळा नर, सुनील प्रभू यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमुळे महोत्सवाची शान वाढणार आहे.

महोत्सवाच्या निमित्ताने मुंबईकरांना केवळ करमणूकच नव्हे, तर आपल्या कोकणच्या संस्कृतीशी नाळ जुळवण्याची संधी मिळणार आहे. परंपरा, कला, खाद्यसंस्कृती आणि स्थानिक लोकजीवन यांचे सुरेख मिश्रण या कार्यक्रमात अनुभवायला मिळणार आहे.


'जे एम एफ' चे संस्थापक अध्यक्ष डॉ.राजकुमार कोल्हे सेंट पीटर्सबर्ग रशिया येथे 'ग्लोबल लीडर' पुरस्काराने सन्मानीत..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : २०२४ मध्ये रशियामध्ये आयोजित ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान, भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि रशियाचे माननीय अध्यक्ष श्री. व्लादिमीर पुतीन यांनी संयुक्तपणे इंडो-रशियन सामाजिक आणि शैक्षणिक देवाणघेवाण कार्यक्रमाची घोषणा केली. 'ग्लोबल लीडर' पुरस्कार हा या उपक्रमाचा एक भाग होता, ज्याद्वारे निवडलेल्या इंडो-रशियन प्रतिनिधींना येत्या काही वर्षांत दोन्ही देशांच्या परस्पर फायद्यासाठी कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी आमंत्रित केले गेले होते. सुरुवातीपासूनच भारत आणि रशियाने मजबूत द्विपक्षीय संबंध सामायिक केले आहेत आणि या फोरमचे हे संबंध पुढील स्तरावर बळकट करण्याचे उद्दीष्ट आहे.
रशिया हा एक आकर्षक विरोधाभासांचा देश आहे, जिथे इतिहास, विज्ञान आणि निसर्ग पृथ्वीवरील सर्वात प्रभावी प्रदेशांपैकी एकामध्ये रूपांतरित होते. जगातील सर्वात मोठा देश म्हणून, दोन खंड आणि ११ वेळ क्षेत्रांमध्ये, त्याचा समृद्ध इतिहास झारपासून सोव्हिएत काळापर्यंत आधुनिक रशियापर्यंत विविध संस्कृती, अत्यंत लँडस्केप्स आणि आयकॉनिक महत्त्वाच्या खुणा बनवतात.
संख्येने रशियाची लोकसंख्या १४४ दशलक्षअसून अधिकृत भाषा रशियनआहे. रशियाचे जमीन क्षेत्र १७,०९८,२४६ कि.मी. असून त्यांची राजधानी मॉस्कोआहे. तसेच त्यांची द्वितीय राजधानी सेंट पीटर्सबर्ग आहे.

आश्चर्यकारक तथ्ये

 रशिया कॅनडाच्या आकारापेक्षा दुप्पट आहे, जगातील दुसर्‍या क्रमांकाचा देश असून त्याचे लँडस्केप गोठलेल्या टुंड्रापासून सुपीक मैदानी आणि भव्य पर्वतांपर्यंत आहे.

सांस्कृतिक समृद्धता 

मॉस्को हे आयकॉनिक रेड स्क्वेअरचे घर आहे, तर सेंट पीटर्सबर्गमध्ये हेरिटेज संग्रहालय आहे, जे जगातील सर्वात मोठे आणि सर्वात महत्वाचे कला संग्रह आहे.

बॅक बाकल लेक 

“सायबेरियाचे मोती” म्हणून ओळखले जाते, हे जगातील सर्वात खोल आणि सर्वात जुने तलाव आहे, जे त्याच्या क्रिस्टल-क्लिअर वॉटर आणि नेरपा सीलसाठी प्रसिद्ध आहे पृथ्वीवरील एकमेव गोड्या पाण्याचे सील.

अत्यंत हिवाळा 

ओमायकॉनसारख्या ठिकाणी तापमान इतके कमी होते की अतिशीत होण्यापासून बचाव करण्यासाठी कार चालू ठेवल्या पाहिजेत.

स्पेस अंतराळातील पायनियर

सोव्हिएत स्पेस लेगसी पुढे रशियाने १९६१ मध्ये जेव्हा युरी गॅगारिन अंतराळात प्रवास करणारा पहिला मनुष्य बनला तेव्हा रशियाने इतिहास घडवून आणला.
आम्हाला रशियन समाजातील विविध क्षेत्रांतील अग्रगण्य लोकांना भेटण्याचा बहुमान मिळाला. सेंट पीटर्सबर्ग अचानक राजवाडे, संग्रहालये, नैसर्गिक सौंदर्य आणि मानवनिर्मित चमत्कारांचे शहर ११ मे २०२५ रोजी जागतिक आर्थिक नेता पुरस्कार सोहळ्यासह, जिथे डाॅ. राजकुमार कोल्हे यांना 'ग्लोबल लीडर' या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले. सोबत डाॅ. प्रेरणा राजकुमार कोल्हे व कु.जाह्नवी राजकुमार कोल्हे, डाॅ. सारीका रोकडे व डाॅ. विजय रोकडे (नागपूर), अशा १९ भारतियांना सन्मानित करण्यात आले.
संपूर्ण दिवस भारतीय आणि रशियन प्रतिनिधींमधील समृद्ध कार्यक्रम आणि उबदार संवादांनी भरलेला होता. सुश्री रशिया वलेरिया, एलेना आणि इतर प्रतिष्ठित रशियन अतिथींनी हा प्रसंग गाठला. संपूर्ण अनुभव प्रेरणादायक आणि संस्मरणीय दोन्ही होता. ९ मे  हा रशिया चा विजय दिवस, यामधे भारतीय प्रतिनिधिमंडल ने भाग घेऊन साजरा केला. रशियन राष्ट्रगीत नंतर भारताचे राष्ट्रगीत गाऊन हा सोहळा साजरा करण्यात आला. आम्ही डॉ. हरी कृष्णा मारान आणि त्याच्या कुटुंबाचे विशेष आभार मानतो, ज्यांनी या प्रवासात संपूर्ण मनापासून पाठिंबा दर्शविला, ज्यामुळे ते आणखी विशेष बनले.

आम्हाला सेंट पीटर्सबर्गमधील 'ब्रह्मा कुमारिज' जागतिक अध्यात्मिक विद्यापीठाला भेट देण्याची संधी देखील मिळाली. त्याची अद्वितीय आर्किटेक्चर आणि आध्यात्मिक आभा खरोखर उल्लेखनीय होती. आम्ही तेथे चार दिवसांनंतर पारंपारिक भारतीय डिनरचा आनंद घेतला. 

एक भावनिक आणि सांत्वनदायक अनुभव 

आम्ही राजयोगिनी चक्राधारी दीदीजी, राजयोगिनी संतोष दीदीजी आणि अलेक्झांडर भाई  यांचे मनापासून समर्पणाचे मनापासून कौतुक करतो, ज्यांचे प्रयत्न हजारो आध्यात्मिक साधकांना मार्गदर्शन करतात आणि परदेशी देशात भारतीय मूल्ये पाळतात.

गेल्या चार वर्षांत युक्रेनशी दीर्घकाळ संघर्ष आणि पश्चिम जगातील असंख्य निर्बंधांचा सामना करावा लागला असला तरी, रशिया लचकदार उभा राहिला आहे जसे की एक धडकी भरवणारा आहे. जसे की त्याचे वैभव सांगत आहे आणि जगभरातील लोक आणि प्रशंसकांची मने जिंकत आहेत.

हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक सारख्या जागतिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रशियामध्ये कार्यरत नाही किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त ब्रँड नाहीत. तरीही, रशियाने स्वत: चे इकोसिस्टम तयार केले आहे आणि तंत्रज्ञानाच्या स्वातंत्र्यात उत्कृष्ट आहे. अंदाजे ९५% लोक फक्त रशियन बोलतात आणि समजतात. आमच्या संपूर्ण भेटीत, रीअल-टाईम भाषांतर आवश्यक होते. आम्ही मूलभूत रशियन शिकण्याची किंवा भेट देण्यापूर्वी भाषांतर ऍप वापरण्याची जोरदार शिफारस करतो. जवळजवळ सर्व सार्वजनिक चिन्हे आणि बोर्ड केवळ रशियन भाषेत आहेत.
आम्ही १ डिग्री सेल्सियस ते ५ डिग्री सेल्सियस पर्यंत तापमान अनुभवले. हे वृत्त अंशतः बुलेट ट्रेनमध्ये आणि अंशतः आमच्या परतीच्या उड्डाण दरम्यान लिहिले गेले गोड आठवणींनी भरलेले. आम्ही आमच्या मनापासून  प्रवासात योगदान देणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे आभार. खोल आदर आणि कृतज्ञतेने आम्ही रशियाच्या भूमीला सलाम करतो असे डॉ. राजकुमार एम.कोल्हे आणि डॉ. प्रेरणा राजकुमार कोल्हे यांनी त्यांच्या घेतलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.

“नवीन फौजदारी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीतून ‘कन्व्हिक्शन रेट’ वाढवावा”..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सांगली येथे, ‘सांगली जिल्हा पोलीस’ आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधितांना निर्देश दिले. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाने सर्वतोपरी कामगिरी करावी. त्यासाठी नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करून ‘कन्व्हिक्शन रेट’ वाढवावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. 

खटल्यांमधून आरोपी निर्दोष सुटण्यामागच्या कारणांचा अभ्यास करून, त्यातील त्रृटी दूर कराव्यात. आरोपी निर्दोष सुटण्याचे प्रमाण अधिक असणाऱ्या पोलीस ठाण्यांचा आढावा घेत, यातील त्रृटी दूर कराव्यात. त्यासाठी सरकारी वकिलांची बैठक घ्यावी. ई-समन्सची नियमित प्रभावी अंमलबजावणी करावी. यामुळे वेळ व पैसा वाचतो. सर्व उपाय करून कन्व्हिक्शन रेटचे प्रमाण वाढले पाहिजे.

मालमत्ताविषयक गुन्ह्यात हस्तगत केलेला माल परत देण्याचे प्रमाण वाढवावे, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी प्रतिबंधात्मक कार्यवाही करताना औद्योगिक क्षेत्रातील बंद रासायनिक कंपन्यांचे सर्वेक्षण करून तपासणी करावी. यासाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित पोलीस ठाण्यांना सूचित करावे.”

बेपत्ता महिलांसंदर्भातील गुन्ह्यांचा पूर्ण तपास आणि कार्यवाही होईपर्यंत पाठपुरावा करावा. यासंदर्भात दाखल गुन्हे, त्यातील किती महिला परत आल्या याचे पोलीस ठाणे निहाय ट्रॅकिंग करावे. यासंदर्भात विशेष मोहीम राबवावी. मोटार वाहन कायद्याखालील केसेससाठी स्वतंत्र व्यवस्था उभी करा, असे त्यांनी संबंधीतांना सूचित केले.

दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल करण्याचे व गुन्हे ‘कन्व्हिक्शन रेट’चे प्रमाण वाढवावे, असे सूचित करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नवीन फौजदारी कायद्यांच्या माध्यमातून दोषारोपपत्र दाखल होण्याची गती वाढवावी. ६० ते ९० दिवसात दोषारोपपत्र दाखल करावेत तसेच आरोपीच्या गैरहजेरीमध्येही खटले चालवावेत. नवीन फौजदारी कायद्यामुळे पुरावे स्वीकारार्हतेची कक्षा वाढल्याने त्याचा फायदा घ्यावा. झिरो एफआयआरचे नियमित एफआयआरमध्ये रूपांतरण करावे, असेही ते म्हणाले.

कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. यावर्षी ११७% पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापूरमधील २०१९ च्या महापुराचा धोका लक्षात ठेवून, त्याप्रमाणे आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, लोकांमध्ये जनजागृती करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून एलिम्को तर्फे दिव्यांग व जेष्ठ नागरिकांसाठी राबविलेले दोन दिवसीय तपासणी शिबिर यशस्वीपणे संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नाने केंद्र सरकारच्या 'भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम' मार्फत दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिकांसाठी डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेत आयोजित दोन दिवसीय तपासणी शिबिर २४ मे व २५ मे २०२५ रोजी उत्साही वातावरणात आणि यशस्वीपणे संपन्न झाले. सदर दोन दिवसीय शिबिरामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिकांनी  मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेतला. या योजनेनुसार दोन दिवसांमध्ये उपस्थित राहिलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना तीन चाकी सायकल, व्हीलचेअर, बॅटरी संचालित मोटराईज्ड सायकल, कुबड्या, वॉकिंग स्टिक, सीपी चेअर, श्रवण यंत्र, ब्रेल साहित्य, स्मार्टफोन, कृत्रिम अवयव तसेच सहभागी ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर, कमोड खुर्ची, ट्रायपॉड, ग्रीवा कॉलर, डेंचर, एल एस बेल्ट इत्यादी साहित्य उपस्थित डॉक्टर वर्गाकडून आवश्यकतेनुसार मंजूर करण्यात आले. सदरच्या शिबिरामध्ये गरजू ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांना केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ मिळावा याकरिता कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे तडफदार आमदार श्री. राजेश गोवर्धन मोरे यांच्या वतीने उत्पन्नाच्या दाखल्याचे वाटप करून मोलाचे सहकार्य करण्यात आले.
या दोन दिवसीय शिबिराचा उद्घाटन समारंभ शनिवार दिनांक २४ मे २०२५ रोजी सकाळी डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शहर शाखेत शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. गोपाळ लांडगे, जिल्हा महिला संघटक सौ. लताताई पाटील, उपजिल्हाप्रमुख श्री. राजेश कदम, श्री. रवी पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख श्री. विवेक खामकर महिला आघाडीच्या जिल्हा संपर्कप्रमुख कविताताई गावंड, तालुका प्रमुख श्री. महेश पाटील, ज्येष्ठ नेते सदा थरवळ, कल्याण तालुका संघटक श्री. अर्जुन पाटील आणि अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघाच्या शिक्षण आणि प्रशिक्षण समितीचे अध्यक्ष श्री. महादेव नरसिंग ढोकळे यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी सह-कार्यालय प्रमुख श्री. बालन मोरे, श्री. धर्मराज शिंदे, श्री. शैलेंद्र भोजने, कोपर शिवसेना शाखा क्र.६५ चे माजी नगरसेवक संजय पावशे, कल्याण ग्रामीण तालुका महिला संघटक सौ. कल्पना पाटील, उपशहर प्रमुख श्री. दिनेश शिवलकर, महिला शहर संघटक डोंबिवली पूर्व सौ. स्वाती हिरवे, मंगलाताई पोखरकर, सुवर्णाताई भापकर, शिक्षिका आणि दिव्यांग भगिनी निकिताताई म्हात्रे, समन्वय समिती ज्येष्ठ नागरिक संघ डोंबिवली अध्यक्ष श्री. सुरेश पालकर, साई सार्थक ज्येष्ठ नागरिक संघ पाथर्डी सदस्य श्री उदय गोखले, साई सार्थक ज्येष्ठ नागरिक संघ पाथर्ली सदस्य श्रीमती भाग्यश्री पुरंदरे, उपशहर संघटक संतोष तळाशीलकर, उपशहर प्रमुख श्री. दीपक भोसले, विधानसभा प्रमुख व शहर सचिव श्री. संतोष चव्हाण, महानगर प्रमुख सौ. सारिका चव्हाण, सौ. प्रभावती म्हात्रे, सारिकाताई रावल, श्वेताताई विश्वकर्मा, सौ.आरती राजपूत,  डॉ. वृषाली गडाड, विधानसभा संघटक अवनी शर्मा, साउथ इंडियन सेल प्रमुख श्री. पॉली जेकब, उपशहर संघटक ज्ञानेश पवार, शैलेश चव्हाण, उपविभाग प्रमुख यशवंत भावसार, विभाग प्रमुख शिवराम हळदणकर, सौ. प्रमिला जाधव, सौ. मंजुळा शेट्टी, सौ. शिल्पाताई मोरे, सौ. गीता राजपूत, सौ. सुरेखा राणे, सौ. प्रतिभा पांचाळ, सौ. नमिता मयेकर, सौ. आकांक्षा साईल, सौ. स्वाती मोहिते, संस्कृती गुप्ता मारुती मोतीराम ठोंबरे, आमदार राजेश मोरे यांचे स्वीय सहाय्यक श्री. सतीश मोडक तसेच खासदार कार्यालयाचे प्रकाश माने इतर कर्मचारी आणि शिवसेनेचे अनेक महिला पुरुष पदाधिकारी / कार्यकर्ते, समाजसेवक, दिव्यांग भगिनी, ज्येष्ठ नागरिक संघांचे प्रतिनिधी व मान्यवर यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. 
या शिबिरामध्ये १८० ज्येष्ठ नागरिकांनी आणि ६६ दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला असून त्यापैकी १५५ ज्येष्ठ नागरिक व ५२ दिव्यांग बांधवांनी त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रानुसार व त्यांना असलेल्या आवश्यकतेनुसार विविध वस्तूंची मंजूरी उपस्थित अधिकारी वर्गाने दिली. या कार्यक्रमाद्वारे उपस्थित कल्याण लोकसभा मतदारसंघातील गरजू ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव तसेच डोंबिवली शहरातील विविध ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी / कार्यकर्ते, विविध दिव्यांग संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सातत्याने विविध कार्यक्रम राबविणारे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब तसेच ज्येष्ठ नागरिकांना व दिव्यांग बांधवांना शिबिरस्थळी उत्पन्नाचा दाखला मिळवून देण्यासाठी सक्रिय सहभाग घेणारे कल्याण ग्रामीण विधानसभेचे तडफदार आमदार श्री.राजेश गोवर्धन मोरे, तसेच शिबिरातील लाभार्थ्यांना विविध वस्तू पुरवणाऱ्या एलिम्को संस्थेचे पदाधिकारी, उपस्थित डॉक्टर्स आणि समस्त शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
या शिबिरासोबतच कल्याण मतदारसंघातील मुंब्रा, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व व ग्रामीण भागातील यापूर्वीच्या शिबिरांमधील लाभार्थ्यांना पुढील पंधरवड्यात साहित्य वितरणाचा समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिकांना मिळणारे सहाय्यक साहित्य त्यांच्या दैनंदिन जीवनात नक्कीच सुलभता आणि आत्मसन्मान निर्माण करणारे ठरेल असे मत उपस्थितांनी व्यक्त केल्याने शिबिर समारोपाच्या वेळी एलीमको कंपनीच्या वस्तीने उपस्थित राहिलेले डॉक्टर व स्टाफ यांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने शाल - श्रीफळ देऊन सत्कार करून त्यांचे आभार मानून आनंदी व हर्षमय वातावरणात संध्याकाळी ५ वाजता दोन दिवसीय शिबिराची सांगता करण्यात आली.

मुंबईत पावसाच्या जोरदार धुमाकूळाचा मध्य रेल्वेला फटका बसून प्रवाशांची उडाली ताराबंळ..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : मुंबईसह उपनगरात पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. १२ दिवस आधीच मान्सून चे आगमन झाल्याने यंदा पावसाने १०७ वर्षाचा रेकॉर्ड मोडत पावसाचा फटका रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला देखील बसला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतून १० ते १५ मिनिटं उशिराने सुरू आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीचा वेग मंदावला आहे. सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग पाहायला मिळत आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे. 

पुढील ३-४ तासांत जिल्ह्यांतील काही ठिकाणी ५०-६० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत. माटुंगा, दादर, वरळी, लालबागमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम उपनगरात देखील पावसाचा जोर वाढला आहे. वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, दहिसरमध्ये दमदार पाऊस सुरू आहे. भांडूप, घाटकोपर, ठाण्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. नवी मुंबईतही जोरदार पाऊस पडत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्र व लगतच्या मराठवाड्याच्या भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

त्यामुळे पुढील चार दिवसांत कोकण, गोव्यातील बहुतांश भागात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ज्या सूखसरींची राज्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा असते तो मान्सून यंदा १२ दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मे महिन्यातच राज्यात मान्सून येण्याची ही १६ वर्षांतील पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढील २४ तासांमध्ये मान्सून रविवारी चक्क तळकोकणात पोहोचला आहे. कर्नाटक आणि संपूर्ण गोवा राज्यातही त्याने धडक दिली. पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून संपूर्ण मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

“ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी कायदा व सुव्यवस्था राखणे प्रथम कर्तव्य !” - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी: अवधुत सावंत

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगली पोलीसांच्या विविध प्रकल्पांचे उदघाटन आणि भूमिपूजन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०१४ नंतर पोलीस कार्यालये व पोलीसांची निवासस्थाने यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करुन देण्यात आला. राज्यात २,००,००० पोलीस असून गेल्या १० वर्षात पोलीसांसाठीच्या ९४,०००  निवासस्थानांची निर्मिती करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
राज्यात आताच्या काळातील लोकसंख्येला अनुरुप पोलीस ठाणी, पोलीस मुख्यालये, पोलीस अधिकारी - कर्मचारी व इतर व्यवस्थांची उभारणी करण्यात येत आहे. मागील काळात राज्यात जवळपास ४०,००० पोलीसांची भरती करण्यात आली असून यापुढेही पोलीस भरती सुरुच राहणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
प्रत्येक जिल्ह्यात फॉरेन्सिक व्हॅन्सची सुविधा करण्यात येत आहे. राज्याने ६० दिवस किंवा काही गुन्ह्यांत ९० दिवस अशा विहित कालावधीच्या आत चार्जशीट दाखल करण्याची क्षमता प्राप्त केली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात ‘रेट ऑफ कन्व्हिक्शन‘मध्ये ५०% पर्यंत वाढ झाली असून ते ७०-७५% पर्यंत न्यायचे आहे. देशातील सर्वात आधुनिक सायबर सिक्युरिटी सेंटर महाराष्ट्राने तयार केले आहे. अंमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स मोहीम’ सुरु करण्यात आलेली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्यासाठी कायदा व सुव्यवस्था राखणे प्रथम कर्तव्य आहे. यासाठी CCTNS-2 प्रणाली आणत आहोत, ऑनलाईन FIR ची व्यवस्था सुरु करण्यात आलेली आहे, स्मार्ट सीसीटीव्ही नेटवर्क सर्वत्र तयार करण्यात आले आहे. याचा उपयोग सामान्य माणसाला दिलासा देण्याकरिता करावा, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, खा.धनंजय महाडिक, आ.सुधीर गाडगीळ, आ.सुरेश खाडे, आ.सत्यजित देशमुख, आ.गोपीचंद पडळकर, आ.अमल महाडिक, पोलीस गृहनिर्माण विभाग प्रमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.