BREAKING NEWS
latest
महाराष्ट्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महाराष्ट्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

भाविकांच्या सेवेत आजपासून मलंगगडावर देशातील सर्वात मोठी आणि लांब पल्ल्याची फ्युनिक्युलर ट्रेन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण दि.१८ : कल्याणमधील श्री मलंगगडावर आता भाविकांना मोठी सुविधा मिळणार आहे. देशातील सर्वात लांब फ्युनिक्युलर सेवा अखेर  सुरू झाली आहे. रविवारी भाजपा आमदार किसन कथोरे आणि सुलभा गायकवाड यांच्या हस्ते या सेवेचं लोकार्पण करण्यात आलं. आजपासून सुरू झालेल्या या फ्युनिक्युलर सेवेमुळे भाविकांना मलंगगडावर जाणं अधिक सोपं, सुरक्षित आणि जलद होणार आहे. विशेष म्हणजे, सुप्रीम कंपनीकडून भाविकांसाठी दोन दिवस ही सेवा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. श्री मलंगगड यात्रेच्या आधीच आता भाविकांच्या सेवेत फ्युनिक्युलर सेवा यंदा दाखल झाल्याने यंदाच्या यात्रेत भाविकांना मोठी सोय होणार आहे.

हा पथदर्शी प्रकल्पाचा प्रस्ताव २००४ मध्ये आमदार किसन कथोरे यांनी मांडला होता. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात या प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती. मात्र मधल्या काळात याकडे दुर्लक्ष झालं होतं. त्यानंतर २०१२ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मात्र, विधानसभा क्षेत्राचे विभाजन झाल्यानंतर हा प्रकल्प रखडला होता. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी या कामाला गती देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. यानंतर कामाला पुन्हा सुरुवात झाली आणि अखेर यंदा २०२६ मध्ये या फ्युनिक्युलर प्रकल्पाचं काम पूर्ण झालं आहे.

मलंगगडावर, हाजी मंगलला कल्याण, मुंबई, नवी मुंबईतून अनेक भाविक येतात. जाण्यासाठी अंदाजे २६०० पायऱ्या चढून वर गडावर जावं लागतं. हा गड चढण्यासाठी जवळपास २तास लागतात. मात्र आता फ्युनिक्युलर ट्रेन आजपासून सुरू झाल्याने हे २ तासांचं अंतर अवघ्या १० मिनिटांत पूर्ण करून जाता येईल. या सुविधेच्या देखरेखीसाठी ७० जण असून १२० जण यातून प्रवास करू शकतात, अशी माहिती आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या सेवेला मंजुरी मिळाल्यानंतर मुंबई मंत्रालयातून फ्युनिक्युलर सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. श्री मलंगगड यात्रेच्या पार्श्वभूमीवर ही सेवा सुरू झाल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी मलंगगडावर जाण्यासाठी पायऱ्या चढून जावे लागत असे, ज्यामुळे अनेक भाविकांना त्रास होत असे. आता या फ्युनिक्युलर सेवेमुळे वृद्ध आणि लहान मुलांनाही सहजपणे गडावर जाता येणार आहे. या सेवेमुळे मलंगगडावरील पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

काय आहे फ्युनिक्युलर सेवा ?

फ्युनिक्युलर ही एक प्रकारची केबल रेल्वे प्रणाली आहे, ट्रॉली सारखी सुविधा आहे. गुरुत्वाकर्षण आणि केबल्सचा वापर करून मागे-पुढे अशा दोन गाड्या एका उंच उतारावर चालवल्या जातात. फ्युनिक्युलर हा शब्द लॅटिन भाषेतील असून लहान दोरी असा त्याचा अर्थ होतो. फ्युनिक्युलर सेवा लिफ्ट आणि ट्रेन अशा दोघांची मिळून तयार झालेली सेवा आहे.

या फ्युनिक्युलर सेवेसाठी पाठपुरावा करणारे कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे लोकार्पणाच्या वेळी अनुपस्थित असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या लोकार्पण सोहळ्याला शिंदे गटाचे खासदार आणि पदाधिकारी अनुपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

'अनिल आय हॉस्पिटल'च्या ठाणे येथील सातव्या रुग्णालयाचे भव्य स्वरूपात उद्‌घाटन समारंभ संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे दि.१८ - ठाणे जिल्ह्यात गेली तब्बल ५४ वर्षे विश्वासार्ह व दर्जेदार नेत्रसेवा देणाऱ्या 'अनिल आय हॉस्पिटलच्'या ठाणे शहरातील दुसऱ्या आणि एकूण सातव्या रुग्णालयाचे उद्घाटन आनंद भवन सोसायटी, भक्ती मंदिर रोड, तीन हात नाका, नेक्सा शोरूमच्या वर,  ठाणे येथे आज मोठ्या उत्साहात व सकारात्मक वातावरणात पार पडले. या अत्याधुनिक नेत्ररुग्णालयाच्या  उद्‌घाटन प्रसंगी कल्याण लोकसभेचे लाडके लोकप्रिय खासदार मा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित राहून 'अनिल आय हॉस्पिटल'च्या सेवेचे भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीस त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी मा. श्री.निरंजन डावखरे यांनी देखील कार्यक्रमाला सदिच्छा भेट देत रुग्णालयाच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले. कार्यक्रमात मा. श्री.नरेश म्हस्के यांनीही उपस्थित राहून 'अनिल आय हॉस्पिटल'च्या ठाणेकरांसाठी सुरू झालेल्या या नव्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
या उद्घाटनप्रसंगी ठाणे शहरातील नगरसेवक, नामवंत डॉक्टर, रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य, तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी रुग्णालयाची पाहणी करून उपलब्ध सुविधांचे कौतुक केले.
यावेळी बोलताना 'अनिल आय हॉस्पिटल'च्या संचालिका तसेच महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी (MOS) च्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर म्हणाल्या, “ठाणेकरांकडून मिळणाऱ्या प्रचंड प्रेम, विश्वास आणि पाठबळामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. ठाणे शहरासाठी सर्वोत्तम, आधुनिक आणि रुग्णकेंद्रित नेत्रसेवा देण्याचा आमचा संकल्प पुढेही तितक्याच निष्ठेने सुरू राहील.”
ठाणे येथील हे नवीन रुग्णालय 'अनिल आय हॉस्पिटल'च्या सेवाविस्तारातील एक महत्त्वाचा टप्पा ठरत असून, ठाणेकरांसाठी नेत्रसेवेच्या दृष्टीने एक नवा विश्वास निर्माण करणारे केंद्र ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली (ईस्ट) आयोजित 'व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड' समारोह संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट आयोजित Vocational Excellence Award (व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड) कार्यक्रमाचे सुंदर आयोजन हे शनिवार दिनांक १७ जानेवारी रोजी रोटरी भवन डोंबिवली येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे हे निवृत्त माजी भारतीय प्रशासकीय अधिकारी श्री. महेश झगडे हे होते. ह्या वर्षीचा पुरस्कार हा विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रदान करण्यात आला त्यात चित्रलेखा वैद्य (पर्यावरण आणि कचरा व्यवस्थापन), चारुदत्त कोलारकर (सामाजिक सेवा), अर्णव पटवर्धन (युवा पक्षीतज्ज्ञ) आणि सुधाश्री ट्रस्ट (सामाजिक कार्य) ह्यांना प्रदान करण्यात आला. शेला, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे प्रमुख स्वरूप होते. तसेच विशेष असा जीवन गौरव पुरस्कार हा श्री. जे के. साबू ह्यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. 
'व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड'' समारोहासाठी डोंबिवली मधील अनेक मान्यवर उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली (ईस्ट) चे अध्यक्ष डॉ. संदीप घरत, क्लब चे सचिव विनायक आगटे, प्रकल्प प्रमुख मानस पिंगळे, प्रकल्प संचालक दीपक नेरकर, माजी रोटरी जिल्हा प्रांतपाल डॉ. उल्हास कोल्हटकर, रोटरी सदस्य आरती बापट, संगीता पाखले, वीणा बेडेकर, शंतनू पुराणिक, पूनम यादव, वर्षा नेरकर राजन सावरे, सतीश अटकेकर, मंजिरी घरत, क्लब चे माजी अध्यक्ष कौस्तुभ कशेळकर, रघुनाथ लोटे, राधिका गुप्ते पुढील वर्षीचे अध्यक्ष अथर्व जोशी आणि इतर अनेक क्लब चे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे रोटेरिअन विश्राम परांजपे ह्यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे महानगर पालिका निवडणुकीतील भाजपच्या ऐतिहासिक विजयाचे धुरंधर शिल्पकार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली, दि. १६ जानेवारी - महापालिका निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित महाराष्ट्राच्या प्रचाराला राज्यातील जनतेने उत्स्फूर्तपणे पाठिंबा व्यक्त केल्याचे चित्र निकालांमुळे स्पष्ट झाले आणि त्याच बरोबर शहरी मतदाराची अचूक नस माहिती असलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या विचारधारे सोबत राहण्याच्या आवाहनाला मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे निकालांवरून दिसले. मागील वर्षी जानेवारीत रविंद्र चव्हाण यांनी भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर राज्यात दीड कोटी प्राथमिक सदस्यांचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले होते तिथेच ते अर्धी लढाई जिंकल्याचे आज या दणदणीत विजयाने स्पष्ट झाले.

भाजपा हा धोरण आखणारा आणि धोरण राबविणारा पक्ष आहे. निवडणुकांचे नियोजन, तिकीट वाटप, सभांचे नियोजन याबरोबरच विरोधी पक्षांना जोखण्याचे कसब “देवेंद्र आणि रविंद्र” या भाजपाच्या जोडीकडे आहे. सरकार आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश पक्ष यातील समन्वयाचे हे यश असल्याने हा अभूतपूर्व विजय मिळाल्याचे विश्लेषण राजकीय पंडितांनी केले आहे. महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे शीर्षस्थ नेतृत्त्व म्हणून पक्षासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी रविंद्र चव्हाण यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात बोलून दाखवलेली. त्यांच्या रूपाने भाजपाला रस्त्यावर उतरून आंदोलन केलेला आणि मातीशी जोडलेला कार्यकर्ता अध्यक्ष म्हणून मिळाला. निवडणूक काळातील वक्तव्याने, पेहरावाने झालेल्या वैयक्तिक स्वरूपाच्या टीकेमुळे रविंद्र चव्हाण बिलकुल विचलित झाले नाहीत. उलट त्यांनी विरोधकांना जनतेसाठी अनावश्यक अशा विषयात गुंतवून ठेवून, भाजपासाठी विजयाची वाट अधिक सुकर केल्याचे स्पष्ट झाले. विरोधकांनी चव्हाण यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टीकेला जनतेच्या दृष्टीने कवडीमोल किंमत असल्याचेही या निमित्ताने दिसले. २५ वर्षांच्या राजकीय वाटचालीत रविंद्र चव्हाण त्यांच्यावर झालेल्या प्रत्येक टीकेनंतर एक पाऊल पुढे जातानाच दिसले. याचे कारणच कायम संघर्ष करून यश संपादन केलेला रविंद्र चव्हाण यांच्यासारखा नेता महाराष्ट्रातील जनतेने अजून नीटसा पाहिलेला वा ओळखलेला नाही आणि राजकीय निरीक्षकांनी अजून अभ्यासलेला नाही. रविंद्र चव्हाण हे अत्यंत मुरलेले आणि मुरब्बी राजकारणी म्हणून महाराष्ट्रात आजच्या भाजपाच्या विजयाने उदयास आलेले आहेत हे दिसले.

देवेंद्र फडणवीस यांना रविंद्र चव्हाण यांची बलस्थानं माहिती आहेत. पक्षासाठी २४ तास समर्पित अध्यक्ष म्हणून त्यांचे महत्त्व फडणवीस जाणून आहेत. रविंद्र चव्हाण यांचा शहरी महाराष्ट्राच्या राजकारणाचा अनुभव आणि त्यांची कायम "निवडणूक सिद्धता" म्हणजेच इलेक्शन रेडीनेस अशा स्वरूपाची कार्यशैली देवेंद्र फडणवीस ओळखून आहेत. त्यातच अडीच वर्षे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम करताना अवघा महाराष्ट्र पिंजून काढत रविंद्र चव्हाण यांनी खात्याच्या माध्यमातून विकासकामे करताना संपूर्ण महाराष्ट्रात हेरलेली आणि पेरलेली माणसं ही भाजपासाठी महत्त्वाची ठरली असं दिसत आहे. आजच्या भाजपाच्या दैदिप्यमान विजयाचे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे अष्टपैलू नेतृत्व जितके प्रखरतेने माध्यमांसमोर दिसलं तसेच प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा नियोजनाचा आवाका महाराष्ट्राच्या लक्षात येईल जेव्हा संपूर्ण विजयाची आकडेवारी प्रकाशित होईल.

'अनिल आय हॉस्पिटल'च्या ठाणे येथील सातव्या रुग्णालयाचे १८ जानेवारी रोजी उद्घाटन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यात गेली तब्बल ५४ वर्षे विश्वासार्ह व दर्जेदार नेत्रसेवा देणारे 'अनिल आय हॉस्पिटल' ठाणे शहरात आपल्या दुसऱ्या आणि एकूण सातव्या रुग्णालयाचे उद्घाटन करत आहे. हे अत्याधुनिक नेत्ररुग्णालय १८ जानेवारी २०२६ रोजी ठाणे पश्चिम येथे सुरू होत आहे. या रुग्णालयाचे उद्घाटन कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट लोकप्रिय खासदार मा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या शुभहस्ते होणार असून, मा. श्री. नरेश म्हस्के हे गेस्ट ऑफ ऑनर म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी ठाणे व परिसरातील अनेक मान्यवर, डॉक्टर, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती अपेक्षित आहे.
पांचपाखाडी, भक्ती मंदिर रोड येथे सुरू होणाऱ्या या नव्या रुग्णालयामध्ये अत्याधुनिक नेत्रतपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रेटिना, ग्लॉकोमा, बाल नेत्रचिकित्सा तसेच लेझर उपचार यांसारख्या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सन १९७२ साली सुरू झालेल्या अनिल आय हॉस्पिटलने आज डोंबिवली (पूर्व व पश्चिम), ठाणे, कल्याण, पलावा, बदलापूर अशा विविध भागांमध्ये आपल्या सेवांचा विस्तार केला असून, हजारो रुग्णांच्या विश्वासावर ही संस्था उभी आहे.

याबाबत बोलताना 'अनिल आय हॉस्पिटल'च्या संचालिका तसेच महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी (MOS) च्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर म्हणाल्या, “ठाणेकरांनी दिलेल्या प्रेम व विश्वासामुळेच आम्ही ठाणे शहरात दुसरे रुग्णालय सुरू करत आहोत. दर्जेदार, आधुनिक आणि रुग्णकेंद्रित नेत्रसेवा प्रत्येकापर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे.” ठाणे शहरातील नागरिकांसाठी हे नवीन रुग्णालय नेत्रसेवेच्या दृष्टीने एक महत्त्वाची उपलब्धी ठरणार आहे.
कार्यक्रम तपशील
📅 दिनांक: १८ जानेवारी २०२६
⏰ वेळ: सकाळी १० ते दुपारी २
📍 पत्ता: अनिल आय हॉस्पिटल,
दुसरा मजला, भक्ती मंदिर रोड,
पंचपाखाडी, नेक्सा शोरूमच्या वर, ठाणे (पश्चिम)
संपर्क: ९९२५२३५९६९

सार्वत्रिक महापालिका निवडणूक २०२५-२६ साठी निवडणूक यंत्रणा सज्ज!

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण दि.१३ - कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक  २०२५-२६ साठी महापालिका निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, या सार्वत्रिक निवडणूकीत ३१ पॅनलमध्ये बहुसदस्य पध्दतीने निवडणूक संपन्न होणार आहे. या निवडणूकीसाठी १५४८ मतदान केंद्रांवर आणि ३८२ ठिकाणी मतदानाची प्रक्रिया संपन्न होणार आहे. यापैकी १०१३ मतदान केंद्रे तळ मजल्यावर, ९ मतदान केंद्रे पहिला मजल्यावर, ४७१ मतदान केंद्रे पार्टीशन स्वरुपात, ५५ मंडपात असणार आहेत. महापालिका क्षेत्रात एकुण १४,२५,०८६ इतकी मतदारांची संख्या असून, त्यापैकी एकुण ७,४५,६६४ पुरुष मतदार, एकुण ६,७८,८७० स्त्री मतदार व इतर मतदारांची संख्या ५५२ इतकी आहे. 

महापालिका सार्वत्रिक निवडणूकीची मतमोजणी एकुण ८ ठिकाणी (निवडणूक निर्णय अधिकारी २ व ४ ची मतमोजणी एका ठिकाणी) होणार असून, त्यांची माहिती खालील प्रमाणे..

१. निवडणूक निर्णय अधिकारी - १ यांचेकडील पॅनल क्रमांक – २, ३ व ४ ची मतमोजणी बिर्ला वन्य, केडीएमटी इमारत, तळ मजला, शहाड (पश्चिम).

२. निवडणूक निर्णय अधिकारी - २ यांचेकडील पॅनल क्रमांक – १, ५, ६ व १० ची मतमोजणी मुंबई विद्यापीठ यांचे उपकेंद्र, वसंतव्हॅली, खडकपाडा, कल्याण (पश्चिम).

३. निवडणूक निर्णय अधिकारी - ३ यांचेकडील पॅनल क्रमांक – ७, ८ व ९ ची मतमोजणी प्रभाग क्षेत्र ३/क चे कार्यालय, तळ मजल्यावरील वाहन पार्किंग क्षेत्र,‍ आधारवाडी, कल्याण (‍पश्चिम).

४. निवडणूक निर्णय अधिकारी - ४ यांचेकडील पॅनल क्रमांक – ११, १२ व १८ ची मतमोजणी मुंबई विद्यापीठ यांचे उपकेंद्र, वसंतव्हॅली, खडकपाडा, कल्याण (पश्चिम).

५. निवडणूक निर्णय अधिकारी - ५ यांचेकडील पॅनल क्रमांक – १३, १४, १५ व १६ ची मतमोजणी साकेत कॉलेज, १०० फुटी रस्ता, राम म्हात्रे चौक, काटेमानिवली, कल्याण (पूर्व).

६. निवडणूक निर्णय अधिकारी - ६ यांचेकडील पॅनल क्रमांक – २०, २६, २७ व २८ ची मतमोजणी आयईएस पाटकर विद्यालय, राजाजी पथ, डोंबिवली (पूर्व) या शाळेच्या स्टील्ट हॉलमध्ये.

७. निवडणूक निर्णय अधिकारी - ७ यांचेकडील पॅनल क्रमांक – २१, २२, २३ व २५ ची मतमोजणी कडोंमपा शाळा क्र. २०, रेती बंदर रोड, मोठा गांव, डोंबिवली (पश्चिम).

८. निवडणूक निर्णय अधिकारी - ८ यांचेकडील पॅनल क्रमांक – २९ व ३० ची मतमोजणी धनजी नानजी चौधरी विद्यालय हॉल, पहिला मजला, नांदीवली, डोंबिवली (पूर्व).

९. निवडणूक निर्णय अधिकारी - ९ यांचेकडील पॅनल क्रमांक – १७, १९ व ३१ ची मतमोजणी सावित्रीबाई फुले कलामंदिर, घरडा सर्कल, डोंबिवली (पूर्व).

शिवसेना-महायुतीच्या पाठीशी नेहमीच दिवेकर भक्कमपणे उभे - खासदार डॉ.श्रीकांत शिंदे

विशेष प्रतिनिधी

दिवा - “शिवसेना-महायुतीच्या नेहमीच दिवेकर पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. गेल्या दहा वर्षांत जे काम करण्याचे वचन दिले ते पूर्ण केले आहे. दिवा शहराचा कायापालट करून, तुम्हाला सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण देण्याचा आमचा निर्धार पक्का आहे. भविष्यात दिवा ते सीएसटी लोकल सुरू होईल, ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. याशिवाय, दिव्यातील विविध विकासकामे सुरू असून, दर्जेदार शिक्षण, आरोग्य सुविधा आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. काम करणारा पक्ष आणि काम करणारे सरकार हे शिवसेना महायुतीचेच आहेत, त्यामुळे पुढील काळात दिवा शहराचा अधिक आणि वेगाने विकास होईल", असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदेने प्रतिपादन केले. ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत दिव्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवा येथे शिवसेना-भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली. या सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी डॉ.श्रीकांत शिंदे यांनी दिव्याच्या कायापालटाचा उल्लेख करत आगामी काळात 'दिवा ते सीएसटी' विशेष लोकल सुरू करण्याचे आश्वासन दिले. यावेळी दिवा शहरात गेल्या दहा वर्षांत झालेल्या आणि सध्या सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा देण्यात आला. दिवा-शीळ मार्गाचे काँक्रीटीकरण, दिवा रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण विकास, प्रवाशांसाठी वाढविण्यात आलेल्या सुविधा, बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत दिवा येथील स्थानकाचे सुरू असलेले काम, क्लस्टर पुनर्विकास योजना, भुयारी गटारी योजना, आगरी-कोळी वारकरी भवन, नानासाहेब धर्माधिकारी सभागृह, अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण, महापालिकेच्या शाळांचा विकास, प्रशस्त पोलिस स्टेशन, डम्पिंग ग्राउंड हटविण्याचा निर्णय आणि आरोग्य सुविधांमधील सुधारणा यांचा उल्लेख यावेळी करण्यात आला.

दिवा शहराचा बदल अधोरेखित करताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, “दहा वर्षांपूर्वी दिवा केवळ गाव स्वरूपात होता. रस्ते, पाणी, स्वच्छता आणि रेल्वे स्थानकाची परिस्थिती अत्यंत बिकट होती. एका प्लॅटफॉर्मवरून प्रवाशांना जीव धोक्यात घालून उतरावे लागायचे. आज दिवा स्थानकाचा कायापालट झाला असून सुरक्षितता आणि सुविधा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.”  दिवा शहरात मोठ्या गृहसंकुलांचा विस्तार होत असून, वाढती लोकसंख्या लक्षात घेता दर्जेदार शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अंबरनाथ येथे मंजूर करण्यात आलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे उदाहरण देत, भविष्यात दिवा शहरातही असे प्रकल्प उभारले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रेल्वे सुविधांबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, दिवा स्थानकावर फास्ट व लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा, प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण आणि तिकीट खिडक्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. भविष्यात कोकणात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्याही दिव्यात थांबतील, तसेच दिवा-सीएसटी विशेष लोकल सुरू होणार असल्याने प्रवाशांना प्रवासाचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होईल. युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी कल्याण रोड परिसरात टाटा स्किल सेंटर उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, पुढील सहा ते सात महिन्यांत ते सुरू होणार आहे. भविष्यात दिवा शहरात उद्योजक घडवण्यासाठी विशेष प्रशिक्षण केंद्र उभारण्याचाही मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

दिवा शहरात आगरी-कोळी वारकरी भवन, नानासाहेब धर्माधिकारी सभागृह, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, अग्निशमन केंद्र, पोलिस स्टेशन, तलाव सुशोभीकरण, परिवहन सेवा आणि महापालिकेच्या शाळा उभारण्यात आल्याची माहिती देण्यात आली. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोमायनिंग प्रकल्प मंजूर झाल्याने, भविष्यात डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न पूर्णतः सुटणार असल्याचेही सांगण्यात आले.

दिवा येथील प्रभाग क्रमांक २७ चे शिवसेना-भाजपा महायुतीचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार शैलेश पाटील, आदेश भगत, दिपाली भगत, स्नेहा पाटील, प्रभाग क्रमांक २८ मधील रमाकांत मढवी, साक्षी मढवी, दीपक जाधव, दर्शना म्हात्रे तसेच प्रभाग क्रमांक २९ चे अधिकृत उमेदवार बाबाजी पाटील, अर्चना पाटील आणि वेदिका पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली. यावेळी विविध सामाजिक संघटनांनी शिवसेना-महायुतीला जाहीर पाठिंबा दिला.

सभेच्या शेवटी १५ जानेवारी रोजी धनुष्यबाण आणि कमळ चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केले. “काम करणारा पक्ष आणि काम करणारे सरकार हे महायुतीचेच आहे. पुढील काळात दिवा शहरात आणखी मोठ्या प्रमाणावर विकासकामे होतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
क्लस्टर पुनर्विकास योजनेचे सर्वेक्षण ९५% पूर्ण, लवकरच काम सुरू होणार

क्लस्टर पुनर्विकास योजनेबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “ही योजना म्हणजे केवळ घर नव्हे, तर सर्वांगीण विकास आहे. धोकादायक आणि अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना हक्काचे, अधिकृत आणि मोठे घर विनामूल्य मिळणार आहे. ठाणे शहरात एकाचवेळी १३ क्लस्टर प्रकल्प सुरू आहेत. दिवा शहरातही ९५ टक्के सर्वे पूर्ण झाला असून, लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होईल.”

आम्ही दहा वर्षांत दिलेला शब्द पाळला - खासदार डॉ.श्रीकांत शिंदे

"प्रत्येक निवडणुकीत राजकीय पक्ष लोकांसमोर येतात. मुंबईच उदाहरणं, आज मराठीच्या नावावर एकत्र आलेले आहेत, पण २५ वर्षांत काय केलं ते त्यांनी सांगितलेलं नाही. उलट पुढे काय करणार ते सांगण्यासाठी लोकांच्या समोर जात आहेत. पण आम्ही १० वर्षांत दिलेला शब्द पाळला आहे, हे अभिमानाने सांगतो” अशा शब्दांत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला.

'रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट' आयोजित ‘डोंबिवली ऑलिम्पिक २०२६’ हा भव्य क्रीडा सोहळा संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : 'रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट' आयोजित ‘डोंबिवली ऑलिम्पिक २०२६’ हा भव्य क्रीडा सोहळा १० व ११ जानेवारी रोजी संपन्न झाला असून डोंबिवली व परिसरातील ३५ शाळांमधील ३,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. उद्घाटन समारंभाला रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर हर्ष माकोळ हे मुख्य अतिथी म्हणून लाभले, तर RPSF १२वी बटालियनचे असिस्टंट कमांडंट श्री. दाहाके आणि इन्स्पेक्टर दिनेश कुमार यांनी मान्यवर म्हणून सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रायोजक Galaxy IEC India Pvt Ltd चे संचालक रोटेरियन विजय अव्हाड, Union Bank चे DBM अतुल शिंदे तसेच स्वच्छता भागीदार Sumeet Elkoplast तर्फे श्री. सानू वर्गीज यांनीही कार्यक्रमाला आपली उपस्थिती देऊन उपक्रमाला बळ दिले.
RPSF ग्राउंडवर ऍथलेटिक्स, कबड्डी, खो-खो, डॉजबॉल, लंगडी आणि टग ऑफ वॉर, कानविंदे हॉलमध्ये बॅडमिंटन (व्हेन्यू पार्टनर : नॅशनल यूथ ऑर्गनायझेशन), डोंबिवली स्पोर्ट्स अरेना टर्फवर फुटबॉल आणि रोटरी भवन येथे बुद्धिबळ अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय क्लब अध्यक्ष डॉ. संदीप घरत, सचिव विनायक आगटे, प्रकल्प संचालक संतोष प्रभुदेसाई आणि प्रोजेक्ट चेअरमन विवेक गोठे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले . या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा २१ जानेवारी रोजी रोटरी भवन येथे आयोजित करण्यात येणार आहे.

महायुतीच्या प्रचार मेळाव्यात मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश..

विशेष प्रतिनिधी

दिवा, दि.११ : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या भव्य मेळाव्यात आज मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हा मेळावा आज सकाळी ११ वाजता दिवा–आगासन रोडवरील दळवीनगर मैदानात उत्साहात पार पडला. या प्रवेशामध्ये मनसेचे उपशहर अध्यक्ष, विभाग अध्यक्ष, शहर अध्यक्ष, विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी तसेच शाखा अध्यक्ष अशा विविध पदांवरील कार्यकर्त्यांचा समावेश होता. शिवसेनेच्या धोरणांवर विश्वास ठेवत आणि महायुतीच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी, महायुतीचे नेते, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यात “शिवसेना जिंदाबाद”, “महायुतीचा विजय असो” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

मोतीराम दळवी, उपशहर अध्यक्ष मनसे, दिलिप गायकर, विभाग अध्यक्ष मनसे,कुशाल पाटील, शहर अध्यक्ष विद्यार्थी सेना मनसे, अर्पित पोळ, वैष्णव दळवी, विदयार्थी सेना विभाग अध्यक्ष मनसे, नितिन आदवडे शाखा प्रमुख मनसे, विकी भगत शाखा प्रमुख मनसे, विशाल भिडे, निखिल पाटील, वेदांत दळवी, विशाल शिंदे, दुर्वेश दळवी, राहुल नाईक, संदिप शिंदे, सचिन गायकर, कौस्तुभ गायकर, चित्रा दळवी महिला आघाडी, चैतन्या दळवी, चैताली दळवी, ममता शिंदे, दिक्षा माने, जागृती जोशी इत्यादींनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. आगामी महापालिका निवडणुकीत दिवा परिसरात शिवसेना–महायुतीची ताकद आणखी मजबूत झाल्याचे यावेळी स्पष्ट झाले. या मेळाव्यामुळे महायुतीच्या प्रचाराला मोठी ऊर्जा मिळाल्याचे चित्र दिसून आले.

मतदान यंत्रणा पूर्ण तयारीत असून दि. १५ जानेवारी रोजी मतदान करून नागरिकांनी बजवावा आपला मतदानाचा अधिकार - आयुक्त अभिनव गोयल

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - गुरुवार दि.१५ जानेवारी २०२६ रोजी नागरीकांनी मतदान करुन, आपला मतदानाचा अधिकार बजवावा, असे आवाहन महापालिका निवडणूक अधिकारी तथा आयुक्त अभिनव गोयल यांनी आज मा.स्थायी समिती सभागृहात संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेसमयी केले. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त योगेश गोडसे, कल्याण परिमंडळ-३ चे पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे, निवडणूक विभागाचे उपआयुक्त समीर भुमकर, आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीचे समन्वय अधिकारी बाळासाहेब चव्हाण उपस्थित होते. या सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी एकुण १५४८ मतदान केंद्र असून, एकुण ९ ठिकाणी स्ट्राँगरुमची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी क्र.१ ते ९ यांच्या अधिनस्त असलेल्या निवडणूक प्रक्रियेची मतमोजणी एकुण ८ ठिकाणी होणार आहे. महापालिकेने मतदान केंद्र निहाय मतदार यादी प्रदर्शित केलेली आहे. तसेच एकुण ११८२ मतदान केंद्रस्त‍रीय अधिकारी (बीएलओ) यांचेमार्फत वोटर स्लिप चे वितरण करण्यात येणार आहे.

महापालिका निवडणूकीसाठी पूर्णपणे सज्ज असून, या निवडणूकीसाठी एकुण १७०  झोनल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे १ सीयु आणि उमेदवारांच्या संख्येनुसार बीयु उपलब्ध करुन दिले जाणार आहेत, मतदान केंद्रामध्ये नागरीकांना आपले मोबाईल फोन नेण्यास मनाई आहे, अशी माहिती महापालिका निवडणूक अधिकारी तथा आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी दिली. कल्याण परिमंडळ-३ चे पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे यांनी मतदान व मतमोजणी दिवशी पोलीस विभागामार्फत करण्यात आलेल्या तयारीची/बंदोबस्ताची माहिती विषद केली. त्याचप्रमाणे मतदानापूर्वी, मतदानाचे दिवशी व मतमोजणीचे दिवशी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात राहील अशीही माहिती त्यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांसमोर दिली.

अनिल आय हॉस्पिटलच्या डोंबिवली पश्चिम येथील सहाव्या शाखेचे भव्य उद्घाटन संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.११:  ठाणे जिल्ह्यात गेली तब्बल ५४ वर्षे विश्वासार्ह व दर्जेदार नेत्रसेवा देणाऱ्या 'अनिल आय हॉस्पिटल' च्या डोंबिवली पश्चिम येथील सहाव्या शाखेचे उद्घाटन आज दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. या नव्या अत्याधुनिक आय क्लिनिकचे उद्घाटन महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष नामदार मा. श्री. रविंद्र चव्हाण साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. 
यावेळी श्री. परणाद  मोकाशी, श्री. जितेंद्र भोईर, श्री. शैलेन्द्र भोईर तसेच श्री. भाई पानवडीकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय डोंबिवली व परिसरातील अनेक मान्यवर, डॉक्टर, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
डोंबिवली पश्चिम येथील 'अनिल आय हॉस्पिटल' ची ही सहावी नवीन शाखा नागरिकांसाठी नेत्रसेवेच्या दृष्टीने एक मोठी पर्वणी ठरली असून, आता अत्याधुनिक नेत्रतपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रेटिना, ग्लॉकोमा, बाल नेत्रचिकित्सा व लेझर उपचार अशा सर्व सुविधा घराजवळ उपलब्ध होणार आहेत. उद्घाटनप्रसंगी बोलताना मा. श्री. रविंद्र चव्हाण यांनी 'अनिल आय हॉस्पिटल'च्या दीर्घकालीन आणि समाजोपयोगी नेत्रसेवेचे विशेष कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी 'अनिल आय हॉस्पिटल'च्या संचालिका तसेच महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी (MOS) च्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर यांनी डोंबिवलीकरांनी दिलेल्या प्रेम, आपुलकी व विश्वासाबद्दल मनापासून आभार मानले. त्या म्हणाल्या, “डोंबिवलीकरांच्या विश्वासामुळेच आज आम्ही सातत्याने सेवा विस्तार करू शकलो आहोत. दर्जेदार, आधुनिक व रुग्णकेंद्रित नेत्रसेवा भविष्यातही आमच्या कडून अखंडपणे सुरू राहील, याची आम्ही खात्री देतो.”
अनिल आय हॉस्पिटल हे विश्वास, अनुभव आणि आधुनिक नेत्रसेवेचे प्रतीक असून डोंबिवली पश्चिम येथील या नव्या शाखेमुळे परिसरातील नागरिकांसाठी उच्च दर्जाची आय केअर अधिक सुलभ होणार असून, ही शाखा नेत्रसेवेत एक नवा मानदंड प्रस्थापित करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

डोंबिवली पाश्चिमेकडील प्रभाग क्र.२५ मधील मनसे पुरस्कृत उमेदवार शैलेश, मनीषा, पूजा धात्रक यांनाच पुन्हा निवडून आणण्याचा नागरिकांनी केला संकल्प..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :- कल्याण-डोंबिवली सार्वत्रिक निवडणूक डोंबिवली पश्चिम प्रभाग क्रमांक २५ (अ) मधून सौ. मनीषा शैलेश धात्रक २५ (ब) मधून पूजा शैलेश धात्रक व २५ (क) मधून शैलेश रमेशचंद्र धात्रक हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुरस्कृत उमेदवार असून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रचारादरम्यान गेल्या अनेक वर्षापासून केलेल्या विकास कामांच्या जोरावर ते मतदान मागत असून मतदारांचा चांगला प्रतिसाद त्यांना मिळत आहे. ठिकठिकाणी मतदारांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन ते संवाद साधत आहेत. त्यामुळे विकास कामांच्या जोरावर मोठ्या मताधिक्याने विजय निश्चित असल्याचे मनीषा शैलेश धात्रक यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले आहे. 

शैलेश रमेशचंद्र धात्रक व मनीषा धात्रक हे कुटुंब गेली अनेक वर्ष या प्रभागाचे यशस्वी नेतृत्व करीत आहेत. प्रभागामध्ये अनेक सोसायट्यांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्या साफ करून देणे, गटारे, नाले सफाई, मुबलक  पिण्याचे पाणी या सुविधा नागरिकांना नियमित दिल्या आहेत तसेच इतर सामाजिक कामे देखील केलेली आहेत व विकासकामांची गंगा प्रभागात वाहत आहे. मनीषा शैलेश धात्रक यांनी सांगितले की प्रचारादरम्यान नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून गेले अनेक वर्षे लोकोपयोगी कामे केलेली आहेत त्यामुळे आमचा विजय निश्चित असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

कल्याण-डोंबिवलीला आनंदी शहर करायचं आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - महायुतीच्या माध्यमातून कल्याण-डोंबिवली परिसरात विविध प्रकल्प राबविले जात असून अनेक विकासकामे केली जात आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवली या शहरांना आनंदी शहर बनवायचं असल्याचे सांगत कोणी कितीही करूद्या दावेदारी महायुतीच राखणार कल्याणची सुभेदारी असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना व्यक्त केला. कल्याण पश्चिमेतील यशवंतराव चव्हाण क्रीडांगणावर आयोजित विजय संकल्प सभेत एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, शहर प्रमुख रवी पाटील आदींसह महायुतीचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी बोलतांना एकनाथ शिंदे यांनी ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला त्यांचा नंबर पहिला. लोकसभा, विधानसभा, नगरपालिका निवडणुकी नंतर आता महापालिका निवडणुकीत चौकार षटकार मारायचा आहे. विरोधकांचा सुपडा साफ करायचा आहे. ६० हुन अधिक नगरसेवक निवडून येऊन विजयाची नांदी सुरू झाली आहे. काही लोकं फक्त टीका टिपण्णी करतात, दुसऱ्यांचा आधार घेऊन काही लोकं मला बुडविण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आपल्या पाठीशी लाडक्या बहिणी आहेत. आपल्यावर कितीही टीका झाली आरोप झाले तरी या आरोपांना मी कामातून उत्तर देतो. 

काहींनी खुर्चीसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली. घरी बसून सरकार चालवता येत नाही.  लोकांणा सामोरे जावे लागते, त्यांच्या समस्या सोडवाव्या लागतात. काही लोकं मुंबईकडेच लक्ष लावून बसले आहेत. काहींचा डोळा मुंबई महानगर पालिकेच्या तिजोरीवर असून आमचा डोळा मुंबईच्या विकासावर आहे. निवडणूक आली की मुंबईतील मराठी माणूस विरोधकांना आठवतो.   
कल्याण हे मुंबईचे शॉकऍपजोबजर आहे. मुंबईचा भार हे उपनगर सांभाळत आहेत. पाच वर्षात कल्याण हे आघाडीचे शहर बनवायचं असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाही. कल्याण-डोंबिवली धोकादायक इमारती क्लस्टरच्या माध्यमातून विकसित केल्या जातीलअडीच वर्षाच्या काळात अनेक निर्णय घेतले गेले. सर्वसामान्याचा विकास, शहरांचा विकास झाला पाहिजे यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. अनेक विकासकामे केली जात आहेत. 

कल्याण ऐतिहासिक नगरी असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची सुरवात येथून झाली त्याचे स्मारक केलं आहे. ईस्ट या वेस्ट कल्याण झालं बेस्ट. लोकांना न्याय देणाऱ्यांच्या पाठीशी जनता उभी राहते. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असे मी प्रतिपादन करतो.रखडलेले पुनर्विकास प्रकल्प म्हाडाच्या माध्यमातून पूर्ण करणार असल्याची ग्वाही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली.

दिव्यातील साबे गावात महायुतीच्या उमेदवारांसाठी आमदार निरंजन डावखरेंच्या उपस्थितीत सुभाष भोईर यांचा झंझावाती प्रचार..

विशेष प्रतिनिधी

दिवा : ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठामपा प्रभाग क्र.२९ मध्ये महायुतीच्या तीन उमेदवारांच्या प्रचारासाठी वरिष्ठ नेते तसेच कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी सहभाग घेत जोरदार प्रचार केला. प्रचारादरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या वेळी आमदार निरंजन डावखरे यांची विशेष उपस्थिती होती. प्रभाग क्र.२९ मधील २९ (अ) मधून अर्चना पाटील, २९ (ब) मधून वेदिका पाटील आणि २९ (क) मधून बाबाजी पाटील हे महायुतीचे उमेदवार निवडणूक रिंगणात असून, तिन्ही उमेदवारांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले.

प्रचारादरम्यान बोलताना सुभाष भोईर यांनी महायुतीच्या कामांचा आढावा मांडत विकासाच्या मुद्द्यांवर भर दिला. तसेच प्रभाग क्र.२९ मधून महायुतीचे तिन्ही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील, असा ठाम विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला. या प्रचारामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात प्रचाराला अधिक गती मिळाल्याचे दिसून येत आहे.

'अनिल आय हॉस्पिटल' चे डोंबिवली पश्चिम येथे सहाव्या शाखेचे दि.११ जानेवारी रोजी उद्घाटन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - ठाणे जिल्ह्यातील नेत्रसेवेत गेली तब्बल ५४ वर्षे विश्वासार्ह सेवा देणारे 'अनिल आय हॉस्पिटल' आता डोंबिवली पश्चिम येथे आपल्या सहाव्या शाखेचे उद्घाटन करत आहे. हे नवीन अत्याधुनिक आय क्लीनिक ११ जानेवारी २०२६ रोजी उद्घाटनासाठी सज्ज होत आहे.
सन १९७२ साली सुरू झालेला 'अनिल आय हॉस्पिटल'चा प्रवास आज ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली (पूर्व), डोंबिवली (पश्चिम), ठाणे, कल्याण, निळजे पलावा, बदलापूर अशा विविध भागांमध्ये विस्तारला असून हजारो रुग्णांच्या विश्वासावर ही संस्था उभी आहे.

डोंबिवली पश्चिम येथील या नव्या शाखेमुळे परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक नेत्रतपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रेटिना, ग्लॉकोमा, बाल नेत्रचिकित्सा व लेझर उपचार  यांसारख्या सर्व सुविधा आता घराजवळ उपलब्ध होणार आहेत. या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष नामदार श्री. रवींद्र चव्हाण  यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न होणार असून, श्री पर्नाद मोकाशी सह डोंबिवली व परिसरातील अनेक मान्यवर, डॉक्टर, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

यावेळी बोलताना 'अनिल आय हॉस्पिटल'च्या संचालिका तथा महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी (MOS) च्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर म्हणाल्या, “डोंबिवलीकरांचे प्रेम, आपुलकी आणि विश्वास यामुळेच आम्ही सातत्याने पुढे वाटचाल करू शकलो. दर्जेदार व प्रगत नेत्रसेवा प्रत्येक रुग्णापर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे. लवकरच ठाणे येथे आमची सातवी शाखा सुरू होणार आहे.” डोंबिवली पश्चिम येथील ही नवीन शाखा परिसरातील नागरिकांसाठी आय केअर च्या दृष्टीने एक मोठी उपलब्धी ठरणार आहे.
दिनांक: ११ जानेवारी २०२६
वेळ: ११ ते २
पत्ता: अनिल आय हॉस्पिटल, तळमजला, घनश्याम कॉम्प्लेक्स, डीएनएस बँक जवळ, एमजी रोड डोंबिवली (पश्चिम)
संपर्क :
अनिल आय हॉस्पिटल
+91 99252 35969

मतदानाबाबत दिवा परिसरात प्रतिज्ञा व प्रभात फेरीच्या माध्यमातून जनजागृती..

विशेष प्रतिनिधी

दिवा : मतदानाचा टक्का वाढविण्याच्या दृष्टीने तसेच लोकशाहीचा अधिकार प्रत्येक नागरिकाने बजावावा, या उद्देशाने ठाणे महानगरपालिकेच्या दिवा प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक २७ व २८ येथे शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रभावी मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात स्वीप उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात मतदानाबाबत जनजागृती मोहिम आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनानुसार स्वीप उपक्रमाच्या नोडल अधिकारी डॉ. मिताली संचेती यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे.

दिवा स्टेशन (पूर्व) येथील एस.एम.जी विद्यालय येथे मतदान जनजागृती प्रतिज्ञा व प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. या प्रभातफेरीत विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन “मतदान हा हक्क आणि कर्तव्य आहे”, “लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करूया” अशा घोषणा देत नागरिकांमध्ये जनजागृती केली. या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक धादवे सर, सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच स्वीप पथक प्रमुख सचिन विलास वायदंडे (पथक क्र. २७ व २८) यांच्या नेतृत्वाखाली मच्छिंद्र मुंडे, गिरीश शेलार (केंद्र समन्वयक – १५), शिवा सांगळे, निवृत्ती जाधव व स्वीप पथकातील सदस्य उपस्थित होते. या जनजागृती उपक्रमामुळे नागरिकांमध्ये मतदानाबाबत सकारात्मक संदेश पोहोचला असून, आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

गुन्हे शाखा घटक -३ कल्याणच्या पथकाने गुन्ह्यातील गेले ३ वर्षांपासुन २ फरार आरोपींचा शोध घेवुन सापळा रचत घेतले ताब्यात..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
 
डोंबिवली - दिनांक ७ जानेवारी रोजी महात्मा फुले चौक पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ४११/२०१६ भा.द.वि. कलम ३२४, ३४ या गुन्ह्यातील आरोपी १) विनोद जगन्नाथ कांबळे, राहणार: पुतळाबाई चाळ, अशोकनगर वालधुनी, कल्याण पुर्व, व २) नागसेन उर्फ नागेष जगन्नाथ कांबळे, राहणार: वरील प्रमाणे हे वेळावेळी त्यांचा ठाव ठिकाणा बदलुन  राहत असून ते सापडत नसल्याने आरोपींना हजर करण्याकरीता मा. न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग पहिले न्यायालय,कल्याण यांनी दि. १७/०१/२०२३ रोजी जाहिरनामा काढलेला होता. सदर आरोपी अद्याप सापडत नसल्याने त्यांचा कसोशीने शोध घेवुन सदर दोन्हीही आरोपी हे काल्हेर भिवंडी येथे राहत असल्याबाबत पोशि.गोरक्ष शेकडे यांना त्यांच्या गुप्तबातमीदारा मार्फत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने गुन्हे शाखा,घटक-३ कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक पोलीस उपनिरीक्षक किरण भिसे, सहा. पोलीस उप निरीक्षक दत्ताराम भोसले, पोहवा. विजय जिरे, विलास कडु, गोरक्ष शेकडे, दिपक महाजन, गुरुनाथ जरग, गणेश हरणे, पांडुरंग भांगरे, सचिन भालेराव, सतीश सोनवणे यांनी काल्हेर गांव हल्दीराम गोडऊनच्या मागे, सीजी पार्क बिल्डींगजवळ भिवंडी येथे सापळा रचुन फरारी आरोपी १) विनोद जगन्नाथ कांबळे, २) नागसेन उर्फ नागेष जगन्नाथ कांबळे यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेवुन पुढील कार्यवाहीकामी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात हजर केले आहे.

मा. कल्याण कोर्टाने जाहीरनामा प्रसिद्ध करून सदर दोन्ही आरोपी हे फरार घोषित करून शोधण्याचे व समक्ष हजर करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते, सदर आरोपी हे दोन्ही सख्खे भाऊ असून एका गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात मा. कोर्टाने त्यांना फरार घोषित केले होते.