BREAKING NEWS
latest
latest लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
latest लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

डोंबिवली सेवाकेंद्र के 'स्वर्ण जयंती उत्सव' निमित्त, VIP प्रोग्राम (दुआओं का सफर, दिल से दिल तक) संपन्न..


प्रतिनिधी: अवधुत सावंत 

डोंबिवली :   ओम शांति 🙏ब्रह्माकुमारीज डोंबिवली शाखा, (घाटकोपर सब-झोन) की ओर से डोम्बिवली सेवाकेंद्र के ५० वर्ष पुरे होने के "स्वर्ण जयंती उत्सव" के उपलक्ष्य में, आदरणीय शकु दीदीजी (निर्देशिका – घाटकोपर उपक्षेत्र, प्रभारी – डोंबिवली सेवाकेंद्र) के मार्गदर्शन एवं प्रेरणा से, "दुआओं का सफर, दिल से दिल तक” (A Blessed journey from Heart to Heart) इस विषय पर विशेष VIP कार्यक्रम का आयोजन किया गया। 

यह कार्यक्रम डोम्बिवली पूर्व के पाटीदार भवन सभागृह में रविवार, १२ अक्टूबर २०२५ को १०.३० बजे संपन्न हुआ।
आए हुए मेहमानों का गोल्डन बैच एवं फोल्डर देकर स्वागत किया गया। कार्यक्रम की शुरुवात परमात्मा की याद से हुई। तत्पश्चात, पवित्र भट ग्रुप डांस अकादमी द्वारा सुन्दर नृत्य प्रस्तृत किया गया ।

आदरणीय ब्रह्माकुमारी राजयोगिनी शकू दीदी जी ने प्रेरणादाई विचार व्यक्त करते हुए कैसे इस डोम्बिवली सेवाकेंद्र की स्थापना १९७५ में २५ दिसंबर को आदरणीय परम श्रद्धेय डॉक्टर नलिनी दीदी के द्वारा हुई, और उसी समय एक आध्यात्मिक प्रदर्शनी का आयोजन किया गया था । उस प्रदर्शनी में आया हुए नगराध्यक्ष भ्राता पटवारीजी ने कहा था मुझे इस डोम्बिवली नगरी को देव नगरी बनाना है, उसी तरह परमात्मा सिर्फ डोम्बिवली नहीं परतु पुरे विश्व को देव नगरी बनाने आये है । साथ ही उन्होंने कहा की हमे अपने अंदर के रावण को पूरी तरह से ख़त्म करना होगा उसीसे हमारे जीवन में परिवर्तन आएगा और सुख शांति की प्राप्ति होगी ।
साथ ही सभी को माउंट आबू, घाटकोपर योग भवन तथा डोम्बिवली सेवाकेंद्र पर आने का हार्दिक निमंत्रण दिया।

तत्पश्चात, आदरणीय निकुंज भाई जी (स्तंभकार एवं मीडिया विंग के राष्ट्रीय समन्वयक) ने अपने बोल रखे, उन्होंने अपने वक्तव्य में VIP का एक अलग ही अर्थ बताया उन्होंने कहा  VIP मतलब वेरी इनोसेंट पर्सन ।
तत्पश्चात, आदरणीय रविंद्र जी ने (अध्यक्ष-भाजपा, प्रदेशाध्यक्ष-महाराष्ट्र प्रदेश) डोम्बिवली सेवाकेंद्र के ५० वर्ष होने के निमित्त शुभ कामनाये दी, और कैसे वे इस ब्रह्माकुमारीज़ संस्था से पिछले कई वर्ष से जुड़े हुए है वो अनुभव साँझा किया ।
कार्यक्रम में आगे आदरणीय शकू दीदीजी, आदरणीय निकुंज भाई जी का और मुख्य अतिथियोंको मोमेंटो देकर सन्मान किया गया ल

निम्नलिखित अतिथि उपस्थित रहे:

1. Bro. Ravindra Chavanji (President of BJP and Pradeshadhyaksh, Maharashtra)
2. Bro. Rajesh More (MLA from Kalyan Rural Assembly constituency in Thane district)
3. Sis. Alka Mutalik Ji (President of Shree Ganesh Mandir Sansthan, Dombivli east) 
4. Bro. Dr. Rajkumar Kolhe Ji (Founder President of Jahnvis Multi Foundation's Vande Mataram Degree College, Dombivli west)
5. Bro Ashok Chandravarkar Ji & Mangala Chandravarkar Ji (Director FDC Ltd)
6. Karnataka Sangha'S Manjunatha College Of Commerce (On Behalf Of Chairaman Bro. Dr.Divakar Shetty, Trustee Devidas Kulal Sir, Urmani Sir,Taranath Sir, Principal Sushila Madam, Mrs Veena Subhash Palan)
7. Bro. Amit Mhatre (Secretary Youth Congress,Dombivli)
8. Sis. Dr. Tara Naik (Md and Gynaecologist, owner of Ashwini Maternity, Nursing Home)
9. Bro. Mr. Bhola Patil (Secretery Obc Dept)
10. Bro Niranjan Kadam (Trustee- Mumbreshwar Temple)
11. Bro. Yogesh Patil (Priest- Mumbra devi Temple) 
12. Bro. Mohan Bhagat (Trustee-Mumbreshwer Temple)
13. Bro.Mr. Shantilal Jain (Prop. M/S Darshan Marbal)
14. Bro. Manoj Kantak Ji (President, Toshvin Analytical Pvt Ltd)
15. Bro. Mahendra Patil (Vice President – Kalyan Jilha OBC Morcha – BJP Mr. Nitin patil (corporator)
16. Bro. Ravi Patil, and Mrs. Jyoti Marathe (corporator)
17. Bro. Dr Milind shirodkar (Director and Chief general surgeon at Aims hospital, Dombivli east)

कार्यक्रम को आगे बढ़ाते हुए RJ दिलीप भाई ने आदरणीय शकू दीदीजी तथा आदरणीय निकुंज भाई जी से कुछ सामान्य सवाल जवाब किये । आदरणीय विष्णु बहन जी ने सभी को मेडिटेशन कराया, सभी ने शांति और शक्ति की अनुभूति की ।
कार्यक्रम के अंत में सभीने आ. नलिनी दीदीजी को पुष्पांजलि अर्पित करते हुए सौगात और टोली स्वीकार की और ब्रह्मभोजन के लिए प्रस्थान हुए ।
इस तरह VIP कार्यक्रम उमंग उत्साह के साथ संपन्न हुआ ।
 
Photo and link:
<https://photos.app.goo.gl/nGHZH8AWQLTAREfv6>

<https://drive.google.com/drive/folders/1NYWecg-2TQCBjfX981CVDSS1TzYArAWo?usp=sharing>  

ओम शांति
राजयोगिनी ब्रह्माकुमारी शकु दीदीजी
निर्देशिका – घाटकोपर उपक्षेत्र, प्रभारी – डोंबिवली सेवाकेंद्र

६० दिवसांचे पैसे भरुन करा ९० दिवस प्रवास..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता राज्यातील ई-बस प्रवाशांना मासिक व त्रैमासिक पास सवलत योजना उपलब्ध होणार आहे. उच्च सेवा वर्गाचा पास असलेले प्रवासी निमआराम किंवा साध्या बसमधून प्रवास करु शकतील. मात्र निमआराम किंवा साध्या बसचा पासधारक ई-बसने प्रवास करत असल्यास दोन्ही सेवांतील भाड्याचा फरक १०० टक्के दराने भरावा लागणार आहे.

काय आहे योजना ?
या योजनेंतर्गंत प्रवाशांना ६० दिवसांचे भाडे भरून ९० दिवस प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे.

कोणत्या बससाठी पास उपलब्धः ९ मीटर ई-बस, १२ मीटर ई बस आणि ई शिवाई सेवा (ई-शिवनेरीवगळून)

मासिक पास (३० दिवस): २० दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारुन ३० दिवस वैध

त्रैमासिक पास (९० दिवस): ६० दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारुन ९० दिवस वैध

एसटी महामंडळाने घेतलेल्या पास योजनांचा मुख्य उद्देश नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने दररोज एकाच मार्गावर प्रवास करणाऱ्या नियमित प्रवाशांना ई-बस सेवेकडे आकर्षित करणे हा आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सध्या महामंडळाच्या ताफ्यात ई-बस प्रकल्पातील ४४८ बसेस आणि शिवाई प्रकल्पातील ५० ई-बसेस कार्यरत आहेत. या बसेसची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्याचा मानस असल्याचे सरनाईक म्हणाले.

१७ ड्रग्स माफियांवर ११५ किलो गांजा जप्त करत कल्याण खडकपाडा पोलीसांची धडक कारवाई..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : अंमली पदार्थांच्या तस्करी जाळ्याचा धसका भरवणारी भव्य कारवाई करत खडकपाडा पोलीसांनी तब्बल १७ ड्रग तस्करांविरोधात मोक्का अंतर्गत कार्यवाही केली आहे. विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यात मोक्का अंतर्गत ड्रग माफियांविरोधात झालेली ही पहिलीच मोठी कारवाई ठरली आहे. कल्याण झोन-३ चे उपयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या ऑपरेशनमध्ये पोलीसांनी तब्बल ११५ किलो गांजा, पिस्तूल, वॉकी-टॉकी संच, वाहने आणि तब्बल ७० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीने विशाखापट्टणम ते कल्याण असा अंमली पदार्थाचा पुरवठ्याचे जाले उभारले होते.

कल्याण जवळ बाल्ल्यानी परिसरात राहणारा गुफरान हजरान शेख हा या तस्कर टोळीचा म्होरक्या असून, त्यांच्यासह १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर ४ आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातील पोलीसांना 'ऑपरेशन ड्रग बर्स्ट' ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच सहायक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे व पोलीस अधिकारी अनिल गायकवाड यांच्या पथकाने केली. या तपासात पोलीसांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून आरोपींच्या ताब्यातून ६२ किलो गांजा, १ पिस्तूल, २ जिवंत काडतुसे आणि २ वॉकी-टॉकी संच चार्जरसह जप्त केले.
अटक केलेल्या आरोपींची नावे गुफरान शेख, बाबार शेख, सुनिल राठोड, आझाद शेख, रेशमा शेख, शुभम उर्फ सोन्या भंडारी, असिफ शेख, सोनू सय्यद, प्रथमेश ननावडे, रितेश गायकवाड, अंबादास खामकर, आकाश भिंगारदे, गणेश जोशी अशी असून आणि इतर ५ आरोपींचा समावेश आहे.

'ड्रग माफियांचा सळसळाट रोखण्यासाठी मोक्का हाच प्रभावी उपाय' - डीसीपी अतुल झेंडे


या प्रकरणात आरोपींनी आर्थिक लाभासाठी संघटित गुन्हेगारी केल्याचे स्पष्ट झाल्याने, महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली. उपयुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले की, 'राज्यातील ड्रग तस्करांच्या मुळावर घाव घालण्यासाठी खडकपाडा पोलीसांची ही कारवाई आदर्श ठरेल'. या संपूर्ण तपासाचा पुढील भाग सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या देखरेखीखाली सुरू असल्याचे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

मदतीचे तोरण, हेच शिवसेनेचे धोरण..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : महाराष्ट्रातील मराठवाड्यातील जालना आणि बीड  येथील आसपासच्या गावातील बऱ्याचशा भागात अतिवृष्टीमुळे नागरिकांचे हाल झाल्याकारणाने शिवसेनेच्या माध्यमातून एक मदतीचा हात म्हणून महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्यनेते नामदार एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आणि कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार, संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे ह्यांच्या नेतृत्वात मराठवाडा येथील जालना, बीड आणि सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात एकूण ४५०० कुटुंबांपर्यंत जीवनावश्यक गरजेच्या वस्तूंची मदत पोहचविली जात आहे. आज बीड जिल्हा तालुका बीड येथील कुर्ला गाव येथे सकाळी १० वाजता सिंदपाना नदी किनाऱ्यावरील एकूण १४ गावांच्या आपतग्रस्त शेतकरी कुटुंबियांना गरजेच्या वस्तू असलेल्या किट चे वाटप करण्यात आले.
शिवसेना कल्याण लोकसभा मतदार संघातील कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे ह्यांच्या नेतृत्वात उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, माजी नगरसेवक राजन मराठे, डोंबिवली युवासेना अध्यक्ष सागर जेधे, उपतालुका प्रमुख राहुल गणपुले, युवासेना विधानसभा अध्यक्ष सूरज मराठे, संजय निकते हे पदाधिकारी उपस्थित होते. बीड जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप, सचिन मुलुक, स्वप्नील गलधर आणि श्याम सुंदर पडुले कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती  ह्यांच्या प्रयत्नातून आणि नियोजनातून हा वाटप कार्यक्रम पार पडला.

पालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांचा स्वबळाचा नारा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात पॅनल निहाय संघटनात्मक बैठका तसेच इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन भारतीय जनता पार्टी स्वबळावर महानगरपालिका निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या बरोबर माजी आमदार नरेंद्र पवार, माजी शहर अध्यक्ष वरुण पाटील, प्रेमनाथ म्हात्रे, तसेच सर्व मंडळ अध्यक्ष, माजी नगरसेवक यांच्या उपस्थितीत पॅनल निहाय सभांचा धडाका सुरू आहे.

या बैठकीत भाजपचे सर्व जेष्ठ पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी देखील एक सुराने स्वबळावर निवडणूक लढण्यास उत्सुकता दर्शविली. कल्याण-डोंबिवली मध्ये भारतीय जनता पक्षावर प्रेम करणारा मोठा वर्ग राहत असून पूर्वी पासून भाजप चा गड मानला जातो म्हणून या निवडणुकीत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर भाजपचा महापौर बसवण्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे मत जिल्हा अध्यक्ष नंदु परब यांनी व्यक्त केले.

एमबीबीएसच्या विद्यार्थिनीला बेशुद्ध करून बलात्कार केला आणि व्हिडीओ काढल्याने एकच खळबळ..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिल्ली : दिल्लीत एमबीबीएसच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीतील आदर्श नगर भागातील एका हॉटेलमध्ये १८ वर्षीय एमबीबीएस विद्यार्थिनीने २० वर्षीय तरुणावर ड्रग्ज देऊन बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. ही घटना ९ सप्टेंबर रोजी घडली, असं अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक केलेली नाही. पीडित तरुणीने तक्रारीत म्हटलं आहे की, आरोपी तिच्या कॉलेजमध्ये शिकत असून मित्र आहे. त्याने मैत्रीच्या बहाण्याने तिला 'हॉटेल ऍपल' मध्ये नेले. पोहोचताच त्याने तिला अंमली पदार्थ दिले आणि नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तरुणीने त्याच्यावर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्याचा आरोपही केला आहे. गुन्हा करत असताना त्याने फोटो, व्हिडीओ काढले असा तिचा दावा आहे. 

पीडित तरुणी हरियाणाच्या जिंद येथील रहिवासी आहे. ती दिल्लीच्या रोहिणी येथील 'बाबासाहेब आंबेडकर मेडिकल कॉलेज'च्या वसतिगृहात राहत आहे. पोलीसांनी तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आणि आरोपीचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीसांनी दिली आहे. 

या महिन्याच्या सुरुवातीला, उत्तर प्रदेशात आठवीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका शाळेच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली होती. या वर्षी फेब्रुवारीमध्ये, दक्षिण दिल्लीच्या सीआर पार्क परिसरात एका १५ वर्षीय मुलीवर तिच्या शिकवणी शिक्षकाने तीन वर्षांत अनेक वेळा बलात्कार केल्याचा आरोप आहे. पश्चिम बंगालची रहिवासी असलेल्या शिक्षकानेही मुलीला धमकावले आणि ब्लॅकमेल केले, असे पोलीसांनी सांगितले.

बलात्काराची तक्रार कशी दाखल करावी ?
पोलीस स्टेशनमध्ये किंवा ऑनलाइन (१०० किंवा महिला हेल्पलाइन १८१) तक्रार नोंदवा. CrPC कलम १६४A अंतर्गत रुग्णालयात तक्रार नोंदवता येते. पीडितेला पोलीस स्टेशनमध्ये कायद्याने मदत उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे, ज्यात महिला पोलीस किंवा वकीलाची उपस्थिती असते. तक्रार नोंदवण्यासाठी वय किंवा इतर कोणतीही अट नाही.

बलात्कार प्रकरणात कायद्याची तरतूद काय आहे ?
भारतीय न्याय संहिता (२०२३) अंतर्गत बलात्कारासाठी किमान १० वर्षांची तुरुंगवास आणि कमाल मृत्युदंडाची शिक्षा आहे. अल्पवयीन मुलींवर बलात्कारासाठी कठोर शिक्षा, ज्यात २० वर्षांपर्यंत किंवा मृत्युदंड. नवीन कायद्यात पीडितांच्या संरक्षणासाठी झीरो टॉलरन्स धोरण आहे, ज्यात तपासासाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे आहेत. वैवाहिक बलात्कार अद्याप गुन्हा मानला जात नाही, परंतु यावर चर्चा सुरू आहे.

बलात्कार पीडितांसाठी मदत आणि संरक्षण काय उपलब्ध आहे ?
पीडितांना वैद्यकीय, मानसिक आणि कायदेशीर मदत मिळते. राष्ट्रीय महिला आयोग (NCW) किंवा UNFPA सारख्या संस्था समुपदेशन देतात. POCSO कायद्याखाली अल्पवयीनांसाठी विशेष संरक्षण. पोलिस तपासादरम्यान पीडितेची ओळख गोपनीय ठेवली जाते आणि तिला सुरक्षित निवासाची व्यवस्था केली जाते. 

हेल्पलाइन क्रमांक:
 १०९८ (बालिका) किंवा १८१ (महिला).

सरकारच्या निर्णयानुसार दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाला कफ सिरप देण्यास बंदी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिल्ली : मध्य प्रदेशात कफ सिरप दिल्यानंतर लहानमुलांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्रीय आरोग्य विभागाने दोन वर्षांहून कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देण्यावर बंदी घातली आहे. मध्यप्रदेश आणि राजस्थानात कफ सिरप दिल्याने लहान मुले दगावल्याने अनेक राज्य सरकारनी या औषधांवर बंदी घातली असताना आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सल्ल्यानंतर छत्तीसगड राज्य सरकारने दोन वर्षांच्या पेक्षा कमी वयाच्या मुलांना सर्दी-पडसे यासाठी कफ सिरप देण्यावर बंदी घातली आहे. हा निर्णय लहान मुलांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी घेतला आहे.
आरोग्य सेवा आयुक्तालयाने उच्चस्तरिय व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित करुन जिल्हा स्तरिय अधिकाऱ्यांना सक्त निर्देश दिले आहेत. औषधांचा वापर केवळ वैद्यकीय सल्ल्याने करावा आणि याबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असे आदेश आरोग्य कर्मचारी आणि संबंधितांना दिले आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार लहान मुलांमध्ये सामान्यत: सर्दी आणि पडसे आपोआपच बरा होत असतो. यासाठी औषधे देणे अनावश्यक असते.

सर्वसामान्य जनतेनेही मनाने डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय औषधे घेऊ नयेत. अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यातील तपासणी सुरु केली आहे. औषध निर्मिती कारखाने आणि उत्पादनांचे रिस्क बेस्ड इन्स्पेक्शन (Risk-Based Inspection) करण्यासाठी औषध निरीक्षकांची पथके नेमली आहेत.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये नवकन्या आणि मातृ पितृ पूजन व दसरा उत्साहात साजरा..


प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली (कोपर) :  दर वर्षी प्रमाणेच यावर्षी देखील 'जे एम एफ' मंडपम मध्ये नव कन्या पूजन करण्यात आले. "या देवी सर्व भूतेषु विद्या रूपेंनं संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः" पार्वती मातेची नऊ रूपे ओळखल्या जाणाऱ्या नवदुर्गा तसेच सरस्वती, लक्ष्मी, पद्मावती, या शिशु विहार मधील छोट्या बालिका नव दुर्गेच्या रूपात नटून थटून आल्या होत्या. त्याच बरोबर व्यंकटेश, भृगूऋषी, गणपती बाप्पाच्या रूपात छोटी बालके आली होती. जणू काही 'जे एम एफ' मंडपम मध्ये स्वर्गच अवतरला होता असे जाणवत होते.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी शाळेच्या प्रवेश दारापासून सर्व देवी देवतांचे  पाय प्रक्षाळून व त्यांचे औक्षण करून सर्वांना सन्मानाने वाजत गाजत मंडपम मध्ये आणून त्यांच्या स्थानावर विराजमान केले. नऊ देवी देवतांची शास्त्रशुद्ध पूजा करून आरती केली व सर्व देवींची साडी खण नारळाने ओटी भरली. शिशु रूपातील नव दुर्गेच्या तेजानी जणू सारा जे एम एफ मंडपम तेजोमय  झाला होता. सर्व पालकांनी देखील कन्या पूजन केले. देवीच्या नवरात्र बरोबरच ही नवरात्र गिरी बालाजी म्हणजेच व्यंकटेशाची देखील आहे म्हणूनच शेष शय्येवर साक्षात बालाजी व त्यांच्या द्विपत्नी लक्ष्मी आणि पद्मावती देखील आपल्या रूपात विराजमान झाल्या होत्या. संगीत शिक्षिका सौ. श्रेया कुलकर्णी यांनी भृगूऋषी आणि लक्ष्मी रागाने का निघून गेली याची कथा सांगितली. शिशु विहारच्या उप मुख्याध्यापिका सौ. मयुरी खोब्रागडे यांनी बालकांना उत्तम सहकार्य करून शिशु रूपातील देवतांनी नाटिका रंगवली.
     
"मातृ देवो भव, पितृ देवो भव गुरू देवो भव, आचार्य देवो भव"
ब्रह्मांडामध्ये देवांपेक्षाही सर्व श्रेष्ठ कोण असेल तर "माता पिता" म्हणूनच गणपती बाप्पाने देखील आपल्या आईवडिलांचे पूजन करून त्यांनाच तीन प्रदक्षिणा घातल्या, हेच संस्कार आपल्या पाल्यामध्ये असणे गरजेचे आहे म्हणूनच सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांचे पूजन करून त्यांच्या भोवती परिक्रमा केली.
अनेक वेळा भगवतीने नऊ पेक्षा अधिक रूपात प्रकट होऊन वाईट शक्तींचा संहार केला आहे, आज ही निरागस दिसणारी शिशु देवींची रुपे म्हणजे आपल्या मधील षडरिपुंवर मात करून ब्रह्मचारिणी देवी  संसारात राहून सुद्धा विरक्त जीवन कसे जगावे याचा मार्ग दाखवते, असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगुन नऊ रूपमधील देवींची माहिती सांगितली तसेच वैकुंठपती व्यंकटेशाला देखील वाईट शक्ती नष्ट करण्यासाठी भगवतीला पाचारण करावे लागले असेही सांगितले. त्यानंतर सर्वांना नवरात्री व दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.
विजयादशमी म्हणजेच दसरा, रामाने रावणाचा वध करून विजयी पताका फडकवत ठेवली म्हणून आजही आपण नऊ शक्तींची पूजा करून विजया दशमीला वाईट गोष्टी नष्ट करून एकमेकांना आपट्याची पाने 'सोने' म्हणून pदेवाणघेवाण करत आलिंगन देतो, संस्कृती आणि संस्कार हे आपल्या चांगल्या विचारांवर टिकले आहेत म्हणूनच ही संस्कृती आपल्या पुढच्या पिढीनेही टिकवून ठेवावी हीच शिकवण शाळेच्या माध्यमातून देत आहोत असे सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सांगितले व सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी देखील देवी झालेल्या सर्व बालिकांचे कौतुक केले, तर इतर वेळी एका ठिकाणीही शांत न बसणारे हे विद्यार्थी खरोखरच संयमाने बसले आहेत तर साक्षात देवीच स्वर्गातून खाली उतरून बसल्या आहेत असा भास होत असल्याचा त्या म्हणाल्या. शिशु विहारच्या सर्व शिक्षिकांनी, पालकांनी देखील मनापासून मुलींना वेशभूषा करून सहकार्य केले. या नंतर सर्व पालक, शिक्षकांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम करून गरबा दांडिया चा खेळ रंगला.

नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांच्या नावाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले शाश्वत..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

भिवंडी : लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाश्वत केले आहे. नवी मुंबई विमानतळ नामकरण कृती समितीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नावाबाबत पदाधिकाऱ्यांना शाश्वत केले, अशी माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी  दिली.
लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वन मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. तसेच या विमानतळाला आदरणीय दि.बा.पाटील यांचे नाव देण्याबाबतच्या भूमिपुत्रांच्या तीव्र भावनांची माहिती दिली. लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसंदर्भात काही अडचणी असल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्ग काढावा. तसेच आदरणीय दिबांचे नाव विमानतळाला देण्याबाबत शाश्वत करावे, अशी आग्रही मागणी कपिल पाटील यांनी केली. 
लोकसभेत २०१६ मध्ये सर्वप्रथम कपिल पाटील यांच्याकडून दि.बा.पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात ठराव मंजूर झाला. तो नागरी उड्डाण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. त्यानंतर तो गृह मंत्रालयात मंजुरीसाठी गेला. गृह मंत्रालयाच्या मान्यतेनंतर संबंधित प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात आला, अशी माहिती कपिल पाटील यांनी या बैठकीत दिली. तसेच संबंधित प्रस्तावात अडचणी आहेत का, याबाबत मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन करावे, अशी विनंती केली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव देणार असल्याचे शाश्वत केले.

मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण, कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, माजी खासदार जगन्नाथ पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे, संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर व इतर लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांचा समावेश होता.

'जे एम एफ' शिक्षण संस्था संचालित 'वंदे मातरम' महाविद्यालयाचे '५८ व्या युथ फेस्टिवल मुंबई' विद्यापीठामध्ये नावलौकिक व पालकांसह कौतुक सोहळा संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली (कोपर) : डोंबिवली स्थित 'जेएमएफ' शिक्षण संस्था संचालित 'वंदे मातरम' महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठामध्ये आपले नाव सुवर्ण अक्षराने कोरले. '५८ व्या युथ फेस्टिवल' मध्ये मुंबई विद्यापीठातील ३०० च्या वर १२ झोन मधुन २७ कॉलेजमध्ये 'वंदे मातरम' महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी माईम ऍक्ट मध्ये सुवर्णपदक पटकावले. तसेच मराठी नाटक 'माझी शाळा' यामध्ये ३५० च्या वर १२ झोन मध्ये ४७ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता आणि यात रौप्य पदक पटकविणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांचा कौतुक व गुणगौरव सोहळा 'वंदे मातरम' महाविद्यालयाच्या मधुबन वातानुकुलीत बँक्वेट हॉलमध्ये आज दिनांक २७/०९/२०२५ रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांच्या नियोजनाखाली पार पडला. 
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चीफ एडिटर 'सी न्यूज भारत' चैनल दिल्ली चे श्री. पवन शर्मा हे उपस्थित होते आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांना आई-वडिलांची सेवा आणि सन्मान करण्याचे सांगितले. संस्थेच्या सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मेहनत किती महत्त्वाची आहे जेणेकरून आयुष्यामध्ये आपल्याला यश प्राप्त करता येते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी हे आमच्याकडे विद्यार्थी म्हणून शिकतात आणि इथेच परिवाराचा एक हिस्सा म्हणून नोकरीही करतात. 
सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनाही आजच्या या कार्यक्रम प्रसंगी आमंत्रित करण्यात आले होते. त्यांना आपल्या पाल्याचे कौतुक बघुन अतिशय आनंद झाला होता व डोळ्यात आनंदाश्रू चमकत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. एन.नाडार  यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. असेच यश संपादन करत रहा असेही मार्गदर्शन त्यांनी केले. कार्यक्रमाला ब्रह्माकुमारीज चे डॉ . कुमार सर, उपप्राचार्य डॉ. वनिता लोखंडे, प्रमुख समन्वयक मंजूला ढवळे हेही उपस्थित होते. या कौतुक सोहळ्यात अनेक विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रति आपले मनोगत व्यक्त केले आणि आपले अनुभव सांगितले. नाटकाचे दिग्दर्शक प्रथमेश देवकोळे आणि शुभम जाधव यांच्या मार्गदर्शन प्राप्त झाले. तसेच प्राध्यापिका मृणाली जाधव यांनी मुलांच्या तयारीला मोलाचे सहकार्य केले.  कार्यक्रमाला संपूर्ण महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.

माइम ऍक्ट सहभागी..
पराग सुतार, तन्वी गुरव, दिवेश मोहिते, निधी अमीन, मितेश पाटील, मंथन पाटील
साथीदार
 मयंक कोठारी, स्नेहा मिश्रा

माझी शाळा स्किट सहभागी..
दिवेश मोहिते, तन्वी गुरव, यश बडेकर, साई कुड्तुडकर, दुर्वा घाडी, सानिका तांबोळी
साथीदार
आयुष सावंत, संस्कार कदम
या कार्यक्रमाचे टिळक देऊन स्वागत सौ. खुशबू दुबे तसेच सूत्रसंचालन प्रा. एकनाथ चौधरी आणि प्रा. सुनिता पाटील यांनी केले.

मेट्रोचे सर्व टप्पे २०२६ च्या अखेर पर्यंत खुले होणार – मुख्यमंत्री फडणवीस

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : मेट्रो ४ आणि ४-अ या मार्गिका वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणाऱ्या मेट्रो ११ या मार्गिकेला जोडण्यात येणार असल्याने ५८ कि.मी लांबीची देशातील सर्वात मोठी मेट्रो मार्गिका ठाणे आणि मुंबईसाठी महत्त्वाची ठरेल. २०२६ च्या ऑक्टोबर पर्यंत या मेट्रोचे सर्व टप्पे प्रवाशांकरिता खुले होतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मेट्रो मार्ग ४ (वडाळा-कासारवडवली) व ४-अ (कासारवडवली-गायमुख) च्या टप्पा-१ गायमुख जंक्शन गायमुख गाव-घोडबंदर रोड- कासारवडवली-विजय गार्डन या मार्गिकेच्या प्राधान्य विभागावर तांत्रिक तपासणी व ट्रायल रनची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री तथा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अध्यक्ष एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मेट्रो मार्ग ४ आणि ४-अ बद्दल माहिती देताना म्हणाले की, घाटकोपर-मुलुंड-गायमुख या मेट्रो मार्गिकेची एकूण लांबी ३५ किलोमीटर असून मेट्रो ४ ची ३२ कि.मी. आणि मेट्रो ४-अ ची २.८८ कि.मी आहे. मार्गिकेत एकूण ३२ स्थानके असून या प्रकल्पासाठी १६ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मेट्रो ४, मेट्रो ४-अ, मेट्रो १० आणि मेट्रो ११ या सर्व मेट्रोसाठी डेपो तयार करण्याकरिता भोगरपाडा येथे ४५ हेक्टर जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

या मेट्रो मार्गिकेचा विशेष फायदा असा आहे की, पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरे, मुंबई शहर आणि ठाणे शहर या सर्व मार्गांना जोडणारा हा मार्ग असणार आहे. पुढे ही मार्गिका वडाळा ते छत्रपती शिवाजी टर्मिनसला जोडणाऱ्या मेट्रो ११ ला जोडली जाणार आहे. त्यामुळे ही ५८ किमी लांबीची देशातील सगळ्यात मोठी मेट्रो मार्गिका निर्माण होणार आहे. या मेट्रोच्या सर्व मार्गिका सुरु झाल्यावर यामध्ये १३ लाखापेक्षा जास्त दैनंदिन प्रवासी प्रवास करतील. या मेट्रोमुळे रस्त्यावरची वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी होईल. पुढच्या वर्षाच्या शेवटापर्यंत या मेट्रोचे टप्प्याटप्प्याने सर्व टप्‍पे प्रवाशांकरिता खुले झाले पाहिजेत असा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
मेट्रो ट्रेनची वैशिष्ट्ये..

बीईएमएल (BEML) चे ६-डब्यांचे ट्रेन-सेट्स, जे मेट्रो मार्ग २ अ व ७ वर चालत आहेत त्याच पध्दतीच्या आधुनिक ट्रेन कंट्रोल अँड मॅनेजमेंट सिस्टम, प्रवासी आपत्कालीन संपर्क यंत्रणा, स्वयंचलित अग्निशमन शोध प्रणाली, अडथळा (Obstacle) शोध उपकरण, आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी दरवाजा, ऑन-बोर्ड सार्वजनिक उद्घोषणा व माहिती प्रणाली, ऊर्जा बचत करणारी पुनरुत्पादक ब्रेकिंग प्रणाली (सुमारे ३०% बचत) या सुविधा असतील.

या प्राधान्य विभागावर तांत्रिक तपासणी व धाव चाचणी करून, एमएमआरडीए ठाणेकर आणि मुंबईकरांसाठी मेट्रो मार्ग ४ व ४-अ कार्यान्वित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत आहे.

समाजाच्या प्रत्येक घटकाचा विचार करणे हेच आमचे धोरण - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीने चालणारे हे सामान्य जनतेचे सरकार आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाच्या हिताचा विचार करणे, हेच या सरकारचे धोरण आहे. कै.अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांचे जीवनमान उंचवण्यासाठी सुरू केलेली चळवळ कोणीही थांबवू शकत नाही. या माथाडी कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन, अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार सहकारी पतपेढी आणि अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार सहकारी ग्राहक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी एपीएमसी कांदा-बटाटा मार्केट येथे आज स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.

या मेळाव्यात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, पणनमंत्री जयकुमार रावल, सार्वजनिक बांधकाममंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आमदार निरंजन डावखरे, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, सरचिटणीस नरेंद्र अण्णासाहेब पाटील, कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप तसेच मोठ्या संख्येने माथाडी कामगार बंधू-भगिनी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम कै. आमदार अण्णासाहेब पाटील आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी संघटनेसाठी एक संघटन उभे केले. आपल्या समाजातील लोकांच्या हितासाठी, माथाडी कामगारांच्या विकासासाठी एखादी व्यवस्था उभारण्यासाठी आपले घर-संसार पणाला लावणारे नेते इतिहासात कमीच आढळतात. त्यापैकी कै.आमदार अण्णासाहेब पाटील हे एक होते. महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांहून मुंबईत येणाऱ्या कामगारांना चांगले राहणीमान मिळावे, त्यांचा विकास व्हावा यासाठी कै.अण्णासाहेब पाटील यांनी चळवळ सुरू केली. या चळवळीला त्यांनी संघटित स्वरूप दिले. अण्णासाहेबांच्या त्यागामुळे आणि प्रयत्नांमुळे माथाडी कामगारांना आवाज मिळाला, सुरक्षा मिळाली आणि पुढील पिढ्यांना स्वप्ने पाहण्याचा अधिकार मिळाला. अण्णासाहेब पाटील यांचे मराठा समाजासाठीचे योगदान सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अण्णासाहेबांनी मोठा लढा दिला. मराठा समाजासाठी बलिदान दिले असेल तर ते अण्णासाहेब पाटील यांनीच दिले. त्यांच्या बलिदानातूनच मराठा आरक्षणाची चळवळ उभी राहिली. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न आम्ही केला. पुराव्याअभावी आरक्षणापासून वंचित असलेला मराठा समाज आता आरक्षणासाठी पात्र ठरला आहे. या माध्यमातून अण्णासाहेबांच्या चळवळीला हातभार लावण्याचे काम या सरकारने केले आहे, असेही ते म्हणाले.

मराठा समाजाचे प्रश्न केवळ आरक्षणाने सुटणार नाहीत. त्यासाठी मराठा तरुणांसाठी शैक्षणिक प्रतिपूर्ती योजना सुरू केली आहे. शिक्षणासाठी शहरात राहण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी भत्ता म्हणून दरवर्षी ६० हजार रुपये देण्यात येतात. मराठा तरुण-तरुणींना विविध प्रकारचे प्रशिक्षण मिळावे, त्यांना एमपीएससी, युपीएससी परीक्षा देता याव्यात यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) स्थापन केली. आतापर्यंत सारथीच्या माध्यमातून ११२ तरुण आयएएस आणि आयपीएस म्हणून नियुक्त झाले आहेत. १ हजार ४८ तरुण-तरुणी महाराष्ट्र शासनात एमपीएससीद्वारे अधिकारी म्हणून नियुक्त झाले आहेत. आतापर्यंत सारथीच्या योजनांचा ८ लाख ३८ हजार ४७७ तरुण-तरुणींनी लाभ घेतला आहे, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, मराठा तरुणांमधून उद्योजक निर्माण करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ स्थापन करण्यात आले असून, या महामंडळातून दीड लाख तरुण-तरुणी उद्योजक झाले आहेत. त्यांना कर्जाच्या स्वरूपात १३ हजार ५०० कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत, असे महत्त्वाचे निर्णय आपल्या सरकारने मराठा समाजासाठी घेतले असून, अशाच प्रकारचे विविध निर्णय इतर समाजातील तरुणांसाठीही घेण्यात आले आहेत. समाजाच्या प्रत्येक घटकाचा विचार करणे हेच आमचे धोरण आहे.

माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाच्या चौकटीत राहून जे करणे आवश्यक आहे ते आम्ही निश्चित करू. नियमांनुसार माथाडी कामगारांना जे काही देता येईल ते जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न या सरकारकडून केला जाईल, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा “देवा भाऊ” असा उल्लेख करून मराठा समाज आणि माथाडी कामगारांसाठी शासनाने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांसाठी त्यांचे आभार मानले. त्यांनी माथाडी कामगारांच्या निवासासाठी स्वस्त दरात जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही केली. मुख्यमंत्री महोदयांच्या सहकार्यामुळे अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळातून दीड लाख उद्योजक निर्माण करता आले, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रास्ताविक भाषणात माथाडी कामगारांचे सध्याचे प्रश्न मांडले. यावेळी माथाडी भूषण मानकरी श्री. दिनकर कृष्णा काटकर, विश्वास कृष्णराव पिसाळ, जनाबाई नारायण धुमाळ, वामन सिताराम वैद्य, मधुकर साहेबराव कदम, राजेंद्र खाशाबा लंभाते, प्रदीप गजानन भगत, अनिल सुरेश खताळ, दत्तात्रय ज्ञानदेव कवर, लक्ष्मण दिलीप पाटील, दीपक नारायण आहेर, भिमराव दशरथ चव्हाण, शशिकांत विष्णू यादव, शंकर भिकाजी शिंदे, संतोष गोणबा गाढवे, सुभाष बळवंत यादव, गौतम शनिचर भारती यांना मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान करण्यात आले. सोनल गुंजाळ, संभाजी शिवाजी बर्गे, सुनील धोंडे, मयूर मगर, अंकुश संकपाळ या लाभार्थ्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धनादेशांचे वाटप करण्यात आले.

पुन्हा एकदा 'जे एम एफ' संचालित 'वंदे मातरम्' पदवी महाविद्यालयाचे 'मुक अभिनय' स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत ५८ व्या युवा महोत्सवामध्ये वर्चस्व..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :  मुंबई विद्यापीठामध्ये नुकत्याच पार पडलेल्या 'एकांकिका नाटक स्पर्धा' व 'मूक अभिनय' स्पर्धेमध्ये 'जे एम एफ' शिक्षण संस्था संचालित 'वंदे मातरम्' पदवी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनुक्रमे रौप्य पदक व सुवर्ण पदक पटकावून महाविद्यालयाचे नाव उज्वल केले. दिवेश मोहिते, पराग सुतार, तन्वी गुरव, मंथन पाटील, मितेश पाटील, निधी अमीन त्याच बरोबर सहकारी सिद्धार्थ कटारे, स्नेहा मिश्रा यांनी मूक अभिनय स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकून प्रथम स्थान निश्चित केले व पुन्हा एकदा 'वंदे मातरम्' पदवी महाविद्यालयाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोचला. नाटकाचे दिग्दर्शन शुभम जाधव यांनी केले सांस्कृतिक समन्वयक मयांक कोठारी यांनी प्रतिनिधित्व केले. मिस मृणाली जाधव यांनी या सर्वांचे नेतृत्व केले 
      
यशाची पायरी चढताना अपयशाच्या पायऱ्यांनाही तेवढेच महत्व असते, म्हणूनच अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असे म्हटले जाते. नाटक आणि अभिनय स्पर्धेमध्ये अनुक्रमे रौप्य आणि सुवर्ण पदक मिळवून तुम्ही वंदे मातरम् महाविद्यालयाला सन्मानित केले आहे त्याला तोड नाही, भविष्यात देखील अशीच अनेक यशाची उत्तुंग शिखरे चढत रहा आणि आपल्या महाविद्यालयाचे नाव उज्वल करा असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी विद्यार्थांना सांगून अभिनंदन करून शुभेछा दिल्या.
      
दर सेकंदाला माणसाच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत असतात म्हणजेच रोजच्या वास्तविक जीवनात देखील मनुष्य नकळतपणे मूक अभिनय करतच असतो, नामांकित स्पर्धेमध्ये  औपचारिक रित्या सहभागी होऊन  मूक अभिनय करून  प्रेक्षकांकडून जी तुम्ही दाद मिळवली व सुवर्ण पदक पटकावले त्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन असे म्हणून  सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे देखील मुलांच्या आनंदात सहभागी झाल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नाडर,  उप प्राचार्या सौ. वनिता लोखंडे,  मुख्य समन्वयक सौ. मंजुळा धावले तसेच सर्व 'जे एम एफ' परिवार यांनी पदक विजेते विध्यार्थ्यांचे कोटी कोटी अभिनंदन केले.

एसटी मध्ये १७४५० चालक, सहाय्यकांची पदे भरण्याची मेगा भरती..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई:  एसटी मध्ये मोठी नोकरभरती जाहीर झाली आहे. आगामी नवीन बसेससाठी कंत्राटी पद्धतीने १७४५० चालक व सहाय्यकांची भरती करण्यात येणार आहे. येत्या २ ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या भरतीसाठी किमान वेतन ३० हजार रुपये असणार आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ३०० व्या संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी कंत्राटी पद्धतीने ३ वर्षांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्याकरिता ई-निविदा प्रक्रिया अवलंबण्यात येत आहे. ही ई-निविदा प्रक्रिया सहा प्रादेशिक विभाग निहाय राबविण्यात येणार आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मनुष्यबळ पुरविणाऱ्या संस्थांकडून राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक मनुष्यबळ वेळेत उपलब्ध होईल.

डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ, यांच्या तर्फे शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्त डोंबिवलीत 'रासरंग - २०२५ उपक्रमाचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार व कार्यसम्राट डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला 'रासरंग' हा शारदीय नवरात्र उत्सव यावर्षी १० व्या वर्षात पदार्पण करत असून २२ सप्टेंबर २०२५ ते १ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत दररोज सायंकाळी डी.एन.सी. रोडवरील शाळेच्या मैदानावर भव्यदिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. २०१७ पासून 'डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन' आणि 'श्री नवदुर्गा युवा मंडळ, डोंबिवली' यांच्या संयुक्त विद्यमाने या उत्सवाचे आयोजन होत आहे. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्राशी निगडीत उपक्रम राबवणारे हे फाऊंडेशन सर्वसामान्य जनतेसाठी सेवाभावी कार्य करत असून, त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे हा रास रंग नवरात्र उत्सव.
सदर नवरात्र उत्सवाची घटस्थापना २२ सप्टेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता होणार असून देवीची आरती दररोज सकाळी ११:०० वाजता आणि संध्याकाळी ७:०० वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभ हस्ते होणार आहे. या नवरात्र उत्सवाचा उद्घाटन सोहळा कल्याण लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते तसेच कल्याण ग्रामीण विधानसभेचे आमदार माननीय राजेश मोरे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माननीय गोपाळ लांडगे तसेच अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत २२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६:०० वाजता नऊ विविधरंगी २१०० फुगे आसमंतात सोडून करण्यात येणार आहे. दररोज रात्री ८:३० वाजता विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या महिलांचा नवदुर्गा पुरस्काराने सन्मान उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. या उत्सवामध्ये महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचे २८ सप्टेंबर रोजी दुपारी ३:०० वाजता भोंडला सोहळा आणि ३० सप्टेंबर - दुपारी ३:०० वाजता कुमारीका पूजन / कुंकुमार्चन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमांमध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे विनम्रपणे आव्हान महिला आघाडी जिल्हा संघटक सौ. लताताई पाटील व त्यांच्यासोबत असलेल्या महिला पदाधिकाऱ्यांनी केले आहे. या उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दररोज सायं. ७:३० ते रात्री १०:००  प्रसिद्ध तबलावादक व संगीतकार नैतिक नागदा यांच्या ऑर्केस्ट्राद्वारे दांडिया-गरबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. डोंबिवली शहरासह अनेक शहरांतील युवक-युवती मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी होण्यासाठी नवरात्र उत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. रास रंग २०२५ नवरात्र उत्सवासाठी येणाऱ्या मान्यवर मंडळी, दुर्गा भक्त व दांडिया प्रेमींच्या गाड्यांची पार्किंग व्यवस्था डीएनसी रोडवरील श्री स्नेहांकित मित्र मंडळाच्या कमानी शेजारील भूखंड, कलावती आईच्या मठासमोर या ठिकाणी करण्यात आलेली असून दुचाकी, चार चाकीने येणाऱ्यांनी इतर ठिकाणी पार्किंग करून रहदारीस अडथळा न करता या पार्किंग व्यवस्थेचा लाभ घ्यावा असे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार राजेश मोरे यांनी सांगितले.
डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजामध्ये राबविण्यात येणारे आरोग्य सेवा, शिक्षण, क्रीडा प्रोत्साहन, महिला सबलीकरण, सांस्कृतिक जतन आणि धार्मिक एकोपा यांचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचा विकास करून कायापालट घडवून आणणाऱ्या डॉ. शिंदे यांचे योगदान आणि जनतेवरील प्रेम या उत्सवाच्या माध्यमातून अधोरेखित होत आहे. या शारदीय नवरात्र उत्सवात जास्तीत जास्त दुर्गाभक्त, युवक-युवती, महिला आणि गरबा-प्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ, डोंबिवली यांच्यावतीने शनिवार दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी डीएनसी शाळेच्या मैदानावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे. यावेळी पत्रकार परिषदेसाठी शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख आणि कल्याण ग्रामीण विधानसभेचे आमदार माननीय राजेश मोरे, शिवसेना कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील, उपजिल्हाप्रमुख आणि जेष्ठ नगरसेवक रवी मट्या पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ, युवा सेना डोंबिवली शहर अध्यक्ष सागर जेधे, ज्येष्ठ नगरसेवक नितीन मट्या पाटील, ज्येष्ठ नगरसेवक राजन मराठे, ज्येष्ठ नगरसेवक रणजीत जोशी, माजी नगरसेवक संजय पावशे, माजी नगरसेविका सारीकाताई चव्हाण, जिल्हा संपर्कप्रमुख विवेक खामकर, शिवसेना कल्याण तालुका सचिव बंडू पाटील, कल्याण ओपन तालुकाप्रमुख आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक गजानन मोतीराम पाटील, युवा सेना जिल्हा सचिव राहुल म्हात्रे, शहर सचिव संतोष चव्हाण, शाखाप्रमुख अमित बनसोडे, व्यापारीं संघटनेचे गजानन व्यापारी, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक उज्वलाताई भोसले, महिला आघाडीच्या केतकीताई पोवार, माजी नगरसेवक तथा खासदार कार्यालयाचे प्रकाश शांताराम माने तसेच शिवसेना महिला आघाडी युवा सेनेचे अनेक मान्यवर महिला पुरुष पदाधिकारी कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'५८ व्या युवा महोत्सव' सांस्कृतिक कार्यक्रमात 'जे एम एफ' संचालित 'वंदे मातरम्' पदवी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रौप्य पदक पटकावत केले भव्य यश संपादन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: मुंबई विद्यापीठामध्ये आयोजित केलेल्या ५८ व्या युवा महोत्सवामध्ये १२ झोन मधील ३६० महाविद्यालय व त्यातून सुमारे ४५ महाविद्यालयांची अंतिम सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये सहभाग दर्शवला होता. डोंबिवली येथील 'जे एम एफ" शिक्षण संस्थेच्या वंदे मातरम् पदवी महाविद्यालयाने मराठी नाटक सादर करून ४५ महाविद्यालयांमधून 'रौप्य पदक' प्राप्त करून आपला दुसरा क्रमांक निश्चित केला.
मराठी गट नाटक 'अ' मधून दिवेश मोहिते, साई कुडतुडकर, यश बाडेकर, सानिका तांबोळी, दुर्वा घाडी, तन्वी गुरव या कलाकारांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने बाजी मारली तर संगीतकार आयुष सावंत व संस्कार कदम यांनी अवीट गोडीचे संगीत दिले. नाट्य दिग्दर्शक प्रथमेश देवकुळे यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले. सांस्कृतिक विभागाच्या संयोजक मिस मृणाली यांनी जातीने लक्ष घालून सांस्कृतिक विभागाची धुरा सांभाळली. सर्व विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या घवघवीत यशाचे अभिनंदन व कौतुक करताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी अभिमानास्पद कामगिरी केल्याबद्दल तुम्ही सर्वांनी वंदे मातरम् महाविद्यालयाचे नाव उज्वल केले तर मिळालेल्या यशाचे श्रेय हे कोणा एकाचे नसून सर्व त्यासाठी कार्यरत असणाऱ्या समुदायाचे असते, तुमच्या मधील दिसणारे प्रयत्न, एकी आणि जिद्द हेच खरे तर चकाकणारे 'रौप्य पदक' आहे असे सांगून सर्वांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मराठी नाटकाची अस्मिता जागरूक ठेवून दर्जेदार नाटक लिहून सर्वच  विद्यार्थी कलाकारांनी आणि दिग्दर्शकाने झोकून देऊन रौप्य पदक भूषविले व आपल्या सांस्कृतिक शहर डोंबिवली आणि 'वंदे मातरम्' पदवी महाविद्यालयचे नाव रोशन केले त्याबद्दल सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन.असे संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नाडर, उप प्राचार्या डॉ.वनिता लोखंडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्वानी या सर्वांचे अभिनंदन केले.

ठाणे गुन्हे शाखेने २८ वाहने हस्तगत करत वाहन चोरी प्रकरणाच्या २६ गुन्ह्यांचा छडा लावत प्रकरण केले उघडकीस..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे, दि.१२ - ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने मोठी कामगिरी करत सराईत वाहनचोरांच्या टोळीला जेरबंद केले असून त्यांच्या ताब्यातून तब्बल २८ वाहने (दुचाकी व चारचाकी) जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे ठाणे शहर, बृहनमुंबई, नवी मुंबई व ठाणे ग्रामीण हद्दीतील २६ गुन्ह्यांचा छडा लावत वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. जप्त वाहनांची एकूण किंमत १७ लाख ८९ हजार ८९९ रुपये इतकी आहे.

अटक केलेले आरोपी

गुन्हे शाखा, घटक-३ कल्याण व घटक-२ भिवंडी यांच्या पथकांनी संयुक्त कारवाई करत खालील आरोपींना जेरबंद केले आहे..
१) अतुल सुरेश खंडाळे (वय:२४ वर्षे, राहणार. हडपसर, पुणे)
२) शेखर गोवर्धन पवार (वय:३० वर्षे, राहणार. जळगाव)
३) आकाश मच्छिंद्र नसरगंध (वय:२३ वर्षे, राहणार. चक्की नाका, कल्याण पश्चिम)
४) गाझी लकीर हुसैन (वय:१९ वर्षे, राहणार. आंबिवली, कल्याण)
५) मुश्ताक इस्तीयाक अंसारी (वय:३१ वर्षे, राहणार. भिवंडी)

उघडकीस आलेले गुन्हे

अटक आरोपींकडून भिवंडी, कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, अंबरनाथ, वासिंद, तळोजा, नवी मुंबईसह मुंबईतील धारावी, कांदिवली, माहिम, नवघर पोलीस ठाण्यात दाखल असलेले २६ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. यामध्ये भादंवि कलम ३७९ व भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत दाखल गुन्ह्यांचा समावेश आहे.

वरिष्ठांचे मार्गदर्शन

ही कारवाई मा. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) ठाणे शहर, अमरसिंह जाधव, पोलीस उपायुक्त (गुन्हे) ठाणे शहर, व शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शोध-१) ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पथकाची कामगिरी

या तपास मोहिमेत वपोनि. जनार्दन सोनवणे (घटक-२, भिवंडी), वपोनि. अजित शिंदे (घटक-३, कल्याण) यांच्यासह सपोनि. श्रीराज माळी, मिथुन भोईर, सर्जेराव पाटील, बळवंत भराडे, तसेच अनेक पोलीस अधिकारी व अंमलदारांचा मोलाचा सहभाग होता. महिलांसह जवळपास ५० हून अधिक अंमलदारांच्या अथक प्रयत्नांमुळे ह्या मोठ्या चोरी प्रकरणांची मालिकाच उघडकीस आली आहे. ठाणे पोलीसांच्या या कारवाईमुळे वाहन चोरी प्रकरणाला दिलासा मिळाला असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये शिक्षणतज्ज्ञ शिक्षकांचा नामांकित "जे एम एफ शिक्षाविद पुरस्कार २०२५" पुरस्कृत सोहळा संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :  ५ सप्टेंबर हा दिवस म्हणजे हाडाचे शिक्षक आणि स्वतंत्र  भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती, त्यांच्या सन्मानार्थ सर्व भारतीय हा दिवस शिक्षक दीन म्हणून साजरा करतात. 
'जे एम एफ' संस्थेमध्ये देखील मोठ्या उत्साहात शिक्षक दीन पार पडला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून सुमारे  ३० मान्यवर शिक्षणतज्ज्ञ शिक्षकांना 'जे एम एफ  पुरस्कार २०२५' ने पुरस्कृत करण्यात आले. महाराष्ट्रातूनच नव्हे तर राजस्थान, गुजराथ, दिल्ली अशा अनेक ठिकाणाहून शिक्षाविद शिक्षकांची उपस्थिती प्रार्थनीय होती. 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार व दिग्दर्शिका जाह्नवी राजकुमार कोल्हे त्याच बरोबर मुख्य अतिथी श्री. एस.सत्यकुमार, (हेवी वॉटर बोर्डचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी) तसेच विशेष अतिथी पद्मश्री पुरस्कृत  श्री. गजानन जगन्नाथ माने, श्री. ए.के.सिन्हा, श्री. बी.एम.सिन्हा, डॉ. मोसेझ, श्री. युवराज कोल्हे, श्री. कोळेकर, डॉ. कुमार, श्री. परशुराम भांगे गुरुजी, सौ. पुष्पा भांगे व उपस्थित असलेले सर्व विभूषित शिक्षकगण तसेच इतर पदाधिकारी यांचे शाळेतील विद्यार्थ्यांनी शारीरिक प्रशिक्षक रमेश वागे, सौ. वैशाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लेझीम ढोलताशे वाजवून व नृत्य शिक्षक अभिषेक देसाई व सौ. कविता गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी  स्वागत नृत्य करून जल्लोषात स्वागत केले. सरस्वती पूजन व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये कार्यक्रमास सुरुवात झाली. संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांच्या हस्ते मान्यवरांना शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन पाहुण्याचे स्वागत करण्यात आले. शिक्षक दिनानिमित नाट्य शिक्षक श्री. प्रमोद पगारे यांच्या दिग्दर्शनाखाली मुलांनी लघुनाट्य सादर केले तर महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात अनेक मोठे शिक्षक होऊन गेले. 
यावेळी प्रसार माध्यमाचे मुख्य श्री. रोहित राजगुरु, अखिल नायडू, आकाश व त्यांच्या चमूने तयार केलेली विभूषित शिक्षकांची लघु चित्रफित दाखवण्यात आली तर 'जाह्मविज मल्टी फाऊंडेशन' चा २५ वर्षाचा प्रवासाचा माहितीपट देखील  दाखवण्यात आला. शिक्षक कसा असावा तर प्रेम आणि उद्वेग यांचा समतोल साधणारा असावा, शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या पाठीवर मारलेली कौतुकाची थाप ही विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि उत्साह वाढविणारी असते तर वेळप्रसंगी पाठीवर मारलेली तीच थाप ही वाईट वळणावरून चांगल्या मार्गावर नेणारी असते, असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले. शिक्षणाने माणूस मोठा होतो तर अनुभवाने माणूस शहाणा होतो, पृथ्वीतलावरील सर्वोच्च श्रेष्ठ पद व सन्मान कोणते असेल तर ते शिक्षक होण्याचे. आणि हे भाग्य सर्वांच्याच वाट्याला येत नाही. ज्ञान दानाचे कार्य करत असताना देखील विद्यार्थी दशेतली शिकण्याची दुर्दम्य इच्छा असणे म्हणजे शिक्षक. शिक्षकांचे ऋण हे कधीही न फिटणारे असते किंबहुना ते न फेडता त्या साठलेल्या व्याजावर मिळालेल्या ज्ञानाच्या  यशाचे मनोरे बांधावेत असे सांगून, आज अनेक उच्चशिक्षित, विभूषित शिक्षक मंडळींना "जे एम एफ शिक्षाविद २०२५"  पुरस्कार प्रदान करताना मला वाटते की एका शिक्षकाने दुसऱ्या शिक्षकाला दिलेला आशीर्वादच आहे. असेही ते म्हणाले.
ज्या प्रमाणे मातीला आकार देऊन कुंभार मडके बनवतो त्याच प्रमाणे  बालमनाच्या कोऱ्या पाटीवर  श्री गणेशा लिहून भविष्य घडवतो तो शिक्षक होय, शिक्षणाला मर्यादा नाहीत आणि शिकायला वय नाही आणि शेवटपर्यंत शिकणारा आणि शिकवणारा असतो तो म्हणजेच शिक्षक. असे सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले. 'जे एम एफ' शिक्षण संस्थेला यंदा २५ वर्ष पूर्ण होत आहेत त्या अनुषंगाने  रौप्य महोत्सव मानचिन्ह, 'जे एम एफ' शिक्षाविद पुरस्काराचे मानचिन्ह, प्रमाणपत्र व शाल प्रदान करण्याकरिता उपस्थित व निवडक ३० मान्यवर शिक्षकांना मंचावर बोलावून श्री. एस.सत्यकुमार अध्यक्ष, हेवी वॉटर बोर्ड, भारत सरकार, मुंबई, संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जाह्नवी कोल्हे, यांच्या हस्ते पूरस्कार देण्यात आले. तर संस्थेतील सर्व शिक्षकांना चांदीची गणपती व लक्ष्मी ची प्रतिमा देण्यात आली. पुरस्कार विजेत्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून संस्थेचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. एकनाथ चौधरी, सौ. श्रेया कुलकर्णी, श्री. योगेश शिरसाट, शर्वरी मॅडम यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्राचार्या ज्योती व्यंकटरामण यांनी केले. राष्ट्रगान गाऊन कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम 'ना भूतो ना भविष्यती' असा झाला.

चैन स्नॅचिंग सारख्या जबरी चोरी करणाऱ्या अंतरराज्य टोळीचा डोंबिवली पोलीसांनी केला परदाफाश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : दिनांक ०३/०९/२०२५ रोजी दुपारी ०४:३० वाजण्याच्या सुमारास चामुण्डा सोसायटी गेट जवळ, ९० फिट रोड, ठाकुर्ली डोंबिवली (पूर्व) येथुन वृध्द महिला पायी  चालत जात असताना मोटार सायकलवर दोन इसम येवून वृध्द महिलेच्या गळ्यातील चैन खेचुन पळून गेले. त्याबाबत डोंबिवली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ६८१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरील दाखल गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून मा. पोलीस उप आयुक्त साो. श्री. अतुल झेंडे, व सहा पोलीस आयुक्त  साो. श्री. सुहास हेमाडे यांनी केलेल्या सुचनांप्रमाणे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गणेश जावदवाड यांनी आरोपीचा छडा लावण्यासाठी व शोध घेणेकामी डोंबिवली पोलीस ठाण्याचे शोध पथकांतील सपोनि. मुपडे व पोउनि. चव्हाण यांच्या दोन टिम तयार करुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नमुद गुन्ह्याच्या तपासादरम्यान घटनास्थळाचे व इतर ठिकाणाचे एकूण १०६ सी.सी.टिव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली असता आरोपी याने गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल क्र. एमएच-२०/ एफआर-१८५१ ही असल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे मोटार सायकल मालकास संपर्क केला असता त्याने सांगितले की, सदर मोटार सायकल त्यांने दिनांक २२/०८/२०२५ रोजी नारायण पेठ, पुणे येथे पार्क केली असुन सदर ठिकाणाहुन ती चोरीस गेली  आहे त्याबाबत विश्रामबाग पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा नोंद आहे. यावरून समजले की, दाखल गुन्ह्यातील आरोपी यांनी सदर मोटार सायकल चोरी करून डोंबिवली येथे येवुन चैन स्नॅचिंग केली आहे. त्या अनुषंगाने सदर आरोपी यांचा गुन्हा केलेल्या ठिकाणाचा माग घेवुन त्यांच्या बाबत अधिक माहिती प्राप्त केली. तपासादरम्यान गुन्हे तपास पथकांनी अथक परिश्रम घेवून सदर आरोपी हे सुनिल नगर, डोंबिवली (पूर्व) येथे येणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांना माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी सापळा लावुन सदर संशयीत्त इसमांना ताब्यात घेतले. त्यांना त्यांचे नावे विचारता त्यांनी त्याची नावे १) अभय सुनील गुप्ता, (वय: २१ वर्षे), राहणार. कुमारनटोला, खुटार रोड, गोला गोकर्णनाथ, ठाणे. गोला गोकर्णनाथ, जिल्हा. लखीमपूर खिरी, उत्तर प्रदेश, २) अभिषेक ओमप्रकाश जौहरी, (वय: ३२ वर्षे), राहणार, खोली क्रमांक १४/१५, हरिहरगंज, ठाणे. कोतवाली, फतेहपूर, जिल्हा फतेहपूर, उत्तर प्रदेश, ३) अर्पीत उर्फ प्रशांत अवधेश शुक्ला, (वय: २७ वर्षे), राहणार, खमरीया, ठाणे, खेरी, जिल्हा. लखीमपुर खिरी, उत्तरप्रदेश, अशी असल्याचे सांगितले. त्यांची अंगझडती घेता अभय सुनिल गुप्ता, याच्याकडे १ गावठी रिव्हॉलव्हर व अभिषेक ओमप्रकाश जौहरी, याच्याकडे ०४ जिवंत काडतूसं सापडले. तसेच त्यांच्या अंगझडतीमध्ये सोन्याचे दागिने मिळून आल्याने त्याबाबत अधिक चौकशी करता सदरचा मुद्देमाल हा डोंबिवली व मानपाडा पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच सदरची मोटार सायकल ही चोरीची असल्याने त्याबाबत विश्रामबाग पोलीस ठाणे, पुणे, येथे गुन्हा दाखल असल्याची माहीती प्राप्त झाली आहे. आरोपी यांच्याकडे १ गावठी कट्टा व ०४ जिवंत काडतूसं मिळून आल्याने त्यांच्यावर डोंबिवली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ६८४/२०२५ आर्म ऍक्ट कलम ३(२५) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे वरील आरोपीकडून पुढील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
१) ३०,०००/- रू. किंमतीचा एक देशी बनावटीचा गावटी क‌ट्टा..
२) ८,००० /- रू. किंमतीची, गावठी बनावटीची ०४ जिवंत काडतुसे..
३) ३७,२६०/- रू. किंमतीची, एक सोन्याची लगड, ४१४ ग्रॅम वजनाची..
(डोंबिवली पोलीस ठाणे गुरनं. ६८१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६), ३ (५)
४) २,१५.०१०/- रू. किंमतीचे, एक सोन्याचे मंगळसुत्र, २३.८९ ग्रॅम..
(मानपाडा पोलीस ठाणे गुरनं. १०५५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३ (५)
५) ९०,०००/- रू. किंमतीची. यामाहा कंपनीची एफझेड मॉडेलची नंबर एमएच-२०/ एफआर-१८५१ (विश्रामबाग पो.स्टे, पुणे, गुरनं १९९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम. ३०३ (२) 

तरी सदर ३ इसमांकडे वरिल प्रमाणे असा एकूण ३,८०,४२० /- रुपयांचा मुद्देमाल मिळून आला असुन नमूद गुन्हे उघडकीस आले आहेत.

जिल्हा ठाणे
१) डोंबिवली पोलीस ठाणे गुरनं.  क्रमांक ६८१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम. ३०९ (६). ३(५) मधील एक सोन्याची लगड, ४१४ ग्रॅम वजनाची..
२) मानपाडा पोलीस ठाणे गुरनं १०५५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम. ३०९ (४), ३(५) मधील एक सोन्याचे मंगळसुत्र, २३.८९ ग्रॅम वजनाचे, मध्यभागी दोन वाटया असलेले, अर्धवट तुटलेले..

पुणे जिल्हा
३) विश्रामबाग पो.स्टे. पुणे, गुरनं १९९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम. ३०३ (२) मधील मॅट ब्लॅक रंगाची एक यामाहा कंपनीची एफझेड मॉडेलची मोटार सायकल क्र. एमएच-२०/एफआर-१८५१..
४) बिबेवाडी पोलीस ठाणे गुरनं. २१०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम. ३०९(४) ३(५)
५) हडपसर पोलीस ठाणे गुरनं. ३६१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम. ३०३(२)
६) हडपसर पोलीस ठाणे गुरनं.  ७६३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम. ३०४(२) ३(५)

उत्तर प्रदेश राज्य येथे अटक आरोपी अभिषेक ओमप्रकाश जौहरी याच्यावर दाखल असलेले गुन्हे..
१) हारगाव पोलीस ठाणे गुरनं. २६६/२०१९ शस्त्र अधिनियम कलम ३, २५ प्रमाणे..
२) हारगाव पोलीस ठाणे गुरनं. क्र. २६९/२०१९ भादंवि. कलम ४११, ४१४, ४२०, ४६७, ४६८ प्रमाणे..
३) हारगाव पोलीस ठाणे गुरनं. २६४/२०१९ भादंवि. कलम ३९, ४०२ प्रमाणे..
४) कोतवाली पोलीस ठाणे गुरनं. ५९६/२०१९ भादंवि. कलम ३९२, ४११ प्रमाणे..

तसेच आरोपी अर्पित ऊर्फ प्रशांत अवधेश शुक्ला याच्या विरुद्ध भादंवि. कलम ३०२ प्रमाणे उत्तरप्रदेश मध्ये गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.

वरील आरोपी यांची पोलीस कोठडी मंजूर असून त्याचा अधिक तपास पोउनि. प्रसाद चव्हाण करीत आहे.

सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे, मा. सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. संजय जाधव, (पूर्व प्रादेशिक विभाग) कल्याण, मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ-३ कल्याण श्री. अतुल झेंडे,  मा. सहा पोलीस आयुक्त श्री. सुहास हेमाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली  मा. वपोनि. श्री. गणेश जावदवाड, मा. पोनि. श्री. विक्रम गौड, मा. पोनि.(गुन्हे) श्री. राजेंद्र खेडकर डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि. अच्युत मुपडे, पोउनि. प्रसाद चव्हाण, पोहवा. सुनील भणगे, मंगेश शिर्के, प्रशांत सरनाईक, पोकॉ. शिवाजी राठोड, नितीन सांगळे, राजेंद्र सोनावणे, देविदास पोटे, ज्ञानेश्वर शिंदे यांनी यशस्वीरित्या केली आहे.