BREAKING NEWS
latest
Breaking News लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Breaking News लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

दिव्यात ‘जय जय रवळनाथ’ नाट्यप्रयोगाला चाकरमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

विशेष प्रतिनिधी

दिवा, दि. २ नोव्हेंबर : भारतीय जनता पार्टी दिवा- शीळ मंडळाच्या वतीने आयोजित ‘जय जय रवळनाथ’ या चालचित्रयुक्त नाट्यप्रयोगाचा भव्य कार्यक्रम शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. यासाठी दिव्यातील चाकरमान्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
हा चलचित्रीत दशावतार नाट्यप्रयोग दशावतार नाट्य मंडळ नेरुर कुडाळ या मंडळाने तर मंडळाचे संचालन सिध्देश सुधीर कलिंगण यांनी केले. या वर्षीच्या दिग्गज नावलौकीक उत्कृष्ट कलाकारांच्या दमदार संचासहित, महान पौराणिक भव्यदिव्य, संघर्षमय, चलचित्रीत नाट्य कलाकृती काल चाकरमान्यांसमोर सादर झाली. तसेच कार्यक्रमाचे समालोचन विवेक पोरजी आणि करुना ढेगे यांनी सादर केले. कार्यक्रमाआधी थोडासा पाऊस पडला असला तरी चाकरमान्यांच्या उत्साहात किंचितही फरक पडला नाही. एक वर्षांच्या बाळापासून ते ८० वर्षांच्या आजोबांपर्यंत सर्व वयोगटातील दिव्यातील नागरिकांनी उपस्थित राहून ‘जय जय रवळनाथ’ दशावतारी नाट्यप्रयोगाचा आनंद घेतला.
महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन, चित्रविचित्र किड्यावर मांत्रिक ध्यानस्त, चलचित्रीत मंदिराचा देखावा, बुरुजातून दिव्य शक्ती प्रगट, रुद्र तेजोमय त्रिशूळ रवळनाथाच्या हाती येणे, घोड्यावर बसून रवळनाथाचे आगमन, अचाट शक्तीची निमिर्ती, ज्योतीबा दर्शन आणि महाकाय रेडा संग्राम, त्रिशूळ तेजोमय होणे, त्रिसूळातून अधांतरी चितविचित्र पिशाच्छ निमिर्ती, त्रिशूळाच्या सहाय्याने रेड्याचे शीर मारणे, त्रिशूळाने मांत्रिकाचा संहार होणे हे सर्व नाट्य प्रयोग हलत्या चलचित्रातून चाकरमान्यांनी पाहिले. दिव्याच्या संस्कृतीत भर घालणारा हा नाट्यप्रयोग सर्वांच्या मनात घर करून गेला.
त्यावेळी कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड, ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदु परब, माजी जिल्हा अध्यक्ष संजय वाघुळे, ठाणे जिल्हा सरचिटणीस विक्रम भोईर, विजय भोईर, अशोक पाटिल, गणेश भगत, दिलीप भोईर, अंकुश मढवी, रोशन भगत, रेश्मा पवार, सीमा भगत, महिला मोर्चा अध्यक्षा सपना भगत, चेतन  पाटिल, समीर चव्हाण, सतीश केळशीकर, साहिल पाटिल, अशोक गुप्ता, गौरीशंकर पटवा, अवधराज राजभर, जिलाजीत तिवारी, पूनम सिंग, रीना सिंग, नीलम मिश्रा आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. या दशावतारी नाट्य प्रयोगासाठी विशेष मेहनत नितिश कोरगांवकर, रवी मुननकर, विठ्ठल गावडे, किरण कोरगांवकर, अनंत पडेलकर, स्वप्नील धुमाळ आणि अनिल गावकर यांनी घेतली होती.
कलाकार सिध्देश कलिंगण, काका कलिंगण, निळकंठ सावंत, रोहित नाईक, राधाकृष्ण नाईक, सुनील खोरजूवेकर, पप्पू घाडीगावकर, संजय लाड, परशुराम मोरजकर, तर लोकराजा ट्रीकसीन ग्रुप नेरुर कौस्तुभ कलिंगण, प्रतिक कलिंगण, संजय नेवगी, तुषार परब, रोहित नारकर, श्रीकृष्ण सावंत, प्रथमेश परब, सिध्देश तारवे, कुणाल पेंडुरकर, मयूर माने, मनीष नेरुरकर, तर संगित साथ हार्मोनिअम आशिष तवटे, मृदुंगमणी चंद्रकांत खोत, तालरक्षक राजू कलिंगण यांनी संगतील दिले आहे.

निवडणूक आयोगाविरोधात सर्वपक्षीय सत्याचा मोर्चा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई, दि. १ : सत्याचा मोर्चा हा मोर्चा एकट्या निवडणूक आयोगाच्याच विरोधात नाही तर जे लोक आयोग चालवतात त्यांच्या विरोधातही आहे. विधानसभेसाठी वापरण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहेत, या याद्या दुरुस्त करा व त्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात भव्य सर्वपक्षीय सत्याचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य नसीम खान, माजी मंत्री रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष ऍड. अभय छाजेड, आमदार भाई जगताप, वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, शेकापचे जयंत पाटील, भाकपचे प्रकाश रेड्डी, माकपचे डॉ. अजित नवले यांच्यासह सर्वपक्षीय नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मोर्चाला संबोधित करताना काँग्रेसचे ज्य़ेष्ठ नेते बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, देशातील निवडणुकीत मतचोरी झालेली आहे हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यासह उघड करून दाखवले पण केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यावर थातूर मातूर उत्तर दिले. निवडणूक आयोगाचे उत्तर हे इतिहासातील सर्वात बोगस उत्तर आहे. कोणतीही चौकशी न करता त्यांनी उत्तर दिले.

विधानसभा निवडणुकीत बोगस मतदारयाद्या वापरण्यात आल्या, त्यासंदर्भात काँग्रेस पक्ष व मविआतील सर्व घटक पक्षांनी निवडणूक आयोगाला विचारणा केली व या बोगस मतदार याद्या वापरू नका असे सांगितले पण विधान सभेच्या बोगस याद्यांवर व त्यांवर घेतलेल्या हरकरतीवर कोणताही निर्णय घेतला नाही आणि आता तीच बोगस यादी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी वापरली जात आहे. आम्ही सर्व विरोधी पक्ष त्या बोगस मतदार याद्यांच्या विरोधात आहोत आणि लोकशाही माननाऱ्यांनी त्याला विरोध करून मतदारयाद्या दुरुस्त करण्याचा आग्रह धरला आहे पण राज्य निवडणूक आयोग समाधान कारक उत्तर देऊ शकले नाही.

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, माझ्या संगमनेर मतदारसंघातील ग्रामीण भागात साडे नऊ हजार बोगस मतदार आहेत, आम्ही त्यावर हरकत घेऊन त्या दुरुस्त करण्यास सांगितले पण तहसीलदार म्हणतात, दुरुस्ती करण्याचा आम्हाला काहाही अधिकार नाही म्हणजे तीच बोगस मतदार यादी आता महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीला वापणार, म्हणून ती यादी दुरुस्त झाली पाहिजे हा आमचा आग्रह आहे पण निवडणूक आयोग ऐकूणच घेत नाही.

सत्ताधारी भाजपाने काढलेल्या मूक मोर्चावर टीका करत बाळासाहेब थोरात म्हणाले की, आपला सत्याचा मोर्चा निघत असताना सत्ताधाऱ्यांनी मूक मोर्चा काढला आहे. या मूक मोर्चात निवडणूक आयोगही सहभागी झाला आहे का ? अशी शंका येते.. ज्येठ नेते शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनीही मोर्चाला संबोधित करून भाजपा महायुती सरकार व निवडणूक आयोगावर सडकून टीका केली.

डोंबिवलीकरांचा 'रन फॉर युनिटी' एकता दौड ला एकतेचा संदेश देत उत्स्फूर्त प्रतिसाद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.३१ : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी डोंबिवली येथे ठाणे पोलीस कमिशनरेट यांच्या माध्यमातून "रन फॉर युनिटी" या एकता दौड चे आयोजन करण्यात आले. सकाळी ७ ते ८ या वेळेत पार पडलेल्या या कार्यक्रमांस डोंबिवलीकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
ठाणे पोलीस कमिशनरेट आयोजित 'एकता दौड' आप्पा दातार चौक येथून सुरू होऊन गणेश मंदिर संस्थान - नेहरू रोड - भाजी मार्केट - फडके रोड  - मदन ठाकरे चौक या मार्गे परत आप्पा दातार चौक येथे समाप्त झाली. कार्यक्रमादरम्यान डोंबिवली पोलीस ठाणे तर्फे नागरिकांसाठी शस्त्रास्त्र प्रदर्शन ठेवण्यात आले होते. उपस्थित नागरिकांनी या प्रदर्शनास विशेष उत्साहाने भरभरून प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमात रामनगर येथील सहाय्यक पोलीस आयुक्त (डोंबिवली विभाग) सुहास हेमाडे, डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जावदवाड, सोनी मराठी वरील क्राईम पॅट्रोल मधील प्रसिद्ध टीव्ही अभिनेता तथा निवेदक सतीश नायकोडी, डोंबिवलीतील प्रतिष्ठित नागरिक, पोलीस मित्र, शांतता कमिटी सदस्य, तसेच शाळा-कॉलेजमधील एनएसएस व एनसीसी विद्यार्थी आणि स्पोर्ट्स ऍकॅडमी चे विद्यार्थी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
सुमारे २५० ते ३०० नागरिक "रन फॉर युनिटी" या एकता दौड कार्यक्रमात सहभागी झाले होते. एकतेचा आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देत हा कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला. या प्रसंगी डोंबिवली पोलीसांकडून योग्य ती दक्षता घेऊन बंदोबस्त ठेवण्यात आला होता, अशी माहिती पोलीसांकडून प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आली.

महाराष्ट्र ऑप्थाल्मॉलॉजिस्ट सोसायटी (MOS) संघाच्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर यांचे कार्बाइड गन (Carbide Gun) वर तात्काळ बंदी घालण्याचे आवाहन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : 'अनिल आय हॉस्पिटल'च्या संचालिका आणि महाराष्ट्र ऑप्थाल्मॉलॉजिस्ट सोसायटी (MOS) च्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर यांनी कार्बाइड गन आणि स्फोटक फटाके यांचा वापर तात्काळ थांबवावा, असे आवाहन केले आहे. या कार्बाइड गनमुळे देशभरात अचानक नेत्र अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. AIOS (ऑल इंडिया ऑप्थाल्मोलॉजिकल सोसायटी) च्या अहवालानुसार भोपालमध्ये १५० हून अधिक मुले जखमी झाली आणि काहींनी दृष्टी गमावली. मध्य प्रदेश, चंदीगड आणि पुणे येथे सुद्धा अशाच घटना नोंदल्या गेल्या ज्यात बहुतेक लहान मुले बळी ठरली. कॅल्शियम कार्बाइड आणि पाण्याच्या मिश्रणातून तयार होणारी ही कार्बाइड गन धोकादायक गॅस उत्पन्न करते ज्यामुळे डोळ्यांना गंभीर इजा, दृष्टी गमावणे आणि चेहऱ्याचे विकृतीकरण होऊ शकते.



डॉ. अनघा हेरूर म्हणाल्या,“ही खेळणी नाहीत, ही तर रासायनिक स्फोटके आहेत जी काही क्षणांत डोळ्यांचे नुकसान करू शकतात. सण आनंदाचा असावा, दुःखाचा नव्हे. सरकारने यावर पूर्ण बंदी आणावी आणि विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.” MOS (महाराष्ट्र ऑप्थाल्मॉलॉजिस्ट सोसायटी) ने AIOS (ऑल इंडिया ऑप्थाल्मॉलॉजिस्ट सोसायटी)च्या लोकजागृती मोहीम, कायदेशीर कारवाई आणि रुग्णालयांच्या तयारीबाबतच्या आवाहनाला समर्थन दिले आहे. नुकतीच दिवाळी आणि छटपूजा सण संपून ख्रिसमस आणि नववर्ष हे सण जवळ आल्याने MOS कडून सर्वांना विशेषतः पालकांना, शाळा प्रशासन यांना अशा धोकादायक वस्तूंचा वापर टाळावा आणि मुलांना त्यापासून दूर ठेवावे “दिवाळी संपली असली तरी सणांचा मौसम अजून सुरू आहे. आता एका डोळ्याचे सुद्धा नुकसान होऊ देऊ नका. प्रकाशाचा सण अंधाराचा कारण होऊ नये.”
 असे आवाहन MOS संघटनेच्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर यांच्या कडून करण्यात आले आहे.
AIOS (ऑल इंडिया ऑप्थाल्मॉलॉजिस्ट सोसायटी)
आणि MOS (महाराष्ट्र ऑप्थाल्मॉलॉजिस्ट सोसायटी)
यांचे एकत्रित आवाहन केले आहे  कि कार्बाइड गनवर बंदी घाला, प्रत्येक डोळा आणि प्रत्येक मुलाचे संरक्षण करा.

पहिल्या ह्युमनॉईड रोबोट चे प्री-बुकिंग सुरू..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
  
कॅलिफोर्निया : 1X कंपनीने 'ह्युमनॉईड रोबोट निओ' या पहिल्या ह्युमनॉईड रोबोटचे प्री-बुकिंग सुरू केले आहे. कंपनीच्या अधिकृत साईटवर या रोबोटची प्री-बुकिंग सुरू झाली आहे, बुकिंगसाठी २०० डॉलर (सुमारे १७,६५६ रुपये) द्यावे लागतील, ज्यांना हा रोबोट प्रवेश हवा आहे त्यांना हा रोबोट २०,००० डॉलर (सुमारे १७ लाख  ६५ हजार ६४० रुपये) मध्ये मिळेल.

कॅलिफोर्नियास्थित एआय आणि रोबोटिक्स कंपनी 1X ने एक रोबोट तयार केला आहे जो माणसासारखा दिसतो, कंपनीने पहिल्या 'ह्युमनॉईड रोबोट निओ' चे प्री-बुकिंग सुरू केले आहे, हा ह्युमनॉईड रोबोट तुम्हाला साफसफाई, स्वयंपाक, भांडी धुणे आणि कपडे धुणे, दरवाजा उघडणे, सामान आणणे, लाईट चालू / बंद करणे यासारख्या सर्व दैनंदिन कामांमध्ये मदत करेल.

हा रोबोट अशा प्रकारे डिझाईन करण्यात आला आहे की तो लोकांचे शब्द समजू शकेल. २९.९४ किलो वजनाचा हा रोबोट ६९.८५  किलोपर्यंत वजन सहज उचलू शकतो. हा रोबोट आजच्या आधुनिक रेफ्रिजरेटरपेक्षा कमी आवाज (नॉईज लेव्हल २२ डिबी) करतो. रोबोटशी संवाद साधण्यासाठी यात ब्लूटूथ, वाय-फाय आणि 5G सपोर्टशिवाय श्रोणि आणि छाती जवळ ३ स्टेज स्पीकर आहेत.

देशात लवकरच सुरु होणार थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट सेवा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : एलॉन मस्क यांची कंपनी, स्टारलिंक, भारतात त्यांच्या सॅटेलाईट ब्रॉडबँड सेवा सुरू करत आहे. कंपनी ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी मुंबईत एक डेमो रन आयोजित करेल. सॅटेलाईट ब्रॉडबँड सेवेसाठी नियामक मंजुरी मिळविण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.

वृत्तसंस्था पीटीआयने वृत्त दिले आहे की या डेमोमध्ये तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलेल्या स्पेक्ट्रमचा वापर केला जाईल. पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसह कायदा अंमलबजावणी संस्था या ऑपरेशनवर बारकाईने लक्ष ठेवतील.

भारताचा सॅटेलाईट ब्रॉडबँड बाजार अजूनही नवोदित अवस्थेत आहे. जिओ आणि एअरटेल सारख्या कंपन्या देखील बाजारात प्रवेश करत आहेत, परंतु स्टारलिंकची तंत्रज्ञान जागतिक स्तरावर ओळखली जाते. भारतीय बाजारपेठेत स्टारलिंकच्या प्रवेशामुळे स्पर्धा वाढेल, किंमती कमी होतील आणि कनेक्टिव्हिटी सुधारेल.

स्टारलिंक हा एक स्पेसएक्स प्रकल्प आहे जो उपग्रहांद्वारे हाय-स्पीड इंटरनेट प्रदान करतो. त्याचे उपग्रह पृथ्वीच्या जवळून फिरतात, ज्यामुळे जलद आणि सुरळीत इंटरनेट प्रवेश सुनिश्चित होतो. हे विशेषतः ग्रामीण भाग किंवा पर्वतरांगासारख्या भागात फायदेशीर आहे जिथे नियमित इंटरनेट प्रवेश उपलब्ध नाही.

चालत्या स्थितीतच वायरलेस पद्धतीनं चार्ज होणार कार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
पॅरीस : फ्रान्समध्ये जगातील सर्वात मोठा असा अनोखा मोटर-वे तयार झाला असून, इथे इलेक्ट्रीक वाहनं आहे त्या वेगात चालत्या स्थितीतच वायरलेस पद्धतीनं चार्ज होणार आहेत. हा रस्ताच उर्जेचा स्त्रोत म्हणून काम करताना दिसतोय. फ्रान्समध्ये जगातील हा पहिलावहिला वाहनं चार्ज करणारा मोटर-वे सुरू झाला असून, यामध्ये डायनामिक वायरलेस चार्जिंग सिस्टम लावण्यात आलं आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीनं इलेक्र्टीक वाहनं आपोआप चार्ज होणार असून, आता कार किंवा ट्रकला चार्जिंग स्टेशन शोधत तिथं थांबण्याची गरज नाही.

पॅरिसपासून जवळपास ४० किमी अंतरावर दक्षिण पश्चिमेस असणाऱ्या ए१० मोटर-वे वर हा प्रयोग सुरू करण्यात आला असून, अनेक संस्थांनी मिळून 'Charge As You Drive' हा प्रकल्प पूर्णत्वास नेला. फ्रान्सचा हा ए१० मोटर-वे १.५  किलोमीटर लांबीचा असून, या रस्त्यामध्ये अनेक कॉईल बसवण्यात आल्या आहेत. याच कॉईलच्या माध्यमातून त्यावरून जाणारी इलेक्ट्रीक वाहनं आपोआपच त्यातून वाहणाऱ्या विजेच्या माध्यमातून चार्ज होतील. चाचणी दरम्यान हे तंत्रज्ञान यशस्वी ठरलं. यामध्ये ३०० किलोवॅटहून अधिक पीक पॉवर आणि सरासरी २००  किलोवॅट इतकी विद्युत संक्षेपण क्षमता दिसून आली.

ऊर्जा क्षेत्रात भारताची ऐतिहासिक कामगिरी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
नवी दिल्ली : भारताच्या ऊर्जा क्षेत्राने २०२५ मध्ये दोन ऐतिहासिक टप्पे पार करत स्वच्छ, सुरक्षित आणि आत्मनिर्भर ऊर्जा भविष्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण वाटचाल केली आहे. ३० सप्टेंबर २०२५ रोजी देशाची एकूण स्थापित ऊर्जा क्षमता ५०० गीगावॉटचा महत्त्वपूर्ण टप्पा पार करत ५००.८९ गीगावाटवर पोहोचली. ही कामगिरी दीर्घकालीन धोरणात्मक पाठबळ, गुंतवणूक आणि सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. या एकूण क्षमतेपैकी २५६.०९ गीगावॉट म्हणजेच ५१% पेक्षा अधिक क्षमता गैर-जीवाश्म इंधन स्रोतांमधून प्राप्त होते, ज्यामध्ये सौर, पवन, जलविद्युत आणि अणुऊर्जा यांचा समावेश आहे. उर्वरित २४४. ८० गीगावॉट क्षमता जीवाश्म इंधनावर आधारित आहे. सौर ऊर्जा १२७.३३ गीगावॉट आणि पवन ऊर्जा ५३.१२ गीगावॉट पर्यंत पोहोचली आहे, जी भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील प्रगती दर्शवते.

वित्तीय वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल ते सप्टेंबर) भारताने २८ गीगावॉट गैर-जीवाश्म क्षमता आणि ५.१ गीगावॉट जीवाश्म इंधन क्षमता निर्माण केली, यावरून स्वच्छ ऊर्जा क्षेत्र किती वेगाने विस्तारत आहे हे स्पष्ट होते. याच वर्षी २९ जुलै २०२५ हा दिवस भारतासाठी नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात मैलाचा दगड ठरला. त्या दिवशी देशाच्या एकूण २०३  गीगावॉट वीज मागणीतून ५१.५% वीज नवीकरणीय स्रोतांद्वारे पुरवली गेली. त्यात सौर ऊर्जा उत्पादन ४४.५५ गीगावॉट, पवन ऊर्जा २९. ८९  गीगावॉट आणि जलविद्युत उत्पादन ३०.२९ गीगावॉट इतके होते. याचा अर्थ असा की प्रथमच भारताने एका दिवसात अर्ध्याहून अधिक वीज हरित स्रोतांद्वारे निर्माण केली हे परिवर्तनाचे ऐतिहासिक संकेत आहे.

या प्रगतीमुळे भारताने COP26 मध्ये घेतलेल्या पंचामृत संकल्पांपैकी एक २०३० पर्यंत ५०% विद्युत क्षमता गैर-जीवाश्म स्रोतांद्वारे प्राप्त करणे हे लक्ष्य पाच वर्षे आधीच पूर्ण केले आहे. हे यश भारताच्या स्वच्छ ऊर्जा परिवर्तनातील नेतृत्व सिद्ध करते, जे स्थिर आणि विश्वासार्ह ग्रिड व्यवस्थापनासह साध्य झाले आहे. यामुळे उत्पादन, स्थापनेपासून ते देखभाल आणि नवकल्पनांपर्यंत अनेक रोजगार संधी निर्माण होत आहेत, ज्याचा लाभ ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांना मिळत आहे.

ऊर्जा मंत्रालय आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय (MNRE) यांनी सर्व वीज निर्मिती कंपन्या, ट्रान्समिशन युटिलिटीज, सिस्टम ऑपरेटर आणि राज्य संस्थांना त्यांच्या योगदानासाठी अभिनंदन दिले आहे. भारताचा ऊर्जा क्षेत्रातील हा टप्पा जागतिक स्तरावर स्वच्छ ऊर्जा नेतृत्वाचे प्रतीक ठरत आहे आणि भविष्यातील हरित भारताच्या दिशेने एक ठाम पाऊल आहे.

एमओएस (MOS) शिष्टमंडळाची डोळ्यांची सुरक्षा आणि बाल दृष्टी उपक्रमांवर चर्चा करण्यासाठी राज्यमंत्र्यांशी भेट..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : महाराष्ट्र ऑप्थॅल्मोलॉजिकल सोसायटी (MOS) च्या शिष्टमंडळात महाराष्ट्र ऑप्थॅल्मोलॉजिकल सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर आणि सचिव डॉ. प्रीती कामदार आणि लातूर लोकसभेचे खासदार डॉ. शिवाजी कलगे यांचा समावेश होता. त्यांनी काल संध्याकाळी माननीय आरोग्य मंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांची भेट घेतली.

बैठकीदरम्यान, शिष्टमंडळाने कार्बाइड गन फटाक्यांमुळे होणाऱ्या डोळ्यांना होणाऱ्या गंभीर दुखापतींमध्ये वाढ होत आहे, त्यामुळे मुलांवर होणाऱ्या विनाशकारी परिणामांवर भर देऊन, तातडीने उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित केली. पुढील अपघात टाळण्यासाठी आणि सार्वजनिक डोळ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी अशा फटाक्यांच्या वापरावर बंदी घालण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्र ऑप्थॅल्मोलॉजिकल सोसायटी (MOS) शिष्टमंडळाने आरोग्य मंत्री तसेच मा. शिक्षण मंत्री, श्री दादासाहेब भुसे, जेथे डॉ. अनघा हेरूर यांनी "बाल दृष्टी अभियान" साठी त्यांचे MOS व्हिजन सादर केले. या उपक्रमाचे उद्दिष्ट राज्यभरातील शालेय मुलांची वार्षिक दृष्टी तपासणी सुनिश्चित करणे आहे जेणेकरून अपवर्तक त्रुटी, मायोपिया, स्क्विंट, अँब्लियोपिया आणि इतर डोळ्यांच्या आजारांचे लवकर निदान आणि व्यवस्थापन सुलभ होईल.

हा कार्यक्रम टाळता येण्याजोग्या दृष्टीदोष रोखण्यासाठी आणि मुलांमध्ये डोळ्यांच्या आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. ही खरोखरच एक ताकदीची फलदायी आणि आशादायक बैठक होती, ज्यामुळे सर्वांसाठी चांगल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी महाराष्ट्र ऑप्थॅल्मोलॉजिकल सोसायटी (MOS) आणि राज्य सरकारमधील सहयोगी प्रयत्नांना बळकटी मिळाली.

ठाणे पोलीसांकडून राष्ट्रीय एकता दिवस निमित्त एकता दौडचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती निमित्त ठाणे शहरात दिनांक ३१/१०/२०२५ रोजी सकाळी ०७.०० वाजता एकता दौड (रन फॉर युनिटी) चे आयोजन करण्यात येणार आहे. या विशेष दिवशी देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता जपण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी तसेच राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी संपुर्ण देशभरात 'एकता दौड' आयोजित करण्यात आलेली आहे.

सदर एकता दौड मध्ये ठाण्यातील सर्व नागरिकांनी, ठाणे पोलीस व त्यांचे कुटुंबीय तसेच पत्रकार बंधु भगिनी यांनी सक्रीय सहभाग घ्यावा असे आवाहन ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडून करण्यात येत आहे. तरी इच्छुक नागरिकांनी सदर कार्यक्रमासाठी दिनांक ३१/१०/२०२५ रोजी सकाळी ६.४५ वाजे पर्यत छत्रपती शिवाजी महाराज चौक, तलावपाळी, ठाणे येथे उपस्थित रहावे.

"एकता दौड मार्गीका खालील प्रमाणे आहे."

छत्रपती शिवाजी महाराज मैदान तलावपाळी येथुन सुरू होवुन मुस चौक उजवी बाजु - साईकृपा हॉटेल, गडकरी रंगायतन सर्कल उजवी बाजु परफेक्ट ड्रायव्हिंग स्कुल सेंटजॉन हायस्कुल - चिंतामणी ज्वेलर्स चौक छत्रपती शिवाजी महाराज मैदान तलावपाळी येथे समाप्त होणार आहे.

कल्याण-डोंबिवलीत पोलीसांच्या ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीमेत ३५० हून अधिक समाजकंटकांवर कारवाई..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण: गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यात भुरट्या चोर्‍या, घरफोड्या, वाटमार्‍या, रात्रीच्या सुमारास सार्वजनिक चालणारे अवैध धंदे, दारू, तसेच अंमली पदार्थांची सेवनाचे अड्डे सुरू झाले होते. रेल्वे स्टेशन परिसरात चोरी-छुपे गैरधंद्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली २४३ अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी कल्याण-डोंबिवलीत पोलीस राज असल्याचे दाखवून दिले. रात्री आठ ते पहाटे चार वाजेपर्यंत पोलीसांच्या वेगवेगळ्या पथकांनी कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागात अचानक धरपकडीसह धाडसत्र मोहीम राबवून ३५३ बदमाशांवर कारवाई केली.

कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यात यापूर्वीही अशाच प्रकारची धरपकड मोहीम सलग दोन ते तीन महिने राबविण्यात आली होती. जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी दिवसाच नव्हे तर रात्रीच्या सुमारास चालणारे अवैध धंद्यांचे अड्डे शोधून उद्धवस्त केले होते. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, तसेच अंमली पदार्थांचे सेवन करणार्‍यांच्या विरोधात गुन्हे नोंदवून गुंडांना तुरूंगात धाडण्यात आले, तर अनेकांना कोर्टाच्या फेर्‍या मारण्यास भाग पाडण्यात आले. कल्याण-डोंबिवलीला नशामुक्त करण्याचा विडा उचललेल्या पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या या मोहिमेमुळे रहिवासी, व्यापारी, दुकानदार आणि व्यावसायिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

 कारवायांनी उसंत घेतल्याने बदमाश मंडळींनी पुन्हा डोके वर काढले होते. रात्रीच्या सुमारास गैरधंदे करणार्‍यांसह सार्वजनिक ठिकाणी अड्डे सुरू झाले असल्याची चाहूल लागताच उपायुक्त अतुल झेंडे यांनी कल्याण-डोंबिवलीतील आठही पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना शनिवारी रात्री अचानक संदेश देऊन धरपकड आणि धाडसत्र राबविण्याचे आदेश दिले. या मोहिमेत उपायुक्त अतुल झेंडे यांच्यासह कल्याण विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे आणि डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे सहभागी झाले होते. कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील इमारती, रेल्वे स्थानक परिसरातील वाहनतळांच्या आडोशाने लपलेले भुरटे चोर, मद्यपी आणि गर्दुल्ल्यांची धरपकड सुरू केली. विविध भागात झाडा-झुडपांचा आधार घेऊन मद्यपान आणि अंमली पदार्थांचे सेवन करण्यासाठी बसलेल्या समाजकंटकांच्या झुंडी पोलीसांनी ताब्यात घेतल्या. काहींनी पोलीसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तथापी अशांना पोलीसांनी पकडून त्यांची शहरात धिंड काढली. मद्यपान करून वाहने चालविणार्‍या चालकांकडून ४५ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत ६ खतरनाक गुंडांना कोठडीचा रस्ता दाखविण्यात आला. २७ तडीपार गुंडाची तपासणी केली.
जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई

 कल्याण-डोंबिवलीचे शहर आणि ग्रामीण भागात केलेल्या कारवाईसाठी १७ पोलिस निरीक्षक ४० सहाय्यक पोलिस निरीक्षक/पोलिस उपनिरीक्षक, २३६ पुरूष कर्मचारी आणि १८ महिला कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला होता. २७ तडीपार, दारू पिऊन वाहन चालवणारे ६, जुगार खेळणारे ३, घातक शस्त्र बाळगणारे ३, तर नाकाबंदी दरम्यान हाती लागलेल्या ४५ जणांकडून ४१ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. या पथकांनी २० लॉजिंग ऍण्ड बोर्डिंग, २० हॉटेल्स आणि १२ बार तपासले. त्यामुळे 'ऑपरेशन ऑल आऊट'ची ही जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई मानली जाते.

मोहीम यापुढेही सुरूच ठेवण्यात येणार

 कल्याण-डोंबिवली परिसरात अचानक पोलीसांकडून धरपकड आणि छापा मोहीम सुरू झाल्याने मोकळ्या मैदानांमध्ये ओल्या पार्ट्या झोडण्यासाठी बसलेल्या टोळक्यांची पळापळ झाली. धरपकड केलेल्या मद्यपींमध्ये सुस्थितीत घरातील काही जण हाती लागले. या सगळ्यांची कान पकडून उठाबशा काढल्या. त्यानंतर या सर्वांची ते राहत असलेल्या परिसरात वरात काढण्यात आली. शिवाय पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. रात्री आठ वाजल्यापासून सुरू केलेली ही धरपकड मोहीम पहाटे चार वाजेपर्यंत सुरू होती. ही मोहीम यापुढे सुरूच ठेवण्यात येणार आहे. ३५० हून अधिक गुंड, समाजकंटक, मद्यपी, गर्दुल्ले, गैरधंदे करणार्‍यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून न्यायालयामार्फत कारवाई केली जाणार आहे. कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागात शनिवारी रात्री ते पहाटेपर्यंत धरपकड आणि छापा मोहीम राबवून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे, शांततेचा भंग करणारे, परिसरात गैरधंदे करणार्‍यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. ही मोहीम यापुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

डोंबिवलीच्या डॉ. अनघा हेरूर यांची महाराष्ट्र नेत्रतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ आणि अनिल आय हॉस्पिटलच्या वैद्यकीय संचालक डॉ. अनघा हेरूर यांची नुकतीच महाराष्ट्र ऑप्थाल्मॉलॉजिस्ट सोसायटी (एमओएस) या भारतातील सर्वात मोठी नेत्रतज्ज्ञांची संघटनेच्या अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील नेत्ररोग क्षेत्राची नवी उंची गाठली जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
३५ वर्षांची अखंड रुग्णसेवा आणि नेतृत्व

डॉ. अनघा हेरूर या गेली ३५ वर्षे नेत्ररोग क्षेत्रात रुग्णसेवेत कार्यरत आहेत. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली 'अनिल आय हॉस्पिटल'ने डोंबिवली, ठाणे, कल्याण, पलावा आणि बदलापूर येथे सात सुपरस्पेशालिटी नेत्ररुग्णालयांचा विस्तार साधला असून, संस्था यावर्षी ५३ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण करत आहे.

त्यांनी आजवर लाखो रुग्णांना नेत्रारोग्य सेवा दिली असून मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिनाचे आजार, लेसिक शस्त्रक्रिया व इतर नेत्रशस्त्रक्रियांमध्ये त्यांना विशेष प्राविण्य आहे. त्यांच्या कुशल हातून असंख्य रुग्णांना पुन्हा स्पष्ट दृष्टी लाभली आहे.

पुरस्कार व गौरव!

नेत्ररोग क्षेत्रातील उत्कृष्टता, सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्व या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम डॉ. अनघा हेरूर यांच्या कार्यात दिसून येतो. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले आहेत.
🏅 प्रमुख पुरस्कार आणि सन्मान:

Bhishagvarya Award – The Best Doctor
Doctor of the Year Award – IMA
Ishwarchandra Award – MOSCON
Hargobind Mishra IIRSI Gold Medal – Gwalior
Albal Oration Award – Solapur, 2025
RJK Singh Community Ophthalmology Award
Tejaswini Award
Dombivli Bhushan Puraskar
Adarsh Dombivilikar Award
Navdurga Puraskar
Stree Sanman Puraskar (मार्च 2023)
Woman Ophthalmologist of the Year – Hyderabad, 2023
Business Leader Award
Role Model of the Year – Noida
Best Surgical Video Award – Rajasthan Ophthalmological Conference, 2018
Best Surgical Skills Award – Women’s Ophthalmological Society, 2018
Best Scientific Team Presentation – WOS, Bengaluru, 2019
Winner – Best Surgical Video (Challenging Cases) – ROSCON, 2019
Gold Medal – IBeach Film Festival

हे पुरस्कार केवळ त्यांच्या व्यावसायिक कौशल्याचे नव्हे, तर त्यांचा दृष्टीकोन, समर्पण आणि नेतृत्वगुणांचेही प्रतीक आहेत.

महिला सक्षमीकरण व समाजसेवा

डॉ. अनघा हेरूर यांना महिला सक्षमीकरण आणि सामाजिक उत्तरदायित्व यावर प्रगाढ विश्वास आहे. त्या अनेक आरोग्य जनजागृती उपक्रमांद्वारे समाजसेवेचे कार्य सातत्याने करत आहेत आणि अनेक महिला डॉक्टर्स व तरुणींसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत.

अध्यक्षा म्हणून दृष्टीकोन – “Unite, Illuminate, Innovate”

MOS च्या अध्यक्ष म्हणून डॉ. अनघा हेरूर यांनी या वर्षासाठी थीम जाहीर केली आहे —
“Unite, Illuminate, Innovate”*
त्यांचा दृष्टीकोन — *“One Vision, One Mission, One MOS.”

त्या महाराष्ट्रातील सर्व नेत्रतज्ज्ञांना एकत्र आणून अभ्यास, संशोधन, आणि उत्कृष्ट रुग्णसेवा यांचे केंद्र तयार करण्याचा संकल्प बाळगतात.

नवीन उपक्रम – रुग्ण व डॉक्टरांसाठी

अध्यक्षा म्हणून डॉ. अनघा हेरूर यांनी काही महत्त्वाचे सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम सुरू केले आहेत —

👁️🗨️ डायबेटिक आय अवेअरनेस वॉक – डोंबिवली
१६ नोव्हेंबर रोजी डोंबिवली येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठा 'डायबेटिक आय अवेअरनेस वॉक' आयोजित केला जात आहे.
या उपक्रमाचा उद्देश आहे — “डायबेटिसमुळे होणारे अंधत्व टाळूया.”

👶 Bright Eyes – बाल सृष्टी अभियान
राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणी आणि दृष्टिजागर कार्यक्रमाचे आयोजन.
“आपल्या पुढच्या पिढीची दृष्टी सुरक्षित ठेवूया.” हा यामागील हेतू आहे.

🎓 तरुण नेत्रतज्ज्ञांसाठी ऍकॅडमिक प्रोग्राम्स..
MOS च्या माध्यमातून तरुण डॉक्टर्ससाठी अत्याधुनिक शैक्षणिक आणि संशोधन संधी निर्माण केल्या जातील, ज्यामुळे महाराष्ट्रातील नेत्रवैद्यक क्षेत्र जागतिक दर्जावर पोहोचेल.

महाराष्ट्रात नेत्रसेवा उच्च दर्जावर

डॉ. अनघा हेरूर यांचे ध्येय आहे की राज्यातील प्रत्येक नागरिकाला आधुनिक, सुलभ आणि दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध व्हावी. त्यांच्या मते, “नेत्रसेवा ही केवळ वैद्यकीय जबाबदारी नाही, ती मानवी सेवेचे सर्वोच्च रूप आहे.”

अंतिम संदेश

“असेल दृष्टी, तर पाहू सृष्टी!”
या विश्वासाने प्रेरित होत,
डॉ. अनघा हेरूर MOS च्या माध्यमातून महाराष्ट्रात नेत्रस्वास्थ्याचे नवे युग सुरू करत आहेत. जिथे प्रत्येक नेत्रतज्ज्ञ एकत्र, प्रत्येक रुग्ण सुरक्षित, आणि प्रत्येक दृष्टी उजळलेली असेल.

लाचलूचपत विभागाने खडकपाडा पोलीस ठाण्यातील एपीआय व हवालदार यांना लाच घेताना रंगेहात पकडले..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : कल्याण पश्चिमेतील खडकपाडा पोलीस ठाण्यातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) आणि एका पोलीस हवालदाराला लाच घेताना लाचलूचपत विभागाने रंगेहात पकडण्यात आले आहे. ऐन दिवाळीत सणासुदीच्या दिवशी ही घटना उघड झाल्याने पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कुशल सापळा रचून ही कारवाई केली, या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक टी.जोशी आणि पोलीस हवालदार व्ही.काळे यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध पुढील चौकशी सुरू आहे. 

ज्याच्या हाती जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी आहे, तेच भ्रष्टाचारात अडकले, याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. "सर्वसामान्य माणसाने कोणाकडे न्याय मागायचा ?" असा सवाल सामान्य लोकातून विचारला जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे कल्याण परिमंडळ-३ च्या पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली असून, संपूर्ण परिसरात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे.

सफाई कर्मचाऱ्याने कचऱ्यामध्ये चुकून आलेला सोन्याचा हार महिलेला केला परत..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण :  एकीकडे सोन्याच्या किंमती गगनाला भिडलेल्या असून दिवसागणिक नवनविन उच्चांक गाठत असताना दुसरीकडे कचऱ्याच्या पिशवीमध्ये कचऱ्यासोबत चुकून सोन्याचा हारही टाकून दिल्याचा प्रकार कल्याण पूर्वेत समोर आला आहे. मात्र सफाई कर्मचाऱ्याने या सोन्याच्या महागड्या हाराबाबत कोणताही मोह न ठेवता संबंधित महिलेला हा हार परत मिळवून दिला आहे. केडीएमसी आणि सुमित कंपनीच्या सफाई कामगारांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाचे सर्वच स्तरांतून मोठे कौतुक होत आहे. 

केडीएमसीच्या सुमित कंपनीच्या सफाई कर्मचाऱ्याकडून नेहमीप्रमाणे आज सकाळीही कल्याण पूर्वेच्या विविध भागातून कचरा संकलनाचे काम सुरू होते. कल्याण पूर्वेतील इमारती आणि चाळीच्या परिसरातून गोळा झालेला हा सर्व कचरा कचोरे टेकडीवरील इंटरकटींग केंद्रावर पाठवण्यात येत होता. त्याचदरम्यान सकाळी कचरा घेण्यासाठी आलेल्या सफाई कर्मचाऱ्याला कचरा देताना त्यामध्ये नजरचुकीने एका महिलेकडून सोन्याचा हारही टाकला गेल्याची तक्रार सुमित कंपनीचे '४-जे' प्रभागाचे अधिकारी समीर खाडे यांना केडीएमसीचे स्वच्छता निरीक्षक अमित भालेराव यांच्याकडून प्राप्त झाली. त्यावरून ही तक्रार आलेल्या ठिकाणी कचरा संकलन करण्यासाठी गेलेल्या संबंधित सफाई कर्मचाऱ्यांना समीर खाडे यांनी या सोन्याच्या हाराबाबत माहिती दिली. आणि त्यांनी लगेचच कचरा संकलन केलेली ही गाडी कचोरे टेकडीवरील इंटरकटींग केंद्रावर नेण्याच्या सूचना गाडीचालकाला केली. 

तसेच हार गहाळ झालेल्या महिलेलाही या इंटरकटिंग पॉइंटवर बोलवण्यात आले. त्यावेळी या गाडीमध्ये गोळा करण्यात आलेला कचरा संबंधित महिला आणि तिच्या कुटुंबीयांसह शेजाऱ्यांच्या आणि सुमित कंपनीच्या अधिकाऱ्यांसमक्ष वेगळा करण्यात आला आणि त्यामध्ये या महिलेकडून चुकून आलेल्या सोन्याच्या हाराचा यशस्वीपणे शोध घेऊन तो हार पुन्हा त्या महिलेच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती सुमित कंपनीच्या समीर खाडे यांनी दिली. 

केडीएमसीच्या सुमित कंपनीच्या सफाई कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाचे या महिलेसह सर्वांकडूनच कौतुक केले जात आहे.  तर आपला महागडा सोन्याचा हार सुखरूप परत मिळाल्याबद्दल या महिलेच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नव्हता.

वयाच्या ८४ व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते असरानी काळाच्या पडद्याआड..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई दि.२० : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते असरानी यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांनी आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. दीर्घकाळापासून फुफ्फुसांच्या आजाराने त्रस्त असलेल्या असरानींवर गेल्या पाच दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. असरानींच्या निधनाची बातमी समोर येताच संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. दीपावलीच्या आनंदाच्या दिवशी ही दुःखद बातमी समोर आली आहे. याबाबत माहिती देताना त्यांचे मॅनेजर बाबुभाई यांनी सांगितलं की, "दीर्घकाळापासून फुफ्फुसांच्या आजाराने ते त्रस्त होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. यातच आज त्यांचं निधन झालं."

असरानी यांनी त्यांच्या कारकिर्दीत शेकडो चित्रपटांमध्ये काम केलं. १ जानेवारी १९४१ रोजी जयपूर येथे जन्मलेल्या असरानी यांनी जयपूरमधील सेंट झेवियर्स स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आणि नंतर राजस्थान कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. १९६७ मध्ये 'हरे कांच की चुडियां' या चित्रपटातून असरानी यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. असरानींच्या सर्वात संस्मरणीय भूमिकांपैकी, 'शोले' चित्रपटातील जेलरची भूमिका अत्यंत महत्त्वाची स्मरणात राहणारी आहे. या चित्रपटातील त्यांचा संवाद, "हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं.”, खूप गाजलं वं प्रसिद्ध झालं आणि अनेक दशकांनंतरही लोक अजूनही त्या संवादाने असरानींना ओळखतात. 'कोशिश' (१९७३), 'बावर्ची' (१९७२), 'चुपके चुपके' (१९७५), 'छोटी सी बात' (१९७५), आणि 'शोले' (१९७५) हे त्यांचे अविस्मरणीय असे चित्रपट आहेत.

गुटक्याची बेकायदेशीर वाहतुक करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखा, घटक-३, कल्याणच्या पोलीसांना यश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: गुजरात राज्यातुन आयशर टेम्पोमधुन महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीरित्या वाहतुक करून विक्री केली जात असल्याबाबत गुन्हे शाखा, घटक-३, कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशिर बातमीच्या आधारे गुन्हे शाखा, घटक-३, कल्याणचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांच्या पथकाने दिनांक १७/१०/२०२५ रोजी ०५:३० वाजता गांधारी ब्रिज चौक, कल्याण पश्चिम, जि. ठाणे या ठिकाणी सापळा रचला असता आरोपी नामे धनराज रामगोपाल स्वामी, राहणार: वार्ड नंबर १३ मु.पो. लालासी ता. लक्ष्मणगढ, जि. शिकर, राज्य: राजस्थान हा त्याच्या ताब्यातील आयशर टेम्पोमधुन प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाची बेकायदेशीर वाहतुक करताना मिळुन आला व त्याच्याकडुन एकुन ८७,३७,४७२/- रू. किंमतीचा अवैध गुटखा, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ व टेम्पो हस्तगत करण्यात गुन्हे शाखा घटक-३च्या पोलीस पथकास यश आले आहे.
सदर बाबत आरोपी नामे धनराज रामगोपाल स्वामी याचे व चौकशीत निष्पन्न पाहिजे आरोपी यांच्या विरोधात खडकपाडा पो.स्टे. गु.र.नं. ७३८/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ मधील कलम २६ (२)) (1), कलम २७(१) सह वाचन ३(१) (ZZ) (IV), शिक्षा कलम ५९(३) तसेच २६ (२) (IV), २७ (३) (d),२७ (३) (e) सह वाचन कलम ३०(२), (a), व मा. अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांची अधिसुचना क्रमांक अ.सु.मा.अ./अधिसुचना-४११/२०२५/०७, दि. १६/०७/२०२५ ची अवज्ञा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा तपास मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विनोद पाटील, पोलीस उप निरीक्षक नेम गुन्हे शाखा, युनिट-३, कल्याण हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. श्री. आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, मा. श्री. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर, मा. श्री. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर व मा. श्री. शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध-१) गुन्हे शाखा, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजित शिंदे, सहा.पो निरी. सर्जेराव पाटील, पोउपनिरी विनोद पाटील, किरण भिसे, सपोउपनिरी दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, पोहवा बोरकर, सुधीर कदम, विजय जिरे, प्रशांत वानखेडे, सचिन भालेराव, गोरक्षनाथ पोटे, विलास कडु, आदिक जाधव, पांडुरंग भांगरे, उल्हास खंदारे, सचिन कदम, पोना प्रविण किनरे, दिपक महाजन, पोशि मिथुन राठोड, सतिश सोनवणे, गुरूनाथ जरग, विनोद चन्ने, गणेश हरणे, गोरक्ष शेकडे, सर्व नेम गुन्हे शाखा, घटक-३, कल्याण यांनी केलेली आहे.

समृद्धी महामार्ग भिवंडीतून थेट ठाण्यात जोडत विनाअडथळा मुंबईत प्रवेश करता येणार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरून ठाण्यात आणि पुढे मुंबईत थेट प्रवेश  करता येणार आहे. या मार्गामुळे वाहतूक कोंडीतून प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. या मार्गामुळे दक्षिण मुंबईत पोहोचणं सोपं होणार आहे.

मुंबई आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावरुन ठाण्यात येण्यासाठी मोठी वाहतूक कोंडी असते. मात्र आता या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे. मुंबई आणि ठाण्यातून प्रवास करणाऱ्या रहिवाशांना आता लवकरच हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई - नागपूर या समृद्धी महामार्गाशी थेट जोडता येणार आहे.

(भिवंडी) आमने ते (ठाणे) साकेत दरम्यान उन्नत मार्ग आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीए  ने (भिवंडी) आमने ते (ठाणे) साकेत दरम्यान २९.३ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग, एलिवेटेड ब्रिज उभारण्याची योजना आखली आहे. या उन्नत मार्गासाठी ६ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. भिवंडी येथील आमने ते ठाणे येथील साकेत या दरम्यान उभारण्यात येणाऱ्या पुलामुळे समृद्धी महामार्गावरुन प्रवाशांना विनाअडथळा थेट मुंबईत प्रवेश करता येणार आहे. नव्या आमने ते साकेत या मार्गामुळे वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होईल.

ठाणे ते मुंबई प्रवास होणार सुखकर

सध्या भिवंडीतून आमने ते ठाणे या प्रवासाला वाहतूक कोंडीमुळे जवळपास दीड ते दोन तास लागतात. तसंच ठाण्यातून मुंबईच्या दिशेने जातानाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर एमएमआरडीए 'इस्टर्न फ्री वे' चा विस्तार करणार आहे. घाटकोपर येथील छेडानगर ते आनंदनगर दरम्यान हा फ्री वेचा विस्तार केला जाणार आहे. या मार्गाचं कामही सुरू करण्यात आलं आहे. छेडानगर ते आनंदनगर हा मार्ग १२.९५५ किलोमीटर लांबीचा असेल. तसंच या मार्गावर सहा लेन असतील. या कामासाठी २६८३ कोटी खर्च अपेक्षित आहे. तसंच आनंदनगर ते साकेत (ठाणे) या मार्गावरही उन्नत मार्गाचं काम सुरू आहे. हा मार्ग ८.२४ किलोमीटर लांबीचा असून यासाठी १८७४ कोटी खर्च येईल. एखादा महामार्ग जेव्हा बनतो तेव्हा विकासाची दालनं खुली करतो त्यामुळे दक्षिण मुंबईत पोहोचणं सोपं होणार आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर समृद्धी महामार्गावरुन विनाअडथळा मुंबईत जाता येईल. भिवंडी-आमने ते ठाणे-साकेत, साकेत ते आनंदनगर आणि आनंदनगर - छेडानगर-घाटकोपर आणि पुढे सध्याच्या 'इस्टर्न फ्री वे' ने दक्षिण मुंबईत पोहोचणं अतिशय सुलभ होईल.

मुंबई - सोलापूर विमान प्रवासाला हिरवा कंदील..

प्रतिनिधी : अवधुत सावंत

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर येथे 'मुंबई-सोलापूर विमान सेवे'चा शुभारंभ संपन्न झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस सोलापूरकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, गेल्या अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आणि अडथळ्यांवर मात करत आज विमानसेवेचा शुभारंभ झाला आहे. शहराचा विकास आणि रोजगारासाठी तसेच नवीन उद्योगांसाठी, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हवाई सेवा. आज मोठ्या प्रमाणावर निर्यात सुरू आहे आणि आपण जागतिक बाजारपेठेशी जोडले जात आहोत, अशा परिस्थितीत विकास साधायचा तर कार्यक्षम (functional) विमानतळ आणि चांगली हवाई जोडणी असणे अत्यावश्यक आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितले.
सोलापूर हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा, या जिल्ह्याच्या जवळपासच्या परिसरात अनेक तीर्थक्षेत्रे आहेत, पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, सोलापूरला सिद्धरामेश्वर, तुळजापूरला आई तुळजाभवानी, अशा पवित्र स्थळांना जोडणाऱ्या भागात हवाई सेवा अत्यावश्यक म्हणून हे विमानतळ सुरू करण्याचा निर्धार आम्ही केला, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात हवाई सेवांचे महत्त्व ओळखून 'उडान योज़ना (RCS)' सुरू केली. सोलापूरसाठी आम्ही 'वायबिलिटी गॅप फंड' तयार केला. मुंबईशी हवाई जोडणी ही सर्वात महत्त्वाची होती, कारण मुंबईला जोडले की संपूर्ण जगाशी जोडले जातो. आज सोलापूरहून प्रत्यक्ष विमानसेवा सुरू झाली आहे. काही वेळातच मुंबईहून विमान सिद्धरामेश्वराच्या नगरीत उतरणार आहे. या पहिल्या उड्डाणाचा साक्षीदार होण्याचा मला अतिशय आनंद आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

याआधी सोलापूरला आयटी पार्क उभारण्याची घोषणा केली होती, मात्र त्यासाठी 'फंक्शनल विमानसेवा' अत्यावश्यक आहे, आता विमानसेवा सुरू झाल्याने आयटी पार्क सोलापूरमध्ये उभारणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री प्रताप सरनाईक, 'स्टार एअर'चे संजय घोडावत व इतर मान्यवर उपस्थित होते.

डोंबिवली सेवाकेंद्र के 'स्वर्ण जयंती उत्सव' निमित्त, VIP प्रोग्राम (दुआओं का सफर, दिल से दिल तक) संपन्न..


प्रतिनिधी: अवधुत सावंत 

डोंबिवली :   ओम शांति 🙏ब्रह्माकुमारीज डोंबिवली शाखा, (घाटकोपर सब-झोन) की ओर से डोम्बिवली सेवाकेंद्र के ५० वर्ष पुरे होने के "स्वर्ण जयंती उत्सव" के उपलक्ष्य में, आदरणीय शकु दीदीजी (निर्देशिका – घाटकोपर उपक्षेत्र, प्रभारी – डोंबिवली सेवाकेंद्र) के मार्गदर्शन एवं प्रेरणा से, "दुआओं का सफर, दिल से दिल तक” (A Blessed journey from Heart to Heart) इस विषय पर विशेष VIP कार्यक्रम का आयोजन किया गया। 

यह कार्यक्रम डोम्बिवली पूर्व के पाटीदार भवन सभागृह में रविवार, १२ अक्टूबर २०२५ को १०.३० बजे संपन्न हुआ।
आए हुए मेहमानों का गोल्डन बैच एवं फोल्डर देकर स्वागत किया गया। कार्यक्रम की शुरुवात परमात्मा की याद से हुई। तत्पश्चात, पवित्र भट ग्रुप डांस अकादमी द्वारा सुन्दर नृत्य प्रस्तृत किया गया ।

आदरणीय ब्रह्माकुमारी राजयोगिनी शकू दीदी जी ने प्रेरणादाई विचार व्यक्त करते हुए कैसे इस डोम्बिवली सेवाकेंद्र की स्थापना १९७५ में २५ दिसंबर को आदरणीय परम श्रद्धेय डॉक्टर नलिनी दीदी के द्वारा हुई, और उसी समय एक आध्यात्मिक प्रदर्शनी का आयोजन किया गया था । उस प्रदर्शनी में आया हुए नगराध्यक्ष भ्राता पटवारीजी ने कहा था मुझे इस डोम्बिवली नगरी को देव नगरी बनाना है, उसी तरह परमात्मा सिर्फ डोम्बिवली नहीं परतु पुरे विश्व को देव नगरी बनाने आये है । साथ ही उन्होंने कहा की हमे अपने अंदर के रावण को पूरी तरह से ख़त्म करना होगा उसीसे हमारे जीवन में परिवर्तन आएगा और सुख शांति की प्राप्ति होगी ।
साथ ही सभी को माउंट आबू, घाटकोपर योग भवन तथा डोम्बिवली सेवाकेंद्र पर आने का हार्दिक निमंत्रण दिया।

तत्पश्चात, आदरणीय निकुंज भाई जी (स्तंभकार एवं मीडिया विंग के राष्ट्रीय समन्वयक) ने अपने बोल रखे, उन्होंने अपने वक्तव्य में VIP का एक अलग ही अर्थ बताया उन्होंने कहा  VIP मतलब वेरी इनोसेंट पर्सन ।
तत्पश्चात, आदरणीय रविंद्र जी ने (अध्यक्ष-भाजपा, प्रदेशाध्यक्ष-महाराष्ट्र प्रदेश) डोम्बिवली सेवाकेंद्र के ५० वर्ष होने के निमित्त शुभ कामनाये दी, और कैसे वे इस ब्रह्माकुमारीज़ संस्था से पिछले कई वर्ष से जुड़े हुए है वो अनुभव साँझा किया ।
कार्यक्रम में आगे आदरणीय शकू दीदीजी, आदरणीय निकुंज भाई जी का और मुख्य अतिथियोंको मोमेंटो देकर सन्मान किया गया ल

निम्नलिखित अतिथि उपस्थित रहे:

1. Bro. Ravindra Chavanji (President of BJP and Pradeshadhyaksh, Maharashtra)
2. Bro. Rajesh More (MLA from Kalyan Rural Assembly constituency in Thane district)
3. Sis. Alka Mutalik Ji (President of Shree Ganesh Mandir Sansthan, Dombivli east) 
4. Bro. Dr. Rajkumar Kolhe Ji (Founder President of Jahnvis Multi Foundation's Vande Mataram Degree College, Dombivli west)
5. Bro Ashok Chandravarkar Ji & Mangala Chandravarkar Ji (Director FDC Ltd)
6. Karnataka Sangha'S Manjunatha College Of Commerce (On Behalf Of Chairaman Bro. Dr.Divakar Shetty, Trustee Devidas Kulal Sir, Urmani Sir,Taranath Sir, Principal Sushila Madam, Mrs Veena Subhash Palan)
7. Bro. Amit Mhatre (Secretary Youth Congress,Dombivli)
8. Sis. Dr. Tara Naik (Md and Gynaecologist, owner of Ashwini Maternity, Nursing Home)
9. Bro. Mr. Bhola Patil (Secretery Obc Dept)
10. Bro Niranjan Kadam (Trustee- Mumbreshwar Temple)
11. Bro. Yogesh Patil (Priest- Mumbra devi Temple) 
12. Bro. Mohan Bhagat (Trustee-Mumbreshwer Temple)
13. Bro.Mr. Shantilal Jain (Prop. M/S Darshan Marbal)
14. Bro. Manoj Kantak Ji (President, Toshvin Analytical Pvt Ltd)
15. Bro. Mahendra Patil (Vice President – Kalyan Jilha OBC Morcha – BJP Mr. Nitin patil (corporator)
16. Bro. Ravi Patil, and Mrs. Jyoti Marathe (corporator)
17. Bro. Dr Milind shirodkar (Director and Chief general surgeon at Aims hospital, Dombivli east)

कार्यक्रम को आगे बढ़ाते हुए RJ दिलीप भाई ने आदरणीय शकू दीदीजी तथा आदरणीय निकुंज भाई जी से कुछ सामान्य सवाल जवाब किये । आदरणीय विष्णु बहन जी ने सभी को मेडिटेशन कराया, सभी ने शांति और शक्ति की अनुभूति की ।
कार्यक्रम के अंत में सभीने आ. नलिनी दीदीजी को पुष्पांजलि अर्पित करते हुए सौगात और टोली स्वीकार की और ब्रह्मभोजन के लिए प्रस्थान हुए ।
इस तरह VIP कार्यक्रम उमंग उत्साह के साथ संपन्न हुआ ।
 
Photo and link:
<https://photos.app.goo.gl/nGHZH8AWQLTAREfv6>

<https://drive.google.com/drive/folders/1NYWecg-2TQCBjfX981CVDSS1TzYArAWo?usp=sharing>  

ओम शांति
राजयोगिनी ब्रह्माकुमारी शकु दीदीजी
निर्देशिका – घाटकोपर उपक्षेत्र, प्रभारी – डोंबिवली सेवाकेंद्र

६० दिवसांचे पैसे भरुन करा ९० दिवस प्रवास..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता राज्यातील ई-बस प्रवाशांना मासिक व त्रैमासिक पास सवलत योजना उपलब्ध होणार आहे. उच्च सेवा वर्गाचा पास असलेले प्रवासी निमआराम किंवा साध्या बसमधून प्रवास करु शकतील. मात्र निमआराम किंवा साध्या बसचा पासधारक ई-बसने प्रवास करत असल्यास दोन्ही सेवांतील भाड्याचा फरक १०० टक्के दराने भरावा लागणार आहे.

काय आहे योजना ?
या योजनेंतर्गंत प्रवाशांना ६० दिवसांचे भाडे भरून ९० दिवस प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे.

कोणत्या बससाठी पास उपलब्धः ९ मीटर ई-बस, १२ मीटर ई बस आणि ई शिवाई सेवा (ई-शिवनेरीवगळून)

मासिक पास (३० दिवस): २० दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारुन ३० दिवस वैध

त्रैमासिक पास (९० दिवस): ६० दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारुन ९० दिवस वैध

एसटी महामंडळाने घेतलेल्या पास योजनांचा मुख्य उद्देश नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने दररोज एकाच मार्गावर प्रवास करणाऱ्या नियमित प्रवाशांना ई-बस सेवेकडे आकर्षित करणे हा आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सध्या महामंडळाच्या ताफ्यात ई-बस प्रकल्पातील ४४८ बसेस आणि शिवाई प्रकल्पातील ५० ई-बसेस कार्यरत आहेत. या बसेसची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्याचा मानस असल्याचे सरनाईक म्हणाले.