BREAKING NEWS
latest

देश-विदेश

featured/block-3

महाराष्ट्र

featured/block-3

ठाणे

featured/block-1

नवी मुंबई

featured/block-3

वसई विरार

featured/block-6

पालघर

featured/block-3

कल्याण-डोंबिवली

featured/block-2

उल्हासनगर-अम्बरनाथ-बदलापुर

featured/block-3

अन्य जिले

featured/block-4

Latest Articles

जिल्हा परिषद निवडणुकीतही पुन्हा देवेंद्र - रविंद्र यांचं वर्चस्व..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई दि.०९ : राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सर्वाधिक जागा पटकाविण्यात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपाने महायुतीतील सहकारी पक्षांपेक्षा आणि महाराष्ट्र विकस आघाडी पक्षांपेक्षा अधिक जागा जिंकून राज्यातील जनतेचा कौल आपल्यालाच आहे हे परत सिद्ध केले. या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हीच राजकारणातील आजची जोडी नं. १ असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि रविंद्र चव्हाण यांच्या नियोजनाच्या बळावर भारतीय जनता पक्षाने राज्यात सर्वाधिक जागा मिळविण्याची अनोखी हॅटट्रिक प्राप्त केली आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या नगर परिषद निवडणूका, त्यानंतर जानेवारीत झालेल्या महानगरपालिका निवडणुका आणि या फेब्रुवारी महिन्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत देवेंद्र आणि रविंद्र या राजकीय पॉवरफुल जोडीने अचूक निवडणूक नियोजन, प्रभावी प्रचार यंत्रणा पद्धती, स्थानिक पातळीवरील पक्षासोबत राज्य पातळीवरील पक्षाचा थेट संवाद आणि समन्वय अशा विविध माध्यमातून भाजपाला उच्च दर्जाची सक्षम पक्ष यंत्रणा उभारली. त्यामुळे स्थानिक नेतृत्वाला शीर्षस्थ नेतृत्वाचा वरदहस्त लाभला आणि धाकही जाणवला. याचा सकारात्मक परिणाम होऊन पक्षाने अनेक ठिकाणी अत्यंत आश्चर्यकारक आणि धक्कादायक विजय नोंदवले. या यशाचे मुख्य शिल्पकार देवेंद्र फडणवीस तर सूत्रधार रविंद्र चव्हाण हे आहेत हे निर्विवादपणे म्हणावे लागेल.

रविंद्र चव्हाण यांना निवडणूक सिद्ध नेता म्हणून ओळखले जाते. ते जमिनीवर वावरणारे आणि कार्यकर्त्यात रमणारे प्रदेशाध्यक्ष आहेत. निवडणुकीत अत्यावश्यक असणारे साम, दाम, दंड, भेद वापरताना विचारधारेच्या धाग्याने कार्यकर्त्यांना आणि मतदारांना जोडणारे असे त्यांचे नेतृत्त्व आहे म्हणूनच दिल्ली आणि नागपूर दोन्ही सत्ताकेंद्रांशी त्यांचा घनिष्ठ संबंध आहे. त्याच बरोबर त्यांना देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा आणि सहकार्य कायम मिळतच असते.

क्रांतिकारी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी महापौर हर्षाली चौधरी यांना निवेदन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण दि.०९ - कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेतील पत्रकारांसाठी "पत्रकार विकास योजना" राबवण्या बाबत "क्रांतिकारी पत्रकार संघाच्या" वतीने महापौर यांना निवेदन देण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील पत्रकार आपल्या मूलभूत सुविधा पासून वंचित आहेत. पत्रकार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. पत्रकार हे लोकशाही टिकवण्यासाठी धडपड करत असतात. आपले जीवन जनतेसाठी समर्पित करून कार्य करत असतात, वेतन नसल्यामुळे या महागाईच्या जमान्यात पत्रकारांची आर्थिक स्थिती बिकट होत चालली आहे.

तसेच पत्रकारितेतून कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी पुरेसा मोबदला मिळत नसल्याने कौटुंबिक परिस्थिती हलाकीची झाल्याने त्यांना त्यामध्ये जीवन जगावं लागतं आहे. तेव्हा वस्तुस्थिती समजून घेता सहानूभूतीपूर्वक 'पत्रकार विकास योजना' राबवून सहकार्य करावे. प्रामुख्याने पत्रकारांच्या मुलांसाठी शैक्षणिक सुविधा विनामूल्य मिळाव्यात, ज्या पत्रकारांचे स्वतःचं घर आहे त्यांना महानगरपालिके तर्फे घर पट्टी माफ करणे, पालिकेतील रुग्णाल्यातून निशुल्क सुविधा मिळाव्यात, मेडिक्लेम, विमा, आरोग्य सुविधा देण्यात याव्या. 
शासनाने पत्रकारांसाठी राबविलेले धोरण महानगर पालिकेने लागू करावे. महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्ह्यात पत्रकारांसाठी घरकुलासाठी/भुखंड योजना राबवण्यात आल्या आहेत. तत्कालीन आयुक्त आर. डी. शिंदे, यांनी सन २००८ च्या पत्रकार समारंभात सर्व पत्रकारांसाठी घरासाठी मनपा हद्दीत भूखंड उपलब्ध करून दिला जाईल असे सूचक विधान केले होते. त्यामुळे पत्रकारांसाठी घरकुल योजना किंवा गृह भूखंड योजना राबविण्यात यावी. लोकशाहीचा हा चौथा स्तंभ मजबुत राहण्यासाठी ही वस्तुथिती डोळ्यासमोर ठेऊन सुविधा, सवलती मिळतील अशा आशयाचे निवेदन संघटनेच्या वतीने महापौरांना देण्यात आले. 

यावेळी, राष्ट्रीय अध्यक्ष - गुलाबचंद्र यादव, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष - मधुकर वाल्हेकर, राष्ट्रीय सचिव - प्रमोद तांबे, पत्रकार - राजू काऊटकर, दीपक इंगळे यांनी निवेदन सादर केले. तसेच अधिक माहिती साठी आमदार विश्वनाथ भोईर, कल्याण उपमहापौर राहुल दामले, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका शहर अभियंता, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका उप आयुक्त सामान्य प्रशासन यांना प्रत रवाना करण्यात आली आहे.

माजी आमदार सुभाष भोईर यांनी दोस्ती गृहसंकुलात कॉंक्रिट रस्त्याचे भूमिपूजनाचा दिलेला शब्द पूर्ण केला..

विशेष प्रतिनिधी

दिवा : शिळफाटा येथील प्लॅनेट नॉर्थ दोस्ती गृहसंकुलात शेकडो नागरिक वास्तव्यास असून परिसरात 'दोस्ती फाउंडेशन' शाळाही आहे. मात्र गृहसंकुलाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना धूळ आणि खड्यांचा त्रास सहन करावा लागत होता.

ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या प्रचारादरम्यान नागरिकांनी ही समस्या माजी आमदार सुभाष भोईर यांच्याकडे मांडली होती. त्यावेळी त्यांनी मुंब्रा-पनवेल मुख्य रस्त्यापासून दोस्ती गृहसंकुलापर्यंत रस्ता दुरुस्त करून देण्याचे आश्वासन दिले होते.
निवडणूक संपल्यानंतर त्या आश्वासनाची पूर्तता करत माजी आमदार सुभाष भोईर यांनी दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून सुमारे ३५० मीटर लांबीचा कॉंक्रिट रस्ता मंजूर करून घेतला. या कामाचे भूमिपूजन नुकतेच पार पडले असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या रस्त्यामुळे गृहसंकुलातील रहिवासी व शाळेतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच परिसरातील वाहतूक व दैनंदिन ये-जा अधिक सुलभ होणार आहेत.

सदर प्रसंगी सुमित सुभाष भोईर, आरिफ शेख, जावेद शेख, शमशुनिषा हुसेन, फईम शेख, हनीफ पठाण, ऍड तन्वीर, ऍड मुफ्ती, अनवर कच्छी, दोस्ती गृहसंकुलातील, रुबी, एल्मोर, जेड, एमराल्ड सोसायटीचे सर्व अध्यक्ष, सेक्रटरी, सदस्य व नागरिक, दोस्ती ग्रुपचे वरिष्ठ अभियंता श्रीपत, सुधीर चव्हाण उपस्थित होते.

कल्याण लोकसभेचे संसदरत्न लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांची फेडरेशनच्या ‘नॅशनल प्रेसिडेंट’ पदी निवड..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : आज अनेक घरातील मुलांच स्वप्न असतं की आपण ही क्रिकेटर व्हाव, मात्र प्रत्येकालाच 'आयपीएल, टेस्ट मॅच' किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट पर्यंत पोहोचता येत नाही. अशा अनेक तरुणांसाठी टेनिस क्रिकेट हे करिअर घडवणारं प्रभावी माध्यम ठरू शकतं. या फेडरेशनच्या माध्यमातून सर्व सामान्य घरातील मुलालाही खेळात स्वतःचं भविष्य घडवण्याची संधी मिळू शकते,” असे प्रतिपादन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा ठाणे येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांची फेडरेशनच्या ‘राष्ट्रीय अध्यक्ष’ पदी अधिकृत निवड झाल्याचे देखील जाहीर करण्यात आले. देशभरात वेगाने लोकप्रिय होत असलेल्या टेनिस क्रिकेटला राष्ट्रीय पातळीवर शिस्तबद्ध आणि अधिकृत व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया (ITCSF) ची स्थापना करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला देशभरातील फेडरेशनचे पदाधिकारी, क्रीडा क्षेत्रातील प्रतिनिधी, स्पर्धा आयोजक, संघ मालक, माजी खेळाडू आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी भारतातील टेनिस क्रिकेटच्या भविष्यातील वाटचालीचा सविस्तर आराखडा मांडण्यात आला. निवडीनंतर बोलताना डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, “कल्याण लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात टेनिस क्रिकेट खेळले जाते. अनेक मोठ्या स्पर्धा येथे आयोजित केल्या जातात. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा स्वतःला क्रिकेटर म्हणून घडवू शकतो. जे खेळाडू प्रोफेशनल पातळीवर क्रिकेट खेळू शकत नाहीत, त्यांच्यासाठी हे एक स्वतंत्र आणि सक्षम व्यासपीठ आहे.” ते पुढे म्हणाले, "गोविंदा-दहीहंडी सारख्या पारंपरिक खेळालाही ‘प्रो-गोविंदा’च्या माध्यमातून व्यावसायिक दर्जा देण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे. जो खेळ केवळ वर्षातून एकदाच खेळला जायचा, त्यालाही व्यासपीठ, ओळख आणि मान्यता मिळवून देण्यात आली. त्याचप्रमाणे कबड्डी आज ‘प्रो-कबड्डी’च्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. म्हणजेच प्रत्येक खेळाला प्राधान्य देण्याची भूमिका आमच्या सरकारने घेतली आहे. टेनिस क्रिकेट हे आधीपासूनच वेगळ्या उंचीवर असून, त्याला व्यावसायिकदृष्ट्या सक्षम स्वरूप देण्यासाठी फेडरेशन सातत्याने प्रयत्न करेल.”

फेडरेशनच्या माध्यमातून दरवर्षी १२५ ते १५० स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असून, सुमारे ४० ते ४५ लाख खेळाडू या स्पर्धांमध्ये सहभागी होतात. या स्पर्धांची एकूण बक्षीस रक्कम अंदाजे ३० कोटी रुपयांच्या आसपास आहे. खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने आयोजक आणि फेडरेशन काम करत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

टेनिस क्रिकेटसाठी राष्ट्रीय पातळीवर शिस्तबद्ध व्यासपीठ

टेनिस क्रिकेटमध्ये झपाट्याने होत असलेली वाढ आणि वाढती आर्थिक गुंतवणूक यामुळे या खेळाकडे तरुणांचा ओढा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, कोणत्याही अधिकृत नियंत्रण यंत्रणेअभावी काही ठिकाणी गैरप्रकार आणि अडचणी निर्माण होत असल्याचे चित्र होते. या पार्श्वभूमीवर देशभरातील स्पर्धा आयोजक, अनुभवी खेळाडू, प्रायोजक आणि संघ मालक एकत्र येऊन 'टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया'ची स्थापना करण्यात आली. फेडरेशनची सुरुवात २०२२ मध्ये झाली असून, ऑगस्ट २०२५ मध्ये कंपनी ऍक्ट सेक्शन ८ अंतर्गत 'बीसीसीआय'च्या धर्तीवर फेडरेशनची अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, हरियाणा, दिल्ली एनसीआर, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील प्रतिनिधी फेडरेशनमध्ये सहभागी आहेत. येत्या काळात इतर राज्यांमध्येही फेडरेशनचा विस्तार करण्यात येणार आहे. टेनिस क्रिकेटला शिस्तबद्ध, पारदर्शक आणि व्यावसायिक स्वरूप देत, अनेक तरुणांच्या क्रिकेटर होण्याच्या स्वप्नांना नवी दिशा देण्याचा निर्धार या पहिल्याच सभेमध्ये व्यक्त करण्यात आला.

दिवा येथील 'ग्लोबल इंग्लिश स्कूल'चा वार्षिक क्रीडा दिन जल्लोषात साजरा..

विशेष प्रतिनिधी

दिवा, दि. ६ फेब्रुवारी – दिवा येथील 'ग्लोबल इंग्लिश स्कूल'चा वार्षिक क्रीडा दिन रुणवाल माय सिटी, डोंबिवली येथील प्रशस्त फुटबॉल मैदानावर दोन दिवस अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या दोन दिवसीय क्रीडा महोत्सवात शाळेतील बालवाडीपासून माध्यमिक विभागापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. क्रीडा दिनामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेली ऊर्जा, कौशल्ये व क्रीडावृत्ती यांचे प्रभावी दर्शन घडले.

या क्रीडा महोत्सवाला दोन दिवस मान्यवर प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती लाभली. पहिल्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून मारुती गायकवाड (मुख्य अधिकारी, कुळगाव– बदलापूर महानगरपालिका) यांची उपस्थिती लाभली. तर दुसऱ्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून नितीन पगार (पोलीस निरीक्षक, मुंब्रा पोलीस स्टेशन) यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. मान्यवरांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि क्रीडाभावना अधिक दृढ झाली.

यावेळी शाळेचे व्यवस्थापकीय संचालक महेंद्र दळवी, प्राचार्या ज्योत्स्ना सोनी तसेच 'दक्ष पोलीस टाईम्स' वृत्तपत्राचे संपादक किरण सावंत यांचीही मान्यवर म्हणून उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना क्रीडा व शिक्षण यांचा समतोल साधण्याचे महत्त्व अधोरेखित केले. क्रीडा दिनाच्या निमित्ताने विविध वयोगटांसाठी धावण्याच्या शर्यती, मैदानी खेळ व इतर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये तंदुरुस्ती, सहकार्य, संघभावना आणि स्पर्धात्मकतेची सकारात्मक भावना विकसित झाली. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मार्गदर्शनामुळे सर्व स्पर्धा शिस्तबद्ध व सुरक्षितपणे पार पडल्या. हा वार्षिक क्रीडा दिन अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाला. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, एकता, आत्मविश्वास, शारीरिक तंदुरुस्ती आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व ठळकपणे अधोरेखित झाले. 'ग्लोबल इंग्लिश स्कूल'ने अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेली आपली बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली.

दहावी व बारावी विद्यार्थ्यांसाठी डोंबिवली वाहतूक शाखा तर्फे विशेष बाईक राईडची सुविधा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षेदरम्यानचा प्रवास सुकर व्हावा आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना वाहतूक कोंडीत अडकावे लागू नये, यासाठी डोंबिवली शहर वाहतूक उपविभागाचे प्रभारी आयुक्त श्रीराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष बाईक रायडर्सची सुविधा सुरू करण्यात आली आहे.
परीक्षार्थी विद्यार्थी जर कुठेही ट्रॅफिकमध्ये अडकले, तर त्यांना तात्काळ मदत मिळून परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचता यावे, या उद्देशाने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक 8655654184 देण्यात आला असून, या क्रमांकावर संपर्क साधताच संबंधित भागातील वाहतूक बाईक रायडर्स विद्यार्थ्यांना त्यांचं ठिकाणाहून थेट परीक्षा केंद्रावर सोडणार आहेत.

पोलीस आयुक्त, ठाणे शहर व पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली हे ट्रॅफिक रायडर्स संपूर्ण ठाणे शहरात कार्यरत राहणार आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दिवशी वेळेच्या ताणातून दिलासा मिळणार असून, पालकांमध्येही समाधान व्यक्त केले जात आहे.

माजी नगरसेवक संजय पावशे यांनी सामाजिक बांधिलकी जपत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरमध्ये केला हळदी- कुंकू समारंभ उत्साहात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली, दि. ५ फेब्रुवारी - माजी नगरसेवक संजय पावशे यांच्या शिवसेना शाखा कार्यालय, प्रभाग क्रमांक ६५ कोपरगाव अंतर्गत कै. लक्ष्मण कृष्णा पावशे सामाजिक संस्था (रजि.) यांच्या वतीने डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हळदी- कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. हळदी- कुंकू कार्यक्रमांतर्गत महिलांना वाण म्हणून सुमारे ५ हजार पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करण्यात आले. तसेच सामाजिक बांधिलकी जपत प्रभागातील वृद्ध नागरिकांनाही बाटल्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांना भगवा फेटा ही बांधण्यात आला. कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. एकत्र येत सणासुदीचा उत्साह साजरा करण्याची संधी मिळाल्याने महिलांनी आयोजकांचे आभार मानले. सामाजिक उपक्रमातून सर्वसामान्य नागरिकांशी नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून दिसून आला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामाजिक संस्थेचे सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.