BREAKING NEWS
latest

देश-विदेश

featured/block-3

महाराष्ट्र

featured/block-3

ठाणे

featured/block-1

नवी मुंबई

featured/block-3

वसई विरार

featured/block-6

पालघर

featured/block-3

कल्याण-डोंबिवली

featured/block-2

उल्हासनगर-अम्बरनाथ-बदलापुर

featured/block-3

अन्य जिले

featured/block-4

Latest Articles

बेकायदा होर्डिंग्ज मोजणीसाठी तब्बल २० लाखांचे कंत्राट दिल्याचा कडोंमपा चा अजब कारभार चव्हाट्यावर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत होर्डिंग्ज किती आहेत? हे मोजण्यासाठी एका संस्थेला तब्बल २० लाख रुपये देण्याचे मंजूर केले होते. मात्र बुधवारी पार पडलेल्या महासभेत शिवसेनेचे नगरसेवक सचिन पोटे यांनी हा विषय उपस्थित करुन त्यावर जोरदार आक्षेप घेतला आहे. हे पैसे संबंधित संस्थेला देऊ नयेत. या प्रकरणी हा निर्णय घेणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक पोटे यांनी केली आहे.

या संदर्भात नगरसेवक पोटे यांनी सांगितले की, गेली पाच वर्षे महापालिकेत प्रशासकीय राजवट होती. महापालिकेस शहरातील होर्डिंग्जच्या माध्यमातून उत्पन्न मिळते. होर्डिंग्जच्या माध्यमातून ५ कोटीचे उत्पन्न मिळते असे महापालिकेने म्हटले आहे. २० बाय ३० आकाराचे एक होर्डिंग्ज भाड्याने दिल्यास वर्षाकाठी ८ ते १० लाख रुपये कंत्राटदाराला मिळतात. साधारणतः १०० अधिकृत होर्डिंग्जचे १२० कोटी रुपये कंत्राटदाराला वर्षाकाठी मिळतात. कंत्राटदार होर्डिंग्जच्या पोटी महापालिकेला केवळ पाच कोटी रुपये देतो. ही बाब लक्षात घेता शहरात अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंग्ज किती? असा सवाल पोटे यांनी उपस्थित केला. त्यावर महापालिकेने अनधिकृत होर्डिंग्ज मोजण्याकरीता एक संस्था नेमली आहे. त्या कामासाठी २० लाख रुपये महापालिका त्या संस्थेला कामाच्या बदल्यात देणार आहे अशी माहिती प्रसासनाकडून देण्यात आली.

केडीएमसीच्या अर्थसंकल्पात मालमत्ता विभागाकडून केवळ ५० कोटी एवढे उत्पन्न दाखवण्यात शहरात अनधिकृत होर्डिंग्ज किती हे आले आहे. त्यावरील चर्चेदरम्यान मोजण्यासाठी संस्थेला २० लाख रुपये मंजूर करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलेले. त्यावर नगरसेवक सचिन पोटे यांनी मोठा आक्षेप घेतला. प्रशासकीय राजवटीत लोकप्रतिनिधींनी स्वखर्चातून लोकांना सुविधा पुरवण्याची कामे केली. तर आयुक्त बंगल्यावर सुशोभीकरणाच्या नावाखाली ५५ लाख खर्च करण्यात आले. त्यापैकी १८ लाखांची उधळपट्टी केवळ नर्सरीवर करण्यात आल्याचा आरोप सचिन पोटे यांनी केला. मागील ५ वर्षात १२०० कोटींचा निधी नगरसेवकांना मिळाला नाही, तो यंदा मिळाला पाहिजे. त्यासाठी महसूली उत्पन्नातून प्रत्येकी अडीच कोटींचा नगरसेवक निधी देण्याची मागणीही पोटे यांनी केली आहे.

युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्पनी इराणसमोर ठेवल्या १५ अटी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
तेल अविव : इराणविरोधात अमेरिका आणि इस्राइलने पुकारलेल्या युद्धाला आता महिना होत आला आहे. इराणविरोधात मध्यपूर्वेतील अन्य मुस्लीम देशही एकवटले आहेत. तरीही इराण मागे हटण्याची चिन्हे दिसत नाहीत. या युद्धामुळे जगातील अनेक देशांमध्ये इंधन टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे जागतीक अर्थव्यवस्थेवर ताण आला आहे. दरम्यान आता इस्रायलच्या ‘चॅनल १२’ च्या वृत्तानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने इराणसमोर सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी १५ कलमी प्रस्ताव ठेवला आहे. एका अमेरिकी अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही माहिती दिली असून, वॉशिंग्टनने या चर्चांची माहिती इस्रायललाही दिल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, इस्रायलला चिंता आहे की, ट्रम्प प्रशासन या अटी अनिवार्य करण्याऐवजी “फ्रेमवर्क करार” करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. व्हाईट हाऊसचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे निकटवर्तीय जॅरेड कुशनर यांनी एक यंत्रणा तयार केल्याचे सांगितले जाते. यामध्ये एक महिन्याच्या युद्धविरामाची घोषणा करून त्या कालावधीत १५ कलमी प्रस्तावावर चर्चा करण्याचा विचार आहे.

इराणसमोर अमेरिकेने ठेवलेल्या प्रमुख अटी

* इराणने आपली अणु क्षमता पूर्णपणे नष्ट करावी.
* अण्वस्त्र कार्यक्रम न राबवण्याची कायमची हमी द्यावी.
* युरेनियम समृद्धीकरण पूर्णपणे थांबवावे.
* ६०% समृद्ध केलेले सुमारे ४५० किलो युरेनियम आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेकडे (आयएईए) सुपूर्द करावे.
* नतांझ, इस्फहान आणि फोर्डो येथील अणु प्रकल्प बंद करावेत.
* आयएईए ला पूर्ण तपासणी व देखरेखीचा अधिकार द्यावा.
* प्रादेशिक ‘प्रॉक्स’ धोरणाचा त्याग करावा.
* प्रॉक्सी गटांना निधी, शस्त्रसाठा आणि मदत थांबवावी.
* होर्मूज सामुद्रधुनी खुली ठेवावी.
* क्षेपणास्त्रांवर मर्यादा घालावी.
* भविष्यातील क्षेपणास्त्र वापर फक्त स्वसंरक्षणापुरता मर्यादित ठेवावा.

श्रीरामनवमी निमित्त मुंबईत २००० ड्रोनचा भव्य शो..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : श्रीराम नवमीच्या सणानिमित्त मुंबईत पहिल्यांदाच २ हजार ड्रोनचा भव्य शो आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे २६ आणि २७ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून आझाद मैदान येथे हा कार्यक्रम होणार आहे. या भव्य ड्रोन शोमध्ये महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती, इतिहास आणि परंपरा आकाशात जिवंत होतील. विविध प्रतिकात्मक आकृत्या, कथा सांगणारे व्हिज्युअल्स आणि आकर्षक प्रकाशरचना यामुळे हा कार्यक्रम खास ठरणार आहे

कसे पोहोचाल ?
आझाद मैदान हे स्टेशनपासून केवळ ७ ते १० मिनिटांच्या अंतरावर आहे. डीएन रोडकडे बाहेर चालत जाऊन मैदानाकडे पोहचता येईल.

चर्चगेट स्थानकातून ५ मिनिटांत टॅक्सी/ऑटोने किंवा १२ ते १५ मिनिटे चालत वीर नरिमन रोडमार्गे आझाद मैदान गाठता येईल.

कार्यक्रमासाठी मोठी गर्दी अपेक्षित असल्याने नागरिकांनी लवकर पोहोचण्याचा आणि शक्यतो सार्वजनिक वाहतूक वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मुंबईकरांसाठी हा ड्रोन शो तंत्रज्ञान आणि परंपरेचा अनोखा संगम अनुभवण्याची सुवर्णसंधी ठरणार आहे.

डोंबिवलीतील ६५ अनधिकृत इमारती संदर्भात दिलासादायक एक पाऊल पुढे..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - महाराष्ट्र राज्याचे मा. उप मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या निर्देशनुसार, कल्याण लोकसभेचे 'इन्फ्रा मॅन' खासदार डॉ.श्रीकांत शिंदे  यांच्या पुढाकारांने, कल्याण ग्रामीण विधानासभेचे आमदार श्री. राजेश मोरे तसेच मा. नगरसेवक श्री. नितिन पाटील व ६५ इमारती चे शिष्टमंडळ यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत आज मंगळवार दिनांक २४ मार्च २०२६ रोजी नगर विकास विभागाचे सचिव मा श्री असीम गुप्ता साहेब यांच्या मंत्रालयातील दालनात मा. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ (आय ए एस), तसेच मा. आयुक्त कल्याण डोंबिवली मनपा श्री. अभिनव गोयल (आय ए एस) यांच्या सोबत सकारात्मक आणि ६५ इमारती मधील नागरिकांना दिलासा दायक अशी व्हिडीओ कॉन्फरेन्स द्वारे संपन्न झाली. 
सदर सभेत...
➡️ अन्यायग्रस्त ६५ इमारती चे एक संघटन स्थापन करणे व त्यास अधिकृत मान्यता यावी यासाठी त्याची नोंदणी करणे. मा.रजिस्ट्रार महोदय यांना त्याबाबत निर्देश देण्यात आले 
➡️ चूक नागरिकांची नसल्याने अन्यायग्रस्त नागरिकांना मानवतेच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे सहकार्य केले जाईल 
➡️ विद्यमान कायद्यातील तरतुदीत नाममात्र फेरबद्दल करून ६५ पैकी अधिकाश इमारती या नियमित होऊ शकणार आहेत त्यामुळे त्या दृष्टीने पाऊले उचलली जातील याबाबत सर्वच विभागानी सहमती दर्शविली.
➡️ इमारती ना जागेचा मालकी हक्क मिळवून दिला जाईल त्यासाठी आवश्यक कागदपत्रे संचिका महापालिका कार्यालयात सादर करणे. एक इमारत फाईल तयार आहे त्याबाबत देखील माहिती देण्यात आली.
➡️ ३१ मार्च पूर्वी मा न्यायालय यांना देखील सर्व माहिती देऊन इमारत निष्कासित करण्या ऐवजी त्या नियमित होऊ शकतात याबाबत माहिती देण्याचे आयुक्त कल्याण डोंबिवली मनपा याना निर्देश देण्यात आले. 
➡️ कॉन्व्हेयन्स करणे तसेच ७/१२ नोंदी अद्ययावत करणे बाबत मा. जिल्हाधिकारी यांना देखील सहकार्य करणे बाबत निर्देश देण्यात आले.

एकूणच ६५ अन्यायकारक इमारती मधील नागरिकांना दिलासादायक आणि सकारात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकणारी आजची सभा ठरली. 
'इन्फ्रा मॅन'खासदार डॉ श्रीकांत शिंदे  निश्चितच आम्हा सर्व नागरिकांना न्याय मिळवून देण्यात यशस्वी होतील याबाबत शंका नाही असे ६५ इमारती शिष्ट मंडळाने मनोगत व्यक्त केले

ब्युरो चीफ पत्रकार आरती मुळीक परब यांना मातृशोक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिवा, दि. २५ मार्च : ब्युरो चीफ पत्रकार आरती मुळीक परब यांच्या आई कै. सौ. लक्ष्मी चंद्रकांत मुळीक परब यांचे दिनांक २४ मार्च २०२६ रोजी सायन येथील इस्पितळात हृदय विकाराच्या उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, नातेवाईक व मित्रपरिवारात हळहळ व्यक्त होत आहे.
कै. लक्ष्मी मुळीक परब या अतिशय प्रेमळ, जिव्हाळ्याच्या आणि ममतेची ऊब देणाऱ्या व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वांच्या मनात घर करून होत्या. त्यांच्या साध्या, नम्र स्वभावामुळे त्यांनी अनेकांची मने जिंकली होती. कुटुंबासाठी त्या आधारस्तंभ होत्या; त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे, अशी भावना व्यक्त केली जात आहे. त्यांचा अंत्यविधी दादर येथील चैत्यभूमी स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात पार पडला. उपस्थितांनी अश्रूंच्या साक्षीने त्यांना अखेरचा निरोप दिला. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि दोन मुलींचा तर पाच नातवंडांचा असा मोठा कुटुंबीय परिवार असून, सर्वत्र शोककळा पसरली आहे.
दरम्यान, त्यांचा दशक्रिया विधी (दहावा) दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी, तसेच बारावा/तेरावा विधी ५ एप्रिल २०२६ रोजी करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.

आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मॉरिशस मध्ये पायाभरणी करत महाराष्ट्र भवनाच्या विस्तारित वास्तूसाठी आठ कोटींचा निधी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : महाराष्ट्र आणि मॉरिशसमध्ये मैत्रीचे नाते पिढ्यान् पिढ्यांचे असून, सातासमुद्रापार राहूनही येथील मराठी जनसमुदायाने आपली सांस्कृतिक नाळ अतिशय अभिमानाने जपली आहे, असे गौरवोद्‌गार भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी मॉरिशस येथे काढले. मॉरिशसमधील मोका येथे महाराष्ट्र भवनाच्या विस्तारित वास्तूचा पायाभरणी सोहळा सोमवारी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र भवन वास्तूच्या विस्तारासाठी आठ कोटींचा निधी देण्यात आला आहे.
आमदार चव्हाण यांनी त्यांच्या तीन दिवसीय मॉरिशस दौऱ्यात मान्यवरांच्या भेटीगाठी घेत, भारत-मॉरिशस संबंध अधिक दृढ केले. या दौऱ्यात आमदार चव्हाण यांनी मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष धरमबीर गोखुल यांच्या सरकारी निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत भारत-मॉरिशस मैत्री, ब्ल्यू इकॉनॉमी, पर्यटन, एआय आणि सायबर सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
"मॉरिशस हाभारताचा लहान भाऊ आहे," असे सांगत राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचे कौतुक केले, तसेच भारताने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्याचबरोबर, मॉरिशसचे परराष्ट्रमंत्री धनंजय रामफुल, आयटी व इनोव्हेशन मंत्री डॉ. अविनाश रामतोहूल आणि कला व सांस्कृतिकमंत्री महेंद्र गोंदीया यांच्यासोबत बैठका पार पडल्या.

नाशिक शिंपी समाज एकता महिला मंडळातर्फे 'रणरागिनी पुरस्कार' सोहळा संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नाशिक - नाशिक सिडको येथील शिंपी समाज एकता महिला मंडळातर्फे 'महाराष्ट्र राज्य मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा' ग्रुप च्या सौजन्याने नाशिक सिडको येथील लक्ष्मीधवल कार्यालयात "रणरागिनी पुरस्कार सोहळा २०२६" चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून शिंपी समाज एकता महिला मंडळाचा अध्यक्षा सौ.माया मिलिंद चव्हाण संकल्पनेनुसार, ऍड. गीतांजली बागुल, अखिल भारतीय शिंपी समाज महिला कार्याध्यक्षा सुनिता शिंपी व ज्येष्ठ समाजसेवक उद्योजक श्री. जयराम मुरलीधर चव्हाण यांचा प्रमुख उपस्थितीत पुरस्कार सोहळा पार पडला. 

यावेळी शिंपी समाज एकता महिला मंडळातील शिंपी समाजातील विविध क्षेत्रात उद्योग व्यवसाय नोकरी करून समाजसेवा करण्यासाठी तत्पर आणि कुटुंबासाठी हातभार लावणाऱ्या ३५ हिरकणींचा, "रणरागिणी पुरस्कार २०२६" देऊन सन्मान करण्यात आला. एकता महिला मंडळाचा उपाध्यक्षा वंदना जगदाळे, सचिव शर्मिला जगताप व खजिनदार शोभा संन्याशी मंडळाच्या प्रवक्त्या सीमा कापडणे, मंडळाचा सदस्य प्रतिभा बिरारी, रेखा निकम, भारती भामरे, सुनीता गवांदे, इंदिरा खैरनार, अनिता बाविस्कर, ललिता बोरसे, कल्पना कटके, भारती महाजन, सुरेखा ब्राह्मणकर यांनी विशेष सहकार्य केले. ऍड. गीतांजली बागुल यांनी एकता महिला मंडळाचा या उपक्रमांचे कौतुक करत पुरस्कार प्राप्त सर्व समाज भगिनींचे अभिनंदन केले. मंडळाचा अध्यक्षा माया चव्हाण यांनी 'महाराष्ट्र राज्य मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप' चे अनमोल सहकार्य लाभले त्याबद्दल आभार व्यक्त केले. आपल्या समाजातील सर्व महिलांनी समाजातील गरजू भगिनींना एकत्र करून सामूहिक उद्योग व्यवसाय कसे सुरू करता येतील यासाठी एकात्मता दाखवून समाज भगिनींना सक्षम करण्यासाठी क्रांतीज्योती सावित्री बाई फुले, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, यांचा आदर्श समोर ठेवून कार्य करावे असे आव्हान केले. कार्यक्रमाचा शेवटी  उपस्थित सर्व मान्यवर व पुरस्कार प्राप्त रणरागिणींचे आभार मानले. व अल्पोहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.