BREAKING NEWS
latest

देश-विदेश

featured/block-3

महाराष्ट्र

featured/block-3

ठाणे

featured/block-1

नवी मुंबई

featured/block-3

वसई विरार

featured/block-6

पालघर

featured/block-3

कल्याण-डोंबिवली

featured/block-2

उल्हासनगर-अम्बरनाथ-बदलापुर

featured/block-3

अन्य जिले

featured/block-4

Latest Articles

भारताचे 'मिसाईल मॅन' माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दूल कलाम यांना भावपूर्ण आदरांजली..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : भारताचे 'मिसाईल मॅन' म्हणून आदराने संभोधले जाणारे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम हे २७ जुलै २०१५ रोजी आजच्या दिनी आपल्यातून निघून गेले आणि संपूर्ण भारत शोकसागरात बुडाला. राष्ट्रपती भवनात एक सूटकेस घेऊन आलेल्या आणि राष्ट्रपती भवन सोडताना तिच सूटकेस घेऊन थेट आपल्या गावी गेलेल्या या 'अग्निपंखा'वर जगभरातून भावपूर्ण श्रद्धांजलींचा वर्षाव झाला. त्यात एक थेंब गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचाही होता. दिवंगत 'भारतरत्न'ला श्रद्धांजली व्यक्त करताना लतादिदी म्हणाल्या,"दिवंगत राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या कविता माझ्या व्यस्ततेमुळे मी गाऊ शकले नाही याची कायम मला सल राहील".

लतादिदी, आपली व्यस्तता आम्ही समजू शकतो. पण विज्ञानाचे पंख पांघरून अवकाशात आकाश भराऱ्या घेणाऱ्या कलाम साहब यांना भारतवर्ष अंतराळगीत म्हणून गात राहील. साधं राहणीमान आणि उच्चं विचाराचे ते आदर्श उदाहरण होते. भारताच्या या महान व्यक्तिमत्वाला जाहीर सलाम वं मानाचा मुजरा. बारशाचं तेरशाला अन् तेरशाचं बारशाला बोलायचं नसतं. पण जाता जाता मोह आवरत नाही एक आठवण शेअर करण्याची.. कलाम साहेबांच्या औदार्याची ! 

१७ जुलै १९८० ला सायंकाळी कलाम साहेब आणि तत्कालीन संरक्षणमंत्री समुद्राच्या बिचवर फिरत होते. सॅटेलाईट लाँचिंगची सर्वांच्याच मनात अस्वस्थता होती. कुणीच काही बोलत नव्हतं. अखेर संरक्षण मंत्र्यांनी कोंडी फोडली. ते म्हणाले, कलामजी, बोलिए.. कल जश्न कैसा मनाने का है.. ?
त्यावर कलाम साहेब म्हणाले "अपने सेंटर में १ लाख पौधे लगाकर" !

भारताची अंतराळातील जगाला ओळख करून देणारे असे स्वयंप्रकाशित, स्वयंसिद्ध, आत्मनिर्भर  'अग्निपंख' पुन्हा पुन्हा पृथ्वीतलावर जन्माला येत नसतात. संपूर्ण भारताच्या वतीने 'मिसाईल मॅन' यांना विनम्र अभिवादन आणि आदरांजली !!

जय विज्ञान !
जय संविधान !!
जय भारत !!!

1971 से चल रहे गैरेज को किया गया अनाधिकृत घोषित! नगर पालिका पर सवालिया निशान?

कांदिवली पश्चिम एस.वी. रोड पर स्थित 1971 से लगातार चल रहे एक गैरेज़ पर नगर पालिका के आर. साउथ डिवीजन ने कार्रवाई की है और इस गैरेज को अनाधिकृत घोषित कर दिया है। इस गैराज के मालिक का नाम रंजीत मापरा है और "1971 से नगर निगम को नियमित टैक्स का भुगतान करने के बावजूद मेरे साथ ऐसा क्यों हुआ?" ऐसे मापरा ने नगर पालिका से सवाल किया है। इस गैराज के डिज़ाइन को नगर पालिका के आर.दक्षिण प्रभाग द्वारा अनुमोदित किया गया था। इसके साथ ही मापरा ने आरोप लगाया है कि आर. साउथ विभाग द्वारा भ्रष्टाचार किया गया है, क्योंकि सोसायटी को नियमित रूपसे मेंटेनेंस के साथ-साथ नियमित बिजली बिलों का भुगतान करने के बावजूद ये कार्रवाई की गई है।


इस बीच स्थानीय लोगों का कहना है कि नगर पालिका ने सोसायटी की योजना को देखे बगैर यह कार्रवाई की है। कुल मिलाकर मापरा के पास मौजूद दस्तावेजों को देखें तो बृहन्मुंबई नगर निगम के आर. साउथ डिविजन पर सवालिया निशान लग रहा है।

बीजेपी विधायक योगेश सागर ने कहा, ''यह गैराज पूरी तरह से अनधिकृत है, उनके पास कोई आधिकारिक सबूत नहीं है.''

योगेश सागर के बयान पर सवाल यह उठ रहे है की अगर यह गैरेज अनधिकृत है तो जब इसकी स्थापना की गई थी तब इसे क्यों अनुमति दी गई थी ? क्यों टैक्स लिया जा रहा था ? इस तरहके कई सवाल फ़िलहाल इस घटना को देखते हुए सामने आ रहे है। 


रिदम डान्स अकॅडमी मध्ये कलियुगात ही श्रावण बाळाचे धडे!


आजच्या मोबाईल च्या युगात कुठेतरी आपला संस्कृतीचा विसर पडत चाला आहे हे लक्षात घेऊन आजच्या पिढी ला गुरुपौर्णिमा चे महत्त्व पटवून देऊन दि रिदम डान्स अकॅडमी च्या सर्व ब्रांच मध्ये गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर साप्ताहिक साजरा केला यात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगांव, शिवटेकडी आणि चार्निरोड ब्रांच मध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी गुरूंचे महत्त्व तसेच, आपले सर्वात पाहिले गुरू हे आपले पालक असतात आणि आपल्या आयुष्यात पालकाचे महत्त्व आणि आपल्यासाठी त्यांचे केले जाणारे श्रम याचे महत्त्व सांगण्यात आले आणि विद्यार्थायांनी आपल्या पालकांचे पाया पडून औक्षण करून त्यांचे आशीर्वाद घेऊन ही गुरुपौर्णिमा दि रिदम डान्स अकॅडमी च्या सगळ्या ब्रांच मध्ये साजरी करण्यात आली.
यावेळी रिदम डान्स अकॅडमीचे संस्थापक रहीम तंबोळी, सहायक -सोनाली नारकर, लेखा शिरोडकर , तन्वी शिद्रुक यांच्या संकल्पनेतून उपक्रम पार पडला.
बुधवार ते रविवार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि यामध्ये 120 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि पालक यांनी सहभाग घेतला होता.
अशी बातमी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खैरनार यांच्या संकल्पनेतून उपक्रम पार पडला अशी माहिती यांनी दिली.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.२१: आषाढ पौर्णिमेला महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला म्हणून व्यास पौर्णिमा किंवा गुरू पौर्णिमा म्हणून हा दिवस संपूर्ण भारतातून साजरा केला जातो. 'जे एम एफ शिक्षण संस्था' संचलित 'जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळा' आणि विद्यामंदिर मधे देखील मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा उत्सव मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक डॉ.राजकुमार कोल्हे,  सचिव डॉ.सौ प्रेरणा कोल्हे यांचे आगमन झाल्यावर त्यांच्या हस्ते व इतर पदाधिकारी यांनी सरस्वती व व्यास पूजन केले. स्वागत समारंभ झाल्यावर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मुख्याध्यापिका श्यामला राव यांनी गुरुपौर्णिमेचे महत्व सांगून छोटीशी गोष्ट देखील विध्यार्थ्यांना सांगितली.
अनेक मुलांनी नृत्य, गायन केले तर काही मुलांनी गुरू शिष्य हा विषय घेऊन गुरू द्रोणाचार्य, शिष्य अर्जुन, एकलव्य, संदिपानी ऋषी, बलराम, श्रीकृष्ण यांच्या गोष्टी सांगून सर्वांची मने जिंकली. तर हिंदी शिक्षिका ममता राय व प्रमोद पगारे यांनी नाटक बसवले व इयत्ता आठवी मधील विध्यार्थ्यांनी गुरू शिष्य संबंधित नाटक सादर केले. गुरू कसा असावा यावर भाष्य करत संस्थापक डॉ.राजकुमार कोल्हे यांनी, गुरू हा 'ज्ञानाचा सागर आणि मायेचा पाझर' असावा असे मुलांना सांगितले. या ज्ञान रुपी सागरातून ज्ञानाचे मोती वेचून घ्या. आपण खूप भाग्यवान आहोत की वेद व्यासांसारखे महर्षी आपले गुरू आहेत. गुरुविण कोण दाखवी वाट.. आपल्या जिभेवर कायम नम्रतेचे  शब्द असावेत, कृपया, क्षमा असावी, आभारी असावे.  प्रेम ह्या शब्दांनी आपण दुसऱ्याचे मन जिंकू शकतो म्हणून आपल्या व्यवहारामधे गुरुंसारखा नम्रपणा असावा असे डॉ.राजकुमार कोल्हे यांनी सांगितले.
सर्व प्रथम आपले गरू आपले आई-वडील आहेत. आईच्या गर्भात असताना झालेले गर्भसंस्कार आणि बाहेर आल्यावर झालेले सामाजिक संस्कार करणारे आपले आई-वडील म्हणजे आपले पहिले गुरू. ना आदी, ना अंत असलेले वेद व्यास हे तपश्चर्येने महर्षी व्यास झाले, त्यावेळी त्यांच्या मातेने देखील त्यांना हात जोडून महर्षी म्हणून नमस्कार केला. असे व्यसांसारखे तपोबल तुम्हीही प्राप्त करा असे संस्थेच्या सचिव डॉ.प्रेरणा कोल्हे यांनी मुलांना सांगून वेदांबद्दल देखील माहिती दिली.

'जन गण मन' इंग्लिश सेकंडरी स्कूल आणि विद्यामंदिर च्या सकाळ व दुपारच्या सत्रात मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला. सहभागी झालेल्या सर्व मुलांना संस्थापक डॉ.राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ.प्रेरणा कोल्हे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सकाळच्या सत्रात संगीत शिक्षिका सौ.श्रेया कुलकर्णी तर दुपारच्या सत्रात सौ.कविता गुप्ता यांनी केले.