BREAKING NEWS
latest

देश-विदेश

featured/block-3

महाराष्ट्र

featured/block-3

ठाणे

featured/block-1

नवी मुंबई

featured/block-3

वसई विरार

featured/block-6

पालघर

featured/block-3

कल्याण-डोंबिवली

featured/block-2

उल्हासनगर-अम्बरनाथ-बदलापुर

featured/block-3

अन्य जिले

featured/block-4

Latest Articles

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये २०२६ सालचे अर्थसंकल्प आणि आर्थिक बाबीवर विचार विनिमयाचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली (कोपर) - अर्थसंकल्प आणि आर्थिक बाबींची तरतूद करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य व जबाबदारी आहे. १ फेब्रुवारी रोजी झालेल्या अर्थसंकल्प सादरीकरण मधे अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी अनेक महत्त्वाच्या तरतुदी सांगितल्या. त्याच अनुषंगाने  दिनांक २ फेब्रुवारी रोजी मधुबन वातानुकूलित दालनात 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि मुख्य वक्ते डॉ. राजकुमार कोल्हे यांनी देखील सहज सुलभ भाषेमध्ये  विद्यार्थ्यांना अर्थसंकल्पाची व्याख्या समजावून सांगितली. रोजच्या दैनंदिन जीवनात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक आर्थिक व्यवहार होत राहतात. अगदी भाजीपाला घेण्यापासून ते सोने चांदी घेण्यापर्यंत व्यवहार सुरूच राहतात. हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक आहे, अशी व्याख्यानाची सुरुवात करताना मुख्य वक्ते डॉ. राजकुमार कोल्हे यांनी अर्थसंकल्प आणि आर्थिक बाबींची तरतूद कशी करावी याबद्दल सांगितले. नवीन वर्षात नवीन पद्धतीने अर्थसंकल्प तयार केला जातो, फार पूर्वी रेल्वे अर्थसंकल्प वेगळे तयार केले जायचे,  २०१७ सालापासून प्रत्येक वस्तूवर अथवा जागेवर जी एस टी कर लागू करण्यात आला. पैशाचे नियोजन कसे करावे, याबद्दल माहिती देताना वक्ते डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सांगितले की आज सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. सद्य परिस्थितीत कुणाही व्यक्तीला सोने चांदी खरेदी करताना सारासार विचार करावा लागेल परंतु ज्या व्यक्तींनी खूप पूर्वी सोने चांदी घेऊन ठेवली आहे त्यांना सद्य स्थितीत ते विकून  चौपट पैसे मिळू शकतात म्हणजेच काय तर पैशाचे नियोजन अशा पद्धतीने करणे हे देखील फायद्याचे आणि गरजेचे ठरू शकते असेही वक्ते डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या चर्चासत्रात  सांगितले.
भारत हा संस्कृती प्रधान देश आहे. मंदिरे, मेळावे, सर्व नद्यांची आरती, उत्सव असे अनेक प्रकारची धार्मिक कार्ये भारतात होत असतात, अनेक परदेशी व्यक्तींना भारतीय संस्कृती बद्दल आकर्षण आणि आदर आहे म्हणून लाखो संख्येने पर्यटक भारतात येत असतात आणि त्यातूनच भारत सरकारला आर्थिक उत्पन्न प्राप्त होते, असे सांगताना पर्यटकांना गौतम बुद्धांबद्दल आदर वाटतो त्या कारणास्तव भारतात अनेक पर्यटक बुद्धिष्ठ मंदिराला भेट देण्यासाठी येत असतात तसेच अयोध्या मधील राम मंदिर, असे अनेक तीर्थक्षेत्र आहेत की ज्या मधून एक नवीन अर्थसंकल्प ची तरतूद होऊन जाते असेही सांगितले. सोळा टक्के उत्पन्न हे पशुपालन व्यवसायातून प्राप्त होते. त्याच बरोबर औषधी, पर्यटन, खेळ, प्रयोगशाळा, इत्यादी मधून आर्थिक उत्पन्न प्राप्त होते.
२६ नोव्हेंबर रोजी संविधान बैठकीत देखील अर्थसंकल्प आणि आर्थिक बाबीची तरतूद कशी करावी याबद्दल लिहून ठेवले गेले आहे असे वक्ते डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सांगितले तर घरातली प्रत्येक गृहिणी  ही दैनंदिन अर्थसंकल्प आणि आर्थिक बाबींचे नियोजन करण्यात पुरुषांपेक्षाही सक्षम असते. एक रुपयाचे दहा रुपये कसे करता येईल याचा विचार करून आपणही नियोजनबद्ध दुप्पट उत्पन्न प्राप्त करू शकता असाही सल्ला डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिला. भारतातील यशस्वी उद्योजक, व्यक्ती यांची उदाहरणे देऊन त्यांच्या जिद्दीने व विचारांनी आपणही मार्गदर्शन घेऊन यशस्वी रित्या आर्थिक उत्पन्न दुप्पट करू शकता असेही सांगितले.
 दोन तासाच्या सत्रामध्ये वक्ते डॉ. राजकुमार कोल्हे सर यांनी अनेक संधी, मार्ग विध्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिले. सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे तसेच प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी मिळून २५० ते ३०० श्रोते या  अर्थसंकल्प चर्चासत्रात उपस्थितीत होते. अनेकांनी वक्ते डॉ. राजकुमार कोल्हे सर यांना प्रश्न विचारून आपल्या प्रश्नाचे उत्तर घेऊन समर्थन करून घेतले.

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टतर्फे ‘बालमेळा २०२६’ यशस्वीरित्या संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट यांच्या वतीने GEI’s 'ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल', डोंबिवली येथे नुकताच ‘बालमेळा २०२६’ या भव्य सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन उत्साहात करण्यात आले. डोंबिवली परिसरातील सुमारे २० शाळांमधील ८०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या बालमेळाव्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. चित्रकला, वक्तृत्व, निबंध लेखन, वादन, समूह गायन, समूह नृत्य व रोटरी हास्यजत्रा अशा विविध स्पर्धांचा या उपक्रमात समावेश होता.

उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर-नियुक्त  श्रीजीत पूतन आणि  डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो. विनेश नायर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या स्पर्धांचे पारितोषिक वितरण समारंभ ३१ जानेवारी रोजी रोटरी भवन, डोंबिवली येथे पार पडला. यामध्ये सर्वोत्कृष्ट शाळा (विजेती) – 'ओंकार इंग्लिश मिडियम स्कूल' (सीबीएसई), सर्वोत्कृष्ट शाळा (उपविजेती) – GEI's 'ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल', तर उत्कृष्ट सहभागासाठी विशेष पारितोषिक – 'डॉन बॉस्को स्कूल' यांना प्रदान करण्यात आले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन अध्यक्ष रो. डॉ. संदीप घरत, सचिव रो. विनायक आगटे, प्रकल्प संचालक रो. संतोष प्रभुदेसाई, प्रोजेक्ट चेअरमन रो. धनश्री मोने,  रो. अशोक तिरुवसकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

आमदार सूर्यकांत दळवी यांचा दिवा ते दापोली एसटी बस सुरू करण्याच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद..

विशेष प्रतिनिधी

दिवा, दि.२ फेब्रुवारी : दिवा ते दापोली एसटी बस सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी कोकणकर प्रतिष्ठानचे संस्थापक व भाजपा अनुसूचित जाती मोर्चा ठाणे जिल्हा सरचिटणीस डॉ. सतीश केळशीकर यांनी दापोलीचे आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिवा शहरातून दर शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पनवेल– गोरेगाव– मंडणगड– दापोली शिवाजीनगर मार्गे उन्हवरे येथे एसटी बस सेवा सुरू करावी तसेच दर रविवारी याच मार्गावरून परतीसाठी एसटी बस सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दिवा शहरासह आजूबाजूच्या परिसरात दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यातील हजारो कोकणवासी कुटुंबे स्थायिक आहेत. नोकरी व व्यवसायानिमित्त येथे वास्तव्यास असले तरी त्यांचे मूळ गाव, शेती आणि नातेवाईक कोकणात आहेत. शनिवार-रविवारच्या सुट्टीत गावी जाण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्याने प्रवासात मोठी गैरसोय सहन करावी लागते.

ही गैरसोय दूर करण्यासाठी दर शनिवारी रात्री १० वाजता दिवा येथून पनवेल– गोरेगाव– मंडणगड–दापोली शिवाजीनगर मार्गे उन्हवरे आणि दर रविवारी रात्री ८ वाजता उन्हवरे शिवाजीनगर येथून दापोली–मंडणगड– गोरेगाव– पनवेल– दिवा अशी एसटी बस सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

ही सेवा सुरू झाल्यास ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांसह प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुखकर होईल, तसेच एसटी महामंडळालाही चांगला महसूल मिळेल, असा विश्वास डॉ. सतीश केळशीकर यांनी व्यक्त केला. यावर आमदार सूर्यकांत दळवी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

ऐतिहासिक कॉइन्स व स्टॅम्प पेपर, आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन व पोस्टर्स स्पर्धा; एकूण दीड लाख रुपयांची रोख बक्षीसे..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी २०१४ पासून डावखर इन्फ्रा, रिजन्सी ग्रुप, समर्थ पेट्रोलियम, एनए सोल्युशन, डावखर फाउंडेशन, डावखर फिल्म यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान आणि इतिहास विषयावर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते.
४५ शाळा, २५,००० विद्यार्थ्यांचा सहभाग

विद्यार्थ्यांमधील कला गुणांना संधी देण्यासाठी त्यांच्यातल्या शास्त्रज्ञांना वाव देण्यासाठी कल्याण-डोंबिवली परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आंतर शालेय विज्ञान प्रदर्शन २९ व ३० जानेवारी २०२६ रोजी बेलग्रेव स्टेडियम, रीजन्सी अनंतम, डोंबिवली (पूर्व) येथे सकाळी १० ते संध्याकाळी ८ या वेळेत पार पडले. सदरचे प्रदर्शन हे सर्वांसाठी विनामूल्य होते. तसेच शाळांसाठी बसची सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती. यावर्षी ऐतिहासिक कॉइन्स आणि स्टॅम्प पेपर चे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना विज्ञान विषयामध्ये स्वारस्य घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी विशेष आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. तसेच पोस्टर स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. जिंकणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, पदक, प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देण्यात आले असून या वर्षी ४५ शाळा सहभागी झाल्या होत्या तर ८० प्रोजेक्ट मांडण्यात आले होते. प्रदर्शनाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक, अभिनेता प्रणव भांबुरे यांनी केले. ५ ते ७ आणि ८ ते १० अशा २ गटामध्ये स्पर्धा झाली आणि १.५० लाखाची बक्षीस विजेत्यांना मिळवली.
विज्ञान प्रदर्शनासाठी एआय आधारित स्मार्ट सुरक्षा, सोलार ट्रेकिंग सिस्टम, स्मार्ट कचरा वर्गीकरण, हायड्रोजन फ्युएल सेल, स्वयंचलित रोप पाणीपुरवठा, प्लास्टिक ते इंधन संकल्पना, पायजोइलेक्ट्रिक फूड स्टेप पावर जनरेटर आणि पोस्टर्स स्पर्धेसाठी हवामान बदल, एआय व रोबोटिक्स, चंद्रयान-३ मोहीम, पाणी वाचवा जीवन जगवा, प्लास्टिक प्रदूषण जनजागृती, मानवी मेंदू, हेल्दी फूड विरुद्ध जंक फूड, विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा, सौरमंडळ असे विविध विषय देण्यात आले होते.
विज्ञान प्रदर्शनात ५ ते ७ वी गटात 'ओमकार इंग्लिश स्कूल' आणि 'डॉन बॉस्को स्कूल' प्रथम क्रमांक विभागून तर 'ॐकार केंब्रिज स्कूल' यांना द्वितीय आणि 'गणेश विद्यालय' यांना तृतीय तसेच ८ ते १० वी गटात प्रथम क्रमांक 'रतनबुवा पाटील विद्यालय' यांना देण्यात आला. तर द्वितीय 'शंकरा विद्यालय' आणि 'श्री चैतन्य टेक्नो स्कूल' विभागून आणि तृतीय 'सेंट जॉन स्कूल' यांना देण्यात आला. पोस्टर स्पर्धेमध्ये अनुक्रमे ५ ते ७ वी गटात 'गणेश विद्या मंदिर', 'शंकरा विद्यालय', 'न्यू श्री वाणी विद्यालय' यांनी प्रथम द्वितीय तृतीय आणि ८ ते १० वी गटात 'ॐकार इंटरनॅशनल स्कूल', 'बी टी गायकवाड इंग्लिश स्कूल', 'सेंट जॉन स्कूल' यांनी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवला आहे. तर बेस्ट प्रेझेंटर म्हणून 'गणेश विद्यालय'चा अनुज काटले आणि नूतन ज्ञान मंदिरची काव्या तुपे यांना पुरस्कार मिळाला.

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ कार्यक्रमाचे अनावरण..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे दि.२६ – भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ आज, दि. २६ जानेवारी, २०२६ रोजी साकेत पोलीस मैदान, ठाणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून या मुख्य शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन भरारी’ या अभिनव शैक्षणिक उपक्रमाचे औपचारिक अनावरण करण्यात आले.
मिशन भरारी' अंतर्गत ग्रामीण विद्यार्थ्यांना विमानवारीची संधी

मिशन भरारी  उपक्रमांतर्गत ठाणे जिल्हा परिषद शाळांतील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विमान प्रवासाचा अनुभव देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे तसेच विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाबाबत जिज्ञासा निर्माण करणे हा आहे.

या उपक्रमांतर्गत इयत्ता पाचवी, सहावी, सातवी व आठवी या वर्गांतील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी, गणित, विज्ञान व समाजशास्त्र या विषयांच्या केंद्र, तालुका व जिल्हास्तरावर स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत. या स्पर्धा परीक्षांमधून जिल्हास्तरावर निवड झालेल्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी फेब्रुवारी व मार्च २०२६ दरम्यान देशातील नामांकित वैज्ञानिक केंद्रांना शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात येणार असून, या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना विमानवारी करण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संशोधन, अवकाश विज्ञान, आधुनिक प्रयोगशाळा व नव्या तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती मिळणार असून, त्यांच्या भविष्यातील शैक्षणिक वाटचालीस नवी दिशा मिळणार आहे.

याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे तसेच विविध मान्यवर, अधिकारी, शिक्षकवर्ग व कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांनी 'मिशन भरारी' उपक्रमाचे कौतुक करत, या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या क्षमतेला नवे क्षितिज मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

'ग्लोबल इंग्लिश स्कूल'मध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा..

विशेष प्रतिनिधी

दिवा, दि.२६ जानेवारी : देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर 'ग्लोबल इंग्लिश स्कूल'मध्ये मोठ्या उत्साहात ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन महेंद्र दळवी व 'दक्ष पोलीस टाईम्स' चे संपादक किरण सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे मुंब्रा पोलीस ठाण्याचे सपोनि. वसंत खतेले, अमोल कोळेकर आणि राजेंद्र तोरडमल यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली.

ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी शाळेच्या प्राचार्या श्रीमती ज्योत्स्ना सोनी, किरण सावंत सर, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, समूहगायन, नृत्य, कवितावाचन व प्रभावी भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीमय व प्रेरणादायी वातावरणाने भारावून गेला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून भारतीय संविधानाचे महत्त्व, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये, शिस्त, एकता व बंधुता याविषयी मार्गदर्शन केले. तरुण पिढीने व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, शिस्त व देशसेवेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी चेअरमन महेंद्र दळवी यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, नैतिक मूल्ये व सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व सांगून शाळा नेहमीच सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्या श्रीमती ज्योत्स्ना सोनी यांनी सर्व मान्यवरांचे, पालकांचे व उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे व शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडल्याचे त्यांनी सांगितले.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये रौप्य महोत्सवी वर्षा अंतर्गत 'जे एम एफ रौप्य पुरस्कार' प्रदान तसेच 'रेडियो जे एम एफ ध्वनी ८८.४' चे उद्घाटन व 'जे एम एफ' रौप्य प्रवास' स्मरणिका सोहळा संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत 

डोंबिवली दि.२३ - जान्हवी मल्टी फाउंडेशन (जे एम एफ) शिक्षण संस्थेमध्ये दिनांक १९ ते २४ जानेवरी पर्यंत सुरू असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात प्रति काला घोडा मोहोत्सव तसेच शाळा, महाविद्यालयांचे 'प्रेरणोत्सव वार्षिक स्नेह संमेलन' मोठ्या जल्लोषात पार पडला. 'जे एम एफ' शिक्षण संस्थेला यंदा २५ वर्ष पूर्ण झाली त्या अनुषंगाने वर्षभर विविध कार्यक्रम करून 'रौप्य महोत्सव' साजरा केला गेला.
"जुनं तेच सोनं" या उक्ती प्रमाणे पुन्हा एकदा नव्याने 'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये वसंत पंचमीच्या मुहूर्तावर "जे एम एफ ध्वनी ८८.४" या रेडिओ स्टेशन चे उद्घाटन "जे एम एफ रौप्य प्रवास" स्मरणिका प्रकाशित  करण्यात आली. प्रमुख पाहुणे श्री.परशुरामजी भांगे, सौ. पुष्पा भांगे त्याच बरोबर संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नाडर सर त्याच बरोबर हे कार्य तडीस नेण्यासाठी अथक परिश्रम घेतलेले श्री. कुमार दुपटे व इतर पदाधिकारी व या योजनेसाठी कार्यरत असलेले सदस्य यांच्या हस्ते "जे एम एफ ध्वनी ८८.४" चे उद्घाटन करण्यात आले. 'जे एम एफ' संस्थेच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला तो म्हणजे शंभर शहरांमध्ये प्रसारित  होणारा "जे एम एफ ध्वनी ८८.४" रेडिओ चॅनल म्हणजे सर्व सामान्य लोकांना 'जे एम एफ' परिवारातील सदस्य म्हणून जोडला जाणारा दुवाच असलयाचे उद्गार संस्थापक अध्यक्ष डॉ.राजकुमार कोल्हे यांनी काढले. चोवीस तास सुरू असलेल्या 'जे एम एफ ध्वनी' मध्ये शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सुरूच राहतील. शाळेच्या गोंगाटामधे किलबिल करणारी ही मुले "जे एम एफ ध्वनी ८८.४" च्या माध्यमातून गाण्याचा, गोष्टीचा, नाटकाचा, 'किलबिल' कार्यक्रम करण्यास सज्ज आहेत असे उद्गार संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी काढले. लहानापासून ते वृध्द व्यक्तीपर्यंत सर्वांनाच आनंद देणारे श्राव्य माध्यम म्हणजे रेडिओ. म्हणूनच संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव यांच्या संकल्पनेतून "जे एम एफ ध्वनी ८८.४" ची संकल्पना साकारली गेली.
दिनांक २३ जानेवारी रोजी ब्रह्मा रंगतालय मंचावर "जे एम एफ रौप्यगौरव पुरस्कार" वितरण सोहळा पार पडला. स्मरणिके साठी संतोष पवार व निमा बृजेश यांचे फार मोठे योगदान ठरले. 'जे एम एफ' शिक्षण  संस्थेसाठी केलेले उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्याची पोचपावती म्हणून शाळा महाविद्यालयांमध्ये कार्यरत असलेले निवडक सदस्यांना "रौप्यगौरव पुरस्कार स्मृतिचिन्ह" प्रदान करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे आणि खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी संस्थेच्या रजत महोत्सवी निवडक सदस्यांना पुरस्कार प्रदान केला. दिलेल्या कामाची जबाबदारी आणि पूर्तता केलेल्या कामाची दखल घेतली जाणे हाच खरंतर मोठा पुरस्कार आहे. संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे आणि खजिनदार जान्हवी कोल्हे यांच्या हस्ते निवडक सदस्यांना रौप्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याच बरोबर 'जे एम एफ' मधील सर्व कौटुंबिक सदस्यांना देखील रजत महोत्सवी भेटवस्तू देण्यात आली.
पुरस्कार हा केवळ पुरस्कार नसून आपण केलेल्या कार्याची पोचपावती आहे, आणि ही पोचपावती जपून ठेवून येणाऱ्या अनेक वर्षात मोठ्या उत्साहात आणि परिश्रमाने कार्य करत राहणे  म्हणजे हा प्राप्त झालेला पुरस्कार एक प्रकारचे स्फूर्तीदायी आणि शक्ती वर्धक औषधचं आहे, असे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या भाषणात म्हटले व पुरस्कारकर्त्यांचे अभिनंदन केले.
'जे एम एफ' रौप्य गौरव पुरस्कार मिळाला म्हणून इथेच न थांबता एक पाऊल पुढे टाकताना इतरांनाही आपल्या बरोबरीने पुढे घेऊन चला आणि 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे नाव अजून उज्वल करा असे सांगत सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. नृत्य, गायन, नाटिका या कार्यक्रमाचे सादरीकरण करून आणि भोजनाचा आस्वाद घेऊन 'जे एम एफ' संस्थेचा रजत महोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला गेला.