BREAKING NEWS
latest

पदवीला प्रवेश घेण्यासाठी मतदार ओळखपत्र बंधनकारक; राज्य सरकारचा मोठा निर्णय..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून पदवी अभ्यासक्रमासाठी (ग्रॅज्युएट) कॉलेजमध्ये प्रवेश घेताना, इतर महत्वाच्या कागदपत्रांसोबत मतदार ओळखपत्रही द्यावे लागणार आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली.

  वयाची १८ वर्षे पूर्ण झाली असल्यास, काॅलेजमध्ये पदवीला प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना इतर कागदपत्रांसोबत 'व्होटर आयडी'चीही झेराॅक्स द्यावी लागेल. कॉलेजला प्रवेश घेताना विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी झाली की नाही, याची तपासणी केली जाणार आहे. मतदार जनजागृती करण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
  ते म्हणाले, की पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना, विद्यार्थ्यांना अनेक कागदपत्रे सादर करावी लागतात. आता त्यात मतदार ओळखपत्राचीही भर पडणार आहे. विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी केली की नाही, याची तपासणी प्रवेश देताना कॉलेजकडून केली जाईल. जेणेकरून लोकशाहीची मूल्यं जोपासत मतदार नोंदणीचे कामही यानिमित्ताने होणार आहे.

पदवीचा अभ्यासक्रम चार वर्षांचा

  दरम्यान, पुढील वर्षीपासून पदवीचा अभ्यासक्रम चार वर्षांचा केला जाणार आहे. यासंदर्भात यूजीसीने मसूदा तयार केला असून, त्यांच्या गाईडलाईननुसार चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असेल. या अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत.

  शिक्षण विभागाच्या नवीन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना तयारी करावी लागेल. त्यात काही अडचणी आल्यास, सेवानिवृत्त कुलगुरूंची समिती वेळोवेळी मार्गदर्शन करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत