BREAKING NEWS
latest

'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांचे नोकरीसाठी अर्ज व मुलाखत पूर्व तयारीच्या मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : आयुष्याच्या टप्प्यामधला पहिला टप्पा म्हणजे 'शिक्षण' आणि त्यानंतरचा महत्वाकांक्षी टप्पा म्हणजे 'नोकरी'. दोन्ही गोष्टीसाठी योग्य मार्गदर्शक लाभला तर योग्य मार्ग स्वीकारण्यास मदतच होते. 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे संस्थापक माननीय डॉ.राजकुमार कोल्हे यांनी अशाच एका कार्यशाळेचे आयोजन 'जे एम एफ' च्या 'मधुबन' वातानुकुलीत दालनामधे केले. इयत्ता नववी पासून पुढे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले जवळपास २०० विद्यार्थी या कार्यशाळेत हजर होते.
नोकरीसाठी मुलाखतीला जाताना कोणकोणत्या आवश्यक गोष्टींची कशी तयारी करायला पाहिजे त्याचे मार्गदर्शन डॉ.राजकुमार कोल्हे यांनी मुलांना केले. त्यामधे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा परिचय पत्रक (बायोडाटा/रेज्युमे) कसा असावा, त्याच बरोबर मुलाखतीला सामोरे जाण्याधी तुमच्यामधील आत्मविश्वास तुमच्या मनामधे आणि चेहऱ्यावर असला पाहिजे, असे डॉ.राजकुमार कोल्हे यांनी कार्यशाळेत उपस्थित मुलांना सांगितले.
मुलाखती दरम्यान दिशाभूल करणारे अनेक प्रश्न देखील तुम्हाला विचारले जातात त्यासाठी गोंधळून न जाता विचार करून आत्मविश्वास पूर्वक त्याची उत्तरे द्या कारण त्या प्रश्नातच उत्तरे दडलेली असतात, तुमचा बायोडाटा (परिचय पत्रक) हा सुटसुटीत, नीटनेटका आणि संपूर्ण खऱ्या माहितीचा असावा व तो लिहण्याची पद्धत देखील कशी असावी याची माहिती देऊन डॉ.राजकुमार कोल्हे यांनी त्याबद्दलची चित्र फित दाखवली. त्याच बरोबर पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी सराव मुलखातीचे (मॉक इंटरव्ह्यू) देखील आयोजन केले.
सर्व उपस्थित विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन संस्थेचे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी केले व त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. ही कार्यशाळा सफ़ल करण्यासाठी प्राचार्य नाडर सर, प्रोफेसर गिरीष छगाणी, उपप्राचार्या वनिता लोखंडे, सर्व अध्यापक वर्ग यांनी सराव मुलाखतीचे आयोजन करण्यात मोलाचे सहकार्य करून अतिशय सुंदर रीतीने ही कार्यशाळा खूपच उपयुक्त अशी झाली.

ठाणे शहरातील महिला व पुरूषांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र, चैन जबरीने खेचुन चोरी करणारे सराईत चोरटे कल्याण गुन्हे शाखा, घटक-०३ कल्याण यांनी केले जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : कोळशेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ९३०/२०२४, बी.एन.एस. २०२३ चे कलम ३०९ (४), ३(५) या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक - ३ कल्याण कडुन करण्यात येत असतांना सदर गुन्ह्यातील व ठाणे शहरात विविध ठिकाणी केलेल्या जबरी चोरीतील संशयीत इसम हे आंबिवली, ता. कल्याण परिसरात येणार असल्याचे  बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्यानंतर मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-०३ कल्याण कडील पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी आंबिवली परिसरातील इराणी वस्तीमध्ये सापळा लावुन सशंयीत इसम नामे १) तौफीक तेजीब हुसेन (वय: २९ वर्षे) मुळ राहणार - चिंदरी रोड, बदुरूदीन कॉलनी, बिदर, कनार्टक, सध्या राहणार - इंदिरानगर, वाल्मिकी शाळेसमोर, आंबिवली पश्चिम, २) मोहम्मद अली उर्फ कालीचरण झेवेरी अली (वय: ३६ वर्षे) राहणार - चिंदरी रोड, बदुरूदीन कॉलनी, बिदर, कनार्टक, ३) अब्बास सल्लु जाफरी (वय: २७ वर्षे) राहणार - स्वतःचे घर, गल्ली नं. ०४, भास्कर शाळेच्या जवळ, पाटील नगर आबिवंली कल्याण पश्चिम, ४) सुरज उर्फ छोटया मनोज सांळूखे, (वय: १९ वर्षे), राह. माउली कृपा चाळ, रूम नं. १, पाटील बाबाचा बेडा परिसर, पाटील नगर, बेडयाचा पाडा, आंबिवली पश्चिम, कल्याण, जि.ठाणे यांना मोठ्या शिताफिने ताब्यात घेण्यात आले.

आरोपींकडुन ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात चैन स्नॅचिंगचे ४० गुन्हे, मोबाईल चोरीचे २४ गुन्हे, वाहन चोरीचे ०६ गुन्हे असे एकुण ७० गुन्हे केले असल्याची कबुली दिली असुन त्यांनी चैन स्नॅचिंग करून चोरी केलेला एकुण ५१ तोळे (५१० ग्रॅम) वजनाचे सोन्याचे वेगवेगळे दागिने, २४ वेगवेगळया कंपनीचे मोबाईल फोन तसेच ०६ मोटार सायकली, एक मारूती स्विप्ट कार असा एकुण ५०,१८,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून एकुण ७० गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असुन मोबाईल चोरी व वाहन चोरीचे गुन्हे कोणकोणत्या ठिकाणी केले आहेत याचा तपास सुरू आहे.
प्रस्तुत यशस्वी कामगिरी मा.आशुतोष डुंबरे पोलीस आयुक्त ठाणे शहर, मा.पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, मा.अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे व मा.शेखर बागडे, सहा. पोलीस आयुक्त, (शोध - १) गुन्हे ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सपोनि. संतोष उगलमुगले, पोउपनि. विनोद पाटील, पोलीस अंमलदार दत्ताराम भोसले, विलास कडु, अनुप कामत, प्रशात वानखेडे, गोरखनाथ पोटे, किशोर पाटील, उल्हास खंडारे, अदिक जाधव, सचिन वानखेडे, दिपक महाजन, गुरूनाथ जरग, मिथुन राठोड, विजेंद्र नवसारे, विनोद चन्ने, गोरक्ष शेकडे, सतिश सोनवणे, रविंद्र लांडगे, महिला पोलीस अंमलदार ज्योत्स्ना कुंभारे, मिनाक्षी खेडेकर, मंगल गावित यांनी यशस्वीपणे केलेली आहे.

व्हीव्हीपॅटमधील मते पुनर्मोजणीसाठी डोंबिवलीत दीपेश म्हात्रे यांनी भरली चार लाखाची रक्कम..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : डोंबिवली विधानसभा निवडणुकीतील ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे दहा व्हीव्हीपॅट यंत्रातील मते पुन्हा मोजणीसाठी अर्ज केला आहे. या प्रक्रियेसाठी लागणारी चार लाख ७२ हजार रुपयांची रक्कम उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे भरणा केली आहे. त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने डोंबिवलीत ईव्हीएम विरुद्ध आंदोलन सुरू केले असून त्या आंदोलनाचा भाग म्हणून शहरात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे.

डोंबिवलीत ईव्हीएम विरोधात राबविण्यात येत आहे स्वाक्षरी मोहीम

शहरातील सामान्य नागरिकांनी ईव्हीएम विरोधात रोष व्यक्त केला आहे. त्यामुळे लोकांच्या मागणीचा विचार करून डोंबिवली शहराच्या विविध भागात ठाकरे गटाकडून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून ईव्हीएम यंत्राऐवजी कागदी मतपत्रिकेच्या माध्यमातून निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली जाणार आहे, असे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.

डोंबिवली विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मतदानाच्या दिवशी बाहेर आलेले आकडे पाहता, त्यात तफावत दिसून आली आहे. त्यामुळे आपण १० व्हीव्हीपॅट यंत्रांमधील मते पुनर्मोजणीची मागणी केली आहे. त्यासाठी लागणारे शुल्क जिल्हाधिकारी कार्यालयाकडे भरणा केले आहे, असे दीपेश म्हात्रे यांनी स्पष्ट केले. या प्रक्रियेमुळे पुढील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून व्हीव्हीपॅट यंत्रातील मते मोजणीसाठी ठिकाण आणि तारीख निश्चित केली जाईल, असे ते म्हणाले. मतदान प्रक्रियेत गडबड होत असल्याचे पुरावे बाहेर आले आहेत. लोकशाही टिकविण्यासाठी आणि जनतेच्या विश्वासाला धक्का लागणार नाही यासाठी आम्ही हा लढा देत आहोत, असे माजी सभापती आणि उबाठा गटाचे पराभूत उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी सांगितले. या मतमोजणी प्रक्रियेवरून डोंबिवलीत ठाकरे पक्ष आणि भाजपमधील धुसफूस पुन्हा वाढण्याची चिन्हे आहेत.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये भारत विकास परिषदेकडून तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत 'एनिमिया मुक्त' तपासणी शिबिर आयोजन व संविधान दिवस साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - सामाजिक कार्य आणि बांधिलकीच्या भावनेतूनच 'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. मुलींच्या व महिलांच्या शरीरात हिमोग्लोबिन ची कमतरता  
(एनिमिया) होण्याचे प्रकार सध्या अस्तित्वात दिसून येत आहे. मुलींचे स्वास्थ नीट असावे असा विचार करून संस्थेच्या संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे व संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी भारत विकास परिषदेच्या अंतर्गत तज्ञ शल्य चिकित्सकांचे शिबिर संस्थेच्या मधुबन वातानुकुलीत दालनांमध्ये आयोजित केले. 'जे एम एफ' संस्था अंतर्गत जन गण मन इंग्लिश शाळा आणि विद्यामंदिर तसेच वंदे मातरम् महाविद्यालय मधील वय वर्षे दहा पासून पुढे सर्वच विद्यार्थीनी, महिला, पालक, शिक्षिका यांच्यासाठी रक्तक्षय तपासणी करण्यात आली.
 कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोकण प्रांताचे अध्यक्ष सीमांत जी प्रधान, अध्यक्ष ऍड.वृंदा कुलकर्णी, डॉ.सचिन पेणकर, डोंबिवली शाखेचे संस्थापक अध्यक्ष श्री.माधव जोशी यांची उपस्थिती प्रार्थनीय होती तर कारगिल युध्दात शहीद झालेले कॅप्टन विनय कुमार सचान यांचे मातोश्री व पिताश्री आवर्जून उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. भारत माता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आज संविधान दिवस म्हणून उपस्थित सर्व  समुदाय व विद्यार्थी यांच्याकडून भारताचे संविधान उद्देशिका प्रतिज्ञा घेतली.त्याच बरोबर २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला आज १६ वर्ष पूर्ण झाली. त्या सर्व शहिदांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
 आजच्या कार्यक्रमाबद्दल बोलताना डॉ. राजकुमार कोल्हे म्हणाले की, सर्व विद्यार्थीनी आणि महिलांनी मनाबरोबरच शरीराने ही तंदुरुस्त असावे, त्यासाठी योग्य सात्विक आहार सेवन करावा. स्त्री हे शक्तीचे रूप आहे, एकाच वेळी अनेक कामे करताना आपल्या शरीरातील होणाऱ्या बदलांकडे ही लक्ष द्यावे व  काळजी घ्यावी असे सांगितले. दहा वर्षा पुढील सर्व विद्यार्थिनींनी पोषक आहार सेवन करून व्यायाम करणे गरजेचे आहे तरच रक्तातील लाल पेशी वाढतील असे सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी विद्यार्थिनींना सांगितले तर रोजची तारेवरची कसरत करणाऱ्या माझ्या सख्यांना मी एवढच सांगू इच्छिते की कामातून वेळ काढून स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्या व गोळ्या औषधंपेक्षा प्रोटीनयुक्त पोषक आहार घेऊन आपल्या रक्तातील लाल पेशीचे प्रमाण वाढवा असा सल्ला दिला.
तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने सर्व विद्यार्थिनी महिलांची रक्तक्षय तपासणी करून गरजेनुसार औषधेही दिली त्याच बरोबर सेवन करण्यासाठी प्रोटीन व लोह युक्त आवश्यक असे भाजके फुटाणे व गुळाचे पाकीट देखील सर्वांना दिले. यामधे १२०० च्या वर विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी सहभाग घेतला.

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी पुन्हा रश्मी शुक्ला यांची वर्णी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई :- राज्याच्या पोलीस महासंचालक पदी पुन्हा एकदा रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात गृह विभागाकडून फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. त्यानंतर ५ नोव्हेंबर रोजी महासंचालक पदी संजय कुमार वर्मा यांना पदभार देण्यात आला होता. आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याने पुन्हा रश्मी शुक्ला यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा पदभार देण्यात आला आहे.

१४४ कल्याण ग्रामीण मतदारसंघातील आजचा निकाल हा दुःखदायक नसून आश्चर्यकारक - योगेश दराडे

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : मागील एक महिन्यापासून प्रचारानिमित्त प्रत्येक मतदारापर्यंत आम्ही पोहचलो. राजूदादांनी आपल्या मतदारसंघात आतापर्यंत केलेली सर्व कामे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. राजूदादा आमदार होते परंतु सत्तेत नव्हते तरीही त्यांनी रस्त्यावर उतरून लोकांचे प्रश्न मार्गी लावले. कोरोना काळातील त्यांनी केलेले काम खरंच उल्लेखनीय होते. अनेक सामाजिक संस्था, धार्मिक संघटनांनी त्यांच्या कामाची पोहचपावती म्हणून धर्म, पक्ष, राजकीय विचारधारा न पहाता जाहीरपणे पाठिंबा दिला व आपले अमूल्य मत राजूदादांना दिले. 

सर्वच ठिकाणी राजूदादांचा बोलबाला होता अगदी विरोधी पक्षांनी प्रामाणिकपणे याची कबुली देखील दिली होती. राजूदादा निवडून येणार यात कोणतेच दुमत नव्हते परंतु शेवटच्या काही दिवसांमध्ये सत्याधाऱ्यांकडून झालेला पैशांचा पाऊस, स्वपक्षीय, मित्रपक्ष व विरोधी पक्ष जे दादांसाठी मैदानात येऊन उभे राहिलेत किंवा बाहेरून पाठिंबा दिला अशा लोकांच्या तडीपाऱ्या यामुळे काही प्रमाणात खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला. तरीही स्वपक्षीय, मित्रपक्ष व विरोधी पक्ष सर्वांनी न डगमगता राजूदादांसाठी काम केले त्यामुळे राजूदादा निवडून येणे हे स्वाभाविक होते यामुळे सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि अजून काही षडयंत्र करता येऊ शकते का यावर कार्यप्रणाली कामाला लावली असेल याबाबत शंका निर्माण होते. 

याचेच उदाहरण म्हणजे मतदानाच्या दिवशी वापरात आलेल्या ईव्हीएम मशीन आहे. ज्या ईव्हीएमचा वापर मतदानासाठी सकाळी सात वाजेपासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत झाला त्या ईव्हीएम मशीन मतमोजणीच्या दिवशी म्हणजे चार दिवसानंतरही ९९% चार्ज कशा राहिल्या ? असा सवाल उपस्थित होतो. साधारण ११ तास मतदानाच्या दिवशी ईव्हीएम मशीनचा वापर झाला त्या अनुषंगाने त्याची बॅटरी ४० ते ५० टक्के तरी संपणे आवश्यक होते, परंतु मतदान केंद्रावर मतमोजणीच्या वेळेस बऱ्याच प्रतिनिधींच्या ही बाब लक्षात आल्यानंतरही लेखी निवेदन देऊनही निवडणूक आयोगाने यावर कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही. त्यामुळे या सर्वच प्रक्रियेवर खूप मोठे प्रश्न चिन्ह निर्माण होते ? सर्वच थरांमधून पाठिंबा असूनही सत्ताधारी पक्षाचा उमेदवार आणि राजू दादांमध्ये ६६ हजार ३९६ मतांचा फरक हीच गोष्टच पचनी पडत नाहीये."ईव्हीएम चा झोल" हेच या विजया मागील गमक दिसून येते यात तिळमात्र शंका नाही.

नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे यांनी जनतेने निवडून दिलेल्याच्या आशीर्वादाबद्दल मानले जनतेचे आभार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : विधानसभा कल्याण ग्रामीण १४४ मतदारसंघाचे शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय महायुतीचे शिवसेना गटाचे अधिकृत उमेदवार राजेश मोरे यांचा ६६४९६ मतांनी दणदणीत विजय झाला असून कल्याण ग्रामीण मतदार संघातील जनतेने आपल्यावर विश्वास ठेऊन आपल्याला मतदान करून निवडून दिल्याचा आशीर्वाद दिला आहे त्याबद्दल त्यांचा मी खुप आभारी आहे, मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला आशीर्वाद देत दिलेली उमेदवारी आणि राज्यातील जनतेसाठी राबविलेल्या लाडकी बहिण सारख्या लोकोपयोगी छोट्या मोठ्या योजना लोकांच्या उपयोगी ठरल्या आहेत. या योजनांवर विश्वास ठेवत आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या ग्रामीण मतदार संघात केलेल्या विकास कामावर विश्वास ठेऊन या जनतेने प्रचंड मोठा आशीर्वाद आपल्याला दिला आहे त्या सर्व मतदारांचे आणि शिवसैनिक कार्यकर्ते यांचे आपण आभार मानतो अशा शब्दात कल्याण ग्रामीणचे नव निर्वाचित आमदार राजेश मोरे यांनी आपल्या भावना प्रसिद्धी माध्यमांसमोर व्यक्त केल्या.
                                            


कल्याण ग्रामीण १४४ च्या मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविणाऱ्या राजेश मोरे यांना या मतदार संघातून तब्बल १ लाख ४१ हजार १६४ मतदारांनी मोरे यांच्या बाजूने कौल दिल्याने मोरे यांना ६६३९६ मताचे मताधिक्य मिळाले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना राजेश मोरे यांच्या विजयाची अधिकृत माहिती मिळताच विजयी मिरवणूक काढत आमदार राजेश मोरे यांचे अभिनंदन केले. पेंढारकर महाविद्यालयापासून काढण्यात आलेल्या विजयी रॅलीवर जागोजागी गुलाल आणि बुलडोझर मधून फुलाची उधळण करत मतदार आणि कार्यकर्त्यांनी राजेश मोरे यांना शुभेच्छा दिल्या.


सामान्य कार्यकर्ता घासून पुसून नव्हे तर ठासून जिंकून आला - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे 

दरम्यान यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हा कल्याण ग्रामीणच्या जनतेचा विजय आहे, आम्ही मागील १० वर्षे या भागात केलेल्या कामाचा विजय आहे. मुख्यमंत्री एकनाथ एकनाथ शिंदे यांनी मागील अडीच वर्षे केलेल्या लोकोपयोगी कामाचा हा विजय आहे. एक सामान्य कार्यकर्ता घासून पुसून नव्हे तर ठासून जिंकून आला आहे. महायुतीने मागील अडीच वर्षात केलेल्या कामामुळे मोठे यश महाराष्ट्रात महायुतीला  मिळाले आहे. जनतेने एकतर्फी विजय महायुतीला दिला आहे. महायुतीच्या झंजावतापुढे महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.