BREAKING NEWS
latest

राज्य सरकारचा ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा..


प्रतिनिधी: अवधूत सावंत

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील लाभार्थ्यांकडून दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर एप्रिल ते जून या कालवधीत उत्पन्नचा दाखला घेण्याची तरदूत होती. मात्र ५० वर्षावरील जेष्ठ, वृद्ध नागरिकांचे यासंदर्भातील अडचण लक्षात घेता सामाजिक न्याय विभागाने दिलासा दिला आहे. ज्या लाभार्थ्यांचे वय ५० पेक्षा अधिक आहे त्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला सादर न करता पाच वर्षातून एकदाच दाखला घेणेबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ५० वर्षावरील लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतः या चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी ३५ वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त आशा या सर्वांना लाभ मिळतो. तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून दारिद्रय रेषेखालील यादीच्या कुटूंबात नांव असलेल्या व रु.२१,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या पात्र लाभार्थ्यास अर्थसहाय्य देण्यात येते.

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या योजनेअंतर्गत ५० वर्षावरील लाभार्थ्यांना दरवर्षी उत्पन्न दाखला मिळवताना अडचणी येत असल्याने त्याबाबत दखल घेण्यात आली आहे, त्यानुसार उत्पन्न दाखल्याच्या अटीमध्ये बदल करण्यात आला असून आता ज्यांचे वय ५० पेक्षा अधिक आहे अशाच लाभार्थ्यांना ५ वर्षांमध्ये एकदाच उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे.
श्री.सुमंत भांगे, सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य.




 

« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत