BREAKING NEWS
latest

बंदुकीचा धाक दाखवून आयआयटी विद्यार्थिनीवर बलात्कार करणारे तिन्ही आरोपी बीजेपी च्या आयटी सेलचे पदाधिकारी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

वाराणसी: उत्तरप्रदेशातील वाराणसी येथे गेल्या २ महिन्याआधी आयआयटी बीएचयू च्या विद्यार्थिनीसोबत सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर मोठा गदारोळ झाला. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून या आरोपींना पकडण्यात पोलीसांना यश आले नव्हते. मात्र शनिवारी पोलीसांनी आणखी तीन आरोपींना अटक केली आहे. मात्र तिन्हीही आरोपी हे भाजपाचे पदाधिकारी असल्याने त्यांना पकडण्यात पोलीसांनी दिरंगाई दाखविली असल्याचा आरोप विरोधी पक्ष सोशल मिडीयावर करीत आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला आयआयटी बीएचयू मध्ये एका विद्यार्थिनीचा विनयभंग झाला होता. मित्रासोबत जाणाऱ्या तरुणीला तीन तरुणांनी अडवून तिचा विनयभंग केला आणि व्हिडिओही बनवला. या घटनेच्या निषेधार्थ अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरले. विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत विद्यार्थी कॅम्पस मध्ये बॅनर, पोस्टर घेऊन निदर्शने करत होते.

आता वाराणसी पोलीसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. कुणाल पांडे, आनंद उर्फ ​​अभिषेक चौहान आणि सक्षम पटेल यांना वाराणसी पोलीसांनी अटक केली आहे. या तिघांवर विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर त्याचे चित्रही समोर आले. पोलीसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलही जप्त केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी भाजप आयटी सेलशी संबंधित असून अनेक बड्या नेत्यांसोबत त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

लंका पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल

मात्र, या घटनेनंतर बीएचयूमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे पोलीसही कामाला लागले. या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी संपूर्ण कॅम्पस बंद ठेवला होता. वर्गखोल्या आणि प्रयोगशाळेतील संशोधनाचे कामही बंद झाले. संपूर्ण कॅम्पसची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. त्याचवेळी पोलीसांनी या प्रकरणी लंका पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला होता.

विद्यार्थिनीने दिलेल्या जबानीत म्हटले आहे की, ती बुधवारी रात्री दीड वाजता वसतिगृहातून काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडली होती. कॅम्पसच्या गांधी स्मृती चौकाजवळ तिचा मित्र भेटला. आम्ही दोघे सोबत जात असताना वाटेत करमन बाबा मंदिरापासून ३०० मीटर अंतरावर मागून एक बुलेट आली.त्यावर तीन मुले स्वार होती. त्यांनी मला आणि माझ्या मित्राला दुचाकी उभी करून अडवून गैरवर्तन केल्याचे पीडितेने सांगितले. मी मदतीसाठी आरडाओरडा केल्यावर त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाबाबत काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने योगी सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत