ठाणे : दिवा विभागात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या व अस्तित्वात असलेल्या अनधिकृत बांधकामांवर ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप उद्धवसेनेचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ऍड. रोहिदास मुंडे यांनी केला आहे.
निवडणूक काळात व त्या आधीही दिवा परिसरात अनेक अनधिकृत इमारती, मजले व बांधकामे उभी राहिली. यासंदर्भात अनेक इमारतींना नोटिसा देण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. यापूर्वी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खान कंपाऊंड परिसरातील १५ अनधिकृत इमारती तोडण्यात आल्या.
दिवा विभागात कारवाई न होणे म्हणजे न्यायालयीन आदेशांचा आणि कायद्याचा अवमान असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या संदर्भात पालिका आयुक्तांना निवेदन देत सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मागणी केली आहे. ठोस कारवाई झाली नाही, तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करू, असा इशाराही मुंडे यांनी दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा