BREAKING NEWS
latest

मार्चपासून पत्रीपुलाच्या तिसऱ्या पुलावरून होणार वाहतुकीचा सुखकर प्रवास..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : पत्रीपुलाच्या तिसऱ्या उड्डाणपुलावरून वाहतूक महिनाभर विलंबाने सुरू होणार असून जे काम फेब्रुवारी महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु आता ते मार्चमध्ये होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) च्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. त्याच विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तो पूल जानेवारी अखेर काम पूर्ण होऊन फेब्रुवारी महिन्यात खुला केला जाईल असे सांगितले होते. त्यानुसार पुलाच्या गर्डरचे काम पूर्ण झाले असून अन्य कामे सुरू आहेत, तांत्रिकदृष्ट्या ती कामे पुढे नेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

या पुलासाठी ३१ कोटींचा निधी मंजूर झाला होता, त्या पुलाचे ३६.६ आणि ४० मीटर अशा दोन भागात गर्डर टाकण्यात आले होते. पुलाची लांबी १०९ मीटर असून त्या पुलाची मागणी कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खा. श्रीकांत शिंदे यांनी केली होती. त्यानुसार तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एमएसआरडीसीने त्यास मंजुरी दिली. नव्या पुलामुळे वाहतूककोंडी कमी होणार असून समांतर रेल्वे उड्डाणपूल होणे आवश्यक होते. त्यानुसार आधीचा उड्डाणपूल तयार झाल्यावर तिसरा उड्डाणपूल होणे आवश्यक होते.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत