BREAKING NEWS
latest

अर्थसंकल्पात मोदी सरकारकडून आश्वासनांचा पाऊस ! २ कोटी लोकांना मिळणार घरे, मोफत वीज..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

देशाचा अंतरिम अर्थसंकल्प मोदी सरकारने सादर केला असून या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना आकर्षित करण्यासाठी आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला आहे. सरकारने आपल्या अंतरिम अर्थसंकल्पात अनेक घोषणा केल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॅन्सरसारख्या आजारांना रोखण्यासाठी सरकारकडून गंभीर पावले उचलली जातील, असे त्यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले. त्यासाठी सरकार लसीकरणासारख्या मोहिमा सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. निर्मला सीतारामन यांचा उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न असेल. मिशन इंद्रधनुष अंतर्गत लसीकरण वाढविण्याचे काम केले जाईल. नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचे काम केले जाईल यासाठी समिती स्थापन करणार आहे. ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींना मोफत लसीकरण तसेच नॅनो डीएपीचा वापर पिकांवर केला जाईल. दुग्धविकास क्षेत्रात चांगले काम होईल. दूध उत्पादकांना प्रोत्साहन देणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. तेलबियांवरील संशोधनाला चालना दिली जाईल. दर महिन्याला ३०० युनिट वीज मोफत दिली जाणार आहे.

शेतकरी आणि महिलांसाठीही मोठी घोषणा

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान जन धन योजनेंतर्गत लोकांना लाभ देण्याबाबत सांगितले. दरम्यान, सीतारामन म्हणाल्या की, पीएम जन धन योजनेअंतर्गत आदिवासी समाजापर्यंत पोहोचले पाहिजे. खास जमातींसाठी खास योजना आणली आहे. यानंतर त्या म्हणाल्या की, पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळाली आहे. सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचत आहेत. अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना ते म्हणाले की, सरकार गरिबी हटवण्याचे काम करत आहे. सरकारने आव्हानांचा धैर्याने सामना केला आहे. ग्रामीण विकासाच्या योजना राबविण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळत आहे.

निर्मला सीतारामन यांनी सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली. ते म्हणाले की, ४ कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला आहे. ११.८ कोटी लोकांना पीएम किसान योजनेतून आर्थिक मदत मिळणार आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच तरुणांना सक्षम बनविण्याचे काम करत आहे. तीन हजार नवीन आयटीआय सुरू झाल्याची माहिती त्यांनी यावेळी  दिली. देशभरात ५४ लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

येत्या ५ वर्षांत २ कोटी कायमस्वरूपी घरे बांधली जातील

अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पीएम आवास योजनेंतर्गत वितरित घरांची संख्या सांगितली. येत्या पाच वर्षांत आणखी दोन कोटी घरे बांधण्याचे काम केले जाईल, असे ते यावेळी म्हणाल्या. कर्करोगावरील लसीकरणाला चालना दिली जाईल, ते रोखण्यासाठी काम केले जाईल. सरकार ९ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींना मोफत लसीकरण करणार आहे. आतापर्यंत १ कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे काम केले जाणार आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत