BREAKING NEWS
latest

शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी डोंबिवलीत मनसे करणार खळखट्याक आंदोलन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
    
डोंबिवली दि.२४ : डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या के.व्ही.पेंढारकर महाविद्यालय प्रशासन विरोधात सेव्ह पेंढारकर महाविद्यालय मोहिमे अंर्तगत माजी विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या बेमुदत साखळी उपोषणाला दहा दिवस झाले आहेत. सोमवारी २४ तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने उपोषणकर्त्यांची भेट घेतली. तसेच त्यांनी महाविद्यालयाचे संस्थाध्यक्ष प्रभाकर देसाई यांचीही भेट घेतली. त्यानंतर प्रशासनाच्या मनमानी कारभार विरोधात मनसे शिक्षक आणि विद्यार्थ्यांकरता लवकरच खळखट्याक आंदोलन करेल असे मनसे महाराष्ट्र प्रदेश व मुंबई विद्यापीठ प्रमुख संघटक संतोष गांगुर्डे यांनी जाहीर केले.

मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार मनविसेच्या शिष्टमंडळाने डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे के.व्ही.पेंढरकर महाविद्यालयाचे संस्थाध्यक्ष प्रभाकर देसाई यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश राज्य संघटक संतोष गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण जिल्हा अध्यक्ष धनंजय गुरव, डोंबिवली शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे, मनविसे कल्याण लोकसभा जिल्हा सचिव प्रितेश पाटील, उपजिल्हा अध्यक्ष दिप्तेश नाईक, शहर सचिव प्रितेश म्हामुणकर, उपशहर अध्यक्ष प्राजक्ता देशपांडे, यतिन पांडगावकर, प्रतीक देशपांडे, शहर संघटक हरिश पाटील, संजय चव्हाण यांनी चर्चा केली. त्यानंतर शिष्टमंडळाने उपोषणकर्त्यांची भेट घेतली.

दरम्यान महाराष्ट्र प्रदेश राज्य संघटक गांगुर्डे म्हणाले, मनसेच्या आंदोलनात कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही. शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मनसे आवाज उठविणार. आम्ही प्रभाकर देसाई यांची भेट घेतली. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले होते. या निवेदनानुसार त्यांचे उत्तर हे विद्यापीठ पब्लिक युनिवर्सिटी कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. आडमुठेपणा आणि स्वतःचे स्वायत्तापण राखण्यासाठी हे केले होते. याबाबत समज देण्यासाठी आम्ही आलो होतो. अनुदानित महाविद्यालय बंद करून विनाअनुदानित करत आहात याचे कारण काय हे विचारले असता देसाई यांनी उतर दिले कि मला विद्यापीठाकडून तसेच केंद्र सरकारच्या विद्यापीठाच्या आयोगाकडून स्वायत्ता बहाल झाली आहे. त्यामुळे मी काहीही करू शकतो. शिक्षकांना एका खोलीत का बसवले याचाही जाब विचारला. शासकीय कामात बाधा का? शिक्षक वर्गात विद्यार्थ्यांना शिकविण्यास तयार आहेत. शिक्षकांना पगार मिळाला नाही याबाबत ते म्हणाले, शासनाचे म्हणणे आहे कि जे इन्चार्ज प्रिसिंपल आहेत त्यांची नेमुणूक केली नाही. त्यामुळे बिल आले नाही म्हणून पगार दिले नाही. मनसेचा याबाबत संघर्ष सुरु आहे. याचा जाब अमित ठाकरे शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन विचारणार आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत