दिवा : दिवा रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वेगाने वाढत असून दिवा शहराची ९० टक्क्यांपेक्षा जास्त लोकवस्ती पूर्वेला आहे. असे असूनही या स्थानकातील पूर्वेचे तिकीटघर रात्री नऊ वाजता बंद होत असल्याने त्यानंतर प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी पश्चिमेला जावे लागते.
मात्र पश्चिमेला असणारे तिकीटघर हे मुंबई दिशेकडे असल्याने प्रवाशांना पायपीट करावी लागते. यामुळे रात्रीच्या वेळेस विशेषतः महिलांना त्रास होत असल्याने पूर्वेचे तिकीटघर मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवावे, अशी मागणी दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ऍड. आदेश भगत यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा