BREAKING NEWS
latest

ठाण्यात घराणेशाहीला नकार, तर दिवा, डोबिंवलीत पाठींबा कसा ?


विशेष प्रतिनिधी

दिवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलांना ठाण्यात तिकीट नाकारले पण त्याचवेळी दिव्यात माजी उपमहापौर रमाकांत मढवींच्या मुलीला तर डोबिंवलीत आमदार मोरेंच्या मुलाला कसे तिकिट दिले गेले. यावर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये चर्चा रंगत आहे. 
  
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. ठाण्यातील खासदार, आमदार यांच्या मुलांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने शिंदे सेनेत नाराजीची लाट उसळली आहे. पण तेच उलट दिवा, डोंबिवलीत जल्लोष पहायला मिळाला. 

ठाण्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक आणि खासदार नरेश म्हस्के यांचे पुत्र आशुतोष म्हस्के यांना उमेदवारी नाकारण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. पण तेव्हाच दिव्यातील माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांची मुलगी साक्षी मढवी हिला दुसऱ्या दोन टर्म असलेल्या नगरसेविकेची तिकिट दिली गेली. तर डोंबिवलीतील आमदार राजेश मोरे यांच्या हर्षल मोरे याला तिकिट दिले गेले. शिंदेंचा ठाण्यात वेगळा न्याय आणि दिवा, डोंबिवलीत वेगळा न्याय का?असा सवाल नागरिक विचारत आहेत. सर्वांना समान न्याय मिळावा असे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे म्हणणे आहे.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये सद्य सवयी व भविष्यकाळातले जीवन "प्रेझेंट हॅबिट्स ऍण्ड फ्युचर लाईफ" या विषयावर व्याख्यानाचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली (कोपर) - व्याख्यानाचे वक्ते व 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांचे प्रेरणादायी विचार  श्रोत्यांना कायमच उस्फुर्त करत असतात. आपली व्याख्यानमाला सुरू करताना डॉ राजकुमार कोल्हे म्हणाले की, नवीन दिवस म्हणजे मिळणारी नवीन संधी असते, प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या अंगात असणाऱ्या चांगल्या वाईट सवयींचा गुलाम असतो, अंगभूत असणाऱ्या चांगल्या सवयी नेहमीच भविष्यकाळातील जीवन सुसह्य करून टाकतात तर वाईट सवयी ह्या भूत, वर्तमान आणि भविष्य यांचा पाठलाग करत राहतात. प्रथमतः वेळेचे नियोजन आणि वेळेची किंमत असणे हेच  खरे यशाचे गमक आहे. पैसा आणि वेळ या गोष्टीला जर तुम्ही प्राधान्य दिले तर अनेक  सकारात्मक गोष्टी तुमच्या जीवनात घडतील, यासाठी योगा करणे,  आवडीचे खेळ खेळणे या चांगल्या सवयी जर लावून घेतल्या तर भविष्यकाळातील जीवन तुम्ही आनंदाने आणि आत्मविश्वास पूर्वक जगू शकाल. स्वतः बरोबरच इतरांचाही आदर करण्याची कला आणि सवय सर्व जन माणसात असावी हे सांगताना डॉ. राजकुमार कोल्हे यांनी स्वामी विवेकानंद यांचे उदाहरण दिले की भारतातील प्रत्येक स्त्री ही पूजनीय, वंदनीय, महाराणी आहे म्हणूनच आमच्या भारतीय संस्कृती मधे स्त्रियांशी हस्तांदोलन न करता आम्ही हात जोडून नमस्कार करून स्त्री चा आदर करतो. 
आपल्या कामाशी, कर्तव्याशी प्रामाणिक राहा, असे सांगत जे आर. डी. टाटा यांचे उदाहरण दिले. भूतकाळ हा मनाचा पुसटसा आरसा असतो तर भविष्यकाळ हा मनाचा,  विचारांचा स्पष्ट दिसणारा चकाकणारा  आरसा असतो म्हणूनच भविष्यातील जीवन सुकर करण्याकरिता अंगभूत वाईट सवयींचा निचरा करा व चांगल्या सवयी वृद्धिंगत करून भविष्यातल्या आव्हानांना सामोरे जाण्याचे धाडस दाखवा असेही वक्ते डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले.
मधुबन वातानुकूलित दालनात उपस्थित असलेले सर्व शिक्षक, विद्यार्थी यांनी मनात रेंगाळत असलेले अनेक प्रश्न डॉ. राजकुमार कोल्हे यांना विचारले व त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळवली तसेच चांगल्या सवयी व वाईट सवयी कोऱ्या कागदावर लिहून वाईट सवयी चा कागद अग्निकुंड मधे टाकून येणाऱ्या नवीन वर्षांची सुरुवात ही फक्त आणि फक्त चांगल्या सवयीनी करायची असा प्रण देखील घेतला. अंगातील आळस जाऊन उत्साह येण्यासाठी सर्व उपस्थितांनी हलके फुलके नृत्य सादर केले. अध्यक्ष डॉ. राजकुमार, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे व खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन मनात  ठरवलेल्या संकल्पाने आणि आनंदाने येणारे २०२६ हे वर्ष सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करणारे ठरो अशा सदिच्छा दिल्या.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजप-शिवसेना युतीचा दबदबा निर्माण करत राज्यातील ८ महापालिकांमध्ये २२ उमेदवार बिनविरोध; भाजप आघाडीवर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

 मुंबई - राज्यातील महापालिका निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या एक दिवस अगोदरपर्यंत एकूण २२ उमेदवार बिनविरोध निवड झाले असून त्यांच्या विजयाची औपचारीकता बाकी आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली महापालिकेतून भाजपने विजयाचा शंखनाद फुंकला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात येथे भाजपच्या ५ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. तर, केडीएमसीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे ४ उमेदवार बिनविरोध आले आहेत. त्यामुळे, केडीएमसी महापालिकेत भाजप-शिवसेना युतीने ९ उमेदवार बिनविरोध करत मोठी आघाडी घेतली आहे. भाजपनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अहिल्यानगरमध्ये २ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. राज्यातील ८ महापालिकेत एकूण २२ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. 

बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये भाजपचे सर्वाधिक म्हणजेच १२ उमेदवार असून शिंदेंच्या शिवसेनेचे ७ उमेदवार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दोन उमेदवार बिनविरोध करण्यात यश मिळवलं आहे. तर, मालेगावमध्ये इस्लाम पार्टीचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. त्यामुळे, एकूण २२ उमेदवार बिनविरोध झाले आहे. दरम्यान, अद्यापही उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने आणखी काही ठिकाणी उद्या वेगळंच चित्र पाहायला मिळू शकतं.

८ महापालिकेतील भाजपचे एकूण १२ उमेदवार बिनविरोध

१. कल्याण-डोंबिवली - वॉर्ड १८ मधून भाजपच्या रेखा चौधरी
२. कल्याण-डोंबिवली - वॉर्ड २६ (क) मधून भाजपच्या आसावरी नवरे
३. कल्याण-डोंबिवली - वॉर्ड २६ (ब) भाजपच्या रंजना पेणकर
४. कल्याण-डोंबिवली - प्रभाग २४ (ब) मधून भाजपच्या ज्योती पाटील
५. कल्याण-डोंबिवली - प्रभाग २७ (अ) मधून भाजपच्या मंदा पाटील
६. धुळे - वॉर्ड क्र १ मधून भाजपच्या उज्ज्वला भोसले
७. धुळे - प्रभाग ६ (ब) मधून भाजपच्या ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील
८. धुळे - प्रभाग १७ मधून भाजपच्या सुरेखा उगले
९. पनवेल - वॉर्ड क्र १८ (ब) मधून भाजपचे नितिन पाटील
१०. भिवंडी - प्रभाग १७ (अ) मधून भाजपचे सुमित पाटील
११. जळगाव - प्रभाग १२ (ब) मधून भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे
१२. पिंपरी-चिंचवड - भोसरी प्रभाग ६ मधून भाजपचे रवि लांडगे बिनविरोध 

२ महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध

१. कल्याण-डोंबिवली - प्रभाग २४ (अ) मधून शिंदेंच्या शिवसेनेचे रमेश म्हात्रे
२. कल्याण-डोंबिवली - प्रभाग २४ (ब) मधून शिंदेंच्या शिवसेनेचे विश्वनाथ राणे
३. कल्याण-डोंबिवली - प्रभाग २४ (क) मधून शिंदेंच्या शिवसेनेच्या वृषाली जोशी
४. कल्याण-डोंबिवली - प्रभाग २८ (अ) मधून शिंदेच्या शिवसेनेचे हर्षल राजेश मोरे
५. जळगाव - प्रभाग १८ (अ) मधून शिंदेंच्या शिवसेनेचे गौरव सोनवणे
६. जळगाव - प्रभाग क्रमांक ९ (अ) मधून शिवसेना शिंदे गटाचे मनोज चौधरी बिनविरोध
७. जळगाव - प्रभाग ९ (ब) मधून शिवसेना शिंदे गटाच्या प्रतिभा देशमुख बिनविरोध 

अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार बिनविरोध

१. अहिल्यानगर - प्रभाग ८ (ड) मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कुमार वाकळे
२. अहिल्यानगर - प्रभाग क्रमांक १४ (अ) मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रकाश भागानगरे 

मालेगावमध्ये एक बिनविरोध

१. मालेगाव - वॉर्ड ६ (क) मधून इस्लाम पार्टीच्या मुनिरा शेख फकीर मोहम्मद

संरक्षण क्षेत्रासाठी ७९ हजार कोटींच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
नवी दिल्ली  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला गती देत संरक्षण क्षेत्रासाठी ७९,००० कोटी रुपये रुपयांच्या खरेदी प्रस्तावांना हिरवा कंदील दाखवला आहे. संरक्षण अधिग्रहण परिषदेने (DAC) घेतलेल्या या निर्णयामुळे केवळ देशाच्या सीमा अधिक सुरक्षित होणार नसून, भारतीय संरक्षण कंपन्यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. नवीन संरक्षण खरेदी नियमावलीनुसार (DPM), एकूण खरेदीमध्ये २५ टक्के आरक्षण सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (MSMEs) ठेवण्यात आले आहे. यामुळे संरक्षण क्षेत्रातील स्टार्टअप्सना मोठ्या कंपन्यांचे भागीदार म्हणून काम करण्याची संधी मिळेल. सरकारी कंपन्या मुख्य कंत्राटदार असतील, तर खाजगी कंपन्या आणि स्टार्टअप्स सुटे भाग पुरवण्याचे काम करतील.

या मंजुरीमध्ये भूदल, नौदल आणि वायुसेनेसाठी अत्याधुनिक उपकरणांचा समावेश आहे:

भूदल : पिनाका रॉकेट प्रणालीसाठी लांब पल्ल्याची मार्गदर्शित क्षेपणास्त्रे, ‘लॉइटर म्युनिशन्स’ (Loiter Munition) आणि ड्रोनविरोधी यंत्रणा.

वायुसेना : ‘अस्त्र मार्क-II’ (Astra Mk-II) क्षेपणास्त्रे, तेजस विमानासाठी ‘फुल मिशन सिम्युलेटर’ आणि ‘स्पाइस-1000’ मार्गदर्शक किट्स.

नौदल : बंदरातील कामांसाठी ‘बोलार्ड पुल टग्स’ आणि हाय-फ्रिक्वेन्सी सॉफ्टवेअर रेडिओ संच.

गुंतवणूकदारांच्या रडारवर असलेले शेअर्स बाजारातील तज्ज्ञ आणि ब्रोकरेज हाऊसेसच्या मते, या निर्णयाचा सर्वाधिक फायदा खालील कंपन्यांना होऊ शकतो:

१. हिंदुस्तान एरोनॉटिक्स (HAL): तेजस सिम्युलेटर आणि अस्त्र क्षेपणास्त्र एकत्रीकरणासाठी प्रमुख कंपनी.

२. भारत इलेक्ट्रॉनिक्स (BHEL): रडार, इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली आणि संप्रेषण उपकरणांसाठी मोठी संधी.

३. भारत डायनॅमिक्स (BDL): अस्त्र आणि पिनाका रॉकेट निर्मितीमध्ये या कंपनीचा मोठा वाटा असेल.

४. झेन टेक्नॉलॉजीज (Zen Tech): सिम्युलेटर आणि ड्रोन शोध यंत्रणेसाठी ही कंपनी चर्चेत आहे.

५. माझगाव डॉक आणि कोचीन शिपयार्ड: नौदलाच्या जहाजांच्या उपकरणांसाठी या कंपन्यांना फायदा मिळेल.

कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचे प्रभाग क्र. २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी तर प्रभाग क्र. २८ मधून हर्षल मोरे असे चार उमेदवार बिनविरोध विजयी..

विशेष प्रतिनिधी

डोंबिवली - कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी तर प्रभाग क्र. २८ मधून हर्षल मोरे असे शिवसेनेचे चार नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहे. यामुळे यांच्यासमवेत प्रभागात उभे असलेल्या भाजपच्या ज्योती पाटील यांदेखील विजयी झाल्या आहेत. यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेनेने आपले खाते उघडले आहे. कल्याण-डोंबिवलीत महायुतीचा महापौर शतप्रतिशत बसणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. तर येत्या दोन दिवसात इतर काही प्रभागात ही शिवसेनेचे काही उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. २४ मधील निवडणूक निकालांनी स्थानिक राजकारणात शिवसेनेचे स्थान अधिक भक्कम केले आहे.  या प्रभागात शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून भारतीय जनता पक्षाचा एक उमेदवार विजयी झाला आहे. तसेच प्रभाग क्र. २८ मधून हर्षल मोरे ही बिनविरोध निवडून आले आहेत. चारही जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने शिवसेनेला मिळालेला हा बिनविरोध विजय पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचा आणि शिवसेनेवर असलेल्या जनतेच्या विश्वासाचा विजय असल्याचे बोलले जात आहे. तर या चारही नगरसेवकांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे. 

शिवसेनेकडून प्रभागातील गटबाजी आटोक्यात ठेवत स्थानिक पातळीवरील समन्वय, संवाद आणि संघटनशक्ती या घटकांचा या निकालात महत्त्वाचा वाटा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चारही जागांवर शिवसेनेचा बिनविरोध विजय म्हणजे या भागातील सत्तेचे समीकरण मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्या बाजूने झुकल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. निकाल जाहीर होताच पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून हा विजय शिवसेनेसाठी केवळ निवडणुकीतील यश नसून आगामी महापालिका राजकारणात आत्मविश्वास मिळवून देणारा निर्णायक टप्पा ठरणार आहे. 

यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेवर महायुतीचा महापौर बसणार आणि यामध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या ही सर्वाधिक राहणार असल्याचे हे चार नगरसेवक उमेदवार बिनविरोध निवडून आले असल्याचे द्योतक मानले जात आहे.

३३ वर्षांनंतर पुन्हा उघडणार जेजे हत्याकांडाची केस..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध जे जे रुग्णालयात १९९२ साली घडलेल्या थरारक गोळीबार प्रकरणाचा खटला आता ३३ वर्षांच्या विलंबानंतर पुढच्या टप्प्यावर पोहोचला आहे. या खटल्यात विशेष टाडा न्यायालयाने दोन आरोपींच्या विरोधात अतिरिक्त पुराव्यांची नुकतीच नोंद करून घेतली आहे. फारुख मन्सुरी ऊर्फ फारुख टकला आणि त्रिभुवन रमापती सिंह ऊर्फ श्रीकांत राय या दोन आरोपींविरूद्ध अतिरिक्त पुरावे नोंदवण्यात आले आहेत.

विशेष न्यायालयाच्या या निर्णयामुळे खटल्याची कार्यवाही पुन्हा गती धरली आहे. यामुळे या प्रकरणातील न्यायलयीन प्रक्रियेत पुढील टप्प्यांसाठी मार्ग मोकळा झाला असून, आरोपींविरुद्ध पुरावे अधिक तपासल्या जाणार आहेत. विशेष टाडा न्यायालयात पोलिसांनी दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये गोळीबाराच्या संपूर्ण घटनाक्रम देण्यात आला आहे.

रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये अचानक बेछूट गोळ्यांचा वर्षाव झाला. अवघ्या काही सेकंदात होत्याच न्हवत झालं. ३३ गोळ्या झाडल्या गेल्या आणि संपूर्ण मुंबई या हत्याकांडाने बिथरली. मागच्या काही वर्षातील पोलीस रेकॉर्डनुसार, अरुण गवळीचा विश्वासू साथीदार शैलेश हळदणकर या मारेकऱ्यांचे लक्ष्य होता. त्यावेळी हल्ल्याच्या काही दिवस आधी शैलेश हळदणकर एका चकमकीत जखमी झाला होता आणि तातडीने पोलीस बंदोबस्तात रुग्णालयात दाखल करण्यात आला होता.

सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास, काही लोक ‘हळदणकरला भेटायचंय’ म्हणत वॉर्डात घुसले. क्षणभरात त्यांनी स्वयंचलित बंदुका बाहेर काढल्या आणि हळदणकर तसेच त्यांच्या संरक्षणार्थ असलेल्या दोन्ही पोलिसांवर गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात हळदणकर आणि दोन्ही पोलीस जागीच ठार झाले.त्यावेळी पोलिसांनी या घटनेची न्यायालयात माहिती दिली होती. ही घटना मुंबईतील गुन्हेगारी आणि हिंसात्मक इतिहासातील एक भयानक आणि थरारक घटना म्हणून आजही लक्षात ठेवली जाते.

सोशल मीडियावरील अश्लील कंटेंटबाबत केंद्राचा इशारा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
नवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना अश्लील सामग्रीबाबत इशारा दिला आहे. यात म्हटले आहे की कंपन्यांनी अश्लील, असभ्य, पोर्नोग्राफिक, मुलांशी संबंधित लैंगिक शोषणाचे आणि इतर प्रकारच्या बेकायदेशीर सामग्रीवर त्वरित बंदी घालावी. जर कंपन्यांनी कारवाई केली नाही, तर त्यांच्यावर खटला चालवला जाईल.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ही सल्लागार सूचना सोमवारी जारी केली होती. पीटीआय वृत्तसंस्थेने मंगळवारी अहवाल जारी करून सांगितले की, सल्लागार सूचनेत इंटरनेट प्लॅटफॉर्मना आयटी कायद्याच्या संदर्भात त्यांच्या अनुपालन फ्रेमवर्कची समीक्षा करण्यास सांगितले आहे.

मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, सोशल मीडिया इंटरमीडियरीसह इतर इंटरमीडियरींना आठवण करून दिली जाते की ते आयटी कायद्याच्या कलम ७९ अंतर्गत कायदेशीररित्या बांधील आहेत. त्यांच्या प्लॅटफॉर्मवर किंवा त्याद्वारे अपलोड, प्रकाशित, होस्ट, शेअर किंवा प्रसारित केलेल्या तृतीय-पक्ष माहितीच्या संदर्भात जबाबदारीतून सूट मिळवण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी.

पीटीआयच्या अहवालानुसार, या तरतुदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना हे सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी करतात. यात असे म्हटले आहे की वापरकर्त्याने अशी कोणतीही माहिती आणि सामग्री होस्ट, प्रदर्शित, अपलोड, सुधारित, प्रकाशित, प्रसारित, संग्रहित, अद्यतनित किंवा सामायिक करू नये जी अश्लील, पोर्नोग्राफिक, बाल लैंगिक शोषणाशी संबंधित, मुलांसाठी हानिकारक किंवा बेकायदेशीर असेल.