BREAKING NEWS
latest

देश-विदेश

featured/block-3

महाराष्ट्र

featured/block-3

ठाणे

featured/block-1

नवी मुंबई

featured/block-3

वसई विरार

featured/block-6

पालघर

featured/block-3

कल्याण-डोंबिवली

featured/block-2

उल्हासनगर-अम्बरनाथ-बदलापुर

featured/block-3

अन्य जिले

featured/block-4

Latest Articles

आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मॉरिशस मध्ये पायाभरणी करत महाराष्ट्र भवनाच्या विस्तारित वास्तूसाठी आठ कोटींचा निधी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : महाराष्ट्र आणि मॉरिशसमध्ये मैत्रीचे नाते पिढ्यान् पिढ्यांचे असून, सातासमुद्रापार राहूनही येथील मराठी जनसमुदायाने आपली सांस्कृतिक नाळ अतिशय अभिमानाने जपली आहे, असे गौरवोद्‌गार भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी मॉरिशस येथे काढले. मॉरिशसमधील मोका येथे महाराष्ट्र भवनाच्या विस्तारित वास्तूचा पायाभरणी सोहळा सोमवारी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र भवन वास्तूच्या विस्तारासाठी आठ कोटींचा निधी देण्यात आला आहे.
आमदार चव्हाण यांनी त्यांच्या तीन दिवसीय मॉरिशस दौऱ्यात मान्यवरांच्या भेटीगाठी घेत, भारत-मॉरिशस संबंध अधिक दृढ केले. या दौऱ्यात आमदार चव्हाण यांनी मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष धरमबीर गोखुल यांच्या सरकारी निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत भारत-मॉरिशस मैत्री, ब्ल्यू इकॉनॉमी, पर्यटन, एआय आणि सायबर सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
"मॉरिशस हाभारताचा लहान भाऊ आहे," असे सांगत राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचे कौतुक केले, तसेच भारताने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्याचबरोबर, मॉरिशसचे परराष्ट्रमंत्री धनंजय रामफुल, आयटी व इनोव्हेशन मंत्री डॉ. अविनाश रामतोहूल आणि कला व सांस्कृतिकमंत्री महेंद्र गोंदीया यांच्यासोबत बैठका पार पडल्या.

नाशिक शिंपी समाज एकता महिला मंडळातर्फे 'रणरागिनी पुरस्कार' सोहळा संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नाशिक - नाशिक सिडको येथील शिंपी समाज एकता महिला मंडळातर्फे 'महाराष्ट्र राज्य मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा' ग्रुप च्या सौजन्याने नाशिक सिडको येथील लक्ष्मीधवल कार्यालयात "रणरागिनी पुरस्कार सोहळा २०२६" चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून शिंपी समाज एकता महिला मंडळाचा अध्यक्षा सौ.माया मिलिंद चव्हाण संकल्पनेनुसार, ऍड. गीतांजली बागुल, अखिल भारतीय शिंपी समाज महिला कार्याध्यक्षा सुनिता शिंपी व ज्येष्ठ समाजसेवक उद्योजक श्री. जयराम मुरलीधर चव्हाण यांचा प्रमुख उपस्थितीत पुरस्कार सोहळा पार पडला. 

यावेळी शिंपी समाज एकता महिला मंडळातील शिंपी समाजातील विविध क्षेत्रात उद्योग व्यवसाय नोकरी करून समाजसेवा करण्यासाठी तत्पर आणि कुटुंबासाठी हातभार लावणाऱ्या ३५ हिरकणींचा, "रणरागिणी पुरस्कार २०२६" देऊन सन्मान करण्यात आला. एकता महिला मंडळाचा उपाध्यक्षा वंदना जगदाळे, सचिव शर्मिला जगताप व खजिनदार शोभा संन्याशी मंडळाच्या प्रवक्त्या सीमा कापडणे, मंडळाचा सदस्य प्रतिभा बिरारी, रेखा निकम, भारती भामरे, सुनीता गवांदे, इंदिरा खैरनार, अनिता बाविस्कर, ललिता बोरसे, कल्पना कटके, भारती महाजन, सुरेखा ब्राह्मणकर यांनी विशेष सहकार्य केले. ऍड. गीतांजली बागुल यांनी एकता महिला मंडळाचा या उपक्रमांचे कौतुक करत पुरस्कार प्राप्त सर्व समाज भगिनींचे अभिनंदन केले. मंडळाचा अध्यक्षा माया चव्हाण यांनी 'महाराष्ट्र राज्य मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप' चे अनमोल सहकार्य लाभले त्याबद्दल आभार व्यक्त केले. आपल्या समाजातील सर्व महिलांनी समाजातील गरजू भगिनींना एकत्र करून सामूहिक उद्योग व्यवसाय कसे सुरू करता येतील यासाठी एकात्मता दाखवून समाज भगिनींना सक्षम करण्यासाठी क्रांतीज्योती सावित्री बाई फुले, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, यांचा आदर्श समोर ठेवून कार्य करावे असे आव्हान केले. कार्यक्रमाचा शेवटी  उपस्थित सर्व मान्यवर व पुरस्कार प्राप्त रणरागिणींचे आभार मानले. व अल्पोहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

"संविधान चषक -२०२६" या स्पर्धेसाठी आमदार राजेश मोरे व परिमंडल-३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी लावली हजेरी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : लोढाहेवन निळजे येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ७११ पंचशिल सामाजिक संस्था (रजि) पंचशिल महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नाईट अंडर-आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा अर्थात "संविधान चषक -२०२६" या स्पर्धेचे २१ व २२ मार्च, २०२६ रोजी, आयोजन करण्यात आले होते.
  या स्पर्धेचे उद्घाटक व प्रमुख अतिथी  मा.राजेशजी मोरे (आमदार, कल्याण ग्रामीण), मा.अतुलजी झेंडे सर (पोलीस उपायुक्त, परिमंडल-३,कल्याण), ऍड हर्षाली विजय चौधरी थविल (महापौर,कल्याण-डोंबिवली मनपा), मा.राहुल दामले (उपमहापौर, कल्याण-डोंबिवली मनपा) मा.राजूदादा पाटील (माजी आमदार), मा.विनोद रतन पाटील (अध्यक्ष -क्रिकेट असोसिएशन, कल्याण ग्रामीण), मा.गजानन मोतीराम पाटील (नगरसेवक, प्रभाग क्रमांक ३१), सौ शैलेजा लालचंद भोईर (नगरसेविका प्रभाग क्रमांक ३१) यांना आमंत्रित करण्यात आले होते.
'संविधान चषक २०२६' या स्पर्धेसाठी खास करून आमदार राजेशजी मोरे तसेच मा.अतुल झेंडे (पोलीस उपायुक्त,परिमंडलं-३,कल्याण), मा.सुहास हेमाडे (पोलीस सहआयुक्त), मा संदिपान शिंदे, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक,मानपाडा) यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

स्पर्धेसाठी सामजिक क्षेत्रातील मा.bबाळाशेठ भोईर, घेसरगाव (उद्योगपती), मा.नागेंद्र फौजदार शर्मा (उद्योगपती), मा.प्रभाकर गोपीनाथ खरबे (उद्योगपती), मा.काशिनाथशेठ पाटील (मा.उपसरपंच), मा.लालचंद भोईर (माजी सरपंच), मा.तकदिर दशरथ काळण (मा.सरपंच), मा.निवृत्ती चंद्रकांत पाटील (मा.सरपंच), मा.महेंद्र धर्मा पाटील (समाजसेवक), मा.संतोष दीक्षित (उद्योजक), मा.वीरेंद्र सिंग (उद्योजक), मा.कैलास म्हात्रे (उद्योजक), मा शरद पाटील (उद्योजक), मा माणिकराव उघडे (रिपब्लिकन नेते), मा.लक्ष्मणराव आंभोरे (रिपब्लिकन नेते), मा.अनंता पाटील (समाजसेवक),मा.सुभाष अनंता पाटील (विभाग प्रमुख), मा.साईनाथ भोईर (समाजसेवक), मा.सुनील पाटील (जेष्ठ कवी), मा.योगेश दराडे (समाजसेवक), मा.शामराव यादव (समाजसेवक), मा देवाभाई भोईर, मा.मजोज भोईर (समाजसेवक), मा रामकृष्ण पाटील, मा मंगेश पाटील, ऍड विशाल वाडेकर यांना देखील विशेष आमंत्रित करण्यात आले होते प्रसंगी बऱ्यापैकी आमंत्रित मंडळीनी 'संविधान चषक २०२६' या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती दर्शविली.

'संविधान चषक २०२६'  या स्पर्धेसाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा यथोचित सन्मान तिन्ही संघटनेच्या वतीने तसेच नवतरुणांनी केला.शिवाय निळजे लोढाहेवन या परिसरात पहिल्यादाच "संविधान चषक २०२६" ही स्पर्धा भरविण्यात आली होती प्रसंगी या स्पर्धेला पहिल्याच वर्षी उत्तम प्रतिसाद मिळाला.

दिव्यातील साबेगाव खाडी परिसरात विसर्जन व दशक्रिया घाटासाठी पाठपुरावा सुरू..



विशेष प्रतिनिधी

दिवा, दि. २१ मार्च : दिव्यातील साबेगाव खाडी परिसरात दिवा शहरासाठी स्वतंत्र व भव्य गणेश विसर्जन घाट तसेच दशक्रिया विधीसाठी घाट उभारण्याची मागणी पुढे आली असून, यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे यांची नगरसेविका अर्चना पाटील यांनी भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. या प्रस्तावासाठी महाराष्ट्र सागरी महामंडळ (मेरिडियन बोर्ड) यांची परवानगी मिळविण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे. दिवा शहरातील वाढती लोकवस्ती आणि मोठ्या सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी सध्या शहराबाहेर जावे लागत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शहरातच योग्य व सुरक्षित विसर्जन व्यवस्था उभी करावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.

नगरसेविका अर्चना निलेश पाटील यांनी या प्रकल्पाची सविस्तर संकल्पना खासदारांना समजावून सांगितली. या संकल्पनेचे कौतुक करत “ही चांगली आणि उपयुक्त योजना आहे,” असे मत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. संबंधित विभागाला याबाबत पत्र पाठवून पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. माजी उपमहापौर तथा शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या सूचनेनुसार या कामाचा पाठपुरावा सुरू असल्याचे नगरसेविका अर्चना पाटील यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक बाबाजी बाळाराम पाटील आणि विभाग प्रमुख नीलेश पाटील हेही उपस्थित होते. या प्रस्तावित घाटामुळे दिवा शहरातील नागरिकांना गणेश विसर्जन व दशक्रिया विधींसाठी सुरक्षित, सोयीस्कर आणि स्थानिक सुविधा उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कर दरवाढ़ न करता रस्ते, उड्डाणपूल व सांस्कृतिक प्रकल्पांना प्राधान्य देत कडोंमपाचा ३,१८६ कोटींचा अर्थसंकल्प आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडून सादर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली, दि.२० मार्च : कोणतीही कर दरवाढ नसलेले कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेचे सन २०२५-२६ चे रु.२७४४.९९ कोटी जमा व रु.२१७२.२२ कोटी खर्चाचे सुधारीत अंदाजपत्रक आणि रक्कम रु.३१८६.४९ कोटी खर्चाचे आणि रक्कम रु.३१८६.६० कोटी जमा रक्कमेचे व रक्कम रु.१०.५१ लक्ष शिल्लक रक्कमेच्या सन २०२६-२७ चे मूळ अंदाजपत्रक महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी महासभेस सादर केले. यावेळी महापौर हर्षाली चौधरी, उप महापौर राहुल दामले, महापालिका सचिव किशोर शेळके, महापालिका मुख्य लेखा परीक्षक सुरेश बनसोडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिग्विजय चव्हाण, परिवहन व्यवस्थापक डॉ. विजयकुमार द्वासे उपस्थित होते.

या अंदाजपत्रकात सन २०२६-२७ या वर्षात मालमत्ता करापोटी रु.६००.०१ कोटी उत्पन्न अपेक्षित असून शासनाकडून जीएसटी अनुदान व मुद्रांक शुल्का पोटी रक्कम रु.५१०.०३ कोटी अनुदान अपेक्षित आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात पाणी पट्टी वसुली पोटी रक्कम रु.१०१ कोटी उत्पन्न अपेक्षित असून शासकीय अनुदाने व अंशदाने अंतर्गत शिक्षण वेतन अनुदानासह रक्कम रु.११५.०६ कोटी अनुदान अपेक्षित आहे. विशेष अधिनियमाखाली वसुली रु.५२६.३० कोटी उत्पन्न अपेक्षित असून रु.२८.८५ कोटी संकिर्ण उत्पन्न अपेक्षित आहे.

यामध्ये सन २०२६-२७ वर्षाकरीता रु.८२९.२५ कोटी अनुदान अपेक्षित आहे. सन २०२६-२७ मध्ये रु.१६5४.०८ कोटी रुपये महसुली खर्च अपेक्षित व रु.१५२४.२० कोटी भांडवली खर्च अपेक्षित आहे. महापालिका निधीतून कल्याण (पूर्व) भागातील युटाईप रस्ता व श्री मलंग रोड, चेतना शाळा ते नेवाळी नाका, मांडा टिटवाळा भागातील विविध रस्त्यांची कामे, ठाणगे वाडी येथील रस्ता अशी अनेक रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. मोठा गांव रेल्वे फाटकाच्या ठिकाणी महापालिकेने रेल्वे उड्डाणपुल प्रस्तावित केला आहे. डोंबिवली पूर्व-पश्चिम जोडणारा कोपर उड्डाणपुल वाहतुकीस अपुरा पडत असल्याने, सदर ठिकाणी नविन दोन पदरी अतिरिक्त उड्डाणपुल बांधण्याचे प्रस्तावित आहे.
महापालिका क्षेत्रातील मुलभूत सोयीसुविधांचा विकास या योजनेअंतर्गत सावित्रीबाई फुले कलामंदिराचे अ‍धुनिकीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. याच योजनेच्या अंतर्गत कल्याण पश्चिम भागात आगरी, कोळी, कुणबी, वारकरी सांस्कृतिक भवन, बारावे येथील आरक्षित भुखंडावर डॉ.आनंदीबाई जोशी उद्यान, सुभाष मैदान येथील स्टेडियम ही कामे लवकरच सुरु करण्यात येत आहेत. महापालिकेच्या फंडातून आधारवाडी, लालचौकी, कल्याण (पश्चिम), बैलबाजार कल्याण (पश्चिम), मुरबाडा रोड कल्याण (पश्चिम), विठ्ठलवाडी कल्याण (पूर्व), थारवाणी कॉम्प्लेक्स जवळ टिटवाला (पश्चिम), मोक्षधाम स्मशानभुमी डोंबिवली (पूर्व), पाथर्ली डोंबिवली (पूर्व), कोळेगाव डोंबिवली (पूर्व) येथे स्मशानभूमी पुर्ननिर्माणचे काम सुरु करण्यात आले आहे. तर, मुलभूत सुविधाअंतर्गत कॅसारिओ डोंबिवली (पूर्व) व माणेरे येथे स्मशानभूमीचे बांधकाम प्रस्तावित करण्यात आले आहे.

रुपाली चाकणकरांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई - नाशिक मधील भोंदूबाबा ‘कॅप्टन’ अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने जोर धरत होती. अखेर या प्रकरणात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संध्याकाळी भेट घेतली होती. दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले होते.

तदनंतर रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीस दाखल झाल्या होत्या. त्या नंतर या सर्व पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे कडे सुपूर्द केला आहे.

सुमित कंपनीने सफाई कामगारांचे दोन महिन्याचे वेतन रखडवल्याने कामगार संघटनेचे काम बंद आंदोलन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - कल्याण:डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत सुमित कंपनीला कचरा उचलण्याचे काम दिलेले आहे. परंतु या कंपनीने सफाई कामगारांचे गेले दोन महिन्यापासून पगार थकविले आहे. याकरता बुधवार १८ तारखेला डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा येथे कामगारांनी पुंडलिकशेठ म्हात्रे कामगार संघटनेने काम बंद आंदोलन केले. 

यादरम्यान शहरात कचरा सकाळी उचलला गेला नाही. त्यामुळे कामगारवर्ग जमल्यानंतर युवा नेते भाजपा नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना एक इशारा देऊन आजचं पगार देण्याचे सांगितले, अन्यथा उद्या पुन्हा काम बंद करू, असा इशारा दिला आहे. यावेळी घनकचरा व्यवसस्थापण विभागाचे उप-आयुक्त रामदास कोकरे हजर होते. त्यांनी लवकरात लवकर कामगारांचे पगार द्यावेत असे ठेकेदाराला सुनावले.