BREAKING NEWS
latest

देश-विदेश

featured/block-3

महाराष्ट्र

featured/block-3

ठाणे

featured/block-1

नवी मुंबई

featured/block-3

वसई विरार

featured/block-6

पालघर

featured/block-3

कल्याण-डोंबिवली

featured/block-2

उल्हासनगर-अम्बरनाथ-बदलापुर

featured/block-3

अन्य जिले

featured/block-4

Latest Articles

राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताह निमित्त महापालिकेच्या विद्युत विभागाकडून चर्चासत्राचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - सध्याच्या काळामध्ये सर्वच ठिकाणी इलेक्ट्रिक वस्तूंचा वापर अतिशय मोठ्या प्रमाणावर होत असल्याने विद्युत कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांनीही अधिक दक्षता घेण्याची गरज आजच्या चर्चासत्रामध्ये व्यक्त करण्यात आली, राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त महापालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांच्यामार्फत आचार्य अत्रे रंगमंदिरातील कॉन्फरन्स हॉलमध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात ठाणे, भिवंडी, उल्हासनगर या महानगरपालिकांचे कार्यकारी अभियंता, विद्युत कर्मचारी, विद्युत कंत्राटदार यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. 

भलेही आज सुरक्षेची अनेक उपकरणे आणि माध्यमे उपलब्ध झाली असली तरी विजेशी संबंधित कोणतेही काम करताना विद्युत कर्मचाऱ्यांनी खबरदारी आणि काळजी घेणे आवश्यकच आहे. कारण लहान लहान गोष्टींमधूनच मोठमोठ्या घटना आणि अपघात घडत असल्याचे या चर्चासत्रात सांगण्यात आले.
आताच्या काळामध्ये घराच्या इंटिरिअरकडे जितके लक्ष दिले जाते तितकेच घरातील वायरिंगकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा महत्त्वाचा मुद्दा यावेळी अधोरेखित करण्यात आला. तर विद्युत वाहिनीचे काम करताना कितीही जुने आणि जाणते कर्मचारी अधिकारी असलात तरीही शॉक हा तुम्हाला सांगून लागत नाही. त्यामुळे काम करताना आपण सतत खबरदारी आणि दक्षता बाळगणे ही अत्यावश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

यासोबतच वीज मीटर फेजिंग आणि मुख्य वायरिंग, घरापासून मीटरपर्यंत येणारी वायर, काम करताना घ्यायची काळजी, पॅनलवर काम करताना घ्यायची काळजी, कोणती उपकरणे वापरावी, शॉर्ट सर्किटमुळे लागणारी आग, इमारतीमधील फायर फायटर यंत्रणेचे पॅनल, त्याची तपासणी, आरसीसीबी उपकरणाची गरज, एफआरएलएसएच केबलचे महत्त्व, आर्थिंग, अशा अनेक लहान मोठ्या मुद्द्यांवर महाराष्ट्र शासनाचे विद्युत निरीक्षक आर आर यादव, सहनिरीक्षक भूषण मानकामे, जाधव यांच्यासह इतर तज्ञ व्यक्तींकडून सखोल मार्गदर्शन करण्यात आले. त्यासोबतच वीज वापर आणि  सुरक्षिततेबाबत भारत सरकारने नव्याने लागू केलेला सेंट्रल इलेक्ट्रिकल ऍक्ट' आणि त्यातील महत्त्वपूर्ण तरतुदींची माहितीही यावेळी उपस्थितांना देण्यात आली. 
या चर्चासत्राला प्रमुख पाहुणे म्हणून महापालिकेचे लेखापरीक्षक लक्ष्मण पाटील, शिक्षण विभागाचे उपआयुक्त संजय जाधव, राष्ट्रीय उत्पादकता परिषदेचे माजी संचालक टी. शंकर नारायण, महाराष्ट्राचे विद्युत निरीक्षक आर आर यादव, सहनिरीक्षक भूषण मानकामे यांच्यासह यशवंत पाटील, कार्यकारी अभियंता राजू राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यातील वीज दरामध्ये होणार १० टक्के कपात..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई - महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने एमईआरसी (MERC) महागाईने त्रस्त झालेल्या महाराष्ट्रातील कोट्यवधी वीज ग्राहकांना एक मोठा दिलासा दिला आहे. १ जुलै २०२५ पासून राज्यातील वीज दरामध्ये १० टक्क्यांनी कपात होणार आहे. विशेष म्हणजे, ही फक्त सुरुवात असून, पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने एकूण २६ टक्क्यांपर्यंत वीज दर कमी होतील. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने एमईआरसी (MERC) महावितरणने दाखल केलेल्या एका विशेष याचिकेवर बुधवारी (२५ जून २०२५) हा निर्णय दिला. या निर्णयामुळे घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक अशा सर्व प्रकारच्या ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचे स्वागत करत याला राज्याच्या इतिहासातील ‘प्रथमच’ घडलेली घटना म्हटले आहे. यापूर्वी वीज दरवाढीच्या याचिका सादर केल्या जात होत्या, मात्र पहिल्यांदाच महावितरणने एमएसईडीसीएल (MSEDCL) वीज दर कमी करण्यासाठी याचिका दाखल केली होती. राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्यावर्षी १० टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत ५ वर्षांत २६ टक्के वीजदर कमी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) हा निकाल महावितरणच्या याचिकेवर दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. साधारणत: पूर्वीचा काळ पाहिला तर १० टक्के वीजदरवाढीच्या याचिका सादर व्हायच्या. पण, राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीजदर कमी करण्यासाठी याचिका केली. त्यावरच हा आदेश एमईआरसीने दिला. या आदेशाचा लाभ घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तिन्ही वर्गवारीत होणार आहे.

राज्यात १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणार्‍यांचे प्रमाण हे ७० टक्के आहे. त्यांच्यासाठी १० टक्के इतके सर्वाधिक दर कमी होतील. आमच्या बळीराजाला दिवसा आणि खात्रीचा वीजपुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सोबतच आगामी काळात वीजखरेदी करारांमध्ये हरितऊर्जेवर मोठ्या प्रमाणात भर दिल्यामुळे वीजखरेदी खर्चात बचत होणार आहे. त्यामुळेच हा दर कमी करण्याचा प्रस्ताव महावितरणला मांडता आला. ही बातमी राज्यातील जनतेला देताना मला आनंद होतो आहे.

कल्याणमध्ये अडीच वर्षाच्या बाळाच्या अपहरणाचा प्रयत्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
कल्याण : कल्याण पश्चिम येथे आज भर दुपारी अडीच वर्षाच्या मुलाचा त्याच्या आईसमोरच चोरून घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला. आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे. पण, या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कल्याण पश्चिमेतील कोळीवाडा परिसरात ही घटना घडली आहे. या भागात अजहर मणियार या रिक्षाचालकाचं घर आहे. त्याचा अडीच वर्षांचा मुलगा फजल घराच्या बाहेर उभा होता. फजलची आई घरात स्वयंपाक करत होती. तो मुलगा घराच्या दारात उभा होता. तितक्यात एका व्यक्तीने त्या मुलाला जवळ घेतले. आरोपीनं मुलाला जबरदस्तीनं घेतल्यानं मुलगा जोरात रडू लागला. मुलाचे रडणे ऐकून परिसरातील नागरिकांचे त्याच्याकडे लक्ष गेलं.

मुलाला घेऊन जाणारी व्यक्ती नवीन दिसल्याने लोकांना संशय आला. त्यांनी आरोपीची विचारणा केली. त्याला उत्तर देता आले नाही. लोकांना पाहून तो घाबरला. त्यावेळी आरोपी मुलगा चोरण्यासाठी आल्याचे लोकांच्या लक्षात आलं. काही जणांनी त्याला मारहण केली. त्यानंतर त्याला बाजारपेठ पोलीसांच्या हवाली केले. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी बाबासाहेब डुकले यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे नाव पूरीमणी आहे. तो सोलापूरमधील शास्त्रीनगर भागात राहतो. त्याच्याकडं सोलापूरचं तिकीट आढळून आलं अशी माहिती मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचला पहिला भारतीय अंतराळवीर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
फ्लोरिडा - भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह चारही अंतराळवीर सुमारे २८ तासांच्या प्रवासानंतर आज, म्हणजे २६ जून रोजी दुपारी ४:०० वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले. पूर्वी त्यांचा आगमन वेळ ४:३० वाजता होता. म्हणजेच हे अंतराळवीर वेळेच्या ३० मिनिटे आधी अंतराळ स्थानकावर पोहोचले आहेत. त्याआधी, मिशन क्रूने अंतराळयानातून लाईव्ह संभाषण केले. यामध्ये शुभांशूने म्हटले होते "अंतराळातून नमस्कार! माझ्या सहकारी अंतराळवीरांसोबत येथे येऊन मी खूप उत्साहित आहे". ते म्हणाले, “जेव्हा आम्हाला व्हॅक्यूममध्ये सोडण्यात आले, तेव्हा मला फारसे बरे वाटत नव्हते. मी खूप झोपलो. मी इथे लहान मुलासारखा शिकत आहे.. अंतराळात कसे चालायचे आणि कसे खायचे".  ऍक्सियम मिशन ४ अंतर्गत, सर्व अंतराळवीर २५ जून रोजी दुपारी १२ वाजता आयएसएसकडे रवाना झाले. तांत्रिक बिघाड आणि हवामानाच्या समस्यांमुळे हे मिशन ६ वेळा पुढे ढकलण्यात आले.

अमेरिकन अंतराळ संस्था नासा आणि भारतीय संस्था इसरो यांच्यातील करारानुसार, भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची या मोहिमेसाठी निवड करण्यात आली आहे. शुभांशू हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय आहेत. ४१ वर्षांपूर्वी, राकेश शर्मा यांनी १९८४ मध्ये सोव्हिएत युनियनच्या अंतराळयानातून अंतराळ प्रवास केला होता.

शुभांशूचा हा अनुभव भारताच्या गगनयान मोहिमेत उपयुक्त ठरेल. ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे, ज्याचा उद्देश भारतीय अंतराळवीरांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवणे आणि त्यांना सुरक्षितपणे परत आणणे आहे. हे २०२७ मध्ये प्रक्षेपित होण्याची शक्यता आहे. भारतात अंतराळवीरांना गगनयात्री म्हणतात. त्याचप्रमाणे, रशियामध्ये त्यांना कॉसमोनॉट्स म्हणतात आणि चीनमध्ये त्यांना तायकोनॉट्स म्हणतात.

एमजीए फाउंडेशन आयोजित इनडोअर क्रिकेट स्पर्धा २९ जून ला मुंबईत..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : एमजीए फाउंडेशनतर्फे 'मुंबई इनडोअर क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशन' आणि 'महाइनडोअर क्रिकेट असोसिएशन' यांच्या मान्यतेने भव्य इनडोअर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, दिनांक २९ जून २०२५ रोजी गोरेगाव (पश्चिम) येथील राम मंदिर रेल्वे स्थानकाजवळील 'सन्‍टेक टर्फ' येथे सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत दोन टर्फवर खेळवली जाणार आहे.

या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होणार असून त्यांचे ४-४ चे दोन गट करण्यात आले आहेत. प्रत्येक संघ गटातील इतर तीन संघांविरुद्ध राऊंड-रॉबिन फॉरमॅटने सामने खेळेल. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील आणि नंतर उपांत्य विजेते संघ अंतिम सामन्यात आमनेसामने येऊन विजेतेपदासाठी लढतील.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चॉईस इंटरनॅशनल लिमिटेड, कोटक बँक, होम स्क्वेअर प्रॉपर्टीज एलएलपी, वेल्थ अँड बियॉन्ड, चाणक्य एंटरप्रायझेस, महावीर मल्टिस्पेशालिटी क्लिनिक यांसारख्या अनेक प्रतिष्ठित संस्थांनी प्रायोजकत्व आणि सहकार्य दिले आहे असे एमजीए फाउंडेशनचे अधिकृत प्रतिनिधी मनीष अग्रवाल व स्नेहा पाटील यांनी या स्पर्धेची माहिती दिली. या स्पर्धेतील विजेत्या संघाला रु २१,०००/- व चषक तर उपविजेत्या संघाला रु ११,०००/-  व चषक एमजीए फाउंडेशनतर्फे देऊन गौरवण्यात येणार आहे. उर्वरित सर्व सहभागी संघांना रु. ५,०००/- चे व्हाऊचर देऊन गौरवण्यात येणार आहे. 
या स्पर्धेत टीडीएस किंगस, टॅक्स टायटंस, आयटीआर वॉरीअर्स, रिटर्न मेकर्स, ऑडीट आर्मी, मनी मास्टर्स, जीएसटी ग्लॅडीएटर्स, इगल लेजर्स हे संघ सहभागी होत आहेत.

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची राज्य खो-खो पंच परीक्षा २९ जूनला..

प्रतिनिधी - अवधुत सावंत

मुंबई - महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने या वर्षी राज्य खो-खो पंच परीक्षा दि २९ जून  रोजी सकाळी १०:०० वाजता  आयोजित केली आहे. महाराष्ट्रात एकाच वेळी विविध जिल्ह्यांमध्ये  परीक्षा होणार आहे. संपूर्ण राज्यात जवळ जवळ १५ केंद्रावर हि परीक्षा होणार असून ज्या जिल्ह्यात परीक्षा होणार आहे त्या जिल्ह्यात पंच वर्ग होत आहेत.  हि राज्य पंच परीक्षा मुंबई, पुणे, बीड, सिंधुदुर्ग, नांदेड, धुळे, ठाणे, नंदुरबार, पालघर, सोलापूर, जालना, सांगली, लातूर व अहिल्यानगर येथे पार पडणार आहे असे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी स्पष्ट केले आहे.   

मुंबई जिल्ह्यात हि परीक्षा बीपीएड कॉलेज, वडाळा येथे दि २९ जून  रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता होणार असून अधिक माहितीसाठी मुंबई खो-खो संघटनेचे प्रमुख कार्यवाह सुरेंद्र विश्वकर्मा (98306 91616) यांच्याशी संपर्क साधण्याचे आव्हान त्यांनी केले आहे. तसेच इतर संबंधित जिल्ह्यात त्या जिल्ह्याच्या सचिवांशी संपर्क साधण्याचे आव्हान कार्यालयीन सचिव प्रशांत इनामदार यांनी केले आहे.

मद्यधुंद अवस्थेत तेलंगणात महिलेने रेल्वे ट्रॅकवर चालवली कार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
तेलंगणा - तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यात, मद्यधुंद अवस्थेत एका ३४ वर्षीय महिलेने तिची गाडी रेल्वे रुळावर आणली. यामुळे तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. १०-१५ गाड्या थांबवाव्या लागल्या किंवा वळवाव्या लागल्या. शंकरपल्लीजवळ घडलेल्या या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. १३ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये महिला रेल्वे ट्रॅकवर किआ सोनेट कार चालवत असल्याचे दिसून येते. महिलेने रेल्वे ट्रॅकवरून सुमारे ८ किमी गाडी चालवली, ज्यामुळे अनेक रेल्वे सेवा विस्कळीत झाल्या.

दुसऱ्या व्हिडिओमध्ये स्थानिक लोक, रेल्वे कर्मचारी आणि पोलिस महिलेला गाडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. जमावाने तिला गाडीतून बाहेर काढल्यानंतर तिचे हात बांधले आहेत. महिलेने असे का केले आणि तिची मानसिक स्थिती काय होती, याचा तपास सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘रेल्वेचे अनेक कर्मचारी आणि पोलिस गाडीच्या मागे धावले. मोठ्या कष्टाने त्यांना गाडी थांबवण्यात यश आले. महिलेला गाडीतून बाहेर काढण्यासाठी सुमारे २० जणांची मदत घ्यावी लागली. ती अजिबात सहकार्य करत नव्हती. रेल्वे पोलिस अधीक्षक चंदना दीप्ती म्हणाल्या की, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, ही महिला अलिकडेपर्यंत एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत होती. ती उत्तर प्रदेशची रहिवासी आहे. ती खूप आक्रमकपणे वागत होती. असे दिसून आले की ती मानसिकदृष्ट्या अस्थिर होती.