BREAKING NEWS
latest

देश-विदेश

featured/block-3

महाराष्ट्र

featured/block-3

ठाणे

featured/block-1

नवी मुंबई

featured/block-3

वसई विरार

featured/block-6

पालघर

featured/block-3

कल्याण-डोंबिवली

featured/block-2

उल्हासनगर-अम्बरनाथ-बदलापुर

featured/block-3

अन्य जिले

featured/block-4

Latest Articles

महायुतीच्या प्रचार मेळाव्यात मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश..

विशेष प्रतिनिधी

दिवा, दि.११ : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या भव्य मेळाव्यात आज मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हा मेळावा आज सकाळी ११ वाजता दिवा–आगासन रोडवरील दळवीनगर मैदानात उत्साहात पार पडला. या प्रवेशामध्ये मनसेचे उपशहर अध्यक्ष, विभाग अध्यक्ष, शहर अध्यक्ष, विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी तसेच शाखा अध्यक्ष अशा विविध पदांवरील कार्यकर्त्यांचा समावेश होता. शिवसेनेच्या धोरणांवर विश्वास ठेवत आणि महायुतीच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी, महायुतीचे नेते, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यात “शिवसेना जिंदाबाद”, “महायुतीचा विजय असो” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

मोतीराम दळवी, उपशहर अध्यक्ष मनसे, दिलिप गायकर, विभाग अध्यक्ष मनसे,कुशाल पाटील, शहर अध्यक्ष विद्यार्थी सेना मनसे, अर्पित पोळ, वैष्णव दळवी, विदयार्थी सेना विभाग अध्यक्ष मनसे, नितिन आदवडे शाखा प्रमुख मनसे, विकी भगत शाखा प्रमुख मनसे, विशाल भिडे, निखिल पाटील, वेदांत दळवी, विशाल शिंदे, दुर्वेश दळवी, राहुल नाईक, संदिप शिंदे, सचिन गायकर, कौस्तुभ गायकर, चित्रा दळवी महिला आघाडी, चैतन्या दळवी, चैताली दळवी, ममता शिंदे, दिक्षा माने, जागृती जोशी इत्यादींनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. आगामी महापालिका निवडणुकीत दिवा परिसरात शिवसेना–महायुतीची ताकद आणखी मजबूत झाल्याचे यावेळी स्पष्ट झाले. या मेळाव्यामुळे महायुतीच्या प्रचाराला मोठी ऊर्जा मिळाल्याचे चित्र दिसून आले.

मतदान यंत्रणा पूर्ण तयारीत असून दि. १५ जानेवारी रोजी मतदान करून नागरिकांनी बजवावा आपला मतदानाचा अधिकार - आयुक्त अभिनव गोयल

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - गुरुवार दि.१५ जानेवारी २०२६ रोजी नागरीकांनी मतदान करुन, आपला मतदानाचा अधिकार बजवावा, असे आवाहन महापालिका निवडणूक अधिकारी तथा आयुक्त अभिनव गोयल यांनी आज मा.स्थायी समिती सभागृहात संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेसमयी केले. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त योगेश गोडसे, कल्याण परिमंडळ-३ चे पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे, निवडणूक विभागाचे उपआयुक्त समीर भुमकर, आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीचे समन्वय अधिकारी बाळासाहेब चव्हाण उपस्थित होते. या सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी एकुण १५४८ मतदान केंद्र असून, एकुण ९ ठिकाणी स्ट्राँगरुमची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी क्र.१ ते ९ यांच्या अधिनस्त असलेल्या निवडणूक प्रक्रियेची मतमोजणी एकुण ८ ठिकाणी होणार आहे. महापालिकेने मतदान केंद्र निहाय मतदार यादी प्रदर्शित केलेली आहे. तसेच एकुण ११८२ मतदान केंद्रस्त‍रीय अधिकारी (बीएलओ) यांचेमार्फत वोटर स्लिप चे वितरण करण्यात येणार आहे.

महापालिका निवडणूकीसाठी पूर्णपणे सज्ज असून, या निवडणूकीसाठी एकुण १७०  झोनल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे १ सीयु आणि उमेदवारांच्या संख्येनुसार बीयु उपलब्ध करुन दिले जाणार आहेत, मतदान केंद्रामध्ये नागरीकांना आपले मोबाईल फोन नेण्यास मनाई आहे, अशी माहिती महापालिका निवडणूक अधिकारी तथा आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी दिली. कल्याण परिमंडळ-३ चे पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे यांनी मतदान व मतमोजणी दिवशी पोलीस विभागामार्फत करण्यात आलेल्या तयारीची/बंदोबस्ताची माहिती विषद केली. त्याचप्रमाणे मतदानापूर्वी, मतदानाचे दिवशी व मतमोजणीचे दिवशी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात राहील अशीही माहिती त्यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांसमोर दिली.

अनिल आय हॉस्पिटलच्या डोंबिवली पश्चिम येथील सहाव्या शाखेचे भव्य उद्घाटन संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.११:  ठाणे जिल्ह्यात गेली तब्बल ५४ वर्षे विश्वासार्ह व दर्जेदार नेत्रसेवा देणाऱ्या 'अनिल आय हॉस्पिटल' च्या डोंबिवली पश्चिम येथील सहाव्या शाखेचे उद्घाटन आज दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. या नव्या अत्याधुनिक आय क्लिनिकचे उद्घाटन महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष नामदार मा. श्री. रविंद्र चव्हाण साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. 
यावेळी श्री. परणाद  मोकाशी, श्री. जितेंद्र भोईर, श्री. शैलेन्द्र भोईर तसेच श्री. भाई पानवडीकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय डोंबिवली व परिसरातील अनेक मान्यवर, डॉक्टर, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
डोंबिवली पश्चिम येथील 'अनिल आय हॉस्पिटल' ची ही सहावी नवीन शाखा नागरिकांसाठी नेत्रसेवेच्या दृष्टीने एक मोठी पर्वणी ठरली असून, आता अत्याधुनिक नेत्रतपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रेटिना, ग्लॉकोमा, बाल नेत्रचिकित्सा व लेझर उपचार अशा सर्व सुविधा घराजवळ उपलब्ध होणार आहेत. उद्घाटनप्रसंगी बोलताना मा. श्री. रविंद्र चव्हाण यांनी 'अनिल आय हॉस्पिटल'च्या दीर्घकालीन आणि समाजोपयोगी नेत्रसेवेचे विशेष कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी 'अनिल आय हॉस्पिटल'च्या संचालिका तसेच महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी (MOS) च्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर यांनी डोंबिवलीकरांनी दिलेल्या प्रेम, आपुलकी व विश्वासाबद्दल मनापासून आभार मानले. त्या म्हणाल्या, “डोंबिवलीकरांच्या विश्वासामुळेच आज आम्ही सातत्याने सेवा विस्तार करू शकलो आहोत. दर्जेदार, आधुनिक व रुग्णकेंद्रित नेत्रसेवा भविष्यातही आमच्या कडून अखंडपणे सुरू राहील, याची आम्ही खात्री देतो.”
अनिल आय हॉस्पिटल हे विश्वास, अनुभव आणि आधुनिक नेत्रसेवेचे प्रतीक असून डोंबिवली पश्चिम येथील या नव्या शाखेमुळे परिसरातील नागरिकांसाठी उच्च दर्जाची आय केअर अधिक सुलभ होणार असून, ही शाखा नेत्रसेवेत एक नवा मानदंड प्रस्थापित करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

डोंबिवली पाश्चिमेकडील प्रभाग क्र.२५ मधील मनसे पुरस्कृत उमेदवार शैलेश, मनीषा, पूजा धात्रक यांनाच पुन्हा निवडून आणण्याचा नागरिकांनी केला संकल्प..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :- कल्याण-डोंबिवली सार्वत्रिक निवडणूक डोंबिवली पश्चिम प्रभाग क्रमांक २५ (अ) मधून सौ. मनीषा शैलेश धात्रक २५ (ब) मधून पूजा शैलेश धात्रक व २५ (क) मधून शैलेश रमेशचंद्र धात्रक हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुरस्कृत उमेदवार असून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रचारादरम्यान गेल्या अनेक वर्षापासून केलेल्या विकास कामांच्या जोरावर ते मतदान मागत असून मतदारांचा चांगला प्रतिसाद त्यांना मिळत आहे. ठिकठिकाणी मतदारांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन ते संवाद साधत आहेत. त्यामुळे विकास कामांच्या जोरावर मोठ्या मताधिक्याने विजय निश्चित असल्याचे मनीषा शैलेश धात्रक यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले आहे. 

शैलेश रमेशचंद्र धात्रक व मनीषा धात्रक हे कुटुंब गेली अनेक वर्ष या प्रभागाचे यशस्वी नेतृत्व करीत आहेत. प्रभागामध्ये अनेक सोसायट्यांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्या साफ करून देणे, गटारे, नाले सफाई, मुबलक  पिण्याचे पाणी या सुविधा नागरिकांना नियमित दिल्या आहेत तसेच इतर सामाजिक कामे देखील केलेली आहेत व विकासकामांची गंगा प्रभागात वाहत आहे. मनीषा शैलेश धात्रक यांनी सांगितले की प्रचारादरम्यान नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून गेले अनेक वर्षे लोकोपयोगी कामे केलेली आहेत त्यामुळे आमचा विजय निश्चित असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

कल्याण-डोंबिवलीला आनंदी शहर करायचं आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - महायुतीच्या माध्यमातून कल्याण-डोंबिवली परिसरात विविध प्रकल्प राबविले जात असून अनेक विकासकामे केली जात आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवली या शहरांना आनंदी शहर बनवायचं असल्याचे सांगत कोणी कितीही करूद्या दावेदारी महायुतीच राखणार कल्याणची सुभेदारी असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना व्यक्त केला. कल्याण पश्चिमेतील यशवंतराव चव्हाण क्रीडांगणावर आयोजित विजय संकल्प सभेत एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, शहर प्रमुख रवी पाटील आदींसह महायुतीचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी बोलतांना एकनाथ शिंदे यांनी ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला त्यांचा नंबर पहिला. लोकसभा, विधानसभा, नगरपालिका निवडणुकी नंतर आता महापालिका निवडणुकीत चौकार षटकार मारायचा आहे. विरोधकांचा सुपडा साफ करायचा आहे. ६० हुन अधिक नगरसेवक निवडून येऊन विजयाची नांदी सुरू झाली आहे. काही लोकं फक्त टीका टिपण्णी करतात, दुसऱ्यांचा आधार घेऊन काही लोकं मला बुडविण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आपल्या पाठीशी लाडक्या बहिणी आहेत. आपल्यावर कितीही टीका झाली आरोप झाले तरी या आरोपांना मी कामातून उत्तर देतो. 

काहींनी खुर्चीसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली. घरी बसून सरकार चालवता येत नाही.  लोकांणा सामोरे जावे लागते, त्यांच्या समस्या सोडवाव्या लागतात. काही लोकं मुंबईकडेच लक्ष लावून बसले आहेत. काहींचा डोळा मुंबई महानगर पालिकेच्या तिजोरीवर असून आमचा डोळा मुंबईच्या विकासावर आहे. निवडणूक आली की मुंबईतील मराठी माणूस विरोधकांना आठवतो.   
कल्याण हे मुंबईचे शॉकऍपजोबजर आहे. मुंबईचा भार हे उपनगर सांभाळत आहेत. पाच वर्षात कल्याण हे आघाडीचे शहर बनवायचं असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाही. कल्याण-डोंबिवली धोकादायक इमारती क्लस्टरच्या माध्यमातून विकसित केल्या जातीलअडीच वर्षाच्या काळात अनेक निर्णय घेतले गेले. सर्वसामान्याचा विकास, शहरांचा विकास झाला पाहिजे यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. अनेक विकासकामे केली जात आहेत. 

कल्याण ऐतिहासिक नगरी असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची सुरवात येथून झाली त्याचे स्मारक केलं आहे. ईस्ट या वेस्ट कल्याण झालं बेस्ट. लोकांना न्याय देणाऱ्यांच्या पाठीशी जनता उभी राहते. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असे मी प्रतिपादन करतो.रखडलेले पुनर्विकास प्रकल्प म्हाडाच्या माध्यमातून पूर्ण करणार असल्याची ग्वाही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली.

दिव्यातील साबे गावात महायुतीच्या उमेदवारांसाठी आमदार निरंजन डावखरेंच्या उपस्थितीत सुभाष भोईर यांचा झंझावाती प्रचार..

विशेष प्रतिनिधी

दिवा : ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठामपा प्रभाग क्र.२९ मध्ये महायुतीच्या तीन उमेदवारांच्या प्रचारासाठी वरिष्ठ नेते तसेच कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी सहभाग घेत जोरदार प्रचार केला. प्रचारादरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या वेळी आमदार निरंजन डावखरे यांची विशेष उपस्थिती होती. प्रभाग क्र.२९ मधील २९ (अ) मधून अर्चना पाटील, २९ (ब) मधून वेदिका पाटील आणि २९ (क) मधून बाबाजी पाटील हे महायुतीचे उमेदवार निवडणूक रिंगणात असून, तिन्ही उमेदवारांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले.

प्रचारादरम्यान बोलताना सुभाष भोईर यांनी महायुतीच्या कामांचा आढावा मांडत विकासाच्या मुद्द्यांवर भर दिला. तसेच प्रभाग क्र.२९ मधून महायुतीचे तिन्ही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील, असा ठाम विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला. या प्रचारामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात प्रचाराला अधिक गती मिळाल्याचे दिसून येत आहे.

'अनिल आय हॉस्पिटल' चे डोंबिवली पश्चिम येथे सहाव्या शाखेचे दि.११ जानेवारी रोजी उद्घाटन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - ठाणे जिल्ह्यातील नेत्रसेवेत गेली तब्बल ५४ वर्षे विश्वासार्ह सेवा देणारे 'अनिल आय हॉस्पिटल' आता डोंबिवली पश्चिम येथे आपल्या सहाव्या शाखेचे उद्घाटन करत आहे. हे नवीन अत्याधुनिक आय क्लीनिक ११ जानेवारी २०२६ रोजी उद्घाटनासाठी सज्ज होत आहे.
सन १९७२ साली सुरू झालेला 'अनिल आय हॉस्पिटल'चा प्रवास आज ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली (पूर्व), डोंबिवली (पश्चिम), ठाणे, कल्याण, निळजे पलावा, बदलापूर अशा विविध भागांमध्ये विस्तारला असून हजारो रुग्णांच्या विश्वासावर ही संस्था उभी आहे.

डोंबिवली पश्चिम येथील या नव्या शाखेमुळे परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक नेत्रतपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रेटिना, ग्लॉकोमा, बाल नेत्रचिकित्सा व लेझर उपचार  यांसारख्या सर्व सुविधा आता घराजवळ उपलब्ध होणार आहेत. या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष नामदार श्री. रवींद्र चव्हाण  यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न होणार असून, श्री पर्नाद मोकाशी सह डोंबिवली व परिसरातील अनेक मान्यवर, डॉक्टर, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

यावेळी बोलताना 'अनिल आय हॉस्पिटल'च्या संचालिका तथा महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी (MOS) च्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर म्हणाल्या, “डोंबिवलीकरांचे प्रेम, आपुलकी आणि विश्वास यामुळेच आम्ही सातत्याने पुढे वाटचाल करू शकलो. दर्जेदार व प्रगत नेत्रसेवा प्रत्येक रुग्णापर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे. लवकरच ठाणे येथे आमची सातवी शाखा सुरू होणार आहे.” डोंबिवली पश्चिम येथील ही नवीन शाखा परिसरातील नागरिकांसाठी आय केअर च्या दृष्टीने एक मोठी उपलब्धी ठरणार आहे.
दिनांक: ११ जानेवारी २०२६
वेळ: ११ ते २
पत्ता: अनिल आय हॉस्पिटल, तळमजला, घनश्याम कॉम्प्लेक्स, डीएनएस बँक जवळ, एमजी रोड डोंबिवली (पश्चिम)
संपर्क :
अनिल आय हॉस्पिटल
+91 99252 35969