BREAKING NEWS
latest

देश-विदेश

featured/block-3

महाराष्ट्र

featured/block-3

ठाणे

featured/block-1

नवी मुंबई

featured/block-3

वसई विरार

featured/block-6

पालघर

featured/block-3

कल्याण-डोंबिवली

featured/block-2

उल्हासनगर-अम्बरनाथ-बदलापुर

featured/block-3

अन्य जिले

featured/block-4

Latest Articles

ठाणे गुन्हे शाखेने २८ वाहने हस्तगत करत वाहन चोरी प्रकरणाच्या २६ गुन्ह्यांचा छडा लावत प्रकरण केले उघडकीस..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे, दि.१२ - ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने मोठी कामगिरी करत सराईत वाहनचोरांच्या टोळीला जेरबंद केले असून त्यांच्या ताब्यातून तब्बल २८ वाहने (दुचाकी व चारचाकी) जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे ठाणे शहर, बृहनमुंबई, नवी मुंबई व ठाणे ग्रामीण हद्दीतील २६ गुन्ह्यांचा छडा लावत वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. जप्त वाहनांची एकूण किंमत १७ लाख ८९ हजार ८९९ रुपये इतकी आहे.

अटक केलेले आरोपी

गुन्हे शाखा, घटक-३ कल्याण व घटक-२ भिवंडी यांच्या पथकांनी संयुक्त कारवाई करत खालील आरोपींना जेरबंद केले आहे..
१) अतुल सुरेश खंडाळे (वय:२४ वर्षे, राहणार. हडपसर, पुणे)
२) शेखर गोवर्धन पवार (वय:३० वर्षे, राहणार. जळगाव)
३) आकाश मच्छिंद्र नसरगंध (वय:२३ वर्षे, राहणार. चक्की नाका, कल्याण पश्चिम)
४) गाझी लकीर हुसैन (वय:१९ वर्षे, राहणार. आंबिवली, कल्याण)
५) मुश्ताक इस्तीयाक अंसारी (वय:३१ वर्षे, राहणार. भिवंडी)

उघडकीस आलेले गुन्हे

अटक आरोपींकडून भिवंडी, कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, अंबरनाथ, वासिंद, तळोजा, नवी मुंबईसह मुंबईतील धारावी, कांदिवली, माहिम, नवघर पोलीस ठाण्यात दाखल असलेले २६ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. यामध्ये भादंवि कलम ३७९ व भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत दाखल गुन्ह्यांचा समावेश आहे.

वरिष्ठांचे मार्गदर्शन

ही कारवाई मा. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) ठाणे शहर, अमरसिंह जाधव, पोलीस उपायुक्त (गुन्हे) ठाणे शहर, व शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शोध-१) ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पथकाची कामगिरी

या तपास मोहिमेत वपोनि. जनार्दन सोनवणे (घटक-२, भिवंडी), वपोनि. अजित शिंदे (घटक-३, कल्याण) यांच्यासह सपोनि. श्रीराज माळी, मिथुन भोईर, सर्जेराव पाटील, बळवंत भराडे, तसेच अनेक पोलीस अधिकारी व अंमलदारांचा मोलाचा सहभाग होता. महिलांसह जवळपास ५० हून अधिक अंमलदारांच्या अथक प्रयत्नांमुळे ह्या मोठ्या चोरी प्रकरणांची मालिकाच उघडकीस आली आहे. ठाणे पोलीसांच्या या कारवाईमुळे वाहन चोरी प्रकरणाला दिलासा मिळाला असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये शिक्षणतज्ज्ञ शिक्षकांचा नामांकित "जे एम एफ शिक्षाविद पुरस्कार २०२५" पुरस्कृत सोहळा संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :  ५ सप्टेंबर हा दिवस म्हणजे हाडाचे शिक्षक आणि स्वतंत्र  भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती, त्यांच्या सन्मानार्थ सर्व भारतीय हा दिवस शिक्षक दीन म्हणून साजरा करतात. 
'जे एम एफ' संस्थेमध्ये देखील मोठ्या उत्साहात शिक्षक दीन पार पडला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून सुमारे  ३० मान्यवर शिक्षणतज्ज्ञ शिक्षकांना 'जे एम एफ  पुरस्कार २०२५' ने पुरस्कृत करण्यात आले. महाराष्ट्रातूनच नव्हे तर राजस्थान, गुजराथ, दिल्ली अशा अनेक ठिकाणाहून शिक्षाविद शिक्षकांची उपस्थिती प्रार्थनीय होती. 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार व दिग्दर्शिका जाह्नवी राजकुमार कोल्हे त्याच बरोबर मुख्य अतिथी श्री. एस.सत्यकुमार, (हेवी वॉटर बोर्डचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी) तसेच विशेष अतिथी पद्मश्री पुरस्कृत  श्री. गजानन जगन्नाथ माने, श्री. ए.के.सिन्हा, श्री. बी.एम.सिन्हा, डॉ. मोसेझ, श्री. युवराज कोल्हे, श्री. कोळेकर, डॉ. कुमार, श्री. परशुराम भांगे गुरुजी, सौ. पुष्पा भांगे व उपस्थित असलेले सर्व विभूषित शिक्षकगण तसेच इतर पदाधिकारी यांचे शाळेतील विद्यार्थ्यांनी शारीरिक प्रशिक्षक रमेश वागे, सौ. वैशाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लेझीम ढोलताशे वाजवून व नृत्य शिक्षक अभिषेक देसाई व सौ. कविता गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी  स्वागत नृत्य करून जल्लोषात स्वागत केले. सरस्वती पूजन व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये कार्यक्रमास सुरुवात झाली. संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांच्या हस्ते मान्यवरांना शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन पाहुण्याचे स्वागत करण्यात आले. शिक्षक दिनानिमित नाट्य शिक्षक श्री. प्रमोद पगारे यांच्या दिग्दर्शनाखाली मुलांनी लघुनाट्य सादर केले तर महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात अनेक मोठे शिक्षक होऊन गेले. 
यावेळी प्रसार माध्यमाचे मुख्य श्री. रोहित राजगुरु, अखिल नायडू, आकाश व त्यांच्या चमूने तयार केलेली विभूषित शिक्षकांची लघु चित्रफित दाखवण्यात आली तर 'जाह्मविज मल्टी फाऊंडेशन' चा २५ वर्षाचा प्रवासाचा माहितीपट देखील  दाखवण्यात आला. शिक्षक कसा असावा तर प्रेम आणि उद्वेग यांचा समतोल साधणारा असावा, शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या पाठीवर मारलेली कौतुकाची थाप ही विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि उत्साह वाढविणारी असते तर वेळप्रसंगी पाठीवर मारलेली तीच थाप ही वाईट वळणावरून चांगल्या मार्गावर नेणारी असते, असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले. शिक्षणाने माणूस मोठा होतो तर अनुभवाने माणूस शहाणा होतो, पृथ्वीतलावरील सर्वोच्च श्रेष्ठ पद व सन्मान कोणते असेल तर ते शिक्षक होण्याचे. आणि हे भाग्य सर्वांच्याच वाट्याला येत नाही. ज्ञान दानाचे कार्य करत असताना देखील विद्यार्थी दशेतली शिकण्याची दुर्दम्य इच्छा असणे म्हणजे शिक्षक. शिक्षकांचे ऋण हे कधीही न फिटणारे असते किंबहुना ते न फेडता त्या साठलेल्या व्याजावर मिळालेल्या ज्ञानाच्या  यशाचे मनोरे बांधावेत असे सांगून, आज अनेक उच्चशिक्षित, विभूषित शिक्षक मंडळींना "जे एम एफ शिक्षाविद २०२५"  पुरस्कार प्रदान करताना मला वाटते की एका शिक्षकाने दुसऱ्या शिक्षकाला दिलेला आशीर्वादच आहे. असेही ते म्हणाले.
ज्या प्रमाणे मातीला आकार देऊन कुंभार मडके बनवतो त्याच प्रमाणे  बालमनाच्या कोऱ्या पाटीवर  श्री गणेशा लिहून भविष्य घडवतो तो शिक्षक होय, शिक्षणाला मर्यादा नाहीत आणि शिकायला वय नाही आणि शेवटपर्यंत शिकणारा आणि शिकवणारा असतो तो म्हणजेच शिक्षक. असे सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले. 'जे एम एफ' शिक्षण संस्थेला यंदा २५ वर्ष पूर्ण होत आहेत त्या अनुषंगाने  रौप्य महोत्सव मानचिन्ह, 'जे एम एफ' शिक्षाविद पुरस्काराचे मानचिन्ह, प्रमाणपत्र व शाल प्रदान करण्याकरिता उपस्थित व निवडक ३० मान्यवर शिक्षकांना मंचावर बोलावून श्री. एस.सत्यकुमार अध्यक्ष, हेवी वॉटर बोर्ड, भारत सरकार, मुंबई, संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जाह्नवी कोल्हे, यांच्या हस्ते पूरस्कार देण्यात आले. तर संस्थेतील सर्व शिक्षकांना चांदीची गणपती व लक्ष्मी ची प्रतिमा देण्यात आली. पुरस्कार विजेत्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून संस्थेचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. एकनाथ चौधरी, सौ. श्रेया कुलकर्णी, श्री. योगेश शिरसाट, शर्वरी मॅडम यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्राचार्या ज्योती व्यंकटरामण यांनी केले. राष्ट्रगान गाऊन कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम 'ना भूतो ना भविष्यती' असा झाला.

चैन स्नॅचिंग सारख्या जबरी चोरी करणाऱ्या अंतरराज्य टोळीचा डोंबिवली पोलीसांनी केला परदाफाश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : दिनांक ०३/०९/२०२५ रोजी दुपारी ०४:३० वाजण्याच्या सुमारास चामुण्डा सोसायटी गेट जवळ, ९० फिट रोड, ठाकुर्ली डोंबिवली (पूर्व) येथुन वृध्द महिला पायी  चालत जात असताना मोटार सायकलवर दोन इसम येवून वृध्द महिलेच्या गळ्यातील चैन खेचुन पळून गेले. त्याबाबत डोंबिवली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ६८१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरील दाखल गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून मा. पोलीस उप आयुक्त साो. श्री. अतुल झेंडे, व सहा पोलीस आयुक्त  साो. श्री. सुहास हेमाडे यांनी केलेल्या सुचनांप्रमाणे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गणेश जावदवाड यांनी आरोपीचा छडा लावण्यासाठी व शोध घेणेकामी डोंबिवली पोलीस ठाण्याचे शोध पथकांतील सपोनि. मुपडे व पोउनि. चव्हाण यांच्या दोन टिम तयार करुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नमुद गुन्ह्याच्या तपासादरम्यान घटनास्थळाचे व इतर ठिकाणाचे एकूण १०६ सी.सी.टिव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली असता आरोपी याने गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल क्र. एमएच-२०/ एफआर-१८५१ ही असल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे मोटार सायकल मालकास संपर्क केला असता त्याने सांगितले की, सदर मोटार सायकल त्यांने दिनांक २२/०८/२०२५ रोजी नारायण पेठ, पुणे येथे पार्क केली असुन सदर ठिकाणाहुन ती चोरीस गेली  आहे त्याबाबत विश्रामबाग पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा नोंद आहे. यावरून समजले की, दाखल गुन्ह्यातील आरोपी यांनी सदर मोटार सायकल चोरी करून डोंबिवली येथे येवुन चैन स्नॅचिंग केली आहे. त्या अनुषंगाने सदर आरोपी यांचा गुन्हा केलेल्या ठिकाणाचा माग घेवुन त्यांच्या बाबत अधिक माहिती प्राप्त केली. तपासादरम्यान गुन्हे तपास पथकांनी अथक परिश्रम घेवून सदर आरोपी हे सुनिल नगर, डोंबिवली (पूर्व) येथे येणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांना माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी सापळा लावुन सदर संशयीत्त इसमांना ताब्यात घेतले. त्यांना त्यांचे नावे विचारता त्यांनी त्याची नावे १) अभय सुनील गुप्ता, (वय: २१ वर्षे), राहणार. कुमारनटोला, खुटार रोड, गोला गोकर्णनाथ, ठाणे. गोला गोकर्णनाथ, जिल्हा. लखीमपूर खिरी, उत्तर प्रदेश, २) अभिषेक ओमप्रकाश जौहरी, (वय: ३२ वर्षे), राहणार, खोली क्रमांक १४/१५, हरिहरगंज, ठाणे. कोतवाली, फतेहपूर, जिल्हा फतेहपूर, उत्तर प्रदेश, ३) अर्पीत उर्फ प्रशांत अवधेश शुक्ला, (वय: २७ वर्षे), राहणार, खमरीया, ठाणे, खेरी, जिल्हा. लखीमपुर खिरी, उत्तरप्रदेश, अशी असल्याचे सांगितले. त्यांची अंगझडती घेता अभय सुनिल गुप्ता, याच्याकडे १ गावठी रिव्हॉलव्हर व अभिषेक ओमप्रकाश जौहरी, याच्याकडे ०४ जिवंत काडतूसं सापडले. तसेच त्यांच्या अंगझडतीमध्ये सोन्याचे दागिने मिळून आल्याने त्याबाबत अधिक चौकशी करता सदरचा मुद्देमाल हा डोंबिवली व मानपाडा पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच सदरची मोटार सायकल ही चोरीची असल्याने त्याबाबत विश्रामबाग पोलीस ठाणे, पुणे, येथे गुन्हा दाखल असल्याची माहीती प्राप्त झाली आहे. आरोपी यांच्याकडे १ गावठी कट्टा व ०४ जिवंत काडतूसं मिळून आल्याने त्यांच्यावर डोंबिवली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ६८४/२०२५ आर्म ऍक्ट कलम ३(२५) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे वरील आरोपीकडून पुढील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
१) ३०,०००/- रू. किंमतीचा एक देशी बनावटीचा गावटी क‌ट्टा..
२) ८,००० /- रू. किंमतीची, गावठी बनावटीची ०४ जिवंत काडतुसे..
३) ३७,२६०/- रू. किंमतीची, एक सोन्याची लगड, ४१४ ग्रॅम वजनाची..
(डोंबिवली पोलीस ठाणे गुरनं. ६८१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६), ३ (५)
४) २,१५.०१०/- रू. किंमतीचे, एक सोन्याचे मंगळसुत्र, २३.८९ ग्रॅम..
(मानपाडा पोलीस ठाणे गुरनं. १०५५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३ (५)
५) ९०,०००/- रू. किंमतीची. यामाहा कंपनीची एफझेड मॉडेलची नंबर एमएच-२०/ एफआर-१८५१ (विश्रामबाग पो.स्टे, पुणे, गुरनं १९९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम. ३०३ (२) 

तरी सदर ३ इसमांकडे वरिल प्रमाणे असा एकूण ३,८०,४२० /- रुपयांचा मुद्देमाल मिळून आला असुन नमूद गुन्हे उघडकीस आले आहेत.

जिल्हा ठाणे
१) डोंबिवली पोलीस ठाणे गुरनं.  क्रमांक ६८१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम. ३०९ (६). ३(५) मधील एक सोन्याची लगड, ४१४ ग्रॅम वजनाची..
२) मानपाडा पोलीस ठाणे गुरनं १०५५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम. ३०९ (४), ३(५) मधील एक सोन्याचे मंगळसुत्र, २३.८९ ग्रॅम वजनाचे, मध्यभागी दोन वाटया असलेले, अर्धवट तुटलेले..

पुणे जिल्हा
३) विश्रामबाग पो.स्टे. पुणे, गुरनं १९९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम. ३०३ (२) मधील मॅट ब्लॅक रंगाची एक यामाहा कंपनीची एफझेड मॉडेलची मोटार सायकल क्र. एमएच-२०/एफआर-१८५१..
४) बिबेवाडी पोलीस ठाणे गुरनं. २१०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम. ३०९(४) ३(५)
५) हडपसर पोलीस ठाणे गुरनं. ३६१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम. ३०३(२)
६) हडपसर पोलीस ठाणे गुरनं.  ७६३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम. ३०४(२) ३(५)

उत्तर प्रदेश राज्य येथे अटक आरोपी अभिषेक ओमप्रकाश जौहरी याच्यावर दाखल असलेले गुन्हे..
१) हारगाव पोलीस ठाणे गुरनं. २६६/२०१९ शस्त्र अधिनियम कलम ३, २५ प्रमाणे..
२) हारगाव पोलीस ठाणे गुरनं. क्र. २६९/२०१९ भादंवि. कलम ४११, ४१४, ४२०, ४६७, ४६८ प्रमाणे..
३) हारगाव पोलीस ठाणे गुरनं. २६४/२०१९ भादंवि. कलम ३९, ४०२ प्रमाणे..
४) कोतवाली पोलीस ठाणे गुरनं. ५९६/२०१९ भादंवि. कलम ३९२, ४११ प्रमाणे..

तसेच आरोपी अर्पित ऊर्फ प्रशांत अवधेश शुक्ला याच्या विरुद्ध भादंवि. कलम ३०२ प्रमाणे उत्तरप्रदेश मध्ये गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.

वरील आरोपी यांची पोलीस कोठडी मंजूर असून त्याचा अधिक तपास पोउनि. प्रसाद चव्हाण करीत आहे.

सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे, मा. सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. संजय जाधव, (पूर्व प्रादेशिक विभाग) कल्याण, मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ-३ कल्याण श्री. अतुल झेंडे,  मा. सहा पोलीस आयुक्त श्री. सुहास हेमाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली  मा. वपोनि. श्री. गणेश जावदवाड, मा. पोनि. श्री. विक्रम गौड, मा. पोनि.(गुन्हे) श्री. राजेंद्र खेडकर डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि. अच्युत मुपडे, पोउनि. प्रसाद चव्हाण, पोहवा. सुनील भणगे, मंगेश शिर्के, प्रशांत सरनाईक, पोकॉ. शिवाजी राठोड, नितीन सांगळे, राजेंद्र सोनावणे, देविदास पोटे, ज्ञानेश्वर शिंदे यांनी यशस्वीरित्या केली आहे.

विवाह नोंदणी सुट्टीच्या दिवशीही होऊन त्याचदिवशी मिळणार नोंदणी प्रमाणपत्र..

प्रतिनिधी : अवधुत सावंत

मुंबई :  नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा वेगवान तसेच सुलभकरण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांमध्ये आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडील विवाह नोंदणी सेवा अंतर्गत आता शनिवार व रविवार असे आठवडा अखेरीचे दोन्ही दिवस विवाह नोंदणी (वीकएन्ड मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस) करता येईल. एवढेच नव्हे तर, सोमवार ते शुक्रवार या कालावधीत दररोज होणाऱ्या नोंदणीपैकी २० टक्के नोंदणी या 'जलद विवाह नोंदणी सेवा' (फास्ट ट्रॅक मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस) म्हणून राखीव राहणार आहेत. या दोन्ही सेवांचा लाभ घेणाऱ्या दाम्पत्यांना नोंदणी केली त्याचदिवशी विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिले जाणार आहे, हे या सेवेचे वैशिष्ट्य आहे. 

प्रशासकीय कामकाजात सुलभता आणणे तसेच नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या सेवांमध्ये वेग आणणे, यासाठी सर्व विभाग तथा खाती यांनी आपापल्या स्तरावर प्रयत्न करावेत, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाने विवाह नोंदणी प्रक्रियेमध्ये सुलभता आणली आहे.

विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे प्रत्येक दाम्पत्यासाठी महत्त्वाचे दस्तावेज असते. वेगवेगळ्या शासकीय कामकाजासाठी ते आवश्यक असते. अलीकडच्या आकडेवारीनुसार, मुंबई महानगरपालिकेमध्ये वर्षभरात सुमारे ३० ते ३५ हजार विवाहांची नोंदणी होते. असे असले तरी, वर्षभरात होणारे विवाह पाहता ही आकडेवारी नक्कीच कमी आहे. याची कारणे प्रशासनाने शोधली असता लक्षात आले की, मुंबईतील नागरिकांना विवाह नोंदणी प्रक्रियेमध्ये वेळेअभावी अडचणी व गैरसोयी जाणवतात. या अडचणी कमी व्हाव्यात, विवाह नोंदणी प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत नवे उपक्रम सुरू करण्यात येत आहेत. त्याकरिता, महानगरपालिकेकडे केल्या जाणाऱ्या विवाह नोंदणी प्रक्रियेमध्ये दोन नवीन सेवा समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

नवीन सेवांपैकी एक सेवा ही कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांमधील 'जलद विवाह नोंदणी सेवा' (फास्ट ट्रॅक मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस) ही आहे. तर दुसरी आठवडा अखेरीची विवाह नोंदणी सेवा (वीकएन्ड मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस) आहे. या दोन्ही सेवांसाठी नियमित नोंदणी शुल्क, अधिक अतिरिक्त शुल्क रुपये २,५००/- इतकी एकूण रक्कम आकारण्यात येणार आहे. दोन्ही सेवांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, तपासणी व शुल्क भरणा ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नोंदणीच्याच दिवशी विवाह नोंदणी प्रमाणपत्र संबंधित दाम्पत्याला प्रदान करण्यात येईल. उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे म्हणाले की, या दोन्ही सेवा रविवार, २१ सप्टेंबर २०२५ पासून सुरु होणार आहेत. या दोन्ही नवीन सेवांमुळे विवाह नोंदणीची प्रक्रिया आणखी जलद होईल. तसेच, विवाह नोंदणीचे प्रमाण वाढेल, असा प्रशासनाला विश्वास आहे.

मुंबईतील धावपळीचे, धकाधकीचे आयुष्य लक्षात घेता, नोकरदार वर्गाला आणि व्यावसायिकांनाही कामकाजाच्या दिवसांमध्ये अतिरिक्त सुट्टी घेऊन विवाह नोंदणीसाठी महानगरपालिकेकडे यावे लागते. कारण, सोमवार ते शुक्रवार या कार्यालयीन कार्यकाळात, विवाह नोंदणीसाठी नवदाम्पत्य व साक्षीदारांना विवाह निबंधकासमोर (विभागीय आरोग्य अधिकारी) यांच्यासमोर प्रत्यक्ष उपस्थित राहणे बंधनकारक आहे. सबब, नोकरदार असो किंवा व्यावसायिक, पती-पत्नी किंवा त्यांचे साक्षीदार यांना आपल्या कामकाजाच्या दिवशी सुटी घ्यावी लागते. यामुळे संबंधितांची गैरसोय होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. ही अडचण दूर करण्यासाठी महानगरपालिकेने आठवडा अखेरीस (वीक एन्ड) म्हणजे शनिवार व रविवार या दोन्ही सुट्टीच्या दिवशी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत या कालावधीत विवाह नोंदणी सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये, दर शनिवारी महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांपैकी - 'ए', 'सी', 'ई', 'एफ दक्षिण', 'जी दक्षिण', 'एच पूर्व', 'के पूर्व', 'पी दक्षिण', 'पी उत्तर', 'आर मध्य', 'एल', 'एम पश्चिम', 'एस' या तेरा विभाग कार्यालयांत (वॉर्ड ऑफिस) विवाह नोंदणी सेवा देण्यात येईल. तर, दर रविवारी 'बी', 'डी', 'एफ उत्तर', 'जी उत्तर', 'एच पश्चिम', 'के पश्चिम', 'पी पूर्व', 'आर दक्षिण', 'आर उत्तर', 'एन', 'एम पूर्व', 'टी' या बारा विभाग कार्यालयांत (वॉर्ड ऑफिस) विवाह नोंदणी करता येईल, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली.

दरम्यान, कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी म्हणजे दर आठवड्यात सोमवार ते शुक्रवार या कामकाजाच्या पाच दिवसांमध्ये होणारी विवाह नोंदणीदेखील जलद व्हावी, संबंधितांना वारंवार महानगरपालिका कार्यालयात येण्याची गरज भासू नये, यासाठी आणखी एक सेवा कार्यान्वित करण्यात येत आहे. 'जलद विवाह नोंदणी सेवा' (फास्ट ट्रॅक मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस) म्हणून ही सेवा ओळखली जाईल. प्रत्येक विभाग कार्यालयामध्ये, सोमवार ते शुक्रवार या पाचही दिवशी, दररोजच्या ३० विवाह नोंदणी कोट्यामधून २० टक्के म्हणजे एकूण ६ विवाह नोंदणी या 'जलद विवाह नोंदणी सेवा' म्हणून राखीव राहतील. या जलद नोंदणीचा लाभ घेणाऱ्या दाम्पत्यांना, सर्व विहित प्रक्रिया पूर्ण करुन त्याच दिवशी विवाह नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. मात्र, या दोन्ही विवाह नोंदणी सेवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी (पब्लिक हॉलिडे) उपलब्ध नसतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ईद-ए-मिलाद व उद्याच्या अनंत चतुर्दशी निमित्त ठाण्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : ठाणे शहरात ईद-ए-मिलाद व उद्याच्या अनंत चतुर्दशीच्या गणेशोत्सव विसर्जना निमित्त होणाऱ्या मिरवणुका व या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयाने कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. ५ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत शहरात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका व धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून, कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी व हे उत्सव शांततेत पार पडण्यासाठी जास्तीत जास्त पोलीस मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे.

सणांच्या काळात गर्दीचा फायदा घेत चैन स्नॅचिंग, मोबाईल, पर्स व मोटारवाहन चोरीसारख्या घटना घडू नयेत यासाठी विशेष शाखा व गुन्हे शाखेतील साध्या वेशातील पोलीस अंमलदारांची वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली आहेत.
सोशल मिडीयावरून धार्मिक तेढ निर्माण करणारे मेसेज, पोस्ट किंवा व्हिडिओ पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरही पोलिसांची करडी नजर राहणार आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या सोशल मिडीया सेलला विशेष दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले असून, अशा प्रकारची माहिती नागरिकांनी मिळाल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे यांनी केले आहे.

बंदोबस्तासाठी उप-पोलीस आयुक्त ११, सहाय्यक पोलीस आयुक्त २६, पोलीस निरीक्षक १००, तसेच ७००० हून अधिक पोलीस अधिकारी व अंमलदार, मुंबई व लोहमार्ग पोलीस, एसआरपीएफच्या दोन तुकड्या व ८०० होमगार्ड्स यांची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय बंदोबस्तादरम्यान सर्व ठिकाणी ड्रोनचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे.

पोलीस प्रशासनाच्या या तयारीमुळे दोन्ही सण शांततेत व उत्साहात पार पडतील, असा विश्वास पोलीस आयुक्त यांच्याकडून व्यक्त केला जात आहे.

बेकायदेशीर अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस कासारवडवली पोलिसांनी केली अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तलयाचे कार्यक्षेत्रात बेकायदा अग्नीशस्त्र बाळगणे खरेदी-विक्री करणाऱ्या तसेच समाजात दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांविरुध्द कारवाई करण्याबाबत मा. पोलीस आयुक्त ठाणे यांनी सुचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने मा. पोलीस सह आयुक्त, व मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे शहर यांनी विशेष मोहिम राबवून कारवाई करण्याकरिता आदेशीत केले आहे. त्याअनुषंगाने श्री. प्रशांत कदम, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ - ५, ठाणे शहर श्री. मंदार जवळे, सहा. पोलीस आयुक्त, वर्तकनगर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहिम चालू आहे. त्यानुसार कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. निवृत्ती कोल्हटकर यांनी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना कासारवडवली पोलीस ठाणे हद्दीत व अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे खरेदी-विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.

दिनांक ०१/०९/२०२५ रोजी कासारवडवली पोलीस ठाणे तपास पथकाचे सपोनि. मनिष पोटे यांना नागलाबंदर सिग्नल जवळ, घोडबंदर रोड, ठाणे याठिकाणी एक इसम बेकायदेशीररित्या अग्नीशस्त्र विक्री करण्याकरीता येणार असल्याचे खात्रीशिर बातमी मिळाली होती. सदरची माहिती त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. निवृत्ती कोल्हटकर यांना कळविल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी नागलाबंदर सिग्नल जवळ, घोडबंदर रोड, ठाणे या ठिकाणी सापळा लावुन दिनांक ०१/०९/२०२५ रोजी २२:५५ दरम्यान इसम नामे जोगिन्दर लछीराम राजभर (वय: २७ वर्षे), धंदा: प्लंबर, राहणार: कासारवडवली, घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम मुळ राहणार ग्राम तणवा, ता. जखनिया, जि. गाझीपुर, राज्य उत्तरप्रदेश यास ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये त्याच्याकडे असलेल्या लाल रंगाची सॅक बॅगमध्ये एक देशी बनावटीचे पिस्टल मॅगझीन सह व ०२ जिवंत काडतुसे किंमत अंदाजे रु.६५,६००/- मिळुन आले. सदर अग्निशस्त्र व काडतुसे त्यांनी बेकायदेशीर बाळगल्याबाबत त्याच्याकडे कोणताही शस्त्र परवाना नसल्याने मा. पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांचे कडील मनाई आदेशाचा भंग केला आहे, त्याच्या विरूध्द कासारवडवली पोलीस स्टेशन गु.र.नं ८१९/२०२५ भा.ह.का.क. ३, २५ सह म. पो. अधिनियम कलम ३७ (१), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची उल्लेखनिय कामगिरी श्री. प्रशांत कदम, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-५, वागळे इस्टेट, ठाणे, श्री. मंदार जवळे, सहा. पोलीस आयुक्त, वर्तकनगर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली कासारवडवली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निवृत्ती कोल्हटकर, सपोनि. मनिष पोटे, पोउपनिरी. नितीन हांगे, सुनिल सुर्यवंशी, पो. अंमलदार. जगदीश पवार, जयसिंग रजपुत, गोरक्षनाथ काळे, संदीप तुपे यांनी केलेली असून पुढील तपास सपोनि. मनिष पोटे हे करीत आहेत.

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याप्रकरणी "महामुंबई मंथन" चे संपादक व विशाल वी. शेटे यांचे विरुद्ध ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : दिनांक १३/०८/२०२५ रोजी 'महामुंबई मंथन' या वृत्तपत्राच्या पानावर महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करून अनुसूचित जाती समाजातील लोकांचा अवमान करणारी बातमी सुपारी घेऊन छापून आणल्यामुळे "महामुंबई मंथन" चे संपादक व संस्थापक अध्यक्ष (सेफ्टी वेल्फेअर असोसिएशन) चे विशाल वी. शेटे यांनी या प्रकरणाला कटकारस्थान रचून आर्थिक देवाण-घेवाण करून शहरात जातीय दंगल घडवून आणू पाहणाऱ्या 'अविष्कार बार रेस्टॉरंट' तसेच 'गुरुदेव पॅलेस गेस्ट हाऊस' चे मालक अभय गोरे, मुलगा अभिजीत अभय गोरे, सौ. आशा अभय गोरे या सर्व जातीवाद्यांवरती ऍट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत कलम ३(१) (आर) (एस) (टी) (यु) व्ही प्रमाणे तसेच बी.एन.एस कायदा कलम २९९, ३५२, ३५६, ६१, ७ प्रमाणे तसेच इतर संबंधित कायद्याप्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याबाबत यावी अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लक्षणराव अंभोरे यांनी अशी मागणी डोंबिवली पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. सुहास हेमाडे यांच्याकडे केली आहे.
:
दिनांक १३/०८/२०२५ रोजी 'महामुंबई मंथन' या वृत्तपत्राच्या पानावर महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करून अनुसूचित जाती जमातीतील लोकांचा अवमान करणारी बातमी वृत्तपत्रावर छापून प्रसिद्ध करण्यात आली त्या संबंधात ह्या अगोदर संविधान चौकात बाजूलाच असणाऱ्या 'अविष्कार बार रेस्टॉरंट' व 'गुरुदेव पॅलेस गेस्ट हाऊस' असणाऱ्या रेसिडेन्शिअल बिल्डिंगमध्ये अनाधिकृत अतिक्रम केलेला 'अविष्कार बार रेस्टॉरंट' तसेच रेसिडेन्शिअल बिल्डिंगमध्ये वेश्याव्यवसाय चालवणारे 'गुरुदेव पॅलेस गेस्ट हाऊस' तसेच त्या बिल्डिंगमध्ये अनाधिकृतपणे काम चालू असल्याच्या तक्रारी महानगरपालिका व पोलीस स्टेशनला याआधी देण्यात आलेल्या असून याचाच मनात राग धरून पैशाच्या जोरावर काही जातीयवादी पत्रकार/संपादक हाताशी धरून आर्थिक देवाणघेवाण करून एकत्रित येऊन कटकारस्थान रचून जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या जातीयवादी रेस्टॉरंट बारचे मालक लॉजिंग चालक-मालक अभय गोरे, मुलगा अभिजीत अभय गोरे, सौं. अशा अभय गोरे, 'महामुंबई मंथन' वृत्तपत्राचे संपादक व विशाल वि. शेटे (संस्थापक अध्यक्ष सेफ्टी वेल्फेअर असोसिएशन) या सर्वांवरती ऍट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे तसेच इतरही संबंधित कायद्याप्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी असे पत्र दिनांक २१/०८/२०२५ रोजी देण्यात येणाऱ्या ह्या तक्रारी अर्ज संदर्भात संबंधितांवरती चौकशी होऊन ३०/०८/२०२५ पर्यंत गुन्हा दाखल करण्यात यावा असे मागणीत नमूद करण्यात आलेले होते. फौजदारी गुन्हे दाखल न करण्यात आल्यास कुठलीही सूचना न देता दिनांक १०/०९/२०२५ पर्यंत गुन्हे दाखल नाही केल्याप्रकरणी संबंधित पोलीस ठाणे कार्यालयावर पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चामध्ये शहरातील सर्व बहुजन पक्ष सामील होणार असल्याची नोंद व माहिती लक्षणराव अंभोरे यांनी  प्रसिद्धी पत्रकातुन दिली आहे.